गाभा:
कोण आहे जबाबदार ह्या सर्व गोष्टींना.
1. पूर्णतः कोलमडलेली प्रशासकिय व्यवस्था
2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार
3. बेफिकीर सामान्य माणूस
4. धर्म जात आधारित प्रचंड लोकसंख्या
5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात)
6. अडाणी आणि अशिक्षित लोक
7. परदेशी स्थायिक नागरिक
8. राजकीय व्यवस्थेचा भयंकर तिटकारा असणारे सो कॉल्ड सुशिक्षित लोक
9. व्यवस्थेला लुटणारे भांडवलदार आणि टॉप सरकारी अधिकारी
खेदाने म्हणावे वाटतेय कि गुलामी ब्रिटिश सरकार बरे होते, सामान्य लोकांचे तरी विचार करायचे देशाची लुट करून...
**** इतर आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि धागा विषयास संबॅधित चर्चा सहभागासाठी अनेक आभार
प्रतिक्रिया
21 Aug 2020 - 6:48 am | बाप्पू
सर्टिफिकेट चे माहिती नाही.. पण
औरंगझेब, बाबर, खिलजी, टिपू आणि तत्सम लोकांच्यावर प्रेम करणे आणि इथे बसून, इथले खाऊन पॅलेस्टिन मध्ये काय होतय याचा जास्त विचार करणे, आपले वेगळे मोहेलले बनवून मिनी पाकिस्तान आणि बांगलादेश वसवणे, दहशतवाद्यांना सॉफ्ट कॉर्नर देणे इ इ हे प्रेत्येक देशभक्ताला खटकतेच.
तुमच्या असल्या चाळ्यांमुळे तुम्हाला दे देशद्रोही म्हणले तर वावगे ठरणार नाही.
मान्य आहे सगळे असे नसतात पण सुक्यासोबत ओले पण जळणारच.. !!
21 Aug 2020 - 8:50 am | Gk
मग अमित शहाला सांगा
आम्हाला काय मोघल परदेशी वाटत नाहीत , शेवटी किती झाले तरी ते राजपुतांचे जावइ होते
21 Aug 2020 - 8:53 am | Gk
दहशत वाद्याना डोवाल , बाजपेयीं ह्यांनी घरी सोडले
आमच्या काँग्रेसने कसाबला फाशी दिली
काँग्रेसने मसूदला पकडले , भाजपाने सोडले
भाजपाने अफजलला पकडले , काँग्रेसने फाशी दिले
काँग्रेसने कसाबला पकडले , काँग्रेसने फाशी दिले
आमचे आमच्या काँग्रेसवर प्रेम होते , आहे आणि राहणार
21 Aug 2020 - 10:24 am | Rajesh188
काँग्रेस वर तुमचे प्रेम आहे चांगले आहे ना
निष्ठा असायलाच हवी .
असंख्य नेते,जनता काँग्रेस पासून लांब जात असताना सुद्धा तुम्ही तुमचा पाठिंबा काँग्रेस ला देतात चांगले आहे.
पण आता ती पहिली कॉग्रस राहिली नाही,
पहिल्या सारखे कर्म वादी नेते काँग्रेस कडे नाहीत.
मग तुम्ही का पाठिंबा देत आहात.
21 Aug 2020 - 11:03 am | Gk
आमची काँग्रेस तशीच आहे,
काँग्रेसचे लोक वाईट असते , तर मोदिने त्यांना तुरुंगात घातले असते , पक्षात घेतले नसते
21 Aug 2020 - 12:04 pm | बाप्पू
अमित शहा चा आणि माझा काय संबंध?? तुमच्या विरुद्ध मते असणारा प्रत्येक माणूस तुम्हाला भाजपप्रेमी, मोदीभक्त का वाटतो?
तुमच्या प्रमाणे मी माझी बुद्धी एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधलेली नाहीये.
काय चूक आणि काय बरोबर हे माझ्या बुद्धीने ठरवतो. राजमाता, किंवा राजपुत्र किंवा एखाद्या खानदानाकडे मी अक्कल गहाण ठेवलेली नाहीये..
