आवडले ऋषिकेशा, सैल विचार मांडलेस म्हणून बरे झाले ;) पण मी जरा विचार घट्ट बांधायचा प्रयत्न करते. :) ह. घे.
बुद्ध लग्नात नाही रे पळाला. रामदासस्वामी पळाले. बुद्ध आपली पत्नी आणि मुलगा यांना मागे टाकून निघून गेला. लग्न-बिग्न झाल्यावर बर्याच काळाने. रामानेही सितेला नाही टाकले. तुलसीदासाने त्याला तसे करायला भाग पाडले. मारिओ पुझोच्या गॉडफादरला फिरोजखान ते रामू काय वाट्टेल ते करायला भाग पाडतात ना तसे. ;)
चंगीझ खानही फक्त अल्फा मेल नाही. त्याला टोळीप्रमुख म्हणून जाणणारे अज्ञ आहेत. त्याच्या देशात तो राष्ट्रीय नायक गणला जातो आणि त्याने केलेल्या अत्याचारांची ग्वाही आजही मध्यपूर्व आशियातल्या लोकांच्या रक्तात दिसते. काही नाही तरी भारताला अनेक खान तर पुरवून गेला - हे मात्र ह. घेण्यालायक ;)
चंगीझ, हिटलर, सद्दाम आणि राम, गांधी, बुद्ध यांत खूप साम्य वाटत नाही, जे काही साम्य आहे ते फक्त एखाद्याचा ध्यास घेतल्याचे, ध्येयवेडाचे.
जे गांधींनी केले आणि एखादा व्यावसायिक पैसे मिळवायला, किंवा एखादा कर्मचारी बढती/ प्रमोशन मिळवायला करतो त्यापेक्षा वेगळे नाही. साम्य असे की कामाची नशा चढल्यावर आयुष्यातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि फरक असा की पैसा कमवताना, प्रमोशन कमवताना घराची होळी होईलच असे नाही. असो, गांधींनी केले तेच क्रांतिकारकांनी केले, इतर नेत्यांनी केले. ध्येयाने वेडी झालेली माणसे कोणाचीच नसतात, अगदी त्यांची स्वतःचीही.
जे बुद्धाने केले, समजा की आख्यायिकेप्रमाणे खरंच त्याने रोगजर्जर व्यक्ती, म्हातारी व्यक्ती आणि प्रेत पाहिले आणि इतकीच कारणे त्याला भौतिक जग सोडायला उद्युक्त करून गेली तर त्याच्यात आणि माझ्यात प्रचंड फरक आहे कारण हे सर्व बघून मला क्षणभर वाईट वाटतं, आणि बस एवढंच वाटतं. बुद्धाला मात्र सर्वस्वाचा त्याग करावासा वाटला. बायको-मूल-राज्य-आई वडिल यासर्वांसोबत त्याने "स्वतःचा"ही त्याग केला असावा असे नाही का वाटत? ज्या रात्री यशोधरा आणि राहुलचा निरोप घेतला त्याच रात्री बुद्धाने सिद्धार्थाचाही निरोप घेतला असावा. :) जो स्वतःचाच नाही राहिला, तो स्वार्थी कसा?
बुद्ध, रामदासस्वामींनी जर बायका-पोरांना सोडून दुसर्या बाया केल्या असत्या, घरोबा केला असता, माया गोळा केली असती ते करताना समाजाकडे दुर्लक्ष करून आप्पलपोटी जीवन जगले असते तर ते स्वार्थी झाले असते. पण त्यांनी स्वतःसाठी कमवायचे म्हणून काही केले नाही, जे त्यांच्याकडे होते त्याचाच त्याग करत गेले. ते स्वार्थी नाही, म्हणूनच जग त्यांना परमार्थी म्हणून ओळखते. आपण आई-वडिलांचा विचार करतो वगैरे म्हणतो पण त्यासाठी कितीसा त्याग करतो. आपल्याला शक्य असते तेवढेच करतो. श्रावणबाळ फार कमी जन्मतात हल्ली. :)
केवळ आपल्या मनासारखे वागणे म्हणजे स्वार्थ नाही. शेवटी, बुद्ध काय आणि रामदासस्वामी काय दोघेही माणसाच्याच जन्माला आले होते. त्यांच्यातील चांगले गुण पाहून इतरांनी त्यांना मोठेपण दिलं. ते आपल्या मनासारखे वागले पण समाजाला ऋणी करून गेले.
