Skip to main content

सोने : बघावे, घ्यावे की -----

लेखक प्रसाद भागवत यांनी शुक्रवार, 20/12/2013 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल च्या मध्यास लिहिलेला हा पोस्ट अधिक विचारमंथनाच्या अपेक्षेने मिपाच्या वाचकांबरोबर शेअर करतो आहे.- आमच्या १५ हुन अधिक वर्षांच्या वैवाहिक वाटचालीत काल प्रथमच सौ. ने माझ्या व्यावसायिक बुद्धीमत्तेवर थोडासा विश्वास दाखवत असल्याचे दाखवुन स्वतःच्या बुद्धीमत्तेची चुणुक दाखवली. "सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो. याशिवाय अपेक्षे्प्रमाणे क्लायंट्सच्या जवळ्पास प्रत्येक फोनमध्येही हा विषय येत् होताच. खरे तर सोने हा काही माझ्या आकलनाचा प्रांत नाही पण तरीही जागतिक बाजारांत मागणी पुरवठा तत्वावर मोठ्या प्रमाणांत व्यवहार होणारी ती एक कमॉडिटी असल्याने मुलभुत नव्हे पण काही तांत्रिक बाबींचा उहापोह करता येतो का ते पहातो. एकदा सोने ही कमॉडिटी असल्याचे मान्य केले की भावातील चढ-उतार होतच असणार हे ओघाने आलेच आणि जेथे तेजी आहे तेथे कधी ना कधी मंदी येणारच, खरे तर हा तर्क अगदी जन्म आहे म्हणजे मृत्यु असणारच या गृहितकाएवढाच स्पष्ट आहे. पण तरीही आपण अनेकदा विवेकबुद्धी सोडुन वागतो आणि अडचणींत येतो. सोने कधीच घसरत नाही.-- अशा अज्ञानमुलक गृहितांच्या पार्श्वभुमीवर बाजाराने दिलेले असे अनपेक्षित झटके ( ते देणे हे बाजाराचे व्यवच्छेदक लक्षणच आहे) ठळक मथळ्यांचे विषय होतात. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या किरकोळ गुंतवणुकदाराने काय करावे ह्या प्रश्नावरील हा माझा व्यक्तीगत दृष्टीकोण मी सांगणार आहे. असा रामायणाला सुरवात होते ती काही ना काही कारणाने बाजारांत एखाद्या वस्तुकडे पहाण्याचा गुंतवणुकदारांचा कल बदलल्याने. त्या कारणांची मीमांसा हा आताच्या लेखनाचा विषय नाही मात्र, येथे सोन्याबाबत तो तेजीकडुन मंदीकदे बदलला आहे एवढेच आपण गृहित धरु या, बाजारांत विक्रीचा जोर वाढुन भावपातळी खाली जावु लागते. परिस्थितीनुसार अशा विक्रीची तीव्रता कमी अधिक असते. कधीतरी भावांतील फरक मोठा असुन भाव नुसते घसरण्याऐवजी गड्गड्ल्यास बाजारांत प्रमुख दोन प्रतिक्रिया पहावयास मिळतात. (१) भाव खुप खाली गेल्याने सुरवातीस आक्रमकपणे विक्री करणारे थोडीशी उसंत म्हणुन का होईना थांबतात अणि (२) स्वस्ताईच्या प्रतिक्षेत असलेले किरकोळ गुंतवणुकदार खरेदी साठी गोळा होतात. यामुळॅ भावपातळीत सुधारणा होते. खुप मोठ्या घसरणीनंतर आलेल्या भावांतील अशा उसळीला तांत्रिक परिभाषेंत 'Dead Cat Bounce' असे म्हटले जाते. ( अगदी मेलेला प्राणीही खुप उंचावरुन खाली आपटल्यास उसळु शकतो या अर्थी.) या अशा फसव्या तेजीमुळे वर उल्लेखलेले किरकोळ खरेदीदार त्यांच्या फायदेशीर सौद्याचा आनंद उपभोगणार, तोच बाजारातील आणखी एक वर्ग या धुमश्चक्रींत सामील होतो, हा असा वर्ग असतो, ज्याने तेजीचा कल असताना असा वस्तुची खरेदी ( अर्थातच चढ्या दराने) केलेली असते व नंतर आलेल्या मंदीत वेळीच भाग घेता न आल्याने घुसमटुन तो बाजार सुधारताच 'बाहेर पड्ण्याच्या' मनस्थितींत असतो. पॉज घेण्यासाठी थांबलेले आधीचे मंदीवाले व हे घायकुतीला आलेले गुंतवणुकदार विक्रीचे पुढ्चे आवर्तन सुरु करतात व बाजार अधिक खालची पातळी दाखवु शकतो. ----ह्या खेळाचे प्रयोग अनेकदा होतात. असे अनुभवास येते की प्रदीर्घ कालावधीनंतर जेंव्हा बाजारात अशी एखादी मोठी घसरण येते, तेंव्हा प्रकरण एका भागांत संपत नाही, थोड्या थोड्या अंतराने असे मंदीचे धक्के बसलेले दिसतात. बाजार विश्लेषकांच्या मते बा्जार कधीच एखाद्या कारणाने , एखाद-दुसरया दिवसासाठी वगैरे आपला दीर्घकालीन कल बदलत नाही. या बाबत कारण मीमांसा करताना नेहमीच 'cockroach theory' चा मनोरजक दाखला दिला जातो.म्हणजेच ज्या प्रमाणे if you see one cockroach in your home, there are likely many more,----- मंदी्ला कारणीभुत असणारया कारणांचेही काहीसे असेच आहे. ती ही झुरळांप्रमाणेच एक एक करुन दृष्टॉत्पत्तीस येउ लागतात. आपण लक्षांत ठेवावयास हवे की भावपातळीचा तळ निश्चित होणे ही एक प्रक्रिया आहे, घटना नाही. ('Bottom formation is a process, not an event') खरे म्हणजे गुंतवणुकदाराच्या दृष्टीने खरेदी हा भविष्यकाळाशी निगडित व्यवहार आहे, म्हणजेच वस्तुची भविष्यकालीन किंमत ही आजच्या किंमतीपेक्षा अधिक असावी हे कोणत्याही गुंतवणुकीमागील सोपे गृहित आहे पण अनेकदा आपण खरेदी चा संबंध भुतकाळाशी जोडतो. कालच्या पेक्षा आज स्वस्त आहे,--- केवळ हाच खरेदीचा निकष कसा काय असु शकतो ? --- उद्याचे काय ?? हा प्रश्न माझ्या मते अधिक महत्वाचा आहे तेंव्हा केवळ वृत्तपत्रीय मथळ्यांकडे पाहुन दिवाळी/दसरा साजरा करण्याची अनाठायी घाई केल्यास कदाचित शिमगा ह्या सणाचे स्मरण ही नंतर होवु शकेल ह्याची जाणीव असो द्यावी.

वाचने 71878
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

दुनिया बुडेल ,प्रलय होइल्,पण बायका आणी सोन्याचा तिटकारा अशक्य .......!त्रिवार अशक्य.....!

सोन्यात कली असतो तस्मात सोने घेवु नये ... चांदी घ्या प्लॅटीनम घ्या ...

सोन्यात गुतंवणुक माझ्यामते ***पणा आहे . शेवटी तो एक धातु आहे . आयातीवर सरकारचे परकीय चलन खर्ची पडते . आणी वेळ आल्सास हि लोक सोन मोडत नाहित . कारण इज्जतीचा सवाल असतो .

इथे तर गळ्यात सोन्याचे साखळदंड आणी सोन्याने मढवलेले शर्ट घालणारे लोक पण गाळात गेलेत.....तर सर्वसामान्य लोकांची काय बात :)

सोन्याचे दागिने लग्नात एकदा आणि मुलाच्या मुंजीत एकदा सगळे घातले होते. एरवी बँकेच्या लॉकरचं भाडं फुकटचं भरते आहे. त्यामुळे नवीन सोनं कमॉडिटी मार्केटचं सुद्धा घेत नाही! सांगली पुण्यासारख्या शहरात तर ५ ग्रॅमचं मंगळसूत्र सुद्धा घालायची सोय राहिली नाही म्हणे! सगळ्याच नाही तरी आता बर्‍याच बायका माझ्यासारखा विचार करत असाव्यात अशी आशा आहे! बाकी मंदी आणि भावनिश्चितीबद्दलचे विवेचन आवडले.

In reply to by पैसा

>>सगळ्याच नाही तरी आता बर्‍याच बायका माझ्यासारखा विचार करत असाव्यात अशी आशा आहे! तस नाही वाटत सोन म्हणल की बायका यड्या होतात. सोनच अस नाही कि खरेदी म्हणल कि बायका यड्या होतात. आजच गुरुपुष्यामृत मुहुर्तावर सोन खरेदी बाबत य.ना वालावलकर यांचे एक पत्र मटा ला आले आहे. गुरुपुनर्वसू योगावर सोनेखरेदी २० डिसेंबरला सकाळी ६ वा. ५९ मिनिटे ते ७ वा. ८ मिनिटे असा केवळ नऊ मिनिटे गुरुपुष्यामृत योग होता. त्या काळात कोणी सोने खरीदण्याचा संभव नाही. म्हणून १९ डिसेंबरच्या गुरुवारी सर्व सुवर्णखरेदी गुरुपुनर्वसू योगावर झाली हे निश्चित. अर्थात मुहूर्त ही एक निरर्थक कल्पना आहे. सोने कधीही घेतले तरी सारखेच. पण कधीच न घेतले तर मात्र फार उत्तम. सराफी दुकानांत काचेआडच्या निर्जीव, निर्बुद्ध पुतळ्यांवर सुवर्णालंकार शोभतात. सजीव, बुद्धीमान व्यक्तीच्या अंगावर ते ओंगळवाणे दिसतात. स्वबुद्धीने विचार करावा. य.ना.वालावलकर महाराष्ट्र टाईम्स, २४.१२.१३ ( टंकलेखन सौजन्य संजोपराव)

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>>पण कधीच न घेतले तर मात्र फार उत्तम. सराफी दुकानांत काचेआडच्या निर्जीव, निर्बुद्ध पुतळ्यांवर सुवर्णालंकार शोभतात. यनावालावरकरांसारख्या मनुष्याने सोन्याची किंमत जाणू नये हे दुर्देव. सोन्याचा हव्यास नसावा मात्र सोनं हे अत्यंत उपयुक्त तसेच मनाला आधार असणारा धातु आहे. आजुबाजुला सर्वत्र महागाई वाढत असतांना, शेअर बाजार किंवा तत्सम गुंतवणूक कधीही घाट्यात येण्याची शक्यता असलेल्या वातावरणात सोनं हीच काय ती दिलासा देणारी गुंतवणूक आहे असे सर्वसामान्य लोकांना वाटले आणि त्यांनी मुहूर्ताचा किंवा कसलाही आधार घेऊन ते खरेदी केले तर त्यात त्रागा करण्यासारखे काय आहे?

सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल तेव्हा आता ठरवा काय करावे ते. आणि जर बँकेत लॉकरमध्ये ठेवायचे तर गहाण ठेवा आणि आलेल्या पैशाचे पुन्हा सोने घ्या. व्याज जरी गेले तरी बराच काळ गुंतवणूक केल्यास बराच फायदा होतो. मी ८००० भाव असताना घेतलेले आज ३२000 झाले मधल्या काळात गहाण ठेवलेल्या पैशातून आलेले सोने विकून गहाण ठेवलेले सोने सोडवले आणि पुन्हा लगेच अगदि त्याक्षणी पुन्हा गहाण ठेवले जास्त पैसे मिळाले कारण भाव वाढला होता त्यातून पुन्हा सोने घेऊन ठेवले हा प्रकार २००८ पासून करतोय. (तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.) घेतले सोने तेव्हा भाव ८०००/- कर्जावर हफ्ता (फक्त व्याज भरावे लागत असल्याने) महिना १% कर्ज ९०% ऑफ द गोल्ड प्राईज in मार्केट (तज्ञांनी गणित करावे, बुद्धीवतांनी चर्चा आणि माझ्यासारखे अडाणी कृती करून मोकळे होतात.)

In reply to by ज्ञानव

>>>(तज्ञांनी गणित करावे, बुद्धीवतांनी चर्चा आणि माझ्यासारखे अडाणी कृती करून मोकळे होतात.) हे भारीच... :)

In reply to by ज्ञानव

पटले नाही. साहेब माझ्या आई वडिलांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी(१९८८ मध्ये) मी आईला २५ ग्राम सोन्याचा हार घेतला होता तेंव्हा सोन्याची किंमत ३२०० रुपये होती. तेंव्हा तेच पैसे जर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत ठेवले असते तर पहिली १० वर्षे १२ टक्क्याने आणि नंतरची १५ वर्षे ९ टक्क्याने व्याज गृहीत धरून किंमत ३९८०० होते. शिवाय माझा ९६० रुपये( प्रती ग्राम कर वाचला असता) म्हणजे २२४० रुपयांचे ३९००० झाले असते. शिवाय हरवणे चोरीला जाणे लॉकरचे भाडे हे त्यात धरलेले नाही. हौसेला मोल नाही. तोच हार यावर्षी आईने अतिशय समाधानाने लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी घातला होता त्याचे मोल कसे करणार. हौसेसाठी घेतलेले सोने आणि गुंतवणूक या गोष्टी वेगळ्या ठेवाव्या अशी माझी विचारसरणी आहे. हा वैयक्तिक सत्य अनुभव आहे. तेंव्हा आपले म्हणणे पटले नाही.