21 Aug 2020 - 12:12 pm | Gk
तुम्हीच बोलले की अमुक तमुक गद्दार आहेत,
तर गृहमंत्री अमित शहा ह्यांना कळवणे , हे नागरिक म्हणून तुमचे कर्तव्य आहे
मला तरी कुणी गद्दार दिसला तर मीही अमित शहालाच कळवणार
21 Aug 2020 - 1:03 pm | Gk
कासमिर प्रश्न निर्माण झाला, ह्याला जबाबदार नेहरू,
मग हेच लॉजिक लावले तर तुमची हिंदू देवळे पडली , बायका पळवूननेल्या , मोघल आले , इंग्रज आले , तर ह्याला जबाबदार तुमचे त्याकाळचे हिंदू राज्यकर्ते आहेत , ते जनतेकडून टेक्स गोळा करत होते , जनतेचे रक्षण करणे , हे त्यांचे कर्तव्य होते , त्यांच्या वंशावळी काढा अन विचारा
विचारा त्यांना , मोगलांनी लुटले , इंग्रजानी लुटले , मग हिंदू राजघराणी , सरदार घराणी मात्र इतिहासात श्रीमंतच कशी राहिली ? देवळांचे , बायकांचे रक्षण का झाले नाही ?
आज सुशांत प्रकरणात काँग्रेसला , ठाकरेना विचारताय ना प्रश्न ? तसेच त्यांना विचारा
आणि जुन्या स्त्री पुरुषणबद्दल इतका असेल कळवळा तर त्यांना हिंफु धर्मात घ्या परत आणि रोटीबेटी व्यवहार सुरू करा. पाकिस्तानातून गरीब हिंदू आणा
काँग्रेसच्या पंतप्रधानाने इटलीची गरीब बारबाला घरात आणली , दोन भिन्न धर्माचे असूनही एकत्र नांदले
21 Aug 2020 - 2:06 pm | बाप्पू
_^_
21 Aug 2020 - 3:56 pm | आनन्दा
पक्का हा माणूस काँग्रेसी नाहीये. हा छुपा भाजपेयी आहे.
21 Aug 2020 - 4:17 pm | शाम भागवत
हाहाहाहाहा!!!
21 Aug 2020 - 12:08 am | कानडाऊ योगेशु
गर्व नव्हे हो अभिमान म्हणा.
जिथे मायमराठीचेच मातेरे होतेय तिथे संस्कृत शिकुन काय दिवे लागणार आहेत.
बाकी सामान्य माणसाचे आयुष्य हे कधीच मुख्य मुद्द्यत (फोकस मध्ये) येण्याजोगे महत्वाचे नव्हते.
आयुष्य सुखकर करावयाचे असेल तर असामान्य बना असे म्हणुन मी माझे चार शब्द संपवितो.
21 Aug 2020 - 12:59 am | अर्धवटराव
महंते महंत करावे...
21 Aug 2020 - 4:27 pm | Rajesh188
BJP च्या हिंदुत्व वादी भूमिकेला पाठिंबा म्हणून लोकांनी bjp ल निवडून दिले आहे हा सर्वात मोठा गैर समाज आहे.
अगदी मुस्लिम लोकांनी सुद्धा bjp ल भरघोस मत दिली आहेत .
आता पर्यंत काँग्रेस नी फक्त मुस्लिम लोकांचा फक्त वापर करून घेतला आणि नेहमीच त्यांना हिंदू ची भीती दाखवून मुख्य प्रवाह पासून लांब ठेवले हे आता मुस्लिम ओळखू लागले आहेत.
कोणताच प्रश्न न सोडवणे फक्त तो धगधगत ठेवून स्वतःची पोळी भाजायची ही काँग्रेस ची सवय आता सर्वांना माहीत झाली आहे.
सर्व धर्मातील,समाजातील लोकांचा bjp la पाठिंबा आहे
21 Aug 2020 - 6:21 pm | आर्यन मिसळपाववाला
सामान्य लोक कधी सुखी होतील हा विषय आहे.
१. प्रशासकिय व्यवस्था रदत खदत चलु असलेलि
२. बेफिकीर सामान्य माणूस
३. धर्म जात आधारित प्रचंड लोकसंख्या
४. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात)
५. अडाणी आणि अशिक्षित लोक
६. राजकीय व्यवस्थेचा भयंकर तिटकारा असणारे सो कॉल्ड सुशिक्षित लोक - ??