समाजाप्रमाणे स्वतः बदलायचे सोडून केवळ स्वतःच्या हट्टाखातर /आग्रहाखातर त्यांना हवे तसे वागले
हे मात्र खरं! हट्टी माणसंच जगात काहीतरी करतात...सतत इतरांना दबून राहणारी माणसं सहसा आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरतात आणि सकारात्मक हट्टाचे फळही चांगले मिळते.
बघ! मिसळपाव कसं जन्माला आलं ते!! हट्टातूनच की! :)
सैल विचारांचा काय गच्च बुचडा बांधलाय!
आखीव, रेखीव, नीटस (आणि म्हणूनच खुलून दिसणाराही)!!! (ह. घ्या)
बुद्ध, रामदासस्वामींनी जर बायका-पोरांना सोडून दुसर्या बाया केल्या असत्या, घरोबा केला असता, माया गोळा केली असती ते करताना समाजाकडे दुर्लक्ष करून आप्पलपोटी जीवन जगले असते तर ते स्वार्थी झाले असते. पण त्यांनी स्वतःसाठी कमवायचे म्हणून काही केले नाही, जे त्यांच्याकडे होते त्याचाच त्याग करत गेले. ते स्वार्थी नाही, म्हणूनच जग त्यांना परमार्थी म्हणून ओळखते.
अगदी अचूक!! परमार्थी तोच असतो जो नुसता विचार करत न बसता प्रत्यक्ष कृती करून तो स्वतःचं आयुष्य झोकून देतो. विचार आपण सगळेच करतो पण हे धैर्य बहुतेकांकडे नसतं...
ध्येयाने वेडी झालेली माणसे कोणाचीच नसतात, अगदी त्यांची स्वतःचीही. ज्या रात्री यशोधरा आणि राहुलचा निरोप घेतला त्याच रात्री बुद्धाने सिद्धार्थाचाही निरोप घेतला असावा. जो स्वतःचाच नाही राहिला, तो स्वार्थी कसा?
क्या बात है! जबाब नही!!!!
रामानेही सितेला नाही टाकले. तुलसीदासाने त्याला तसे करायला भाग पाडले. मारिओ पुझोच्या गॉडफादरला फिरोजखान ते रामू काय वाट्टेल ते करायला भाग पाडतात ना तसे.
:)
बघ! मिसळपाव कसं जन्माला आलं ते!! हट्टातूनच की!
हा, हा, हा!!!! हा मात्र परफेक्ट पंच!!!
इथे आम्ही दाद देतो!!!:))
अनेक आभार प्रियालीताई, मस्त :) .. इतस्त्ततः पसरलेल्या कपट्यांचं कोलाज आवडलं
पण.. मला ते आहे याच स्वरूपात लिहायचं होतं कारण विचार हे नेहेमीच सुसंबद्ध असतात असे नाहि.. अशा स्वैरविचारांच्या गहन चिंतनानंतर (!!!!) लेख प्रसवतात ;) मात्र सर्वप्रथम मी सैल आणि स्वैर अशाकरता लिहिले होते की हे काहि क्षण चमकून गेलेले विचार आहेत.. ते सैल तर आहेतच पण अत्यंत स्वैर आहेत.. हे विचार, मते अथवा तथ्ये नाहित... त्या विचारांना क्षणिक घटना सोडल्यास अजिबात संदर्भ नाहित.. एखाद्या 'पेटलेल्या' ;) क्षणी जेव्हा जग तुला स्वार्थी म्हणून हिणवत असतं तेव्हा अशाही पद्धतीचे विचार चमकून जातात... :P
साधारणतः याला मी विचित्र विचार म्हणतो.. इथेही बघितलंस तर सुरवातीला कैच्या कै वाटणारे विचार शेवटीशेवटी (कसेबसे)चॅनलाईझ होत जातात.
