वियोग या विषयावरील काही जुन्याच कविता आज पुन्हा वाचत होतो या शेअर कराव्याश्या वाटल्या सहज म्हणुन हा धागाप्रपंच केला. बघा एखादी तार जुळते का तुमचीही.
हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचा संग्रह "निशा निमन्त्रण" हा मला फ़ार भावतो. या संग्रहातील कवितांचा काळ तसा फ़ार जुना आहे साधारणत: १९३७-३८ मध्ये लिहीलेल्या या कविता आहेत. बच्चन यांच्या विख्यात " मधुशाला" आणि "मधुबाला" नंतर लिहिलेल्या कवितांचा हा स्वतंत्र संग्रह आहे. या कविता संग्रहाला तुलनेने कमी प्रसिद्धी मिळाली बहुधा. तर मजजवळ असलेल्या निशा च्या आवृत्तीला स्वत: बच्चन यांनी लिहीलेल्या प्रस्तावनेतुन या संग्रहातील कविता त्यांची पार्श्वभुमी इ. संदर्भात बरीच माहीती मिळते. बच्चन यांची या कविता लिहीतांनाची मनस्थिती ही लक्षात येते. मधुशाला लिहील्यानंतर च्या काळातील मनस्थिती विषयी (मधुशाला ची मुळ प्रेरणा खय्याम च्या रुबाईयात मधुन मिळाली होती याचा ही अनुवाद बच्चन यांनी केलेला आहे आपल्या कुसुमाग्रजांचे खय्यामप्रेम येथे आठवते) बच्चन म्हणतात " हर तुफ़ान मन्द पडता है, हर नशा उतरता है. मेरी भावनाऒ ने तीव्रतम स्थिती छु ली थी. वहॉ पर ज्यादा देर टिका रहना असम्भव था.जीवन का पहिया घुम गया "
गिर-गिर टुटे घट प्याले, बुझ दीप गये सब क्षण मे ; सब चले किये सिर नीचे, ले अरमानो की झोली.
गुंजी मदिरालय भर मे, लो चलो-चलो की बोली.
तर एकीकडे त्यांचा अशा रीतीने मधुशाला च्या आनंदाचा बहरकाळ संपुन गेलेला होता. त्यातच त्यांना क्षय रोगाने गाठुन थेट मृत्युच्या दारात उभे केले व परीस्थिती आणखीच बिकट झाली. उत्साहाच्या आनंदाच्या एका तीव्रतम टोकाकडुन ते दुसर्या निराशेच्या टोकाकडे गेले. कुठल्याही अतीसंवेदनशील माणसा च्या नशिबात हे दोन्ही टोकांवर झुलत राहणे असतेच. याच निराश मनस्थितीच्या काळात त्यांनी "हलाहल" मरघट , अतीत का गीत आदींची निर्मीती केलेली आहे. आणि हे ही कमी नव्हते म्हणुन त्याच सुमारास नियतीने त्यांच्या पत्नी चा मृत्युरुपात कायमचा वियोग घडवुन आणला. या विषयी बच्चन म्हणतात " मेरी पत्नी श्यामा बीमार हो गयी और दो सो सोलह दिन चारपाई पर पडी रहकर , हमारे बचाने के सारे उपायो को विफ़ल कर, उस पार चली गयी" ते एका कवितेत म्हणतात की काळ मला घ्यायला आला होता तेव्हा मी भयभीत न होता त्याचे स्वागत करायलाच गेलो होतो मात्र काळाने सुड उगवला तो असा.
दिखा जब मुझको आता काल, कफ़न का ले हाथो मे थान;
बढाया पट जब मेरी और, उठा, तैयार हुआ तत्काल,
निकट जो मेरे थे वरदान, दिया , पर, उसने उन पर डाल.
तर असे झाले....
या निशानिमन्त्रण संग्रहातील सर्व कवितांच्या मागे कविची मनस्थिती वरील विवेचनाने कळु शकेल. या कविता संग्रहाला त्यांनी पत्नी ला अर्पण केलेले आहे
"स्वर्गता श्यामा को "
असे अर्पणाचे शब्द आहेत.
या संग्रहातील सर्वच कविता ओल्या आहेत. आशयदृष्ट्या फ़ार वैविध्य असे या कवितांत अर्थातच नाही आहे. पुढे व्यक्तीगत भावनेच्या क्षोभातुन बाहेर येऊन बच्चन सामाजिक वगैरे कडेही वळतात मात्र ज्या संवेदनशीलतेने ज्या प्रिय व्यक्तीला हरवुन बसलेल्या माणसाच्या रीक्त तीव्र शोकमग्न मनस्थितीतुन या पैकी काही ज्या कविता आलेल्या आहेत त्याने यांची उत्कटता फ़ारच वाढलेली आहे.