७. भ्रश्त्त सरकारी अधिकारी - ???
आयुष्य सुखकर करावयाचे असेल तर असामान्य बना असे म्हणुन मी माझे चार शब्द संपवितो. - सविस्तर सान्गा
21 Aug 2020 - 7:59 pm | Rajesh188
1) प्रशासकीय व्यवस्थेत बदल करणे गरजेचे आहे.
आपली जी प्रशासन व्यवस्था आहे ती ब्रिटिश काळापासून आहे त्यांना राज्य करायचे होते .
इंग्लंड मध्ये बसून भारतातील राज्य कारभार चालवण्यासाठी प्रशासन यंत्रणेला खूप अधिकार आणि कायद्याचे संरक्षण त्यांना दिले आहे.
आता लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे.
प्रशासन यांत्रेनेचे विशेष अधिकार आता काढून घेतले पाहिजेत.
त्यांची बांधिलकी जनतेशी आणि कायद्याशी आहे ह्याची जाणीव त्यांना करायला हवी.
प्रशासनातील कोणत्या ही व्यक्ती विरूद्ध कोर्टात केस करण्याचा अधिकार जनतेला हवा.
त्या साठी सरकार च्या परवानगी बिलकुल गरज नसावी.
आरोप झाल्या नंतर त्या व्यक्ती ला प्राथमिक चोकशी नंतर ताबडतोप suspend केले जावे.
21 Aug 2020 - 8:02 pm | Rajesh188
जगातील काही मोजक्याच देशात अत्यंत उत्तम प्रशासन आहे.
त्यांनी ते कसे साध्य केले ह्याचा अभ्यास करून आपल्या कायद्यात सुद्धा बदल करावा.
21 Aug 2020 - 9:56 pm | कोहंसोहं१०
कधी होणार सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर ------------->> माणूस सामान्य असो व असामान्य तो तेंव्हाच सुखी होऊ शकतो जेंव्हा तो अध्यात्माकडे (धार्मिकतेकडे नाही) वळेल.
तोपर्यंत कितीही भौतिक सुखे प्राप्त झाली तरी तो सुखी कधीच होऊ शकणार नाही. सर्व पाश्चिमात्य देश याचे बोलके उदाहरण आहेत. भौतिक आयुष्यात कितीही प्रगती झाली तरी आयुष्य पुर्णपणे सुखी होऊ शकणार नाही. आत्मिक आनंद प्राप्त झाला तर आहे त्या परिस्थितीत सुद्धा माणूस सुखी राहू शकतो.
तस्मात भौतिक साधनातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आत्मिक आनंद प्राप्त करण्याच्या मागे लागा एवढेच.
22 Aug 2020 - 8:21 am | Gk
एम पी बिहार वर धागे काढा कुणीतरी
ते मास्तुरे उर्फ श्री गुरुजी गायब झालेत
22 Aug 2020 - 1:15 pm | शाम भागवत
नोटाबंदी व जीएसटीमुळे जर २०२४ पर्यंत आपली अर्थव्यवस्था सुधारू शकेल काय? जर सुधारली तर हे सरकार आणखी मोठ्या बहुमताने निवडून येऊ शकते.
नोटाबंदीमुळे ५-६ वर्षे त्रास होऊ शकतो असे अनेकांनी ४-५ वर्षांपूर्वी स्पष्ट केले होते.
त्यामुळे
नोटाबंदी व जीएसटीमुळे २०२४ पर्यंत आपली अर्थव्यवस्था नक्की गाळात जाणार असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी तसे नमूद करावे. मी २०२४ ला त्यावर विचार करीन म्हणतोय.