हट्टी माणसंच जगात काहीतरी करतात...सतत इतरांना दबून राहणारी माणसं सहसा आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरतात आणि सकारात्मक हट्टाचे फळही चांगले मिळते
हे मात्र अचूक..
मला या निष्कर्षावर मुद्दामच यायचे नव्हते.. केवळ मनातील भन्नाट विचार चॅनलाईझ होऊ पाहतानापर्यंतचा प्रवास दाखवायचा (आता कळतंय की क्षीण ;) ) प्रयत्न होता.. हा प्रवास मला बर्याचदा जास्त रोचक वाटतो.. एरवी आपण कधीही करत नाहि असे कैच्या कै विचार या दरम्यान आपण करतो नाहि का?
बुद्ध लग्नात नाही रे पळाला. रामदासस्वामी पळाले. बुद्ध आपली पत्नी आणि मुलगा यांना मागे टाकून निघून गेला
अशा चुकांबद्दल बोलाल तर रात्री दिडला लिहावसं वाटण्याची ही उबळ कारणीभूत आहे ;)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
ऋषिकेश आणि प्रियाली,
तुम्ही दोघांनी मस्तच लिहिलंय. एक आणखी माहिती:
रामदासस्वामींनी लग्नातून पळून गेल्यावर नंतर त्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं दुसय्रा मुलाशी.
यमी
श्रेष्ठ गंगाधर, म्हणजे रामदास स्वामींचे थोरले बंधू यानी त्याच मंडपात उपस्थित दुसर्या एका चांगल्या घरच्या मुलाशी, दुसरा मुहूर्त साधून लावून दिले होते.
:)
पुण्याचे पेशवे
प्रियालीच्या प्रकट चिंतनात या खेपेस ;) वाद न घालता दुजोरा देता येत असल्याने तुर्तास +१ इतकेच म्हणतो!
बाकी हृषिकेशचा मूळ लेख पण काही वादग्रस्त विधाने वाटली असली तरी आवडला.
लेख, प्रतिसाद, दोन्ही आवडले.
दाखल्यांची गडबड झाली असली तरीही ऋषिकेश यांचा आशय समजला.
तुकारामाची बायको, सॉक्रेटिसची बायको, मो.के.गांधींचा पुत्र, यांची पुष्कळ फरपट झाली... या कलंदर लोकांना जे काय मिळते त्याला "आत्मानंद" (आत्मा = स्व) असे काहीसे म्हणतात, ते उगाच नव्हे.
अवांतर : सीतेला पुन्हा परित्यक्ता करविणारा प्रथम मोठा कवी तुलसीदास की भवभूती?
अशा चुकांबद्दल बोलाल तर रात्री दिडला लिहावसं वाटण्याची ही उबळ कारणीभूत आहे
हो ते आलं होतं लक्षात माझ्या. ;) विचारांना बंधने नसतात आणि एखाद्या विचाराची उबळ यायला आणि ती मूर्तस्वरूपात बांधायला निमित्त लागत नाही. :) म्हणूनच तुझे चिंतन आवडले. काही विचार हृदयातून येतात तर काही डोक्यातून. (म्हणजे काय ते विचारू नका बॉ!) तुझे विचार हृदयातून आले.
ऋषिकेश, आणि प्रियाली... दोघांनीही सुंदर लेखन केले आहे.
ऋषिकेशने जिथे लेख संपवला आहे.. म्हणजे त्याला कोणत्याही शेवटापर्यंत न नेता म्हणजे सकारत्मक किंवा नकारात्मक... अशा प्रकारच्या निर्णयापर्यंत न नेता जिथे संपवला आहे.. त्यातून त्याच्या मनात चालेलेल्या विचारांचं द्वंद्व लक्षात येतं.
