Skip to main content

समाज

मानसिकता

लेखक प्रविण गो पार्टे यांनी सोमवार, 20/02/2017 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
कमाल आहे बुआ आपल्या भारतीय मानसिकतेची... ब्रिटीशांनी स्वार्थासाठी बांधलेले इमले आज World Heritage म्हणून मिरवत आहेत.. आणि माझ्या शिवबाने रयतेच्या कल्यानासाठी बांधलेले गडकील्ले मात्र अंधार कोठडिचे जीवन जगत आहे.. बहुदा यालाच भारतीय अस्मिता म्हणत असतील राव.....

!!! ....सभा "Social Networking " ची.... !!!

लेखक बटाटा चिवडा यांनी बुधवार, 15/02/2017 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा.. चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा.. Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची.. Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King' सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " .. Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike.. या सर्व गदारोळात.. Myspace, PerfSpot, BigAdda ओरडत होते 'आम्ही पण आह

द मेन्स्ट्रुअल मॅन

लेखक इरसाल कार्टं यांनी शुक्रवार, 10/02/2017 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
द मेन्सट्रुअल मॅन, वाचून थोडे दचकलात ना? पण मी आज एका अश्या माणसाची गोष्ट सांगत आहे ज्याला अख्खं जग याच नावाने ओळखायला लागलंय त्याचं खरं नाव आहे अरुणाचलम मुरुगनाथम . आणि विशेष म्हणजे हा माणूस आपल्याच भारतातला आहे. चारचौघातला, पण त्याचं काम एवढं जबरदस्त आहे कि त अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलाय. आमच्या क्लासमेट्स फाउन्डेशन ची मूळ प्रेरणाच तो आणि त्याचे कार्य आहे. माझी याच्याशी ओळख झाली इंटरनेट वरील या व्हिडिओ मुळे. साधारणत: ५-६ वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ बघितला आणि डोक्यात पार झिणझिण्या आल्या.

राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया

लेखक वडापाव यांनी सोमवार, 06/02/2017 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.

काय करावे!!! तिच्याशी नाते जोडावे की नको???

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी रविवार, 05/02/2017 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी या आधीच माझं वय व माझी पार्श्वभुमी आंतरजालावर सांगुन झालेली आहे.मी अविवाहीत आहे.सध्या एका to be or not to be प्रकरणात अडकलो आहे. जास्त फाटे न फोडता विषयाला हात घालतो.माझ्या घराजवळ एक विवाहीत तरुणी राहते.तिचे व माझे कुटुंब एकमेकांना ओळखते.ति साधारणतः माझ्या पुढे तीन चार वर्ष मोठी असेल .आधी कधी तिने माझ्याशी संपर्क ठेवला न्हवता.माझ्याकडे बघतही नसायची.पण अचानक गेल्या काही महीण्यात तिचा नूर बदलला व ति माझ्याकडे हेतुतः बघायला लागली.तशी ती दिसायला खूप सुंदर आहे.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ५१

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 02/02/2017 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः- वर्षभरापेक्षा जास्त कालावधी नंतर आज ह्या लेखमालेच्या पुढच्या भागाच्या लेखनाचा मुहुर्त लागला आहे . त्यामुळे अगदी नवीन वाचणार्‍यांना सगळे संदर्भ लागतीलच असे नाही.यासाठी क्षमस्व.परंतू सदर भागापासून या लेखमालेनीही मनातल्या मनात थोडा सांधेबदल केलेला आहे.त्यामुळे हे लेखन मागील संदर्भांशिवायंही सर्ववाचकांना आवडेल अशी आशा धरून पुनः एकवार सुरवात करतो आहे. चुकभूल द्यावी घ्यावी.

ब्रम्मा

लेखक पराग देशमुख यांनी शनिवार, 28/01/2017 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
निराकार, निर्विकार, अनासक्त आणि एकूणच सांगायचं झाल तर अनामिक असा मी एक नदीपात्रातील गोटा. तसा मुळात मी घाटी पण सह्याद्री, मंद्राद्री, निलगिरी नि सातपुडा वगैरे कौतुक आमच्या नशिबात अपवादानेच सापडतील. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असणाऱ्या मराठवाड्याच्या मध्यबिंदूशी माझी मुळ अजून घट्ट रुजलेली आहेत.

एक वादळी जीवन: ओशो!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 25/01/2017 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
एक वादळी जीवन: ओशो! सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल. विसाव्या शतकात भारतामध्येच नाही तर जागतिक पातळीवरील क्रांतीकारी व्यक्तींमध्ये ओशोंचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. १९३१ ते १९९० ह्या ५९ वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे वादळ निर्माण केलं ते अजूनही सुरू आहे. १९ जानेवारी १९९० रोजी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.

गावगाड्यात हरवलेला चेहरा: नारायणमामा

लेखक चंद्रकांत यांनी शनिवार, 14/01/2017 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
गावगाड्यात हरवलेला चेहरा: नारायणमामा ताई, नवरदेव-नवरीले हायद लावले चाला! अप्पा, मानतानं निवतं शे! जिभाऊ, शेवंतीले निघा! बापू, टायी लावाले चाला! आबा, तात्याकडनं चुल्हाले निवतं शे! या आणि अशाच प्रसंगपरत्वे अगदी बारश्यापासून बाराव्यापर्यंत कार्यक्रमांसाठी निवते देणारा खणखणीत आवाज गल्लीच्या सीमा पार करून निनादत राहायचा काही वेळ तसाच आसपासच्या आसमंतात. त्या सांगण्यात एक लगबग सामावलेली असायची. आजही हा आवाज मनात आठवणींच्या रूपाने स्पंदित होतो. स्मृतीच्या गाभाऱ्यातून निनादत राहतो. या आवाजाचा धनी कालपटाने जीवनग्रंथात अंकित केलेल्या काही वर्षांची सोबत करून निघून गेला आहे.

महाराष्ट्राचे दुर्गवैभव आणि आपण

लेखक कर्रोफर नमुरा यांनी शुक्रवार, 13/01/2017 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून एक समृद्ध, प्रगतीशील आणि पराक्रमी देश आहे, हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे. प्राचीन काळी हा प्रांत ऋषीमुनींचे आणि महारथींचे दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम हे येथील राष्ट्रीकांचे वैशिष्ट्य राहिले आहे. अगदी कला, स्थापत्य आणि निसर्गसौंदर्य हे देखील या भूमीला वरदान ठरले आहेत. अजिंठावेरुळचे स्थापत्य तर जगाला भुरळ घालत आहेत. लोणारचे खारयुक्त सरोवर हे खगोलतज्ञ आणि वैज्ञानिक यांचे आवडते ठिकाण. अनेक वैदिक, पौराणिक, मध्ययुगीन आणि अर्वाचीन दाखले याला प्रमाण आहेत.