(मूळ प्रेरणा : मिपा वरील समस्त विडंबने)
देवानं विडंबकांना असं का बनवलं?
दिसली कविता की तिला झोडावं
सगळ्याच विडंबनायोग्य वाटतात
पण मिपाकरांना उठसूट वेठीला का धरावं?
कधी गळे दाबावे, कधी छाताडावर नाचावे
प्रत्येक विडंबन का इतके अवगुणी?
दळभद्री मेली प्रतिभा, एकीवर बसत नाही
दर पाच धाग्यांनंतर यांचीच तुणतुणी!
कुणी हसून प्रतिक्रिया देतं
कुणी नाइलाजानं कौतुक करतं
कुणी शालजोडीतले हाणत असते
पण "जनाची ना मनाची' तरी यांना कुठे असते?
कुणी "लिहू नका' सुचवू पाहतं
क्वचित कुणी थेट हल्ला करतं
किती प्रकारे त्रास दिला, तरी
विडंबनाच्या व्यसनात मन फसतं
सगळ्याच कविता विडंबनयोग्य असतात?
"नको नको' म्हणूनही विडंबने