यातल्या काही कवितांतील या साध्या साध्या ओळी बघा, यात कविला जणु कायम स्वरुपीच्या भविष्यातील वियोगाची एक जणु व्याकुळ करणारी चाहुल लागलेली आहे ही चाहुल लागल्याने भिरभिरं झालेलं बच्चन यांच मन म्हणतय
साथी, अन्त दिवस का आया !
जग के विस्तृत अन्धकार मे, जीवन के शत-शत विचार मे,
हमे छोडकर चली गयी, लो, दिन की मौन संगिनी छाया !
साथी, अन्त दिवस का आया.
यातील दिवसातली "सावली" मैत्रीण आणि जी मौन आहे मुक आहे हे किती सुंदर आहे !
अशीच व्याकुळता अजुन एका कवितेत
साथी, सांझ लगी अब होने ! यातही आढळते.
असा मृत्युला घाबरलेला वियोगाच्या मृत्युच्या भीतीने व्याकुळ झालेला पथिक चालत आहे कवि म्हणतो
अन्धकार बढता जाता है !
डर न लगे सुनसान सडक पर , इसीलीए कुछ उंचा कर स्वर,
विलग साथियो से हो कोइ पथिक, सुनो, गाता आता है
अन्धकार बढता जाता है !
याच संग्रहातील मला सर्वाधिक भावुक करुन गेली त्या कवितेतील या काही ओळी इथे देण्याचा मोह आवरत नाही. बच्चन म्हणतात
है यह पतझड की शाम, सखे !
नीलम-से पल्लव टुट गये , मरकत-से साथी छुट गये.
अटके फ़िर भी दो पीत पात जीवन-डाली को थाम, सखे !
है यह पतझड की शाम, सखे !
नंगी डालों पर नीड सघन, नीडों मे है कुछ-कुछ कम्पन,
मत देख, नजर लग जायेगी; यह चिडियों के सुखधाम, सखे !
है यह पतझड की शाम, सखे !
यातील दोन जीर्ण होउन पिवळ्या पडलेल्या तरीही जीवनाला धरुन ठेवलेल्या पानांचे रुपक हे स्वत: क्षयाने मृत्युशय्येवरील बच्चन आणि चारपाई पर दो सो सोलह दिन पडलेल्या श्यामाजींच्या प्रतिमा अधिक गडद करत जातं. अधिक उदास करत जात, चिडियो के सुखधाम हा शब्द दाम्पत्य जीवनातला निरागस आनंद किती छान दाखवतो.
या कविता वाचतांना मग त्या बच्चनची जरी व्यक्तीगत ट्रॅजेडी असली तरी त्या वियोगाच्या भावनेशी आपल्या नकळत आपणही तीव्रतेने कनेक्ट होत जातो. आपल्या जीवनातील प्रिय व्यक्तीचां वियोग हा आठवल्यावाचुन राहत नाही. आपल्या जुन्या जखमावरंची खपली कुठेतरी उडते. व या कविता वाचतांना आपणही बच्चन च्या मनस्थितीशी जुळत जातो.
नविन वर्षा चे स्वागत करतांना उपहासाने बच्चन म्हणतात
आओ, नुतन वर्ष मना ले !
गृह-विहीन वन-वन प्रवास का, तप्त आसुऒ , तप्त श्वास का,
एक और युग बीत रहा है, आओ इस पर हर्ष मना ले.
आओ, नुतन वर्ष मना ले !
पुढे एका कवितेत उदासीच्या उत्तररात्री पर्यंत अजुनही जागा असलेला कवि विनंती करतोय
दीप अभी जलने दे, भाई !
कारण त्याच्या वेड्या मनाला हरवलेल्या प्रियेचा भास अजुनही होतोय ती असेल कदाचित इथेच.... कुठेतरी..... त्याचं मनं चाहुल घेतयं तिची....
दीपशिखा मे झिलमिल -झिलमिल, प्रति पल धीमे-धीमे हिल हिल,
जीवन का आभास दिलाती कुछ मेरी-तेरी परछाई !
दीप अभी जलने दे, भाई ! पलक नही मेरी लग पाई,
दीप अभी जलने दे, भाई !
याच भासामध्ये भिजलेली अजुन एक कविता बच्चन या ओळीत म्हणतात
मै उसे फ़िर पा गया था!