:)
तोपर्यंत या सरकारने ₹२००० ची व ₹५०० ची नोट बंद करावी. ₹२०० ही सर्वात मोठी नोट असावी. तोपर्यंच ₹२०० व त्या खालच्या सर्व नोटा भरपूर उपलब्ध करून द्याव्यात अशी वैयक्तिक इच्छा आहे. जेणे करून काही कोटींची लाच देण्या घेण्यासाठी एका बॅगेऐवजी काही पोत्यांचा वापर करायला लागला पाहिजे. ;) ;) ;)
22 Aug 2020 - 2:13 pm | Gk
मग बाहेर हिर्याचे दुकान काढतील व हिरे देऊन घेऊन बार्टर एक्स्चेंज ने लाच खातील
22 Aug 2020 - 2:40 pm | शाम भागवत
तसं काही तरी होणारच की. पण ते करताना त्या सगळ्याचा थोडाफार तरी ट्रेस राहीलच. शिवाय पैशापेक्षा ते नक्कीच त्रासदायक असेल. लाचखोरी, निवडणुकातील पैसे वाटप, आमदार खासदारांचा घोडाबाजार करायला पैसै वापरता येत नाहीत म्हटल्यावर ते किती त्रासदायक होईल याची कल्पना तर करून बघा. बार्टर सिस्टिम फार त्रासदायक. देशात कोणाचेही सरकार येवो. त्याने ₹२०० वरच्या नोटा बंद कराव्यातच.
थोडक्यात
नोटांची साठेबाजी करू देऊ नका इतकेच माझे म्हणणे आहे. त्याचा उपयोग फक्त विनिमयासाठी झाला पाहिजे. आपोआप चलनाची संख्या आटोक्यात राहते. समांतर अर्थव्यवस्था निर्माण होत नाही. निर्माण झाली तरी ती बाळसे कधी धरू शकत नाही.
खरतर हा राजकारण विरहीत चर्चेचा मुद्दा आहे असे मला वाटते. जीके धन्यवाद. तुमच्यामुळे हाही मुद्दा स्पष्ट करता आला.
22 Aug 2020 - 11:57 pm | Gk
500 च्या काळ्या पैशाने जो एक खोली भरू शकतो , तो 200 च्या नोटा आल्या की 2 खोल्या भरेल , ने आन करायला 2 गाड्या वापरेल
23 Aug 2020 - 12:57 am | शाम भागवत
बरोबर तसंच व्हायला पाहिजे.
22 Aug 2020 - 2:17 pm | Gk
काँग्रेसने 500 , 1000 च्या नोटात काळा पैसा साठवला हे ओरडून ओरडून सांगून 2000 ची नोट काढली त्यातून मोदींनी हेच सांगितले की आम्ही 60 वर्षे भुकेले आहोत, 2000 च्या नोटेशिवाय आमचे भागणार नाही
22 Aug 2020 - 2:50 pm | शाम भागवत
हे फार छान झालंय असं माझं वैयक्तिक मत आहे. ₹२००० ची नोट गरीबांकडे असायची शक्यता फार कमी आहे. कोणी एखाद्याने बाळगलीच तरी ती नोट तो फार काळ काही स्वत:जवळ ठेऊ शकणार नाहीत. ती त्यांला मोडायलाच लागेल.
त्यामुळे यावेळेस जेव्हा ₹२००० ची नोट रद्द होईल तेव्हा गरिबांना अजिबातच त्रास होणार नाही. मला तर वाटते ₹५०० ची नोट हळूहळू चलनातून कमी करत आणावी. व ₹२०००ची वाढवावी. जेणेकरून जे नोटांच्या थप्या बाळगू इच्छितात त्यांना ₹२००० नोटात ते साठवायला लागावेत. मग जेव्हा ही नोट रद्द होईल तेव्हा चलनसाठा करणाऱ्यांमधे जबरदस्त धमाका होईल.
22 Aug 2020 - 3:05 pm | ऋतुराज चित्रे
इतिहासातून काही शिकले नाही असं वाटतंय. ५०० आणि १००० च्या नोटा काळा पैसेवाल्यांनी कशा वटवल्या हे माहीत असताना २००० च्या नोटेबद्दल इतकी खात्री ? चोर हुशार आहेत, चौकीदाराच्या एक पाऊल पुढे आहेत.
22 Aug 2020 - 3:22 pm | शाम भागवत
मी समांतर अर्थव्यवस्था समाप्त होण्याला किंवा क्षीण करण्याला महत्व देतो. त्या दृष्टिने विचार करतो.
