कधी निसटले धागे
मज कळलेच नाही
कशी उसवली वीण
मज कळलेच नाही
त्या निवांत भेटी
त्या एकांत गाठी
डोळ्यांत हर्षाचे झरे
अन देहांची मिठी
क्षण ते सरले जरी
मन ते भरलेच नाही
ती मधाहूनी गोड
कुठे हरवली ओढ ?
अशी कशी मुक्याने
मोडली माझी खोड
माणसाचे मन ते
मज उमगलेच नाही
येते रात सजुनी
येतो पाऊस अजुनी
शालीन थंडी गुलाबी
मारते मिठी बाजूनी
मग कसा प्रेमाचा
ग्रीष्म गेला विझुनी ?
काय खरं नि खोटं
तू मज वरलेच नाही ?
प्रतिक्रिया
1 Dec 2025 - 7:29 pm | कर्नलतपस्वी
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामीनी.....
सखी मंद झाल्या तारका.....
तरूण आहे रात्र अजूनी....
किंवा.....
दोन रात्रीतील आता संपला वेडेपणा.....
1 Dec 2025 - 11:29 pm | सुक्या
प्रत्येकाच्या आयुष्याचा एक हळवा कोपरा . . .
पुलेशु.
7 Dec 2025 - 11:28 pm | बिपीन सुरेश सांगळे
या कवितेचा संदर्भ ही एक चर्चेतील , ताजी आणि दुर्दैवी गोष्ट आहे .
असो .
सर्व वाचकांचे आभार