प्रियालीने त्या विचारांना दिशा देण्याचं काम केलं आहे असंच मी म्हणेन.
जो स्वतःचाच नाही राहिला, तो स्वार्थी कसा?
+१
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रियालीने सगळ्या ऐतिहासिक श्रद्धास्थानांच्या चड्ड्या उघड्या केलेल्या आहेतच. इथे पुढे जाणे नको.
पण एका वाक्याला टाळ्या पडताहेत, त्याची चड्डी काढणे उरले. ते काम आमचे. सगळे म्हणताहेतः
"जो स्वतःचाच राहिला नाही, तो स्वार्थी कसा?" +१ वगैरे.
मंडळी, स्वतः ही संकल्पना, पुन्हा एकदा चाचपडून बघा. स्वतः म्हणजे माझे शरीर, माझा आत्मा, माझे नातेवाईक, त्यांची शरीरे, त्यांचा आत्मा, माझे मित्र/मैत्रिणी, त्यांचा आत्मा, किंवा कसे ?
ह्यात माझे अनुयायी, सध्या असलेले, किंवा पुढे जे होतील ते, हे कसे वगळले ?
समजा माझी विचारशैली इतकी खोल असेल, की माझे जे पुढे होणारे अनुयायी आहेत, त्यांना मी सध्या केलेले कार्य हे स्वार्थी वाटणार नाही, तर ?
मी आज जी गोष्ट केलेली आहे, ती सध्याच इतरांना माझ्या स्वार्थातून उद्भवलेली वाटणार नाही, उलट अत्यंत निस्वार्थीपणे केली आहे असेच वाटेल पण त्यामुळे मला पुढे अनेक अनुयायी मिळतील, ह्या विचाराने मी केलेली असेल तर ? मी स्वार्थी आहे की नाही ?
आता असा अनेक वर्षानंतरचा विचार करण्यास आपण सामान्य जन निष्प्रभ ठरतो, पण बुद्ध, ख्रिस्त, किंवा रामदास हे सर्वच अशा "डीप" बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी असा विचार केलाच नसणार, हे छातीठोकपणे सांगू शकाल ?
- सर्किट
नेहेमीप्रमाणेच बुद्धिबळातल्या उंटासारखा तिरका विचार आणि म्हणून स्वागतार्ह! ;)
मी आज जी गोष्ट केलेली आहे, ती सध्याच इतरांना माझ्या स्वार्थातून उद्भवलेली वाटणार नाही, उलट अत्यंत निस्वार्थीपणे केली आहे असेच वाटेल पण त्यामुळे मला पुढे अनेक अनुयायी मिळतील, ह्या विचाराने मी केलेली असेल तर ? मी स्वार्थी आहे की नाही ?
'अनुयायी मिळतील' ह्या स्वार्थी हेतूने जर आचरण केले तर त्या केलेल्या गोष्टींचा फोलपणा लवकरच उघड होतो कारण ध्येयनिश्चिती पोकळ असते. अशी कामे पिढ्यानपिढ्या सोडाच परंतु बर्याचदा त्या व्यक्तींच्या हयातीतच मोडकळीला येतात. परंतु बुद्ध, ख्रिस्त, रामदास (किंवा शिवाजी) अशा लोकांनी केलेले कार्य हे अनुयायी गोळा करण्यासाठी नव्हते तर 'अकेले चलते बने और कारवां बनता गया' अशा स्वरुपाचे होते. कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा कोणताही मोबदला देण्याची कोणतीही गॅरंटी नसताना केवळ ध्येयाने प्रेरित होऊन मागे जायला सर्वच माणसे वेडी नसतात. त्यातले जाणते लोक बिंग फोडतात किंवा परिस्थितीनेच ते फुटते आणि हे लोक इतिहासजमा होतात इतिहास निर्माण करु शकत नाहीत!
तेंव्हा तुम्ही म्हणता त्याप्रकाराने त्यांची बुद्धी 'डीप' नव्हती!
