मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयर्नमॅन : कौस्तुभ राडकर

श्रीरंग ·
लेखनविषय:
आजच लंकावी - मलेशिया येथे पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून पुण्याच्या कौस्तुभ राडकरने विक्रम प्रस्थापित केला. अत्यंत कठिण अशी ही स्पर्धा पूर्ण करण्याची ही त्याचे नववी वेळ आहे. हा पराक्रम करणारा तो एकमेव भारतीय असून, जगातील सर्व खंडांमध्ये भाग घेऊन ही कामगिरी करणार्या मोजक्या दुर्मीळ ट्रायथलीट्समध्ये त्याने स्थान मिळवले आहे. आयर्नमॅन विषयी : आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते. जलतरण, धावणे, व सायकलिंग या तिन्हीचा समावेश असलेल्या ट्राएथ्लॉन या क्रीडाप्रकारातिल ही स्पर्धा जगभरात विवइध ठिकाणी भरवली जाते.

कुणी जाल का सांगाल का

संजय क्षीरसागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विरहाची व्यथा प्रियकरानं आणि तीही गाण्यातून सांगावी असा योग दुर्लभ. कवी अनिलांची ही अन्योक्ती अलंकारातली कविता, कोकिळेकडे संकेत करत विरहवेदना इतकी नज़ाकतीनं मांडते की नुसत्या काव्यार्थाशी जरी समत्व साधलं तरी रसिक दाद देईल. एकेक ओळ, एकेक शब्द, लयीचा असा काही तोल सांभाळत लिहीलायं की क्या कहेने! म्हणजे एक तर काव्यविषय वेगळा तरीही अत्यंत तरल, त्यात विरहाची विविधांगांनी अशी काही मांडणी की जान कुर्बान. त्यात कहर म्हणजे वसंतरांवचा चिरतरुण आवाज. जणू काही स्वतःचीच कविता असल्यासारख्या हुकुमतीनं त्यांच वेदनेची तरलता व्यक्त करणारं गाणं. जरा कालावधी सापडायचा आवकाश की वसंतराव शब्दाचं सोनं करणार.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

सोत्रि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
chawadee “नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत. “अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात!

स्वायत्त महाराष्ट्र

विजुभाऊ ·
राज ठाकरेनी परवा महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिन्ट प्रकाशीत केली. यात महाराष्ट्राच्या विकासा बद्दल बरेच मुद्दे आहेत. पायाभूत सुविधा ,मुलभूत गरजा , प्रशासन , प्रगतीच्या संधी अशा अनेक अंगाने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केलेला आहे. यात काही ठिकाणी उदा: प्रशासन : यात राज्याचे परराष्ट्र धोरण हे वेगळे विधान आहे. यात म्हंटले आहे की. विकासात्मक व्यापार वृद्धीसाठी राज्याची थेट, स्वतंत्र व सक्रिय भूमिका
आज जागतिकीकरणामुळे सगळे देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. या देशांतील राष्ट्र सरकारांपेक्षा राज्य सरकारांना कधी नव्हे ते जास्त महत्त्व आले आहे.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ७

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२९ जुलै १८५४ ला जॉन रे ने नौदलाच्या सेक्रेटरीला आपल्याला मिळालेली सर्व माहीती संकलीत करुन संदेश पाठवला. रिपल्स बे, जुलै २९ या वर्षीच्या वसंत ऋतूतील बुथिया आखाताचं सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या मोहीमेवर माझी वाटचाल सुरु असताना पेली उपसागरात माझी काही एस्कीमोंशी भेट झाली. त्यांच्यापैकी एकाकडून पश्चिमेच्या दिशेला एका मोठ्या नदीपलीकडे गोर्‍या लोकांची एक तुकडी उपासमारीने प्राणाला मुकल्याचं मला कळून आलं.

बखरींची सांगी अन पुराणातली वांगी

माहितगार ·
तर्क क्रमांक (अर्ग्यूमेंट) १) मुळात अबकडकालीन पुरावेच कमी आहेत. त्यामुळे निष्कर्ष आणि संदर्भ केवळ नंतर उपलब्ध झालेल्या बखरीतुन आणि दस्तावेजातुनच मिळु शकतात. जर तत्कालीन (प्रमाण) दस्तावेजच फक्त मान्य करायचे झाले तर बर्‍याच राजांचे अस्तित्वच नाकारायला लागेल आणि खुद्द अबकड-राजांबद्दल फार कमी माहिती मिळते. आणि मग त्या प्रवाहात तुम्हाला बर्‍याच सरदारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या कर्तुत्वाकडे डोळेझाक करावी लागेल. बखरीतील स्वतःला पाहिजे तेवडीच माहिती सलेक्टीव्हली नाकारणे बाकी स्विकारणे न्याय्य (फेअर) नाही. म्हणून बखरींमधील सर्व माहिती स्विकारली पाहिजे.

काय रे देवा… (संदीप खरे यांची माफी मागून )

माम्लेदारचा पन्खा ·
लेखनविषय:
आता पुन्हा निवडणुका येणार तेच उमेदवार हात जोडत येणार मग आपण खोटं खोटं हसणार मग मधेच डोक्यात प्रश्न येणार हे आज इथे कशाला येणार ? काय रे देवा.… मग तो पडलेला प्रश्न विचारता नाही येणार मग आम्ही तो गिळणार मग गिळूनही तो पुन्हा विचारावासा वाटणार मग समोरच्या उमेदवाराच्या डोळ्यातही तो दिसणार तो निर्लज्ज असेल तर त्यावर हसणार त्याच्याही मनाला टोचत असेल तर नजर चुकवणार मग नसताच बघितलं तसं तर बरं झालं असतं असं वाटणार आणि ह्या सगळ्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसणार मग त्यावेळी नेमकी दुसरी प्रचारटोळी येणार मग त्यात मागच्या वेळी निवडून दिलेला उमेदवार असणार मग त्याने तेव्हा बरीच आश्वासनं दिलेली

Blue Print

सुहास.. ·
काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत. सर्वात महत्त्वाचे .. मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही.

खेळ मांडला !!

चिनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहानपणी आम्ही भावंड (मी ,मोठा भाऊ ,दोन चुलत बहिणी ) दुपारच्या वेळी घरात लपाछुपी खेळायचो . घरात शक्य होईल तितका गोंधळ घालणे , हा त्या मागचा उद्देश असायचा. घरातील मोठयांना आमच्या आवाजाचा त्रास व्हायचा . पण आम्हाला त्याची फिकीर नव्हती. मग खेळात आणखी मजा यावी म्हणून आम्ही दोघादोघांचे दोन गट तयार केले. आपल्या सोयीसाठी माझ्या आणि चुलत बहिणीच्या गटाला आपण "आघाडी" असं नाव देऊ . आणि मोठा भाऊ व दुसर्या बहिणीच्या गटाला "युती" म्हणुया. एकदा आघाडीने युतीला शोधायचं मग युतीने आघाडीला शोधायचं असं ठरलं . आणि खरंच आम्हाला खेळण्यात जास्त मजा येऊ लागली .