नोटा वटवा किंवा काही करा. समांतर अर्थव्यवस्थेत चलनाचा साठा नसला पाहिजे. निदान तसा साठा करणे तसेच त्याचा विनीयोग करणे हे त्रासदायक झाले पाहिजे.
चोर कोणीही असो किंवा चौकीदार कोणिही असो. समांतर अर्थव्यवस्था आटोक्यात राहिली पाहिजे हे उद्दिष्ट्य साधले म्हणजे झाले.
22 Aug 2020 - 4:06 pm | Gk
प्रत्येक वेळेला अशी नोट बंदी केली म्हणजे मग ढेकणे मरावीत म्हणून दरवर्षी एकदा घर जाळून नवीन बांधावे असे म्हणण्यापैकी आहे,
हल्ली ते वर्तक की कोण ते दिसत नाहीत , नोकरीला लागले का , की आईची पेन्शन पुरते अजून ??
22 Aug 2020 - 4:22 pm | शाम भागवत
आता फक्त एकदाच ठेकणं मारायची आहेत!!!!
:)
नविन ₹४००० ची नोट काढायचीच नाही. ;)
₹२०० च्यावरचे सगळे बंद.
वर्तक? कोण काय माहीत नाही बाॅ.
पण ₹२००० नोटबंदी झाली की उगवतील की सगळे. आत्तापासून त्यांची कशाला दखल घेत बसायचं?
:)
22 Aug 2020 - 4:30 pm | Gk
वर्तक म्हणजे नोटांबंदी अर्थ क्रांतीचे जनक
तेंव्हा तर किती गाजत होते
आणि ते स्वतः नोकरी करत नाहीत , आईच्या पेन्शनवर जगता म्हणे.
आणि आता ढेकणे मोदींच्याच पक्षात येऊन बसली आहेत , त्यांना जाळले तर भाजपात फक्त सतरंजी उचलणारे राहतील
22 Aug 2020 - 4:36 pm | Gk
ते वर्तक नाहीत , अनिल बोकील , अर्थ क्रांती पुणे
22 Aug 2020 - 4:43 pm | शाम भागवत
:)
22 Aug 2020 - 2:54 pm | शाम भागवत
जीके परत एकदा धन्यवाद.
मला आणखी एक मुद्दा मांडता आला ज्यात राजकारण नाहीये तर लाचखोर व काळापैसैवाले यांना त्रासदायक होईल असे काही सुचवता आले.
22 Aug 2020 - 2:57 pm | शाम भागवत
चला आता थांबतो.
माझा राजकीय धाग्यांवरचा चर्चा करायचा यावर्षीचा कोटा संपला.
;) ;) ;)
22 Aug 2020 - 4:22 pm | Rajesh188
बहू मताने बहु संख्य लोकांनी निवडून दिलेले आणि राज्य घटने नुसार स्थापित केंद्र सरकार नोट बंदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
नोट बंदी च काय पूर्ण चलन परिवर्तित करण्याचा सुद्धा अधिकार आहे.
आणि तो कायदेशीर आहे,इथे बेकायदा काही नाही.
एक टोकाची भूमिका अशी सुद्धा घेता येईल.
22 Aug 2020 - 4:31 pm | शाम भागवत
अहो राजेशभौ,
प्रतिवाद कसे करायचे याबाबत मी नमुने वरती दिले आहेत त्यातून काहीतरी शिका हो.
असो.
मी आता मात्र थांबतो.
:)
22 Aug 2020 - 5:35 pm | Gk
काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटांबंदी करावी , असे कोणत्या पुस्तकात दिले आहे ? जगात असे प्रयोग इतरत्र कुठे झालेत ?
24 Aug 2020 - 8:47 pm | शाम भागवत
24 Aug 2020 - 9:29 pm | कोहंसोहं१०
जोपर्यंत काँग्रेस ची कमान गांधी परिवाराकडे आहे तोपर्यंत मोदींना सक्षम पर्याय मिळणे अवघड आहे. कारण सोनिया गांधी चे नेतृत्व भ्रष्ट, राहुल गांधीचे अकार्यक्षम आणि प्रियांका गांधीचे नेतृत्व अननुभवी हे जनतेला वेगळे सांगायची गरज राहिली नाही. याची जाण काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांना नव्हती असे नाही पण पक्षात लोकशाही नसल्यामुळे आवाज उठावयाला नेते घाबरत.