In reply to by सुबोध खरे

तुम्ही माझा मूळ प्रतिसाद संपूर्ण वाचला नाही. तसेच ३२०० रुपये (प्रती १० ग्रामप्रमाणे)सोन्याच्या भावाचा २५ ग्रामचा हार रु.२२४० ला कसा ते काही कळले नाही. असो. पण माझे गणित असे आहे कि तर....१९८८ साली ३२०० प्रमाणे घेतलेले सोने (रु. ३२०० प्रती १० ग्राम )रु. ८०००/- ला हातात आले.( जे दागिन्याच्या रूपाने म्हणजे सोने कमीच. पण तो मुद्दा नाही.) आज सोने ३०००० प्रती १० ग्राम प्रमाणे जरी विचार केला तरी त्याची किंमत ७५००० रुपये होते. हा झाला ढोबळ गणिताचा भाग. पण जर मी म्हणतो त्याप्रमाणे त्याकाळी सोने गहाण (लॉकर मध्ये नाही ) ठेवून नवीन सोने ट्रेड केले असते जसे मी वर नमूद केले आहे तर तुमचे किती हार आज तुम्ही विकत घेऊ शकला असता , व्याज देऊनहि , त्याचे गणित जाणकार मांडतीलच. कारण
(तज्ञांनी गणित करावे, बुद्धीवतांनी चर्चा आणि माझ्यासारखे अडाणी कृती करून मोकळे होतात.)
कदाचित २ वर्षात १ नवीन हार हि आईला घेऊन देऊ शकला असतात म्हणजे ओरिजिनल एक आणि नवीन एक असे दोन हार झाले असते. मी दिलेला ट्रेड खालीलप्रमाणे : (डॉक्टर साहेब ट्रेड ....ट्रेड अतिशय महत्वाचा भाग आहे इथे.)
मी ८००० भाव असताना घेतलेले आज ३२000 झाले मधल्या काळात गहाण ठेवलेल्या पैशातून आलेले सोने विकून गहाण ठेवलेले सोने सोडवले आणि पुन्हा लगेच अगदि त्याक्षणी पुन्हा गहाण ठेवले जास्त पैसे मिळाले कारण भाव वाढला होता त्यातून पुन्हा सोने घेऊन ठेवले हा प्रकार २००८ पासून करतोय. (तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)
पी पी एफ मधील तुमची रुपये ८००० (रु. ३२००/प्रती १० ग्राम ) गुंतवणूक २५ वर्षाने तुम्हाला एकूण ९८६४९/- देते.

आणि

जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे २२४० रुपयाची तुमची हारातली गुंतवणूक पी पी एफ मध्ये असती तर एकूण 27६२२/- देते.

In reply to by ज्ञानव

सोन्यात तुम्हाला एकदाच रु. ८०००/-( किंवा तुम्ही अदा केलेली रक्कम रु. २२४० /- )भांडवल म्हणून गुंतवावे लागले असते. पी पी एफ ला तुम्हाला दर वर्षी केवळ खाते सुरु राहावे म्हणून किमान १०० रुपये प्रमाणे २५ वर्षासाठी २५०० /- रुपये वाढीव भांडवल गुंतवावे लागले असते.(आता रु ५०० किमान गुंतवणूक करावी लागते असे ऐकून आहे.) मी एकदाच रु.८००० सोन्यात टाकून ७००० रुपये बँकेकडूनच घेऊन पुन्हा सोने घेतले आणि भाव वाढल्यावर विकले असे ट्रेड केले. (ते मी कितीही वेळा करू शकतो.कारण जितके जास्तवेळा खाते बंद उघड होईल तेव्हढे पैसे मला जास्त मिळतात कारण भाव वाढलेला असतो.)

In reply to by ज्ञानव

>> मी एकदाच रु.८००० सोन्यात टाकून ७००० रुपये बँकेकडूनच घेऊन पुन्हा सोने घेतले आणि भाव वाढल्यावर विकले असे ट्रेड केले. हे म्हणजे स्टॉकचे मार्जिन अकाऊंट उघडण्यासारखे झाले. असो, या बाबतीत मी डॉ. खरे यांच्याशी सहमत आहे. २०११ च्या रिपोर्टमध्ये वॉरन बफेने सोन्याबद्दल काय म्हटले आहे, ते इच्छुकांनी जरूर वाचावे. The second major category of investments involves assets that will never produce anything, but that purchased in the buyer’s hope that someone else – who also knows that the assets will be forever unproductive – will pay more for them in the future. Tulips, of all things, briefly became a favorite of such buyers in the 17th century. This type of investment requires an expanding pool of buyers, who, in turn, are enticed because they believe the buying pool will expand still further. Owners are not inspired by what the asset itself can produce – it will remain lifeless forever – but rather by the belief that others will desire it even more avidly in the future. The major asset in this category is gold, currently a huge favorite of investors who fear almost all other assets, especially paper money (of whose value, as noted, they are right to be fearful). Gold, however, has two significant shortcomings, being neither of much use nor procreative. True, gold has some industrial and decorative utility, but the demand for these purposes is both limited and incapable of soaking up new production. Meanwhile, if you own one ounce of gold for an eternity, you will still own one ounce at its end. What motivates most gold purchasers is their belief that the ranks of the fearful will grow. During the past decade that belief has proved correct. Beyond that, the rising price has on its own generated additional buying enthusiasm, attracting purchasers who see the rise as validating an investment thesis. As “bandwagon” investors join any party, they create their own truth – for a while. Over the past 15 years, both Internet stocks and houses have demonstrated the extraordinary excesses that can be created by combining an initially sensible thesis with well-publicized rising prices. In these bubbles, an army of originally skeptical investors succumbed to the “proof” delivered by the market, and the pool of buyers – for a time – expanded sufficiently to keep the bandwagon rolling. But bubbles blown large enough inevitably pop. And then the old proverb is confirmed once again: “What the wise man does in the beginning, the fool does in the end.” Today the world’s gold stock is about 170,000 metric tons. If all of this gold were melded together, it would form a cube of about 68 feet per side. (Picture it fitting comfortably within a baseball infield.) At $1,750 per ounce – gold’s price as I write this – its value would be $9.6 trillion. Call this cube pile A. Let’s now create a pile B costing an equal amount. For that, we could buy all U.S. cropland (400 million acres with output of about $200 billion annually), plus 16 Exxon Mobils (the world’s most profitable company, one earning more than $40 billion annually). After these purchases, we would have about $1 trillion left over for walking-around money (no sense feeling strapped after this buying binge). Can you imagine an investor with $9.6 trillion selecting pile A over pile B? Beyond the staggering valuation given the existing stock of gold, current prices make today’s annual production of gold command about $160 billion. Buyers – whether jewelry and industrial users, frightened individuals, or speculators – must continually absorb this additional supply to merely maintain an equilibrium at present prices. A century from now the 400 million acres of farmland will have produced staggering amounts of corn, wheat, cotton, and other crops – and will continue to produce that valuable bounty, whatever the currency may be. Exxon Mobil will probably have delivered trillions of dollars in dividends to its owners and will also hold assets worth many more trillions (and, remember, you get 16 Exxons). The 170,000 tons of gold will be unchanged in size and still incapable of producing anything. You can fondle the cube, but it will not respond. Admittedly, when people a century from now are fearful, it’s likely many will still rush to gold. I’m confident, however, that the $9.6 trillion current valuation of pile A will compound over the century at a rate far inferior to that achieved by pile B.

In reply to by उपाशी बोका

लिमिटेशन्स आहेत भाव पडला तर लगेच ब्रोकर पैसे मागतो.किंबहुना मार्जिन म्हणजे जुगारच असावा. इथे नुसते नियमाने व्याज भरले कि झाले सोन्याचा भाव वाढला कि पुन्हा सोने TOP UP करायचे आणि पैसे नाही "युनिट्स" वाढवायचे. पण इथे सर्वजण सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहत आहेत मी ट्रेडिंग म्हणून पाहतो आहे. तसेच सोने, शेअर्स,सदनिका काहीही खरेदीची वेळ हि आदल्या उच्चतम पातळीखाली जेव्हा येते तेव्हा असते तसे ट्रेड भरपूर मिळतात पण पारंपारिक गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणारे आणि एकदम जुगार म्हणून पाहणारे असे दोन तट मला मिळणाऱ्या प्रतिसादातून दिसून आले ते त्या तत्वांना कन्व्हिन्स आहेत मी माझ्या तत्वाला कन्व्हिन्स आहे. असो...

(तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)
हा भाव जेव्हा - जेव्हा सोने सोडवले तेव्हाचा आहे.

सोन हा चांगला गुंतवणूक पर्याय आहे हे मान्यच. गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांबरोबर सोनेही समाविष्ट असावे. परंतु ही गुंतवणूक सोन्याची बिस्किटे अथवा नाणी घेऊन करता येते. सोन्याच्या दागिन्यांचा सोस अनाकलनीय आहे. दागिने खरेदी करताना तसेच प्रसंगी ते मोडताना घडणावळ, घसारा इत्यादी कारणांसाठी होणारा खर्च निरर्थक ठरत नाही का? दागिन्यांचा हा सोस अकारण संपत्तीच्या प्रदर्शनाकडे आणि त्यातून अहमहमीकेकडे झुकतो आणि त्यातून गुंतवणूकीचा मूळ उद्देश कितपत साध्य होतो?

आपली हिशेबात गल्लत झाली आहे. १) मी प्रती ग्राम प्रमाणे स्वच्छ हिशेब दिला आहे त्यात ३२००/ रुपये / दहा ग्राम आहे या सर्व हिशेबाला आपण २. ५ ने गुण म्हणजे आपल्याला हिशेब नीट लक्षात येईल २) आपल्या करपात्र उत्पन्नातून ३० टक्के वजावट मिळते म्हणजे प्रती दहा ग्राम रुपये ९६०/- म्हणजे ८००० पैकी २४०० रुपये वजावट म्हणजे ५६०० रुपये नक्त गुंतवावे लागतात ३) पी पी एफ मधील तुमची रुपये ५६०० (रु. ३२००/प्रती १० ग्राम ) गुंतवणूक २५ वर्षाने तुम्हाला एकूण ९८६४९/- देते.आणि हे २४०० रुपये (कराचे वाचलेले )सुद्धा त्यात गुंतवले तर तीच रक्कम १,५८,०००/ - होतात तीच सोन्यातील गुंतवणूक ८ हजार रुपयावर ७५००० देते. आपणच हिशेब करून पहा काय जास्त फायदेशीर आहे ४) दर वर्षी १०० रुपये आपल्याला तसेच बारा टक्के व्याज सुद्धा देतात. ५) पी पी एफ मधील गुंतवणूक सहा वर्षानंतर काढून घेता येते आणि तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो . म्हणजेच अधिक ३०% नक्त नफा. असे आपण साहव्या वर्षानंतर करू शकता. (ती शक्यता अजिबात धरलेली नाही तरीही) ६) सोन्याची किंमत आपण म्हणता तशी पूर्वी वाढलेली नव्हती हि गेल्या पाच वर्षातील वाढ (२००७ ते २०१२) आहे मागच्या वर्षानंतर हि वाढ परत थांबली आहे. (http://zeenews.india.com/business/bullion/bullion-news/gold-price-india…)तेंव्हा आपण त्या कालावधीत सोने घेतले तर भरपूर फायदा झाला त्यागोदर नाही आणि कदाचित लगेच पुढच्या पाच वर्षात होईल असे नाही. सोने फक्त ७३-७४, त्यानंतर ७७-८० आणि शेवटी २००७ ते २०१२ या कालावधीत भरभर वाढले होते आणि बाकी इतकी वर्षे ५-६ % या दरानेच वाढले आहे ७)सोने गेल्या ८८ वर्षात ८.५ टक्के दरानेच वाढलेले आहे यात एक महायुद्ध, असंख्य युद्धे भयानक जागतिक मंदी इ अनेक करणे असून सुद्धा. (२०१२ साली २९००० आणि आता ३०००० म्हणजे जेमतेम ३ % म्हणजे आता आपण जर १२ टक्के व्याजाने पैसे घेतले तर नक्त ९ % नुकसान होते ) . ८) आपल्या हिशेबात १२ % व्याज (सोन्याच्या कर्जाचे) गृहीत धरलेले नाही. ९) वरील विदा मध्ये कोणत्या वर्षात सोने १२ टक्क्यापेक्षा वाढले तेवढीच वर्षे आपल्याला नफा होईल आणि इतर वर्षी नुकसान होईल. सोने वाढेल कि कमी होईल याचा अंदाज बांधणे ब्रम्हदेवाला सुद्धा शक्य नाही. १०) सोन्याच्या व्यापारातून मिळवलेला नफा हा परत करपात्र आहे म्हणजे ३० % त्यातून आयकर कपात केली तर प्रत्यक्ष फायदा किती होईल ते पहा. ८८ वर्षात ८.५% दराने वाढलेल्या सोन्यावर ३० टक्के आय कर लावल्यास नक्त परतावा ५.८ टक्के होतो. ११) पी पी एफ मधील गुंतवणूक हि पूर्णपणे कर् माफ आहे १२) सोन्यातील हा ट्रेड सर्व सामान्य माणसा ला सहज जमणारा नाही. पण वर्षात एकदा सरकारी खात्यात पैसे भरणे कोणाही माणसाला सहज जमणारे आहे. सबब आपले म्हणणे अजिबातच पटणारे नाही.

