Skip to main content

हलकल्लोळ - १ (उपोद्घात)

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 03/08/2012 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी जयेशने मला 'केऑस्' ह्या नावाचं पुस्तक दिलं. का कुणास ठाऊक, पण अनेक दिवस माझी समजूत अशी होती की केऑस् हा विषय अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्सशी निगडीत असावा. जयेशनी थोडीफार कल्पना दिली होती, पण ते पुस्तक उघडण्याची इच्छा अनेक दिवस मला झाली नाही. (पुस्तक मुखपृष्ठ छायाचित्र सौजन्य -  http://www.midshelf.com/ProductSummary.aspx?P=9780749386061 ) अश्याच एका कोणत्या तरी दिवशी 'बघुया काय आहे ते' या विचारानी मी ते पुस्तक उघडलं आणि मग मात्र त्यात गुंगून गेलो.

बायोहजार्ड भाग १ /३

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 03/08/2012 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
वसूने डाव्या कोपराने स्टेरलियम च्या बाटलीचे बटण दाबले. ते निळे द्रावण उजव्या हातात घेतले. प्रथम दोन्ही हातांची बोटे चोळली मग तळहात. मागची बाजू. आधीच उघडून ठेवलेले निर्जंतुक ग्लोव्ह्ज चिमटीने उचलून हातांवर चढवले. अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. पहिला दरवाजा उघडला. मग दुसरा दरवाजा उघडण्यासठी तिने पुन्हा अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. ती तिच्या कॅबिनेट मधे दाखल झाली. डॉ. वसुंधरा सुब्रमण्यम वय वर्षे ४३. अविवाहित. ती एम. बी. बी. एस.

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

लेखक मन१ यांनी शुक्रवार, 03/08/2012 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा:- पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी. अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं. शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती.

नो प्रोब्लेम ...

लेखक यशोधन वर्तक यांनी शुक्रवार, 03/08/2012 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक प्रोब्लेम्ला उत्तर हे असताच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो , कधी पैसा हवा असतो तर कधी मानसं . या तीन गोष्टींच्या टप्प्या पलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो ....वपुर्झा ..व . पु . काळे यांनी काही वर्षांपूर्वी या ओळी लिहिल्या आणि प्रोब्लेम्स कडे पाहायचा आपला नजरीयाच बदलून गेला. त्या आधीचा माझं जगणं म्हणजे ' बाहर है प्रोब्लेम घरमे है प्रोब्लेम ...आगे पीछे आजू बाजू प्रोब्लेम हि प्रोब्लेम ' असे होते. मला आठवतंय लहानपणी शाळेत असताना गणित हा विषय म्हणजे माझं शत्रू नंबर वन . उदाहरण संग्रह सोडवून तयार ठेवणे हा माझ्या समोरचा मोठा प्रोब्लेम असे.

जीवनव्रती...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 03/08/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणातला मंडणगड तालुका म्हणजे एकेकाळी सरकारी नोकरांसाठी `अंदमान'! इथे बदली होणं ही शिक्षा समजली जायची. याच तालुक्यातल्या हजारभर वस्तीच्या घराडी गावातली ही कथा. रायगड जिल्ह्य़ात उरण गावातली शाळा आजही `किनरे गुरुजींची शाळा' म्हणून ओळखली जाते. गावातल्या पालकांनी मुलांना शाळेत पाठवावं म्हणून किनरे गुरुजींनी घरोघर अक्षरश: वणवण करून पटसंख्या जमविली. ९० मुलांनिशी सुरू झालेल्या या शाळेत आज चार हजार मुलं आहेत. किनरे गुरुजींचं शाळेशी असलेलं नातं आजही शाळेनं जपलंय. किनरे गुरुजींच्या पत्नीचं माहेर घराडीतलं. वागळ्यांकडचं. माहेरचं हे घर किनरे यांच्या पत्नीला मिळालं होतं.

'आम्ही ऑलिम्पिक बघितले' : लंडन २०१२ तिकीट - फ्रॉड (झोल) वेब साईट

लेखक स्वरालि यांनी शुक्रवार, 03/08/2012 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन २०१२ ची तिकिटे resale ला ठेवली आहेत असे समजले. दीड वर्षापूर्वी लंडन २०१२ official वेब साईट वर रजिस्टर करूनही (कोणत्याही खेळाचे) तिकीट मिळाले नाही, म्हणून खूप वाईट वाटत होते...आणि रागही येत होता (विशेषतः टीवी वर ऑलिम्पिक खेळ होताना 'रिकाम्या सीट्स' बघून मनात नुसता राग खवळत होता). लंडन मध्ये असूनही एकही ऑलिम्पिक खेळ बघायला न मिळणे म्हणजे काय?

रद्दीवाला -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 03/08/2012 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
रद्दीवाला "या कविराज"- म्हणून माझे स्वागत करतो त्याच्या पैशानेच मला तो कटिंग चहा पाजत असतो - मला भेटल्यावरती तो आनंदी अन् खुषीत दिसतो माझ्या कवितेच्या रद्दीवर त्याचा धंदा चालू असतो ! एके काळी 'रद्दीवाला' म्हणून ज्याला हिणवत होतो सलाम करुनी मी आता त्याचे जंगी स्वागत करतो - "आभारासह परती"चा कविता-कचरा माझा घेतो रद्दीवाला धंदा करुनी , धंद्यामधुनी 'सोने' घेतो ! कवितांच्या रद्दीने माझ्या, रद्दीवाला झाला 'राव' 'अध्यक्ष'पदी खुर्चीवरती देणगीसाठी त्याचे नाव - व्यासपिठावर बसून हल्ली तो कविसंमेलन गाजवतो समोर सतरंजीवर बसुनी आम्ही टाळ्या वाजवतो !
काव्यरस

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 03/08/2012 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून. त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह! - २

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 03/08/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावरचा मूळ धागा बिपिन कार्यकर्ते यांचा आहे. शीर्षक तेच घेऊन भाग दोन असे स्वरूप केले आहे. त्यासाठी त्यांची परवानगी घेतलेली नाही. त्याबद्दल क्षमस्व. काल मंत्रालयात बैठक झाली. पतंगराव कदम आणि रामराजे नाईक-निंबाळकर त्यावेळी होते. माझ्या मंत्रालयीन स्रोतांकडून मी त्या बैठकीसाठीच्या टिपणातील एक कागद मिळवला आहे. तो नुकताच हाती आला. हे एक कोष्टक आहे. जलसंपत्ती खात्याने तयार केलेले. ते जसेच्या तसे खाली देतोय. या संस्थळाच्या प्रत्येक सदस्याने त्या कोष्टकाचा आपापला अन्वयार्थ लावावा, येथे मांडावा. धरणग्रस्तांचे मुद्दे खरे-खोटे ठरवावेत. यानिमित्ताने तुमच्या मनात येणारे प्रश्न येथे उपस्थित करा.