परंतु कठीण परिस्थितीतही मोदींची लोकप्रियता कमी होत नाही हे पाहून राजकारणी करीयर संपायच्या भीतीने काही नेत्यांनी एकत्रितपणे पक्षनेतृत्वाविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस केले शेवटी.
शेवटी काँग्रेस हा सशक्त विरोधी पक्ष किंवा रसातळाला गेलेला पक्ष यापैकी काहीही म्हणून पुढे आला तरी फायदा देशाचाच होईल येणाऱ्या काही वर्षात.
25 Aug 2020 - 5:01 am | चौकस२१२
विचार करून करून शेखर गुप्ता थकलेले दिसत आहेत ...अन त्यात त्यांनी हे नाही सांगितले कि :मोदींना खरोखरच लोकप्रियता लाभली आहे" ती कशी आणि का?
असो...
मोदी नेतृत्वाखालील भाजप सत्तेत टिकून आहे यामागची काही सर्वसामान्य कारणे मला दिसतात ति अशी..
- काही लोकांनि मत दिले आणि देत आहेत कारण त्यांना निदान द्विपक्षीय लोकशाही टिकव्याची आहे आणि त्यासाठी "काँग्रेस ला भरपूर संधी दिली आता दुसऱ्यांना देऊ" हा विचार आहे
- भाजपने वनवासात पण राहून हळू हळू आपले स्थान ( गोवा उदाहरण) मजबूत केले याचे एक प्रकारचे कौतिक वाटत असल्यामुळे त्या चिकाटीला बक्षीस म्हणून काह्ही लोक त्यांना निवडून देत आहेत ( याचह्यमागे हा विचार कि आज नाही उद्या लोकांचे मत बदलेले हा जो संघाचं विचार आहे तोच )
- निवडणुकी आधी स्पष्ट मुद्दे आणि त्याची केलेली अंमलबजावणी ( ते मुद्दे पटत नसले तरी पुरेश्या लोकांचं मनात "हे व्हायला पाहिजे " असे होते म्हणून भाजपने स्वबळावर निवडून आले )
- त्यांच्या विचारसरणीवर मतभेद असू शकतो परंतु त्यांना तुम्ही दुर्लक्षित नाही करू शकत हे लोकांना उमजू लागले
- काहीतरी " तत्वावर " ( ती तत्व पटो अथवा नाही पण निदान आहेत तरी ) चालणार पक्ष आता दुर्मिळ आहेत त्यातील एक + अंतर्गत लोकशाही , कमी घराणेशाही या बाबी लोकांना भावल्या
- पहिल्या ५ वर्षात जी आवई उठवली होती कि आता "अल्पसंख्यांकांचाच नरसंहार होणार" तसे काही ना झाल्यामुळे हि टीका किती खोटी होती याचा लोकांना झालेला साक्षात्कार
- फारसे धर्माचा विचार न करणारे हिंदू सुद्धा काँग्रेस च्या " हिंदूंना चेपा" " हिंदू म्हणले कि विचू चावलं असा कांगावा करणारे समाजवादी " या धोरणावर शेवटी वैतागून भाजपाला देऊ मत या विचारापर्यंत पोचलेली जनता
- भाजप म्हणजे फक्त मोदी असे जरी वरकरणी वाटत असले तरी आत्तापर्यंत चा भाजपचा इतिहास बघितलं तर "मुख्य नेत्या" बरोबर हा अपक्ष बाकी खेळाडू पण दर्जाचे निर्माण करू शकतो याचे दर्शन ( गडकरी, स्वामी, योगी, कै पर्रीकर, कै स्वराज , कै महाजन इत्यादी - याउलट फक्त गांधी परिवार आणि त्याचा पेशवाई च्या शेवटची जशी परिस्थितीत तशी परिस्थिती )
- भाजप म्हणजे "शेटजी आणि भटजी" या टिकेपासून दूर जाण्यात भाजपला आलेलं यश
या अनेक कारणामुळे अजूनही भाजप ला संधी द्यायला लोक तयार दिसत आहेत
अर्थात या पुढे भाजपला असलेली आव्हान पण आहेत त्याकडे दुर्लक्ष करून कसे chalele
- मोदी ब्रँड कमी व्हायला पाहिजे
- धडाधड निर्णय ठीक पण अंमलबाजवणी वर जास्त लक्ष
- राष्ट्र सुरक्षा/ बहुसंख्याकांची अस्मिता यावर काम झाले आपण इतर सामाजिक प्रश्न ? त्यावर जास्त दिसणारे काम किंवा त्याचाही जास्त जाहिरात
- आयाराम गयाराम घेऊन भाजपची काँग्रेस होऊ न देणे आणि त्याचा बरोबर सत्ता ठेवणे हे कसे काय करणार ?