In reply to by सुबोध खरे

प्रथम इथे गेल्या ४१ वर्षातीलसोन्याचे भाव दिलेले आहेत. म्हणजे सोन्याची वाढ हि गेल्या पाच वर्षातील वाढ आहे का ? त्याचे उत्तर मिळेल. सोन्याचे अनेक ट्रेड आहेत जे तुम्हाला इतर कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा चांगले आणि सुरक्षित पैसे मिळवून देतातच. पण तुम्ही फार ढोबळ पणाने पी. पी. एफ आणि सोने हि सांगड घालता आहात. मी २००६ पासून ह्या प्रकारात ट्रेड करत आहे. कॅडबरी किंवा बिस्कुट ह्या प्रकारात सोने घेतो आहे त्यामुळे ते विकताना घट कधीच आली नाही. माझा ट्रेड खालील प्रमाणे : १० ग्राम सोने खरेदी दर रु. ८४०० प्रमाणे गुंतवणूक : ८४०० ०९ ग्राम सोने खरेदी दर रु. ८४०० प्रमाणे गुंतवणूक :७५६० (हे पैसे बँकेने वरील १० ग्राम सोने गहाण ठेऊन दिले आहेत.)म्हणजे ७५६० भागिले ८४० रुपये प्रती ग्राम प्रमाणे ९ ग्राम प्रथम गहाण ठेवलेले सोने सोडवले २००८ साली तेव्हा भाव होता १२५०० आता मी ९ ग्राम सोने विकले आणि आलेले पैसे बँकेत भरून उरलेले १० ग्राम सोडवून घेतले आणि तेही सोने विकले. १९ ग्राम सोन्याची विक्रीतून आलेले पैसे : २३७५० (१९ * १२५०) वजा बँकेचे कर्ज : ७५६० १२% व्याज रुपये ९०७.२० दर साल : २७२२ प्रमाणे रुपये (९०७.२०* ३ = २७२१.६०) एकूण नक्त नफा : २३७५० -(७५६०+२७२२+८४००)= ५०६८/- २७% नफा म्हणजे ९% वार्षिक आता तुम्ही म्हणाल म्हणजे फिक्स डीपोझीट एवढाच झाला कि तर सकृत दर्शनी तुम्हाला ट्रेड कळावा म्हणून दिलेली पद्धत आहे ती. वास्तवात मी पुन्हा ५०६८ रुपयाचे सोने विकत घेतले असे करत करत आज माझ्याकडे नक्त ३० ग्रांम सोने, म्हणजे एकूण ४० ग्राम सोने, बिस्कुट रुपात जमा आहे. (फक्त ८ वर्षात...२५ नाही कि १५ नाही )पण त्यासाठी मला १० वेळा बँक ते सोनार धावाधाव करावी लागते जी पी पी एफ मध्ये पूर्णपणे वाचते कारण आता ओन लाईन पैसे भरण्याची सोय हि आहे. पण हा झाला माझा ट्रेड. ह्याचे अनेक कंगोरे आहेत जे मला भांडवलवृद्धी देतात ती हि युनीट्सच्या रुपात. आता तुम्ही गणित करा २००६ ला माझी गुंतवणूक ८४०० आणि आज माझे भांडवल (जो माझा नफा हि आहे.) ३० ग्राम * ३००० प्रती ग्राम = रु. ९००००/- कोण फायद्यात आहे ते.(मुळ १० ग्राम मी लक्षातच घेत नाहीये.) आता टेक्स : कर भरताना माझ्या एकूण उत्पन्नातून ३०% कर भरावा लागतो त्यात माझ्या करबचत योजनामधील गुंतवणूक माझ्या कामी येते आणि गम्मत म्हणजे त्या कर बचत योजनाही व्याज देतात. माझा ट्रेड सर्वांना कळला का ? मी काही लपवतो आहे असे वाटत असेल तर जरूर विचारा. --------------------------------------------------------------------------------- प्रथम, आर्थिक उत्पन्न हे नेहमी विक्रीतून येते मग ती बुद्धीची विक्री असो, सेवेची विक्री असो कि एखाद्या वस्तूची विक्री असो त्या विक्रीतून आणि फक्त विक्रीतूनच झालेला नफा हा करपात्र असतो. तुम्ही सोने खरेदीतून सरसकट ३०% कर वजा कसा केलात ते मला समजले नाही. कुणी मिपाकर जर सी ए असतील तर त्यांनी प्रकाश टाकावा. मला जाणून घ्यायला आवडेल.कारण त्याने माझे नफ्याचे प्रमाण भरपूरच वाढेल. म्हणजे आजचे ३०००० रुपयाचे सोने कर वजवटीमुळे मला २१००० रुपयात बाजारात मिळेल असा अर्थ निघतो का? तुम्ही पहिल्या प्रतिसादात काढलेला नफा रु. ३९००० होता जो पुढच्या प्रतीसादापार्यंत १५८००० झाला ते हि गणित इथे उदाहरणासहीत मांडा मोघम आकडेवारी नको कारण त्याने मी बावचळतो. कारण जर तुम्ही खालील प्रमाणे गुंतवणूक पी पी एफ मध्ये केलीत अगदी वर्षाला १०० रुपये भरून तरीही पूर्वी १२% आणि आता ९% प्रमाणे गणित खाली दिले आहे. (कुणाला खालील गणिताची एक्सेल हवी असल्यास अल्प मोबदल्यात उपलब्ध करून देण्यात येईल ....मोबदला : मिपा.) १) रुपये 2२40 अधिक १०० रुपये दर वर्षी प्रमाणे २५ वर्षानंतर रुपये ३७७८९/- २) रुपये ५६०० अधिक १०० रुपये दर वर्षी प्रमाणे २५ वर्षानंतर रुपये ७९२२२/- ३) रुपये ८००० अधिक १०० रुपये दर वर्षी प्रमाणे २५ वर्षानंतर रुपये १०८८१७/- असे पैसे मिळतात. सकृत दर्शनी हे पैसे सोन्यापेक्षा जास्तच आहेत. पण... १) सोन्याला जी रोखता आहे (लिक्विडीटी) ती पीपीएफ ला नाही. १५ वर्षापर्यंत पी पी एफ ची संपूर्ण रक्कम काढता येत नाही. २) १२% व्याज दर ९% (१ एप्रिल २०१३ पासून ८.७०%) आलेला आहेच तो अजून हि खाली येऊ शकतो ३) योग्य तो कर सरकारकडे भरून जर मला हवे तेव्हडे कमावण्याची मुभा असेल तर मी जितक्या संधी मला उपलब्ध होतील तितके पैसे जास्त मिळवत राहीन असा विचार आपण का करू नये? सरकारला कर द्यावा लागेल म्हणून निष्क्रिय बसून राहणे म्हणजे चलनातून पैसा वाढतो ह्या नियमालाच खीळ घालणे होईल. आणि सरकारला कर देऊ नये का? प्रत्येक गुंतवणुकीचे निकष हे वय, तुम्हाला लागणारी भविष्यातली गरज हे लक्षात घेऊनच करतात म्हणजे गुतंवणूक रोखता हाही तितकाच महत्वाचा भाग आहे. सोन्याचे युनिट्स जर बँकेच्या पैश्यात वाढवत राहिले तर तो फायदा किती आणि कसा होतो ते सोन्याच्या भावावरून दिसतेच.पी पी एफ चे युनिट्स तसे वाढवता येत नाहीत. जगभरातल्या खाणीतून होणारे सोन्याचे उत्पादन आणि जगभरातली मागणी लक्षात घेता सोन्याचा भाव खाली जाईल का हे सांगयला श्री ब्रह्मदेव ह्यांना त्रास द्यायची गरज नाही. तसेच २०१२ साली 31७९९ आणि २०१३ साली ३४५०० इतका होता म्हणजे ८.५०% (मी जे १२% व्याज देणार त्यापेक्षा कमीच ओ !!!) "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" ह्या पद्धतीने पी पी एफ जे देईल तेच तुम्हाला घ्यावे लागेल म्हणजे खेळाचे नियम पी पी एफ्चे तर ते बरोबर नाही खेळाचे नियम माझ्या हातात हवे म्हणजे मी मला हवे तेवढे कमवू शकतोच. आता मुद्दा सामान्य माणूस, मराठी माणूस (वास्तविक द्विरुक्ती आहे.) हे लेबल लाऊन किती दिवस जगणार हो. सोन्याच्या दुकानात आणि बँकेत गर्दी दिसते सोन्याचे भाव कितीही वाढले तरीही. आणि सामान्य कुणी नाही (कोट्यवधींची स्पर्धा ज्याने आईच्या पोटातच जिंकली तो सामन्य नाहीच...) ज्याला जरा जास्त पैसे देणारे कुणी दिसले तर तो त्या माणसाच्या मागे धावत सुटतो कारण तो सामान्य नाही "माठ" आहे म्हणून. थोडक्यात कुणीतरी कमावून द्यावे मी मेहनत (??) सोर्री झंझट करणार नाही हि वृत्तीच सामान्य करतेय आपल्याला. पी पी एफ वाईट नाही माझे हि खाते आहेच कि पण पी पी एफ मध्ये पैसे मी सोन्यातून ट्रेड करून भरतो इतकाच फरक आहे. थोडक्यात गुंतवणूक आणि ट्रेड ह्याची योग्य सांगड घालून आर्थिक वृद्धीचा प्रयत्न सतत करणे कि वेगवेगळ्या योजनांमधून पैसे अडकवून वाट पाहत बसणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. @वारेन बफे बद्दल प्रचंड आदर मनात आहेच पण त्यांनी सगळ्या जगातील १/५ चांदी खरेदी केली होती ती का बुवा?

In reply to by ज्ञानव

एकूण नक्त नफा : २३७५० -(७५६०+२७२२+८४००)= ५०६८/- २७% नफा म्हणजे ९% वार्षिक
माझी एकूण गुंतवणूक ८४०० +२७२२ = १११२२ आणि नफा ५०६८ /- म्हणजे जवळ जवळ ४५.५० % कारण मी व्याज आणि पहिले भांडवल रु. ८४०० म्हणजे १५.६०% मी म्हंटलेच आहे.

In reply to by ज्ञानव

वारेन बफे बद्दल प्रचंड आदर मनात आहेच पण त्यांनी सगळ्या जगातील १/५ चांदी खरेदी केली होती ती का बुवा?
त्यांनी चांदी घेतली, सोने नाही. चांदीची ऑद्योगिक क्षेत्रात बरीच गरज असते. ती सोन्या सारखी नुस्ती पडुन रहात नाही.

In reply to by ज्ञानव

@ ज्ञानव - तुम्ही गहाण ठेवुन उगाच व्याज वाया घालवत आहात. त्यापेक्षा हे करुन बघा. ( तुम्ही स्टॉक्स मधे काम करता म्हणुन तुम्हाला उपयोगी आहे ). तुम्हाला माहीती असेलच, तरी पण. १. सोने घेण्यापेक्षा त्याचे ETF घ्या ( तेव्हड्याच किमती चे ). उदा. १,००,००० २. ते Pledge करा, तुम्हाला ८५,००० चे Margin मिळेल ( Without any Cost ). ३. ह्या मार्जीन चा उपयोग करुन तुम्ही F&O मधे काम करु शकता. ४. जर सोन्याचा भाव वाढला तर तुम्ही ते pledge काढुन, विकू शकता.

In reply to by प्रसाद१९७१

आणी सोन्याचा भाव उतरला तर ? गेली चार ते पाच वर्षे २००७ ते २०१२ सोन्याचा भाव चढतच गेला म्हणून ज्ञानव साहब त्या काळात यशस्वी झाले.(त्या अगोदर असे झाले नसते ही गेल्या ८८ वर्षांच्या सोन्याच्या भावावरून स्पष्ट दिसत आहे.) याच काळात जर सोने पडले असते तर दुहेरी नुकसान झाले असते. हा सट्टा आहे सर्व समान्य माणसाने खेळू नये असे मला वाटते. साध्या सोन्याला उतरती कळा लागलेली आहे तेनव्हा पुढच्य दोन ते तिन वर्षात सोने प्रत्यक्ष किंवा गोल्ड फंड मध्ये घेऊ नये असे मला वाटते. F & O हा सुद्धा सट्टा आहे ज्याचे जळते त्याचे ओले ही जळते आणी नाहि त्याचे सुकेही जळत नाहि.ज्याने कमित कमी पाच वर्षे शेअरबाजारात घालविली आहेत त्यानेच याचा विचार करावा. नाहीतर यात हात भाजून घेतलेले लोक मिपावर सुद्धा कमी नाहित असे पुर्वीच्या चिखलफेकी वरून जाणवते.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब - माझा सल्ला फक्त ज्ञानव यांना होता. ते सोने गहाण ठेवून महीना १% व्याज उगाचच वाया घालवत आहेत, म्हणुन त्यांना ह दुसरा उपाय सांगितला. त्यांचे वर्षाचे १२ % व्याज वाचेल.

In reply to by सुबोध खरे

तुम्ही वाढवलेले युनिट्स कामाला येतातच. हा सट्टा तर अजिबात नाही कारण सोने हे बराच काळ स्थिर असते असा अनुभव आहे. ते रातोरात पडत नाही कि चढत नाही आणि सोने चढायला लागल्यावरच ट्रेड केले पडायला लागल्यावर वाढवले तरी आज मी बराच पुढे आहे. रु. १९३ सोन्याचा भाव रु. ३४००० पर्यंत पोहचला हाही इतिहासच आहे. आणि सोने जर इतके नुकसान कारक आहे तर लोकांनी विकायला काढावे कि... दागिन्यांची झीज होते तरीही आम्ही नव नवीन दागिने ३४००० रुपयाने हि विकत घेतोच आहोत. मग ते का हौस म्हणून ? म्हणजे "सामान्य माणसाकडे" ३४००० रुपयाची हौस करायला पैसा आहे? आणि ट्रेड करून तो वाढवायला सांगितला तर तो जुगार आहे? हे विसंगत आहे. लहान मुलांचे भवितव्य घडावा सांगणाऱ्या म्युचअल फंदात पैसे बुडले तरी लोक हु कि चू करत नाहीत पण जो सोन्याचा ट्रेड ८४०० चे ९०००० फक्त ८ वर्षात करून देतो तो जुगार? मग मी स्वतःला कृतीशील अडाणी म्हणतो ते तरी पटते का?

