Skip to main content

आमची संगीत यात्रा..

लेखक भम्पक यांनी गुरुवार, 21/03/2024 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल पोराने ऑनलाईन मागवलेला अँपल चा एअरपोड आला. चेक करू म्हटले तर काय तंत्रज्ञान प्रगत झाले आहे याचा प्रत्यय आला. त्यात नॉइज कॅन्सलेशन चा पर्याय होता .आता नॉइज कॅन्सलेशन म्हणजे त्या एअरपोड मध्ये अशी काही रचना असेल कि ते कानात फिट बसतील अन बाहेरचा गोंगाट कमी होईल अशी माझी भाबडी समजूत.पण या एअरपोड ने तीला मूठमाती दिली.कारण कानात बसवल्या बसवल्या जेव्हा नॉइज कॅन्सलेशन चे ऑप्शन निवडले अन एकदम प्रचंड शांतता पसरली. बापरे हे मात्र जबरीच होते अन संगीत हि एकदम शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळत होते.अर्थातच इंग्लिश गाणी..आजूबाजूला असलेला गोंधळ कणभरही जाणवत नव्हता.मी प्रचंड प्रभावित झालो.

रखमाई

लेखक मी-दिपाली यांनी गुरुवार, 21/03/2024 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
“ मून पे कदम रखनेवाला पहला इंसान कौन था ?” लेक्चर हॉलमध्ये प्रोफेसर विरू सहस्रबुद्धे उर्फ व्हायरसने प्रश्न विचारताच एकापाठोपाठ अनेक आवाज ऐकू येतात उत्तरादाखल, “ नील आर्मस्ट्रॉंग, सर. ” “ obviusly he was, we all know it. लेकिन दुसरा कौन था ? ” “.....” विचाराला फारसा अवधीही न देता लगेचच व्हायरसचं पुढचं वाक्य कानावर पडतं, “ Don't waste your time, it is not important. Nobody remembers the man whoever came second..” ‛थ्री इडियट्स' चित्रपटातील हा प्रसंग. असंच काहीसं ‛दुसरेपणाचं’ नशीब घेऊन जन्माला आलेलं एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे ‛डॉ. रखमाबाई राऊत' ! डॉ.

माझी मॅट्रिक आणि आत्ताच्या एक्झाम्स.

लेखक आजी यांनी गुरुवार, 21/03/2024 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
त्या अनादि,अनंत, सर्वसाक्षी जगन्नियंत्याने आपल्या ललाटावर भाग्यरेखा लिहिताना अहर्निश परीक्षा देणंच लिहिलं आहे,असं प्रत्यंतर प्रत्येक जीवात्म्यास हा भवसागर पार करत असताना येत असतं! बास,बास,बास! पिळापिळी पुरे! ह्याच लायनीवर ही सगळी पोस्ट लिहीत बसले ,तर माझी दमछाक होईल. सोप्या भाषेत मला एवढंच म्हणायचं आहे की, आपल्यापैकी प्रत्येकाच्या नशिबात, रोजच्या व्यवहारात परीक्षा देणं लिहिलेलंच असतं. खरं तर मला रोजच्या रोज येणाऱ्या संकटरुपी परीक्षेवर लिहायचंच नाहीये. मला लिहायचंय ॲक्चुअल परीक्षेवर.

कॉफी...

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 21/03/2024 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा स्वच्छ टॉवेल गुंडाळून शॉवर मधून बाहेर येत तू मला कॉफी विचारतोस. तुझ्या आजुबाजुला शॅम्पूचा वास घमघमत असतो, माझ्या तनामनावर तृप्तीची गोड साय धरलेली असते. ती मोडून कॉफी पिणं जीवावर येतं. शिवाय तशीही कॉफी काही माझी फार आवडती असंही नसतं. पण तरीही, मी मान हलवत होss म्हणते. कारण तुला ती करताना पहाणं कॉफीहूनही फ्रेश असतं. तू बोलता बोलता पाणी उकळायला ठेवतोस. मग "मग" घेतोस. मी लगेच " मला तुझ्यातलीच शेवटची थोडी" म्हणून तुझी लगबग थोडी कमी करते. तू शांतपणे कॉफीचे दोन सॅचे त्यात रिकामे करतोस.