अजून एक प्रश्न मग भाजपवर टीका का वाढली आहे
- वरील निर्माण झालेले प्रश्न
- विरोधकांचाच संधीसाधू पणा आणि खास करून वैफल्य ( ममता , पवार लालू इत्यादी कडबोळं काही काम करेना, गांधी परिवारबद्दल उघडच टिळक करता येत नाही )
अजून एक मुद्दा
इंदिरा गांधींची लोकप्रियता आणि त्यांचे परत निवडून येणे आणि मोदींची लोकप्रियता आणि निवडू येणे यात फरक आहे जरी दोन्ही कडे व्यक्तिपूजा हा घटक असले तरी मला तरी वाटते कि मोदींचं पाठी पक्ष आहे संघटना आहे आणि आज मोदी तर उद्या दुसरे koni ( जसे पूर्वी वाजपेयी होते) तसे नेते हा पक्ष निर्माण करू शकेल यावर लोकांनन्चा विश्वास बसला आहे म्हणून हा फरक
इति
25 Aug 2020 - 9:45 am | Rajesh188
तुम्ही हल्ली सकाळ वाचत नाही वाटत.
रोज आघाडी सरकार वर टीका असते.
सकाळ आता bjp चा झालंय.
मीडिया पण पक्षांतर करतात.
25 Aug 2020 - 2:39 am | वीणा३
भाजप च्या काही गोष्टी पटतात काही नाही, पण त्यांनी इतकी वर्ष ज्या गोष्टी त्यांच्या निवडणूक अजेंडा वर होत्या (कलम ३७०, ट्रिपल तलाक, राम मंदिर) ह्या पूर्ण केल्या आहेत. कुठल्याही पक्षाने खरं तर निवडणुकीला जाण्यापुर्वी मतदारांना पुढच्या ५ वर्षात काय करू ह्याचा एक बांधीव मसुदा द्यावा. समजा साधारण १२ केंद्रीय मंत्री निवडून आल्यानंतर असू शकतात तर ते १२ जण पुढच्या ५ वर्षात काय काय कामं करतील ते नीट (जमल्यास डेडलाईन सकट) लिहून द्यावं.
उदा. रस्ते विकास मंत्रालय पुढच्या ५ वर्षात ७०० किमी चे रस्ते बांधेल. प्रत्येक वर्षाच्या शेवटी ६० - ८० किमी रस्ते बांधून झालेत का नाही हे लोकांनी पाहावं (यात ट्विटर, चेपू वर लोक मेसेज करू शकतात, रिपोर्टर आहेतच विचारायला). थोडक्यात गरिबी हटाओ / स्वच्छ भारत अशा व्हेग घोषणेऐवजी. प्रत्येक वर्षी ४० शहर स्वच्छ करणार, असं काहीसा मोजता येण्यासारखा मसुदा द्यावा.
सगळेच पक्ष भरपूर गोंधळ घालतायत, किमान ५ वर्षात प्रत्येक मंत्रिमंडळ काही ठराविक काम तर करायला नक्की बांधील राहील.
27 Aug 2020 - 1:28 pm | आर्यन मिसळपाववाला
बेफिकीर सामान्य माणूस -
वरील काही प्रतिक्रिया मधून त्याचे प्रत्यातर येत आहे असे खेदाने म्हणावे लागेल.
राजकीय प्रभाव हाच फक्त कारणीभूत आहे का सगळ्या गोष्टींना.
कि एक नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी पुढार्यांवर ढकलून व्यवस्थेच्या नावाने शिमगा करत आला दिवस पुढे ढकलायचा.