In reply to by सुबोध खरे

(त्या अगोदर असे झाले नसते ही गेल्या ८८ वर्षांच्या सोन्याच्या भावावरून स्पष्ट दिसत आहे.)
८८ वर्षात ८.५ जर भाव वाढत असेल तर पुष्कळ आहे कि. वाईट काय आहे ते लिहा

In reply to by प्रसाद१९७१

पण १) मी जुगार कधीच खेळत नाही (F&O) च्या संदर्भात बोलतोय. २) प्रत्यक्ष गोल्ड मला अनेक कारणांनी बरे पडते. सोनार आता घरातलाच असल्यासारखा झाला आहे. त्यामुळे फोनवर काम होते.बँक जवळजवळ ९५% पैसे देते कारण बरीच वर्ष संबंध आहेत. ३) ब्रोकर्सवर तेवढा विश्वास नाही कारण खूप पहिले भोगले आहे. ४) CONSERVATIVE थिंकिंग असल्याने बँकच बरी पडते. व्याज आणि कर भरून हि स्लो बट स्टेडी मी युनिट्स वाढवतो आहेच. एकतर धंदा आहे थोडी मेहनत घ्यावी आणि थोडे प्रत्यक्ष सोने हातात घेऊन बघण्याची नशा काही औरच आहे. पण सल्ला पटला आवडला तरी तत्व आड येतात म्हणून सॉरी. तसेच धन्यवादसुद्धा

In reply to by ज्ञानव

सन २०४० "सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल तेव्हा आता ठरवा काय करावे." जर सव्वीस वर्षात गुंतवणूक तिप्पट झाली तर दर काय मिळतो ४.२४ टक्के वर त्या व्याजावर आपल्याला आयकर भरावा लागतो ३० % प्रमाणे म्हणजे शंभर रुपयचे सोने घेतले तर ते ३०० रुपयचे होणार विकलेल्या नफ्यावर (२०० रुपयावर ६० रुपये आपण कर भरणार)म्हणजे आपला परतावा फक्त ३.४ टक्के होतो. मग सोन्यात गुंतवणूक का करायची हे आपणच सांगा.

In reply to by सुबोध खरे

म्हणूनच ट्रेड करायचा सल्ला देतोय २००६ साली १० ग्राम घेतलेले सोने आजे २०१३ मध्ये(८ वर्षात) १०+३० =४० ग्राम पर्यंत वाढवले त्याचा फायदा मला होतोच आहे. मी फक्त ८४०० आणि दरवर्षीचे व्याजच गुंतवतो बाकी पैसे बँक भरते. ३४००० रुपयाला हि सोने घेतले आहे. आणि आता २०००० येईल तेव्हाही घेणारच आहे. सोने हे दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे हे तुम्हीही जाणता पण म्हणून ते घेऊन नुसतेच बसून राहिलात तर कदाचित तितकी भांडवल वृद्धी मिळणार नाही कारण लोक सोन्याची रोखता लक्षात घेऊन पैसे गुंतवत जातात भांडवल वृद्धी हा त्यांचा उद्देश नसतो मी बाजारात उपलब्ध साहित्य म्हणजे सोने, बँकेकडे गहाण ठेवण्याची सोय, एक उत्तम सोनार आणि माझी अल्प बुद्धी वापरून एक सिस्टीम चालवतो ज्या द्वारे मला एक नियमित उत्पन्न मिळते ते मी पुन्हा सोन्यात गुंतवतो आणि माझी

"युनिट्स"

लक्षात घ्या

"युनिट्स"

वाढवत राहतो. माझे हि नियम तुमच्या सारखे साधेच आहेत की सोने हि दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे. आणि व्याज, कर काहीही ना चुकवता संपूर्ण कायदेशीर...उलट आमच्याच धंद्यात सगळे व्हाईट मध्ये व्यवहार होतात.....पद्धतीने करतो. पण तुम्ही म्हणता ती "बुद्धिवादी चर्चा किंवा गणिते" मला समजत नाहीत मी खरोखर एक अडाणी आहे जो संधी घट्ट धरून ठेवतो कारण सगळ्या प्राण्यांना शेपूट मागे असते "संधी" ह्या प्राण्याला शेपूट डोक्यावर असते ती येताना दिसली कि धरावी नाहीतर ती गेली कि गेली. सोने गहाण ठेवा हि जाहिरात हा माझा क्ल्यू होता मी म्हंटले सगळ्या बँकांना एकदम कसे वेड लागले कि त्या सोने गहाण ठेऊन पैसे देऊ लागल्या? मग थोडी बाजारत फेरी मारली आणि केले सुरु...आता २००६ साली मी हे सुरु केले तर तो योगायोग नाही कारण बँकाही तेव्हाच सोन्यावर कर्ज देऊ लागल्या आणि गम्मत अशी कि किसान विकास पत्र किंवा तत्सम गोष्टी गहाण ठेऊन मी ट्रेड करतच होतो तरी एवढी अक्कल नव्हती की सोनेपण ठेवावे.... असो कदाचित तुम्हाला ते समजाणार नाही कारण प्रत्यक्ष कामाचा तुम्हाला अनुभव नाही पण बँक जर बरोबर असेल आणि एक किंमती वस्तू माझ्याकडे असेल तर त्याला वेग कसा द्यायचा हे मी पूर्ण जाणतो..

In reply to by ज्ञानव

>> बँक जवळजवळ ९५% पैसे देते कारण बरीच वर्ष संबंध आहेत. समजा, तुम्ही १ वर्षापूर्वी ३०,००० रुपयांनी १० ग्रॅम सोने घेतले. ते कर्ज ठेऊन ९५% लोन घेतले (२८,५००). मग त्या २८,५०० चे ९.५ ग्रॅम सोने घेतले. म्हणजे तुमच्याकदे १९.५० ग्रॅम सोने आहे आणि २८,५०० कर्ज आहे. १ वर्षानी सोन्याचा भाव ३०,००० वरून २५,००० वर आला. बँकेच्या हिशोबाने तुम्हाला सध्याच्या २५,००० रेटच्या ९५% लोन (= २३,७५०) बँकेने द्यायला पाहिजे, पण तुमचे लोन तर २८,५०० आहे. अशा वेळी बँक तुम्हाला ४७५० चा (२८,५०० - २३,७५०) मार्जिन कॉल देणार का?

In reply to by उपाशी बोका

२) समजा, तुम्ही बँकेला ४७५० रुपये भरले + १ वर्षाचे व्याज ३४५० (२८,५०० x १२%) पण भरले, म्हणजे तुमची "गुंतवणूक" झाली ३०,००० (सोने खरेदी) + ४७५०(मार्जिन कॉल) + ३४५० (व्याज) = ३८,२००. सध्याच्या २५,००० रेटने तुमच्या १९.५ ग्रॅम सोन्याचे झाले ४८,७५० आणि डोक्यावर कर्ज आहे २८,५०० म्हणजे मिळणार २०,२५० आणि खर्च केले ३८,२००. ही "गुंतवणूक" (किंवा ट्रेडिंग म्हणा) फायद्याची कशी? ३) जर तुम्हाला मार्जिन कॉल भरायचा नाही, मग सोने विकावे लागेल. त्याचे मिळतील ४८,७५० (२५,०००/१० x १९.५) तुम्ही बँकेला देणार २८,५०० (कर्ज) + ३४५० (व्याज) = ३१,९५० म्हणजे हातात उरले ४८,७५० - ३१,९५० = १६,८०० म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या ३०,००० चे झाले १६,८००. leverage असा घातक ठरतो. पटतोय का हिशोब?

In reply to by उपाशी बोका

२) समजा, तुम्ही बँकेला ४७५० रुपये भरले + १ वर्षाचे व्याज ३४५० (२८,५०० x १२%) पण भरले, म्हणजे तुमची "गुंतवणूक" झाली ३०,००० (सोने खरेदी) + ४७५०(मार्जिन कॉल) + ३४५० (व्याज) = ३८,२००. सध्याच्या २५,००० रेटने तुमच्या १९.५ ग्रॅम सोन्याचे झाले ४८,७५० आणि डोक्यावर कर्ज आहे २३,७५० (४७५० भरल्यामुळे कमी झालेले कर्ज) म्हणजे मिळणार २५,००० आणि खर्च केले ३८,२००. ही "गुंतवणूक" (किंवा ट्रेडिंग म्हणा) फायद्याची कशी?

In reply to by उपाशी बोका

पण मी वर प्रतिसादात एक वाक्य दिले आहे.
(तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)
म्हणजे २५००० नंतर मी थांबलोय.. नुसतेच आकड्याचे खेळ नाहीत हे. मागचे पुढचे संदर्भ लक्षात घेऊन तयार केलेली सिस्टीम आहे हि. २५000 नंतर मी थांबलोय.(फक्त एकदाच ३४०००ला एकदा सोडवून थोडे सोने घेतले आहे.) तुम्ही मध्येच एकदम समजा ३०००० ला घेतले तर असे आकडे मांडून लॉस नक्क्कीच दाखवू शकता कारण गुंतवणूक किंवा ट्रेड हयाची वेळ हि तितकीच महत्वाची आहे. बँक मला मार्जिन ट्रेडिंग करू देईल असे तुम्हाला वाटते का? पण मी २००६ पासून

"युनिट्स"

गोळा करतो आहे.त्यामुळे माझ्याकडचे सोन्याचा भाव अवरेज करून वेगवेगळा झाला आहे. माझा ब्रेक इव्हन पोइंत येऊन गेला आहे. मी एक पद्धत मांडली जी फूल प्रुफच आहे कारण वेळेत घेतलेला निर्णय कमावून देतोच. पण आता तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ट्रेडिंगची सायकल परत मिळण्यासाठी थांबावे लागेल नुसतेच वाचले आणि ठरवले कि घ्या सोने असे तर नाही ना? आता तुम्हाला १८-२०००० पर्यंत भाव येण्याची वाट पहावी लागेल पण माझ्याकडे युनिट्स वाढल्याने मी मात्र मला हवा तसा ट्रेड करू शकतो. (व्याजाचे भान ठेऊन निर्णय घेत घेत.) बाकी तुमचा हिशोब बरोबर ३०००० ने घेतलेल्या सोन्यावर आता काय मिळणार? कदाचित माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल.

In reply to by ज्ञानव

बाकी तुमचा हिशोब बरोबर. ३०००० ने घेतलेल्या सोन्यावर आता काय मिळणार? leverage किती घातक ठरू शकतो, एव्हडेच मला इतरांना उदाहरणाने पटवून द्यायचे होते. माझा हिशोब बरोबर आहे, हे सांगितल्याबद्दल आभारी आहे. भाव ८,००० वरून १२,००० नंतर २५,००० आणि नंतर ३४,००० झाला, त्यामुळे तुमचे अ‍ॅव्हरेज कॉस्ट कमीच असणार. त्यामुळे ही सिस्टीम फूलप्रूफ आहे, असे तुम्हाला वाटणे सहाजिक आहे. माझ्या मते हा भ्रम आहे. (fallacy). जर ८००० किमतीवरून १२,००० जाण्याऐवजी किंमत ६५०० वर गेली असती, तर वर म्हटल्याप्रमाणे नुकसान झालेच असते. आता तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ट्रेडिंगची सायकल परत मिळण्यासाठी थांबावे लागेल नुसतेच वाचले आणि ठरवले कि घ्या सोने असे तर नाही ना? आता तुम्हाला १८-२०००० पर्यंत भाव येण्याची वाट पहावी लागेल तुमच्या सिस्टीमप्रमाणे २५,०००ला (च) का थांबलात किंवा १८-२०,०० पर्यंत का थांबायचे, ते जरा स्पष्ट करू शकाल का? गुंतवणूक किंवा ट्रेड हयाची वेळ हि तितकीच महत्वाची आहे. तुमच्या मते, तुमची सिस्टीम हा गुंतवणूकीचा प्रकार आहे की ट्रेडिंगचा?