चतुरंग
अशा लोकांनी केलेले कार्य हे अनुयायी गोळा करण्यासाठी नव्हते तर 'अकेले चलते बने और कारवां बनता गया' अशा स्वरुपाचे होते.
पुरावा काय ?
बुद्धिमत्ता खोल असली, तर पुढच्या दोन नव्हे तर दहा चाली मनात ठेवून पुढची पहिली चाल करायची ह्या बुद्धिबळातल्या खेळींविषयी आपण माहितगार असालच.
सामन्य बुद्धिमत्तेच्या लोकांना पुढच्या दोन (फार तर तीन) चाली दिसतात). प्रत्येक वेळी पुढच्क्ष्ही चाल ठरवताना त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह फ्याक्टर १६ (किंवा किमान पुढच्या फळीतले आठ) असतो.
मग ? एवढा विशाल वृक्ष कुठून वाढणार, हे कसे ठरवणार आपण सामान्य लोक ?
तुम्ही शिवाजीचे नाव घेतले आहे, म्हणून सांगतो. नेताजी पालकराला पुन्हा महंअद कुलीखानापासून हिंदू धर्मात आणण्यात महाराजांच्या किती चाली होत्या ?
त्यांच्या तोफखान्याचा जिम्मेदार मुसलमान होता. त्याला स्वराज्यातच ठेवण्यासाठी तर हे कृत्य झाले नाही ?
आग्र्याहून महाराज परत आलेत, तेव्हा त्यांच्या सत्तावीस किल्ल्यांपैकी वीस मुसलमानांच्या ताब्यात होते. कुलीखानाचा पालकर करून घ्येण्यात त्या वीस किल्लेदारांना बेसावध ठेवणे, हे तर धोरण नव्हते ?
रंगराव, तुम्ही आणी आम्ही ह्या ऐतिहासिक महापुरुषांना सेकंड गेस करू शकत नाही. त्यावेळी त्यांच्या मनात किती डीप मूव्ह्ज होत्या हेदेखील ठरवू शकत नाही. त्यामुळे आपण त्यांना "बेनेफिट ऑफ डाऊट" द्यायला हवा, की नाही ?
- सर्किट
कार्य हेच त्यांच्या 'नि:स्वार्थी' विचार करण्याचा पुरावा आहे त्याला आणखी वेगळा पुरावा नको!
प्रत्येक आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्याला त्या त्या परिस्थितीप्रमाणे एखाद्या महापुरुषाचे किंवा स्त्रीचे स्मरण होते ह्यातच त्यांची महत्ता दडलेली असते.
बुद्धिबळाच्या चालीत महान खेळाडू हे ८ ते १० चालींपुढचे आणि कित्येक वेळा तर १२ ते १४ चालीपर्यंतसुद्धा संभाव्य चित्र डोळ्यांसमोर आणू शकत असतात. त्याचप्रमाणे हे महान लोक तसे करु शकत असावेत असे दिसते त्याशिवाय आपल्या कार्याचे दूरगामी परिणाम कसे होऊ शकतील ह्यासंबंधी विचार संभवत नाही.
नेताजीचे पुनर्धर्मांतर करुन घेणे ही सरळ सरळ राजकीय मुत्सद्देगिरी आहे ह्यात शंकाच नाही पण हा तथाकथित 'स्वार्थ' अंतिमतः स्वराज्याच्या हिताचा होता त्यामुळे तो व्यक्तिगत संकुचित स्वर्थाच्या कैकपट विशाल होता! त्यात त्यांचे आणखी कोणकोणते विचार आणि अंतःप्रवाह दडलेले होते हे महाराज आणि त्यांचे कूटनितिज्ञ मंडळच जाणो! पण ते व्यक्तिगत, संकुचित नक्कीच नव्हते/नसणार हे आपण सांगू शकतो असे तुम्हाला वाटत नाही का?