था वही तन , था वही मन
था वही सुकुमार दर्शन,
एक क्षण सौभाग्य का छुटा-हुआ सा आ गया था !
वह न बोली , मै न बोला, वह न डोली , मै न डोला,
पर लगा पल मे युगो का हाल -चाल बता गया था !
चार लोचन डबडबाये, शब्द सुख कैसे बताये ?
मै उसे फ़िर पा गया था !
कवि या दु:खा वर कुठलेही जगाच्या व्यवहारातले रहाटगाडग्याचे उपाय शोधण्याच्या नादात पडत नाही. तो म्हणतो
नही खोजने जाता मरहम , होकर अपने प्रति अति निर्मम,
उर के घावो को आसु के खारे जल से नहलाता हु !
ऐसे मे मैन बहलात हु.
एका कवितेत ढगा बरोबर फ़ार सुरेख संवाद साधत कवि त्याच्या बरोबर असलेले साम्य दाखवत म्हणतो
आज मुझसे बोल, बादल !
तम-भरा तु, तम-भरा मै, गम-भरा तु, गम-भरा मै.
आज तु अपने ह्रदय से ह्रदय मेरा तोल, बादल ! आज मुझसे बोल बादल !
आणि फ़ार छान रीक्वेस्ट करत तुझ्या माझ्यातल्या फ़रका ला ( अश्रु चे डोळ्यातील खारे पाणी ) थोडा बाजुला ठेव थोडा विसर असे म्हणत कवि म्हणतो
भेद वह मत देख दो पल
क्षार जल मै, तु मधुर जल,
व्यर्थ मेरे अश्रु, तेरी बुंद है अनमोल, बादल !
आज मुझसे बोल बादल !
या वरील कविता संग्रहातील कविता वाचतांना
तुला विसरण्यासाठी पट सोंगट्या खेळते, आकांताने घेता दान पटालाही घेरी येते.
असे कसे एकाएकी, फ़ासे जळले मुठीत , कशा तुझ्या आठवणी उभ्या कट्टीत.... कट्टीत..
चीही आठवण हमखास होते.
तर असो बघा जमल्यास वाचुन एकदा निशा निमन्त्रण आवडेल तुम्हाला कदाचित !
एक अजुन आवडलेली कविता आहे Les Murray या कविची " The Widower in the country " यातही आयुष्यातला जोडीदार गमावलेल्या एका विधुराची ही कविता आहे. यात त्याच्या रोजच्या एकाकी वैराण टफ़ अशा जीवनाचं दिनचर्येच एकसुरी वर्णन येत राहतं. अन मग त्यातल्या अगदी शेवटच्या दोन तीन ओळीत द स्क्रीमींग वॉज ओन्ली... त त्याच्या शोकाचे प्रखर चित्र डोळ्यापुढे उभे राहते. ही कविता मला फ़ार आवडली.
I will get up soon, and leave my bed unmade.
I will go outside and split off kindling wood,
From the yellow - box log that lies besides the gate,
And the sun will be high, for I get up late now,
I will drive my axe in the log and come back in
With my armful of wood, and pause to look across
The Christmas paddocks aching in the heat,
The windless trees, the nettles in the yard....
And then I will go in, boil water and make tea.............................
.........................
नंतर पुढे या ओळी येतात....
Coming on dark I will go home, light the lamp.
And eat my corned-beef supper, sitting there
At the head of my table. Then I will go to bed.
Last night I thought I dreamt- but when I woke
The screaming was only a possum ski-ing down
The iron roof on little moonlit claws.
( पोएम्स दॅट मेक ग्रोन मेन क्राय या संग्रहात ही कविता आहे.)
हा कविता संग्रह ही फ़ार सुंदर आहे जमल्यास वाचावा. Poems that make grown men cry ( 100 men on the words that move them) Edited by Anthony and Ben Holden.
प्रतिक्रिया
30 Nov 2016 - 3:15 am | जयन्त बा शिम्पि
अतिशय सुंदर रसग्रहण , वाचून छान वाटले. मला त्यांच्या खालील ओळी पण खूप आवडतात
" जो बीत गयी सो बात गयी,
देखो उस अंबर को देखो,
कितने उसके तारे टूटे कितने उसके प्यारे छूटे,
जो टूट गया,सो टूट गया,
जो छूट गया,सो छूट गया,
पर टूटे तारोंपर, कब अंबर शोक मनाता है,
जो बीत गयी सो बात गयी...."