In reply to by उपाशी बोका

हा निव्वळ ट्रेड आहे. आणि त्यातून जनरेट होणारे रेवेन्यु गुंतवणुकीत लावतो म्हणजे सोनेच किंवा एफ डी किंवा पी पी एफ बाकी भाव केव्हा खाली जाईल ते आणि वर जाईल ती समज आता डेव्हलप झाली आहे. भाव २०००० किंवा १८००० का येईल त्याला कारण शेअर मार्केट आहे. प्रत्येक मार्केटची ट्रेड सायकल असते रियल इस्टेट आता स्थिरावले आहे. बराच माल पडून आहे. हिरा मार्केट संपल्यात जमा आहे. गोल्ड मध्ये कमावून झाले आहेत. जेव्हा एखाद्या माध्यमात (रियल इस्टेट, शेअर,गोल्ड )भरपुर स्पर्ट येतो त्यांनतर ते मार्केट धडधड कोसळू लागते जनरली ते ५०% कोसळते आपल्या उच्चतम पातळी पासून म्हणजे सोने ३४००० - १७००० असा विचार करता १८ ते २० पर्यंत त्यात पुन्हा जोरात खरेदी सुरु होईल पण एकदा २२-२३000 ची पातळी त्यांने दाखवली आहे तेही विसरता कामा नये. मी जे तुम्हला भरपुर स्पर्ट येतो त्यांनतर ते मार्केट धडधड कोसळू लागते म्हणतो त्याबाबत तुम्ही कुठलाही शेअर, कमोडीटी किंवा अगदी आय टी किंवा तत्सम क्षेत्रातल्या नोकर्यासुद्धा पाहा तुम्हाला जाणवेल. शब्दात मांडणे कदाचित मला जमत नाहीये कारण वासावरून चव ओळखण्याचे कसब शब्दात बसवता येत नाही. त्यामुळे ८००० भावाला जेव्हा वेग आला तेव्हा मी १२००० पातळी आधीच मनात धरली होती ८०००+४००० असे गणित करून आणि माझ्याकडे येणारी ग्राहक मंडळी मला हसत होती. (खुप वाईट वाटले तेव्हा मला आज तेच माझ्या मागे असतात कुठे पैसे लाऊ विचारत ......तेव्हाही वाईटच वाटते.) मार्केटचा मी भक्त आहे कारण नावातच "पेठ"कर आहे. असो. अभ्यास नसेल तर नुसत्या पद्धतीला काही अर्थ नसतो आणि गुंतवणूक प्रगल्भता लक्षात ना घेता एखाद्य्ला विरोध म्हणून विरोध असे असेल तर काय बोलणार??? कदाचित तुम्हाला कळले असेल मला काय म्हणायचे आहे ते.

In reply to by ज्ञानव

CONSERVATIVE थिंकिंग असल्याने
@ज्ञानव - तुम्ही ट्रेडिन्ग करता आहात, त्यात सुद्धा गहाण ठेवुन, त्यावर व्याज भरुन अजुन पोझिशन तयार करता आहात. तरीही स्वताला Conservative म्हणता आहात. हा विरोधाभास आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब - तुमचे एकदम बरोबर आहे. सोन्याचे भाव मधल्या ४-५ वर्षात खुप वाढले म्हणुन त्यात १०% तरी ROI दिसतो आहे. ह्या भाववाढीची कारणे ही वेगळी होती. आता पुन्हा तशी भाववाढ दिसणार नाही.

सोन्याचा भाव भारतीय रुपयात देण्यापेक्षा गेल्या शंभर वर्षांचा विदा डॉलर्स मधे आहे त्याचा एकदा अभ्यास केला तर एकंदर तुमचे गणित फेल जाते असे दिसेल. येत्या काही दिवसांत सोने ८०० डॉलर्स पर्यंत खाली येण्याचा अंदाज इनसायडर सांगत आहेत. टेक केअर ... गार्निअर.

In reply to by मारकुटे

सोन्याचा भाव खाली जवळ जवळ २२००० ते १८००० पर्यंत येईल असा अंदाज आहे. आणि मला तेच हवे आहे. कारण प्रत्येक गुंतवणुकीची एक ट्रेड सायकल असतेच फक्त ती पकडता आली पाहिजे. बाकी माहितीबद्दल धन्यवाद.

"सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो. मी तर स्वतःच (बायकोने विचारायच्या आधीच) तिला म्हणतो "अग, जरा सोने घेतो तुझ्यासाठी." पण नवर्‍यावर "पूर्ण विश्वास" असल्याने तिला लगेच शंका येते, मग तीच म्हणते "जाऊ दे, मी कुठे वापरते कधी. नाहीतरी बँकेतच पडून राहाणार ना". मी लगेच आज्ञाधारकपणे "बरं" म्हणतो. याला म्हणतात "साप भी मरे और लाठी भी ना टूटे". ती इथे मिपावर येत नाही, म्हणून बरे, नाहीतर काही खैर नाही. :)

एक महत्वाची गोष्ट : (अ) पी पी एफ् चे मुद्दल व परतावा यांची हमी सरकारने हमी दिलेली असते. त्यामुळे (१) मुद्दल बुडण्याची शक्यता नाही. आणि (२) व्याजदर फार खाली जाण्याची शक्यता नगण्य. (मागच्या वेळी पी पी एफ् चा व्याजदर अर्धापाव टक्का कमी करण्यावरून सरकारला पाठीबा देणार्‍या आणि विरोधी पक्षांच्या केवढ्या नाकादुर्‍या काढाव्या लागल्या होत्या हे लक्षात असेलच) म्हणजे एकूण परताव्याच्या साधारण आज केलेल्या आकडेमोडीएवढीच रकमेएवढी रक्कम मिळण्याची हमी असते. याउलट (ब) सोने किंवा इतर कोणत्याही कमॉडिटित केलेल्या गुंतवणूकीचा परतावा हा केवळ एक अंदाज असतो. याबद्दल कोणीही कोणतिही हमी देवू शकत नाही. जर भाव वर गेले तर आजच्या आकडेमोडीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो पण भाव पडले तर मूळ मुद्दलातही घट होउ शकते. भाव सतत वर जाणे हे भाव वर जाण्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात होते आणि भाव कोसळण्याची शक्यता भाव खूप वर असण्याच्या स्थितिला जास्त असते... आता सोन्याचे भाव बहुधा भाव त्यांच्या उच्च पातळीला आहेत (बबल / फुगवटा ?) असा अंदाज आहे. थोडक्यात... ज्यांना निर्धोक आणि खात्रीचा परतावा पाहिजे असेल त्यांनी पी पी एफ् मध्ये गुंतवणूक करणे योग्य. ज्यांच्याकडे अशी शिल्लक आहे की जास्त परताव्यासाठी ती धोका पत्करून गुंतवायला त्यांची हरकत नाही, त्यांनी कमॉडिटी अथवा कलाकृती इ च्या गुंतवणूकीचा अभ्यास करून त्यांत गुंतवण्याचा निर्णय घ्यावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बद्दल बोलतोय. गुंतवणुकीबद्दल नाही. गुंतवणूक करा पण ट्रेड करून करा एवढेच. आणि युनिट्स वाढत असल्याने सुरक्षितता आणि परतावा दोन्ही उत्तमच आहे. मुळात १ रुपयात १.९० पैशाची गुंतवणूक का कमावून देणार नाही?

In reply to by ज्ञानव

वरचा प्रतिसाद अजून स्पष्ट करण्यासाठी अजून एक भर... पी पी एफ् ही "इन्व्हेस्ट अ‍ॅन्ड फरगेट" अशी नसली तरी "इन्व्हेस्ट अ‍ॅन्ड रिमेंबर जस्ट वन्स अ इअर" अशी. त्यामुळे ही "एकरकमी + दरवर्षी किमान" किंवा "किमान रकमेच्यावर दरवर्षी हवी तशी" गुंतवणूक आहे. शिवाय "करोत्तर गुंतवलेले मुद्दल+ व्याज" पूर्णपणे आयकरमुक्त आहे. म्हणजे आज आकडेमोड केलेला परतावा १००% हातात येण्याची हमी आहे. त्याविरुद्ध, कमॉडिटी ट्रेडिंग ही भारतात तेवढिशी न रुळलेली गुंतवणूक आहे. शिवाय तिच्यावर शेअरच्या बाजारभावासारखेच जागतिक मागणी-पुरवठ्याचे सर्व परिणाम, धोके, अटी आणि नियम लागू होतात. ट्रेडिंगसाठी आणि विशेषतः खरेदी-विक्रीच्या योग्य वेळा निवडण्यासाठी सतत जागरूक राहणे जरूरीचे असते. भाव वर जात असले तरी एक मर्यादा ठरवून (अजून भाव वाढतील असा मोह ताब्यात ठेवून) "प्रॉफीट बुक" करण्यासाठी विक्री करणे आणि भाव पडत असले तरी एक मर्यादा ठरवून (भाव परत वर येतील अशी आशा न बाळगता) "लॉस कंट्रोल" विक्री करणे अथवा सिंव्हाच्या काळाजाने "झाले नुकसान तर झाले" असे म्हणून गूतवणूक कायम ठेवणे (होल्ड) हे सर्वसामान्य गुंतवणुकदाराला कितपत झेपेल याची शंका आहे. त्याचबरोबर, एकदा ट्रेड केला की फायद्याने फार हुरळूळून जाता किंवा तोट्याची फार हळहळ न करता त्याचा पुढचा ट्रेड त्या नविन वेळेच्या परिस्थितीचे विष्लेशण करून थंड डोक्याने करणे जरूरीचे असते. अश्या गूतवणुकीचा हातात येणारा परतावा ठरवताना त्यांतून सर्व वजावट (ट्रेड्संबद्धीचे कर, ब्रोकर कमिशन आणि आयकर) वजा करायची असते. थोडक्यात, कोणतीही गुंतवणूक तिच्याबद्दल शक्य तेवढी सर्व माहिती घेऊन आणि स्वतःची धोका पत्करण्याची तयारी (रिस्क अ‍ॅव्हर्जन) कितपत आहे हे ठरवून मगच करावी. शेअर अथवा कमॉडिटिच्या गुंतवणूकीचा परतावा भूतकालातील घडामोडीवर किंवा इतरांच्या पूर्वानुभवांवर अवलंबून नसतो. त्यामुळेच तशी धोक्याची सूचना अश्या सर्व गुंतवणूकींच्या जाहिराती आणि माहितीपत्रकांवर देणे कायद्याने जरूर आहे. येथे मी कोणा एका गुंतवणूकीच्या प्रकाराचा विरोध अथवा भलावण करत नाही. वरीलपैकी कोणती परिस्थिती आपल्या खिश्याला आणि रक्तदाबाला परवडणारी आहे की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे; इतकेच माझे मत आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुरक्षीतता व व परतावा ह्या संकल्पना अनेकदा सापेक्ष ठरतात. तुलनाच करावयाची तर पी पी एफ् ही अधिक दीर्घकाळ अडकुन रहाणारी गुंतवणुक आहे. आणि जरी तिच्यातील व्याजदाराचे बदल ही अधिक संथपणे होतात तरी एकुणातच येथुन पुढे कोणालाही, अगदी सरकारलाही, व्याजदर कृत्रिमपणाने कमी वा जास्त ठेवणे शक्य नाही. (अशाच एका खात्रीच्या आणि 'सरकारी' असे बिरुद मिरवलेल्या युनिट ट्रस्ट चे अशाच कृत्रिमपणाने किंमती ठरविल्याने शेवटी काय झाले याची आठ्वण आल्याशिवाय रहात नाही) त्यामुळे मुद्दल बुडण्याची शक्यता नाही हे खरे असले तरी व्याजदराबद्दलचे अंदाज ( होय, अंदाजच) चुकु शकतात. असा व्याजदर हा एकतर्फी ठरवला जातो आणि तो खात्यात असलेल्या सर्व रकमेवर लागु होतो. करपात्रता हाही एक 'आज आहे पण उद्या ---? ' या पठडीतला्च मुद्दा आहे. E-E-E म्हणजे गुंतवणुकीच्या वेळॅॲ करसवलत देणारी - गुंतवणुकी दरम्यान करमुक्त उत्पन्न देणारी आणि शेवटी रोखतेच्या वेळीही करमुक्त असेल अशा गुंतवणुक पर्याय रद्द करण्याचा प्रस्ताव याआधीच अर्थखात्याच्या विचाराधीन आहे. गंमतीचा भाग म्हणजे असे कोणतेही बदल जे गुंतवणुकीचा मुळ हेतु नष्ट करणारे असले तरी ते ' हम करे सो कायदा--' या तत्वाने घेतले जातात व त्याविरुद्ध गुंतवणुकदाराला बाहेर पडण्याचा वा ते नाकारण्याचा कोणताही हक्क नसतो. तेंव्हा इस्पीकचा एक्का यांचे विचेचन चुकीचे नव्हे पण या धाग्या संदर्भात थोडेसे गैरलागु आहे.

In reply to by प्रसाद भागवत

उच्चतम परतावा २६% नीचतम शेवटचा मला आठवतो तो १४% तरीहि काही महाभाग विकत घेतच होते की...सरकारी गुंतवणुकीत तोटा नसतो सांगत अरे जे २६ वरून १४ वर आले तो काय फायदा का तुमचा .....? पुन्हा किंमत आणि भाव ह्याचा अर्थ, महागाई वगैरे तर जाऊच देत.