बाँड आणि बांध

लेखक कुमार जावडेकर यांनी बुधवार, 20/03/2024 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन - 'बाँड' बाँड हा वटण्यास थोडा समय आहे आणि त्याला देणगीचे वलय आहे बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी बातम्या मज वाचण्याची सवय आहे सांग आता मी खरे बोलू कुणाशी झूठ येथे बोलण्याला अभय आहे 'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?' शासनाची का तमा मी बाळगावी? आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे - 'सुमार' जावडेकर माझीच मूळ गझल - 'बांध' बांध हा फुटण्यास थोडा समय आहे आणि मागे जीवनाचा प्रलय आहे बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी चेहरे मज वाचण्याची सवय आहे सांग आता मी खरे बोलू कुणाशी झूठ येथे बोलण्याला अभय आहे 'शहर हे बदलून टाकू' ते म्हणाले बोललो त्यांना 'जुना हा विषय आहे' वादळाची का
काव्यरस

विचित्रविश्वात भागो.

लेखक भागो यांनी मंगळवार, 19/03/2024 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
विचित्रविश्वात भागो. एक काळ असा होता कि मी खूप गरीब होतो. पदवीधार झालो नि तडक मुंबई गाठली. कुरिअर कंपनीत नोकरी मिळवली. त्या कंपनीतच मित्र मिळाले. त्यांच्या खोलीतच एक कॉट घेतली. भाड्याने. मग घरातले सगळे लग्न कर म्हणून पाठी लागले. मुलगी गावातलीच आमच्यापैकीच होती, माहितीतली होती. “बाबा, पण मला राहायला जागा नाही.” मी तक्रारीच्या स्वरात सांगितले. बाबा एकदम भडकले, “लग्नाचा आणि जागेचा काय संबंध? अरे तिची पत्रिका मी बघितली आहे. निवासस्थानाचे ग्रह उच्चीचे आहेत. तुम्ही दोघं राजा राणी बनून राजवाड्यात रहाल. राजवाड्यात.” बाबांच्या भरोश्यावर मी लग्न करून टाकले.

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/03/2024 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......

प्रकाश प्रदूषण - ज्योतिर्मा तमसो गमय।

लेखक चामुंडराय यांनी सोमवार, 18/03/2024 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात वावरताना आपले शरीर पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारची माहिती गोळा करून ती संदेशाच्या स्वरूपात सर्व बाजूंनी बंद अशा अंधार कोठडीत असलेल्या त्याच्या कडे पाठवते. तो (पहिला) ह्या गोळा झालेल्या सर्व माहितीचे विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो. ह्या निष्कर्षांद्वारे तो (दुसरा) ह्या जगाची अनुभूती (first person, internal and subjective experience - Qualia) घेत असतो. ह्यातील पहिला म्हणजे आपला मेंदू आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः (म्हणजे नक्की कोण?). ह्या भौतिक संदेशांची अनुभूती मात्र अभौतिक असते आणि हा बदल नक्की कसा होतो ह्याचे आकलन झालेले नाही.

भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग २

लेखक गोरगावलेकर यांनी रविवार, 17/03/2024 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ येथे वाचा कशेळीहून गणपतीपुळेला निघालो. सागरी किनाऱ्याच्या रस्त्याने प्रवास करत वाटेत जमेल तेव्हडी ठिकाणे पाहणार होतो. कशेळीजवळ कातळशिल्प आहेत ती बघायची होती. शिल्प मुख्य रस्त्यापासून थोडी दूर आहेत. थोडे अंतर पायी चालावे लागते. चालायची तयारी होती पण कोणी वाटाड्या मिळाला नाही म्हणून विचार रद्द केला. कशेळी हे कनकादित्य मंदिरासाठी प्रसिद्ध असले तरी येथे अजून एक सुंदर मंदिर आहे ते म्हणजे श्री लक्ष्मीनारायण मंदिर. थोड्याच वेळात येथे पोहचलो.