महाभारताच्या युद्धात कृष्ण अनेक वेळा संदिग्ध राहिला आहे, सकृतदर्शनी खोटे बोलला आहे, जसे 'नरो वा कुंजरो वा' हे कशाचे लक्षण आहे? अंतिम सत्याच्या विजयासाठी खेळली गेलेली कूटनीती ही व्यक्तिगत स्वार्थी नसते तर ती सत्याचाच एक भाग बनते.
ह्यात सेकंड गेस करण्याचा प्रश्नच नाहीये. दूरगामी विचार करताना परिस्थितीच्या विशाल पटावर कोणती मोहोरी कुठे आहेत, कुठे असतील, कुठे असायला हवीत ह्याचा विचार करुन तो यथार्थपणे कृतीत उतरवणे आणि हे करीत असताना त्या त्या वेळच्या परिस्थितीला प्रामाणिक राहून निर्णय घेणे हे काम ते लोक करीत आले. त्यात कुठलाही 'डाऊट' नाहीये, असलाच तर त्याचे निराकरण पुढे घडत जाणार्या/गेलेल्या घटनांवरुन घडून येते.
आता आपल्याला तेव्हाच्या सर्व घटनांविषयी तंतोतंत माहीती असणे संभवत नाही त्यामुळे काही गोष्टीत डाऊट असणे शक्य आहे परंतु त्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा, कारकीर्दीचा विचार करताना एकून जी काही वागणूक आपल्याला इतिहासातून दिसलेली असते त्यावरुन त्या डाऊट असलेल्या प्रसंगी सुद्धा, तर्काने विचार करता, ती व्यक्ती स्वार्थी वागलीच नसती असे आपण म्हणू शकतो. ह्या अर्थी बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला मी तयार आहे! :)
चतुरंग
सगळ्यात पहिल्यांदा - ऋषिकेश आणि इतर प्रतिसादींचे चर्चा रंजक केल्याबद्दल मनापासून आभार...
मनातील एक उत्स्फुर्त विचार - ही भलीभली मंडळी फार पुढच्या चालींचा विचार करण्यातला फोलपणा ओळखून असावीत असा बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला हरकत नसावी. पुढ्यातली एकच चाल तेवढी महत्वाची हे कळायला खरोखरच केव्हढा थोरपणा हवा... ह्म्म्म्म...
रामदासस्वामींनी लग्नातून पळून गेल्यावर नंतर त्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं दुसय्रा मुलाशी
कुनी लाउन दिलं ? कव्हा लाउन दिलं? क्वाँच्याशी लाउन दिलं? तिच पुढ काय झालं? संदर्भासहित स्पष्टीकरण करा ( १० मार्क)
लै भारी !!!!
ऋषिकेश, आणि प्रियाली... दोघांनीही सुंदर लेखन केले आहे.
वादच नाय !!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
सर्व वाचकांचे, प्रतिसादकर्त्यांचे व विशेषतः प्रियालीताईचे व सर्कीटरावांचे याच विचारांना वेगळ्या (की वेगवेगळ्या ;) ) कोनातून बघितल्याबद्दल अनेक आभार
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
विशेषतः प्रियालीताईचे व सर्कीटरावांचे याच विचारांना वेगळ्या (की वेगवेगळ्या ) कोनातून बघितल्याबद्दल अनेक आभार
चालायचंच. रंगरावांचेही आभार. त्येंनी आमच्या येगळ्या कोनाचा पदुकोन केला. शटल परत आले, परतवणे वेळेअभावी शक्य नाही.
- सर्किट
प्रतिक्रिया
चिंतन
सुरेख!
कोलाज
मस्त
संदर्भ
श्रेष्ठ गंगाधर स्वामींनी दिले होते लाऊन.
+१
चालना
असेच
+१
मस्त
स्सही रे !!!
+१
जियो
धन्यवाद
सुंदर..
स्वतःचा राहिला नाही
सर्किटराव,
पुरावा काय ?
ह्या लोकांचे टिकून राहिलेले
एकच चाल
(विषय दिलेला नाही)
आभार
कोन रे त्यो ?
लेखन आणि