In reply to by प्रसाद भागवत

१. तुमचे मत बँकेच्या सर्वसाधारण ठेवींबाबत खरे आहे पण पी पी एफ् बाबत नाही. पी पी एफ् (पब्लिक प्रॉव्हिडंड फंड) ही सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी निर्माण केलेली सामाजिक सेवानिवृत्ती योजना आहे भांडवलशाही योजना नाही. कोणीही सत्तेवर आले तरी सर्वसामान्य बँक ठेवींसारखा भांडवलशाही विचार पी पी एफ् बाबत होईल हा विचार अत्यंत धाडसाचा आहे ! किंबहुना पी पी एफ् च्या व्याजदराचा विचार सरकारतर्फे एकतर्फी होतो आणि तो गुंतवणूकदारांच्या बाजूने होते हेच पी पी एफ् चे एक शक्तीस्थान आहे ! कारण तो व्याजदर एकदम कमी करणे राजकिय दृष्ट्या कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही ! इतक्या जास्त व्याजाचा, इतक्या कमी जोखमीचा आणि शिवाय पूर्णपणे करमुक्त गुंतवणूक पर्याय सद्या भारतात दुसरा व्कचितच (असलाच तर) असेल... असल्यास नक्कीच माहिती हवी आहे. बँकांच्या व्याजदरांचा आणि पी पी एफ् च्या व्याजदरांचा तडक संबंध नाही हे खालील पी पी एफ् व्याजदरांवरून कळून येईलः 01.04.1986 to 14.01.2000.......................... 12% 5.01.2000 to 28.02.2001............................ 11% 01.03.2001 to 28.02.2002 .......................... 10.5% 01.03.2002 to 28.02.2004 .......................... 9% 01.03.2003 to 30.11.2011........................... 8% 01.12.2011 to 31.03.2012........................... 8.6% 01.04.2012 to 31.03.2013........................... 8.8% 01.04.2013 onward.................................... 8.8% या सरकारी योजनेत वेळोवेळी बदल होतात. ते वर सांगितलेल्या कारणांमुळे बहुदा गुंतवणूकदारांच्या फायद्याचेच असतात. वरचे कमी झालेले व्याजदरही बँकांचे व्याजदर त्यापेक्षा अधिक कमी झाल्यानंतर सरकारवर फार मोठा बोजा पडू नये म्हणूनच कमी झालेले आहेत. २. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (यु टी आय) आणि पी पी एफ् ची तुलना योग्य नाही. या दोन गोष्टी मूळातूनच फार वेगळ्या आहेत. युनिट ट्रस्ट गुंतवणूक योजनेचे व्यवस्थापन करणारी राष्ट्रियिकृत लिमिटेड कंपनी आहे आणि तिच्या फंडातील निवेष ही १००% भांडवलशाही तत्वावरची गुंतवणूक आहे. यु टी आय बुडण्याचा आणि इतर लिमीटेड कंपनी बुडण्यात तसा अर्थाअर्थी फरक नव्हता. भारत सरकारने काही प्रमाणात तिला तारले ते केवळ नैतीक तत्वांवर. पी पी एफ् हे सार्वभौम सरकारने स्वतः उभे केलेले कर्ज (सॉव्हरिन डेट) आहे. पी पी एफ् बुडणे म्हणजे भारत सरकार बुडणे असे म्हटले तर ते तितकेसे चूक नाही. ३. मात्र इतक्या फायद्यांबरोबर पी पी एफ् चे काही तोटे आहेत ते असे: अ) ही गुंतवणूक दीर्घ मुदतिची आहे. सहा वर्षांनंतरच ५०% पर्यंत पैसे आणि १५ वर्षांनंतर १००% पैसे परत घेता येतात. १५ वर्षांनी अजून पाच वर्षे मुदत (अधिक हप्ते देऊन / न देउन) वाढवता येते. त्यामुळे सहज उपलब्ध असावी असे वाटणारी रक्कम यात गुंतवू नये. आ) वार्षिक एक लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. हा आकडा सरकार वेळोवेळी बदलून मोठा करत आलेले आहे, कधीच कमी केलेला नाही. इ) अनिवासी भारतिय यांत गुंतवणूक करू शकत नाही :( . मात्र निवासी असताना सुरू केलेल खाते काही अटींवर चालू ठेवता येते. असो. या फायद्याच्या आणि अतिशय निर्धोक अश्या गुंतवणूकीबद्दल फार माहिती नसते असे आढळल्याने इतके लिहीले. पूर्ण माहिती सरकारी संस्थळांवर अथवा आय सी आय सी आय सारख्या पी पी एफ् खाते स्विकारू शकणार्‍या बँकांच्या संस्थळावर मिळेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सर, आपल्या पतिपादनाशी मी असहमत आहे. आपण म्हणता ती स्थिती आणि आकडेवारी खरी असली तरी ती प्रामुख्याने भुतकाळाशी निगडित आहे. मात्र अलिकडे सरकारी आर्थिक धोरणात वेगवान बदल होत आहेत. एकेकाळी अशा योजनांतुन पैसे गोळा करणे ही अर्थव्यवस्थेची गरज होती कारण तुलनात्मक रित्या ते स्वस्तच पडत असत. मात्र अलिकडे वा भविष्यात परिस्थिती तशी रहिलेली नाही., मात्र अलिकडे कोणीही सत्तेवर आले तरीही पैशाचे सोंग यापुढे अगदी सरकारलाही आणता येणार नाही हे सत्य आपण स्वीकारावयास हवे. सरकार कोणासही आता अनावश्य्क संरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही, सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्याने निर्माण केलेली सामाजिक सेवानिवृत्ती योजना ( एन .पी . एस), पेन्शन, इन्शुरन्स सारख्या क्षेत्रातल्या सुधारणा, सब्सीडीबाबतची सरकारी भुमिका, या होवु घातलेल्या बदलांची साक्ष आहेत. पी पी एफ् सारख्या योजना ह्या एक ओझे म्हणुनच पाहिल्या जातात व हळुहळु त्या कालबाह्य होतील याबद्दल माझ्ह्या मनांत शंका नाही. या योजनेच्या करपात्रतेबद्दलच्या सम्भावित बदलांबाबत मी लिहिलेच आहे. याशिवाय या योजनेतील गुंतवणुकीचा काही अंश शेअरबाजार वा तत्सम ठिकाणी गुंतवावा अशा वारंवार येणार्या सुचना ही अशा बदलांची नांदी आहे. (२) तांत्रिक्द्रुष्ट्या काहीही असले तरी युनिट ट्रस्ट ची स्थापना केंद्रसरकारनेच आपल्या अन्य मध्यस्थांकरवी केली होती. त्यावर सरकारचे अप्रत्यक्ष पणाने पण पुर्ण नियंत्रण होते हे विसरता येणार नाही. आत्ता आपणास या . पी पी एफ् योजनेबद्दल असलेला विश्वास अनेकांना अगदी आपण सांगत असलेल्या मुद्द्यांमुळेच त्यावेळी युनिट ट्रस्ट बद्दल होता, ही वस्तुस्थिती आहे. तेंव्हा या दोघांची तुलना करणे अपरिहार्य आहे. (३) जोखीम ही एक सापेक्ष कल्पना आहे असे मी म्हटलेच आहे. माह्झ्यामते गुंतवणुकीचे अधीक चांगले पर्याय नकीच उपलब्ध आहेत .आपणाबरोबर या मुद्द्यावर चर्चा करावयास नकीच आवडेल. आपण पुण्यात असता काय ?? मी पुण्याचा आहे.

In reply to by प्रसाद भागवत

१. तांत्रिक्द्रुष्ट्या काहीही असले तरी युनिट ट्रस्ट ची स्थापना केंद्रसरकारनेच आपल्या अन्य मध्यस्थांकरवी केली होती. त्यावर सरकारचे अप्रत्यक्ष पणाने पण पुर्ण नियंत्रण होते हे विसरता येणार नाही. आत्ता आपणास या . पी पी एफ् योजनेबद्दल असलेला विश्वास अनेकांना अगदी आपण सांगत असलेल्या मुद्द्यांमुळेच त्यावेळी युनिट ट्रस्ट बद्दल होता, ही वस्तुस्थिती आहे. तेंव्हा या दोघांची तुलना करणे अपरिहार्य आहे. ही केवळ तांत्रिक नाही पण बाजारी व्यवस्थेतील पूर्ण सत्य आहे. यु टी आयला मदत करणे हा १००% राजकिय फायद्याचा / नाईलाजाचा निर्णय होता तो कायद्याने जरूर नव्हता; जसा अमेरिकन पेन्शन फंड सांभाळणार्‍या वित्तसंस्थांना अमेरिकेने जागतिक आर्थिक संकटाच्या सुरुवातीला केला होता अगदी तसाच. राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या सरकारला कधी पैसा कमी पडला आहे?... आणि शेवटी हा सगळा पैसा जनतेने दिलेल्या करांतून अथवा देशाच्या नावावर कर्ज घेऊन अथवा देशाच्या नोटा छापूनच उभा केला जातो ! आर्थिक संकटाच्या वेळी अमेरिकेवर १० पेक्षा जास्त ट्रिलियन डॉलरचे कर्ज होते तरी २ ते ३ ट्रिलियन डॉलर कर्ज ज्यांनी बेजबाबदारपणे अर्थव्यवस्था बुडवली त्या अर्थसंस्थाना जवळ जवळ शून्य व्याजदराने दिले गेले. आता ते कर्ज १७ ट्रिलियनच्याही वर गेले आहे आणि दर क्षणाला वाढत आहे. तरी क्वांटिटेटिव्ह इझिंगच्या नावाखाली अर्थव्यवस्थेत पैसा छापून ओतणे आजही चालूच आहे. ते जरी मार्च २०१४ ला बंद करू म्हटले असले तरी ते होण्याची खास लक्षणे नाहीत असाच तज्ञांचा अंदाज आहे. येथे डोकावा आणि गम्मत पहा. सरकारचे यु टी आयवरचे नियंत्रण आणि ५१% शेअर असलेल्या वैयक्तीक भागधारकाचे लिमिटेड कंपनीवरचे नियंत्रण यात शब्दशः काही फरक नाही. पूर्वी १००% टक्के सरकारी असलेल्या पण आत्ता डायव्हेस्ट केलेल्या आणि शेअरमार्केटवर नोंदवलेल्या कंपन्यांवर सरकारचे बहुमताचे नियंत्रण आहे आणि त्यांच्याकडून आपले बहुमत वापरून सरकार शक्य तेवढा आणि हवा तेवढा डिव्हिडंड घेते. पण त्याचा अर्थ असा नाही की उद्या जर त्या कंपन्या बुडीत निघाल्या तर सरकार भागधारकांना त्यांचे पैसे आताच्या शेअरच्या किंमतीप्रमाणे परत करेल. कंपनीची सगळी देणी देऊन उरलेली रक्कम (जर उरलीच तर) प्रत्येक भागधारकाला त्याच्या भागांच्या समप्रमाणात वाटली जाईल. मात्र कंपनी लिमिटेड असल्याने भागधारकाला कंपनी न फेडू शकलेल्या कर्जाचा भार उचलावा लागणार नाही हीच काळ्या ढगाची रुपेरी कडा ! पी पी एफ् हे कायद्याने स्वतः भारत सरकारने प्रत्येक ठेवीधारकाकडून स्वतंत्रपणे घेतलेले कर्ज आहे. त्यामूळे ते भारत सरकारची तडक जबाबदारी आणि सरकारच्या बाजारातल्या पतीशी तडक जुळलेले आहे. त्यामुळे जर कोणी ते दोन्ही एकच समजले तर तो एक फार मोठा आणि कदाचित महागडा ठरणारा केवळ गैरसमज होता/आहे. २. सब्सीडीबाबतच्या भारत सरकारच्या भुमिके बद्दल कृपया गैरसमज ठेवू नका. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये) बालीत झालेल्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गॅनायझेशनच्या सभेत (ब्राझील वगैरेंनी सर्व देशांनी माघार घेतल्यानंतरही) एकट्या भारताने हट्ट धरून सब्सीडी कायम ठेवण्याचा क्लॉज मंजूर करून घेतलेला आहे. नुकताच मंजूर केलेला अन्न सुरक्षा कायदा हा भारतात या ना त्या कारणाने सब्सिडी पुढची अनेक वर्षे चालूच राहणार याची ढळढळीत साक्ष देत आहे. हे दोनच पुरावे येथे पुरे ठरावेत. असो. इथे खूप झाले. प्रत्यक्ष भेट आवडली असती. पण मी सद्या भारतात नसल्याने अधिक चर्चा खरड वही / व्यनीवर करायला आवडेल.

In reply to by प्रसाद भागवत

फक्त अजून एकच महत्वाचे आणि थोडक्यात... एकेकाळी अशा योजनांतुन पैसे गोळा करणे ही अर्थव्यवस्थेची गरज होती कारण तुलनात्मक रित्या ते स्वस्तच पडत असत. मात्र अलिकडे वा भविष्यात परिस्थिती तशी रहिलेली नाही. पी पी एफ चे पैसे सरकारी योजनांत वापरात येत असले तरी विनातरण कर्ज मिळवणे हा तिचा दुय्यम हेतु आहे. मुख्य हेतू सर्वसामान्य लोकांना निवृत्तिच्या काळात आर्थिक सुरक्षा देणे आहे. याच कारणासाठी तिच्या नावात "प्रॉव्हिडंड" हा शब्द आहे. आणि म्हणूनच आर्थिक झळ सोसूनही ही योजना सरकार अधिकाधिक आकर्षक ठेव॑त आलेले आहे. १५ वर्षे लॉक इन ही अट जाचक असली तरी ती प्रॉव्हिडंड फंड या कल्पनेशी मिळतीजुळती आहे आणि तो पैसा विनाकारण सर्वसामान्य कारणासाठी वापरला जाण्याची शक्यता काही अंशी कमी करते. अर्थात त्यामुळे सरकारला हा पैसा जास्त काळासाठी वापरायला मिळतो हा एक दुय्यम फायदा (जादा व्याज देऊनच मग) मिळतो.

