भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग ४
भाग ३ येथे वाचा
काल रात्री आम्ही सावित्री नदी पार करून हरिहरेश्वरास आलो होतो. सावित्री नदीच्या दक्षिण तीरावर जेथून फेरीबोट सुटते तेथे वेश्वी गाव आहे आणि येथेच रत्नागिरी जिल्ह्याची हद्दही संपली. नदीच्या उत्तर तीरावरील बागमांडला येथे पोहचताच आमचा आता रायगड जिल्ह्यात प्रवेश झाला होता.
आज सहलीस निमित्त ठरलेला दिवस म्हणजेच 'महिला दिन' उगवला. ध्यानी मनी नसतांना आज महाशिवरात्रीच्या शुभ दिनी आम्ही दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरास येऊन पोहचलो होतो. मंदिरात प्रचंड गर्दी असणार होती.
मिसळपाव