In reply to by प्रसाद भागवत

१. तुमचे मत बँकेच्या सर्वसाधारण ठेवींबाबत खरे आहे पण पी पी एफ् बाबत नाही. पी पी एफ् (पब्लिक प्रॉव्हिडंड फंड) ही सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी निर्माण केलेली सामाजिक सेवानिवृत्ती योजना आहे भांडवलशाही योजना नाही. कोणीही सत्तेवर आले तरी सर्वसामान्य बँक ठेवींसारखा भांडवलशाही विचार पी पी एफ् बाबत होईल हा विचार अत्यंत धाडसाचा आहे ! किंबहुना पी पी एफ् च्या व्याजदराचा विचार सरकारतर्फे एकतर्फी होतो आणि तो गुंतवणूकदारांच्या बाजूने होते हेच पी पी एफ् चे एक शक्तीस्थान आहे ! कारण तो व्याजदर एकदम कमी करणे राजकिय दृष्ट्या कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही ! इतक्या जास्त व्याजाचा, इतक्या कमी जोखमीचा आणि शिवाय पूर्णपणे करमुक्त गुंतवणूक पर्याय सद्या भारतात दुसरा व्कचितच (असलाच तर) असेल... असल्यास नक्कीच माहिती हवी आहे. बँकांच्या व्याजदरांचा आणि पी पी एफ् च्या व्याजदरांचा तडक संबंध नाही हे खालील पी पी एफ् व्याजदरांवरून कळून येईलः 01.04.1986 to 14.01.2000.......................... 12% 5.01.2000 to 28.02.2001............................ 11% 01.03.2001 to 28.02.2002 .......................... 10.5% 01.03.2002 to 28.02.2004 .......................... 9% 01.03.2003 to 30.11.2011........................... 8% 01.12.2011 to 31.03.2012........................... 8.6% 01.04.2012 to 31.03.2013........................... 8.8% 01.04.2013 onward.................................... 8.8% या सरकारी योजनेत वेळोवेळी बदल होतात. ते वर सांगितलेल्या कारणांमुळे बहुदा गुंतवणूकदारांच्या फायद्याचेच असतात. वरचे कमी झालेले व्याजदरही बँकांचे व्याजदर त्यापेक्षा अधिक कमी झाल्यानंतर सरकारवर फार मोठा बोजा पडू नये म्हणूनच कमी झालेले आहेत. २. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (यु टी आय) आणि पी पी एफ् ची तुलना योग्य नाही. या दोन गोष्टी मूळातूनच फार वेगळ्या आहेत. युनिट ट्रस्ट गुंतवणूक योजनेचे व्यवस्थापन करणारी राष्ट्रियिकृत लिमिटेड कंपनी आहे आणि तिच्या फंडातील निवेष ही १००% भांडवलशाही तत्वावरची गुंतवणूक आहे. यु टी आय बुडण्याचा आणि इतर लिमीटेड कंपनी बुडण्यात तसा अर्थाअर्थी फरक नव्हता. भारत सरकारने काही प्रमाणात तिला तारले ते केवळ नैतीक तत्वांवर. पी पी एफ् हे सार्वभौम सरकारने स्वतः उभे केलेले कर्ज (सॉव्हरिन डेट) आहे. पी पी एफ् बुडणे म्हणजे भारत सरकार बुडणे असे म्हटले तर ते तितकेसे चूक नाही. ३. मात्र इतक्या फायद्यांबरोबर पी पी एफ् चे काही तोटे आहेत ते असे: अ) ही गुंतवणूक दीर्घ मुदतिची आहे. सहा वर्षांनंतरच ५०% पर्यंत पैसे आणि १५ वर्षांनंतर १००% पैसे परत घेता येतात. १५ वर्षांनी अजून पाच वर्षे मुदत (अधिक हप्ते देऊन / न देउन) वाढवता येते. त्यामुळे सहज उपलब्ध असावी असे वाटणारी रक्कम यात गुंतवू नये. आ) वार्षिक एक लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. हा आकडा सरकार वेळोवेळी बदलून मोठा करत आलेले आहे, कधीच कमी केलेला नाही. इ) अनिवासी भारतिय यांत गुंतवणूक करू शकत नाही :( . मात्र निवासी असताना सुरू केलेल खाते काही अटींवर चालू ठेवता येते. असो. या फायद्याच्या आणि अतिशय निर्धोक अश्या गुंतवणूकीबद्दल फार माहिती नसते असे आढळल्याने इतके लिहीले. पूर्ण माहिती सरकारी संस्थळांवर अथवा आय सी आय सी आय सारख्या पी पी एफ् खाते स्विकारू शकणार्‍या बँकांच्या संस्थळावर मिळेल.

माझ्या दवाखान्याच्या मजल्यावर माझा शेअर ब्रोकर आहे ज्याच्याकडे मी गुंतवणूक करतो. माझ्याकडे रुग्ण आला की मी लगेच उठून दवाखान्यात येतो. एकदा तेथे बसलेल्या एका इसमाने विचारले की डॉक्टर इतकी घाई काय आहे इथे मार्केट चढते आहे जरा थांबा. मी शांत पणे त्याला म्हणालो साहेब मी १९८४ सालपासून वैद्यक शास्त्र शिकतो आहे आणी १९९१ पासून रेडीयोलॉजी.शेअर बाजार हे अवांतर आहे. त्यात मी किती वर्षे आहे फार तर पाच किंवा सहा. आलेला प्रत्येक रुग्ण माला नक्की पैसे देऊन जाणार आहे पण प्रत्येक शेअर ची ताशी खात्री नाही. एक पंच तंत्रातील गोष्ट आहे. एकदा एका गाढवाला एका लांडग्याने धरले. त्याला तो खाणार एवढ्यात गाढव त्याला म्हणाले अरे माझ्या मागच्या पायात काटा मोडला आहे. तो तु प्रथम काढ म्हणजे नंतर तुला खाताना त्रास होणार नाही त्याप्रमाणे लांडगा त्याच्या मागच्या पायात काटा शोधू लागला तेंव्हा गाढवाने त्याला एक जोरात लाथ मारली त्याने लांडग्याचे सर्व दात पडून गेले.लांडगा मनात म्हणाला, मला बापाने खाटकाचा धंदा शिकवला होता हा वैद्यकाचा धंदा करायला गेलो ती चांगली अद्दल घडली" या उक्तीप्रमाणे साहेब माझा वैद्यकाचा धंदा चालतो आहे तो सोडून हा सटोडियाचा धंदा करणे नाही. आधी प्रपंच करावा नेटका

In reply to by सुबोध खरे

जरा चर्चा रंगली असती तर मझा आला असता की... आणि सटोडीयाचा धंदा तर मीही करत नाही. बाकी गाढव-लांडगा काही समजले नाही... कारण तसा मी "निराकार गाढव" आहे हो फार लाथा बिथा झाडणे झेपत नाही.

In reply to by ज्ञानव

माझ्या म्हणण्याचा साधा सरळ अर्थ असा आहे की आपण ज्या विषयात शिक्षण घेतले आहे आणी ज्यावर आपला चरितार्थ अवलंबून आहे त्यात पूर्ण लक्ष घालून काम करावे आपल्याकडे खर्च करून उरलेला पैसा असेल तो सुरक्षित गुंतवणुकीत टाकावा आणी त्यातूनही जर अधिक पैसा असेल तर ट्रेड वगैरे मध्ये गुंतवावा. कारण पी पी एफ सारख्या गुंतवणुकीत व्याज फार जास्त मिळाले नाही तरी कर वाचतो आणी मु़ख्य म्हणजे भांडवल पूर्ण सुरक्षित असते. जर आज सोने ३०००० रुपये भावाने घेतले आणी उद्या ते २८००० झाले तर नुसते व्याजच नव्हे तर २००० रुपये मुद्दलातच खोट येऊ शकते. त्यातून ते जर १२ टक्के व्याजाने घेतले असतील तर व्याजही बोडक्यावर बसते. दिवसभर मान मोडून नोकरी किंवा धंदा केल्यावर मुद्दलात खोट आलेली किती मराठी लोकांना झेपेल. म्हणून मी म्हणतो कि कमीत कमी पाच वर्षे या क्षेत्रात प्रत्यक्ष काम केल्यावर ट्रेड वगैरे च्या नादास लागावे. चार बुके वाचून जसे आयुर्वेदाचार्य किंवा वैद्यक विशारद होता येत नाही तसेच ट्रेडर सुद्धा होता येत नाही. (जसे लोक कोणालाही वैद्यकीय सल्ला फुकट देतात. त्यातून आयुर्वेदाचा सल्ला तर काहीही साईड इफेक्ट नाही म्हणून जास्तच तसेच टीप्स घेऊन कोणी श्रीमंत झालेला नाही. (बुडालेले मात्र भरपूर दिसतात)

In reply to by ज्ञानव

माझ्या म्हणण्याचा साधा सरळ अर्थ असा आहे की आपण ज्या विषयात शिक्षण घेतले आहे आणी ज्यावर आपला चरितार्थ अवलंबून आहे त्यात पूर्ण लक्ष घालून काम करावे आपल्याकडे खर्च करून उरलेला पैसा असेल तो सुरक्षित गुंतवणुकीत टाकावा आणी त्यातूनही जर अधिक पैसा असेल तर ट्रेड वगैरे मध्ये गुंतवावा. कारण पी पी एफ सारख्या गुंतवणुकीत व्याज फार जास्त मिळाले नाही तरी कर वाचतो आणी मु़ख्य म्हणजे भांडवल पूर्ण सुरक्षित असते. जर आज सोने ३०००० रुपये भावाने घेतले आणी उद्या ते २८००० झाले तर नुसते व्याजच नव्हे तर २००० रुपये मुद्दलातच खोट येऊ शकते. त्यातून ते जर १२ टक्के व्याजाने घेतले असतील तर व्याजही बोडक्यावर बसते. दिवसभर मान मोडून नोकरी किंवा धंदा केल्यावर मुद्दलात खोट आलेली किती मराठी लोकांना झेपेल. म्हणून मी म्हणतो कि कमीत कमी पाच वर्षे या क्षेत्रात प्रत्यक्ष काम केल्यावर ट्रेड वगैरे च्या नादास लागावे. चार बुके वाचून जसे आयुर्वेदाचार्य किंवा वैद्यक विशारद होता येत नाही तसेच ट्रेडर सुद्धा होता येत नाही. (जसे लोक कोणालाही वैद्यकीय सल्ला फुकट देतात. त्यातून आयुर्वेदाचा सल्ला तर काहीही साईड इफेक्ट नाही म्हणून जास्तच तसेच टीप्स घेऊन कोणी श्रीमंत झालेला नाही. (बुडालेले मात्र भरपूर दिसतात)

या उक्तीप्रमाणे साहेब माझा वैद्यकाचा धंदा चालतो आहे तो सोडून हा सटोडियाचा धंदा करणे नाही. आधी प्रपंच करावा नेटका +१

१०० टक्के सहमत बफे साहेबांच्या मते - महागाई शी लढण्यासाठी तुमच्या कडे Employable Skills असणे हा एकमेव उपाय आहे.

(१) सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल --- होईलही, पण तो २५००० ही होण्याची शक्यताही आहेच ना ?? तेंव्हा असे अंदाज बांधण्याला तितकासा अर्थ नाही. (२)आपण दिलेल्या खरेदी - गहाण- खरेदी या चक्राकार पद्ध्तीतुन ( ज्याला पिरॅमिड स्टोक थिअरी असेही म्हणतात) आपल्याला फायदा झाला याबद्दल आपले अभिनंदन. पण एक स्टेटर्जी म्हणुन वारंवार असे करणे हे घातक आहे. अशाच मार्जिन ट्रेंडिंग च्या अशाच अतिवापराने बाजारांत यापुर्वी भयावह पडझडी झाल्या आहेत भाव न वाढता अचानक कोसळ्ल्यास उदा . आपल्याच उदाहरणांप्रमाणे सोन्याचा भाव 8400 वरुन 7200 झाला असता तर आपली उपाययोजना काय असती ?? उपाशी बोका म्हणतात त्या प्रमाणे हे म्हणजे स्टॉकचे मार्जिन अकाऊंट उघडण्यासारखे झाले. आणि हे कमालीचे धोकादायक आहे हे नक्की. या बाबत प्रसाद१९७१ ( नामसाधर्म्या शिवाय दुसरी ओळख नाही) यांचा विचार अधिक तर्क्शुधद्ध वाटतो. ( ३) सुरक्षीतता व व परतावा ह्या संकल्पना अनेकदा सापेक्ष ठरतात. तुलनाच करावयाची तर पी पी एफ् ही अधिक दीर्घकाळ अडकुन रहाणारी गुंतवणुक आहे. आणि जरी तिच्यातील व्याजदाराचे बदल ही अधिक संथपणे होतात तरी एकुणातच येथुन पुढे कोणालाही, अगदी सरकारलाही, व्याजदर कृत्रिमपणाने कमी वा जास्त ठेवणे शक्य नाही. (अशाच एका खात्रीच्या आणि 'सरकारी' असे बिरुद मिरवलेल्या युनिट ट्रस्ट चे अशाच कृत्रिमपणाने किंमती ठरविल्याने शेवटी काय झाले याची आठ्वण आल्याशिवाय रहात नाही) त्यामुळे मुद्दल बुडण्याची शक्यता नाही हे खरे असले तरी व्याजदराबद्दलचे अंदाज ( होय, अंदाजच) चुकु शकतात. असा व्याजदर हा एकतर्फी ठरवला जातो आणि तो खात्यात असलेल्या सर्व रकमेवर लागु होतो. करपात्रता हाही एक 'आज आहे पण उद्या ---? ' या पठडीतला्च मुद्दा आहे. E-E-E म्हणजे गुंतवणुकीच्या वेळॅॲ करसवलत देणारी - गुंतवणुकी दरम्यान करमुक्त उत्पन्न देणारी आणि शेवटी रोखतेच्या वेळीही करमुक्त असेल अशा गुंतवणुक पर्याय रद्द करण्याचा प्रस्ताव याआधीच अर्थखात्याच्या विचाराधीन आहे. गंमतीचा भाग म्हणजे असे कोणतेही बदल जे गुंतवणुकीचा मुळ हेतु नष्ट करणारे असले तरी ते ' हम करे सो कायदा--' या तत्वाने घेतले जातात व त्याविरुद्ध गुंतवणुकदाराला बाहेर पडण्याचा वा ते नाकारण्याचा कोणताही हक्क नसतो. तेंव्हा इस्पीकचा एक्का यांचे विचेचन चुकीचे नव्हे पण या धाग्या संदर्भात थोडेसे गैरलागु आहे.

In reply to by प्रसाद भागवत

पण एक ट्रेडिंग पद्धत म्हणजे ती अंधानुकरण करून अवलंबायला लागा असे मी म्हंटलेच नाहीये. सोन्याच्या गुंतवणुकीचे दिवस किंवा ट्रेडिंगचे दिवस येतील तेव्हा त्यात सुरुवात करा कि.त्याआधी समजून घ्या . आणि पी पी एफ चे व्याजदर जे मिळवून देईल त्याचे हि गणित इथे कुणीतरी मांडा. १)३२००/ प्रती १० ग्राम मधून ३०% कर वजावट कशी होते ते हि कुणीतरी सांगा. २)८००० रुपये १५८००० कसे झाले तेही सविस्तर लिहा.(मी तत्काळ १०० रुपये दर वर्षी मिळवून हिशोब प्रतिसादात दिलाय )त्यावर कुणाचे काहीच भाष्य नाही. आणि हे
पी पी एफ मधील गुंतवणूक सहा वर्षानंतर काढून घेता येते आणि तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो. म्हणजेच अधिक ३०% नक्त नफा. असे आपण साहव्या वर्षानंतर करू शकता. (ती शक्यता अजिबात धरलेली नाही तरीही)
हि तर निव्वळ दिशाभूल आहे किंवा अभ्यास न करता केलेलं विधान आहे कारण गुंतवलेल्या किंवा जमा रकमेपैकी २५% पाच वर्षांनी (आणि तेही योग्य कारण देऊनच.) काढता येतात अन्यथा १५ वर्ष पैसे काढता येत नाहीतच. म्हणजे माझे वडील किंवा आई हॉस्पिटल मध्ये मरणपंथाला असताना मला पी पी एफ किती कामाला येईल? शून्य टक्के कारण प्रोसिजर होऊन हातात पैसे येई पर्यंत मी आई वडिलांना होल्ड वर राहा सांगू का? सोने मला २ तासात पैसे हातात देते. आणि सगळ्यात गंमतीशीर वल्गना म्हणजे
तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो.
कसा हो वाचतो जरा मलाही समजावा.(म्हणजे आयकर कलम कोणते ?)कारण कर बचती साठीची गुंतवणूक हि त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे. पण कर वाचवणारे त्याला बे कायदेशीर फाटे फोडून येन केन प्रकारे आपला कर वाचावतीलच. (आणि एका वेळी पैसे काढून घेऊन लगेच त्याच वर्षात पुन्हा पी पी एफ ला तिथेच भरणे हा प्रकार हि मला कळत नाही. च्यायला....लोक कर वाचण्यासाठी काय काय करतात राव!) आणि एकूण कर भरण्यापेक्षा कर न भरण्याकडेच सगळ्यांचा भर आहे. हे तर दुर्दैव आहे. मी काही देणार नाही आणि सरकारने मात्र गुंतवणूक दाराला विश्वासात घ्यायलाच पाहिजे. पुन्हा विसंगती. कर माफी हा उद्देश अंमळ जास्तच आहे लोकांत मी म्हणतो घ्या कर पण द्या भरपूर. म्हणजे पी पी एफ चा मूळ उद्देशच तुम्ही लक्षात घेत नाही आहात किंवा जाणून बुजून त्यावर काही बोलत नाही आहात.

In reply to by ज्ञानव

अहो ज्ञानव सर, "कसा हो वाचतो जरा मलाही समजावा.(म्हणजे आयकर कलम कोणते ?)कारण कर बचती साठीची गुंतवणूक हि त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे.---" हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. कारण PPF मधली काढ्लेली रक्कम ही करपात्र उत्पनाचाच भाग बनते, भलेही ती व्याज असो की मुद्दल. आणि जर ती व्याज असेल तरीही ती करमुक्त आहे. त्यामुळे ती उत्पन्नांत मिळवुनही कराची देय रक्कम वाढ्णार नाही.. आता यात बेकायदेशीर फाटे वगैरेचा संबंध काय?? कर वचविण्याचा प्रयत्न करणे ही एक चांगली बाब आहे, कर चुकवु नय हे खरे पण सनद्शीर मार्गाने वाचविण्यात गैर काय ?? शेवटी a penny saved is penny earned नाही का ?? आपण कर बचत, कर चुकवेगिरी आणि कर माफी याची गल्लत करताय असे नाही वाटत ?? बाकी PPF मध्ये पैसे अडकुन पडतात हे खरे, याबाबत आपण सांगितलेला तपशील बरोबर आहे.

In reply to by प्रसाद भागवत

वाचवण्यासाठी पीपीएफमधून जमा रकमेच्या २५% रक्कम काढून कर वाचवून पुन्हा पीपीएफलाच भरायचे? तुम्ही सीए आहात का ?
कारण PPF मधली काढ्लेली रक्कम ही करपात्र उत्पनाचाच भाग बनते, भलेही ती व्याज असो की मुद्दल. आणि जर ती व्याज असेल तरीही ती करमुक्त आहे.
इथे वीड्रा रक्कम हि मुद्दल आणि व्याज मिळून आहे हे तुम्ही मान्य करताच आहात पण त्यातले मुद्दल हे इंकम नाही पण ते सर्रास इंकम म्हणून दाखवण्याची प्रथा आहे ते बेकायदेशीर आहे.कारण हे मुद्दल तुम्ही गेली ५ वर्षे पी पी एफ्ला भरता आहात ते आज ह्या वर्षी एकदम इंकम म्हणून कसे दाखवता कारण पी पी एफ मध्ये तुम्ही दर वर्षी आधीच ते इन्कम च्या रुपात दाखवून झालेले असते आणि कर वाजवट हि घेतलेली आहे. आणि तरीही तुम्ही पुन्हा कर वजावट जर मागाल तर ते विसंगत किंवा बेकायदेशीर होते. असो किचकट आहे थोडे. जर एखाद्या इन्कमच्या बाबतीत डबल कर लावता येत नाही तर डबल कर वजावट एकाच रकमेवर कशी चालेल? पण इथे अनेक पळवाटा आहेत साहेब त्या वापरल्यात तर मी चूक आणि तुम्ही सनदशीर.. १) मुद्दल मुळात इन्कम होईलच कशी? २) व्याज (अगदी करमुक्त) हे जरी इंकम आहे तरी ते कितीसे असणार आणि त्याने किती फरक पडणार? ३) तसेच एकदा मुद्दल काढून झाल्यावर पी पी एफ च्या १५ वर्षांच्या कामगिरीवर होणारा परिणाम तुम्ही लक्षात घेतला का ? सगळ्यात महत्वाचे काढलेली रक्कम हि व्याजात ना धरता मुद्दल म्हणून धरले जाईल त्यामुळे ते त्या वर्षाचे इंकम कसे होईल ? पण हा मुद्दया बाबत मी थोडा साशंक आहे कारण इथे बँकिंग इंव्होल्व होते म्हणून. वरील मुद्दा दोनला अनुसरून जर मी दरवर्षी फक्त १०० रुपये गुंतवले तर ५ वर्षांनी मला १२५ रुपये काढण्याची मुभा आहे समजा त्यात व्याज हि मला मिळाले तर ते किती असेल किंवा डॉक्टर खरे ह्यांनी रुपये ५६०० जर १९८८ साली गुंतवले असते तर त्यांना ५ वर्षांनी फक्त १०५७ रुपये व्याजपोटी जमा होऊन त्यातील २५% त्यांना परत मिळाले असते. म्हणजे २५० रुपये करमुक्त इंकम त्या वर्षासाठी होईल उफ्फ्फ्स त्यासाठी इतकी मेहनत?
पी पी एफ मधील गुंतवणूक सहा वर्षानंतर काढून घेता येते आणि तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो . म्हणजेच अधिक ३०% नक्त नफा.
जर तुम्ही सी ए असाल तर ३०% नक्त नफा कसा ते हि मला सांगा. आणि इतरत्र मी जे मुद्दे मांडलेत त्याचे हि विवेचन द्या हि विनंती. आणि ज्ञानव सर??....नको नको प्लीज.

In reply to by ज्ञानव

श्रीमान ज्ञानवजी, आपण आपल्या आधीच्या पोस्ट्मध्ये काही विधानांबाबत ( माझ्या नव्हे) " हि तर निव्वळ दिशाभूल आहे किंवा अभ्यास न करता केलेलं विधान आहे" अशी आक्रमक भाषा वापरता, वस्तुस्थितीची संभावना 'गंमतीशीर वल्गना ' अशी करता आणि वर बिनादिक्कत 'कसा हो वाचतो जरा मलाही समजावा.(म्हणजे आयकर कलम कोणते ?) असा 'अहं ब्रह्मास्मि' थाटाचा प्रश्न विचारता------ मी यावर फक्त खुलासा केला आहे. . तर सांगावयाचे हे की, कायद्याने असे करता येते. आणि कायद्याचा अर्थ लावायला कोणी C.A असायलाच हवे असे नाही. आपण करसवलत मिळण्यासाठीच्या गुंतवणुकीसाठी असलेले कलम 80C मुळांतुन वाचावे अशी आपणास नम्र विनंती आहे.. करसवलत मिळविण्यासाठी करावयाची गुंतवणुक करदात्याने त्याच्या करपात्र उत्पन्नंतुन करावी एवढीच आयकर खात्याची अपेक्षा आहे. ' ती त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे' हा तुम्ही लावलेला अर्थ आहे ज्याला आधार नाही. माझे म्हणणॅ एवढेच आहे की एखाद्याने पी पी एफ मध्ये पैसे भरल्यास त्या पैशांवर त्याला कर वजावट मिळेल. ते पैसे त्याने कोठुन आणले, त्याच्या त्याच PPF खात्यातुन काढुन, की अन्य एखाद्या खात्यातुन ह्याचा विचार कोणी करण्याचा प्रश्न येतच नाही. सबब पीपीएफमधून जमा रकमेच्या २५% रक्कम काढून कर वाचवून पुन्हा पीपीएफलाच भरणे ह्यात अयोग्य अनैतिक असे काहीही नाही. रहिला प्रश्न तो अशा काढलेल्या रकमेचा आपल्या रिटर्न मधे दाखवायचा, त्यावर खुलासा हा की ते मुद्दल असल्यास प्रश्नच नाही, व्याज असल्यासही ते करमुक्त असल्याने उन्पन्न वाढ्ले तरी कर वाढ्णार नाही. असे असताना कोणी मुद्दल/ इन्कम याचा गोंधळ करावाच का ?? आणि करीत असेल तर त्याचा विचार आपण का करावा ?? बाकी आपली डबल कर वजावट वगैरे शंका अगम्य आहे. आपण एक व्यावसायिक अर्थसल्लागार आहात, अशा वेळी आपल्या विधानांचे महत्व अनेकपटीने वाढते. आपण पैसा मिळविण्यासाठीच तर हा सारा उद्योग करतोय, अशावेळी कर बचत, कर नियोजन या सारख्या महत्वाच्या पैलुंवरही आपण मार्गद्रशन करावयास हवे, मात्र आपली त्या विषयाचा अभ्यास आणि भुमिका अनाकलनीय आहे. आपण एखाद्या विषिष्ट कालावधीत यशस्वी झालेली गोष्ट 'सिस्टीम' म्हणुन अवलंबण्यापेक्षा( आणि तो 'फॉर्मुला' चालत नाहीशी विपरित परिस्थिती उद्भवली की मी 'थांबलोच' होतो अशी लंगडी कारणमिमांसा देण्यापेक्षा) अधिक व्यापक विचार करुन आमच्या सारख्या सामन्यांचा फायदा करुन द्यावा असे वाटते. "-----आर्थिक उत्पन्न हे नेहमी विक्रीतून येते मग ती बुद्धीची विक्री असो, सेवेची विक्री असो कि एखाद्या वस्तूची विक्री असो त्या विक्रीतून आणि फक्त विक्रीतूनच झालेला नफा हा करपात्र असतो. -----जगभरातल्या खाणीतून होणारे सोन्याचे उत्पादन आणि जगभरातली मागणी लक्षात घेता सोन्याचा भाव खाली जाईल का हे सांगयला श्री ब्रह्मदेव ह्यांना त्रास द्यायची गरज नाही. -----सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल" अशी अर्थहीन विधाने आपल्यासारख्या अनेक वर्षे बाजारात धालवलेल्या धुरिणाने करावीत हे एक आश्चर्यच आहे. खरे म्हणजे लिहायला संकोच वाटतो पण आपले या धाग्यामधले बहुतेक पोस्ट हे तार्किकतेच्या कसोटीवर टिकणारे नाहीत आपण 06 वर्षांच्या मुदती संदर्भात बरोबर बोलला आहात असे मी आधीच म्हणालो आहे पण तरीही एकुणांत मुळ मुद्याला बगल देवुन, कल्पनांची गल्ल्त करुन वा मध्येच अत्यंत गैरलागु प्रश्न विचारुन आपण एका आर्थिक विषयावरील चर्चा दिशाहीन करीत आहात असे माझे मत आहे. क्षमस्व.