Skip to main content

समाज

मी बाई होते म्हणुनी - भाग १५

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 29/03/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी . . भाग - १४ - http://www.misalpav.com/node/39099 .. ‘लक्ष्मणाचा विवाह उर्मिलेशी, शत्रुघ्नाचा श्रुतकिर्तीशी आणि भरताचा मांडवीबरोबर होणं योग्य आहे असे मला वाटते.’ राजा दशरथांचा आवाज त्या ठिकाणी भरून राहिला आहे असा भास झाला.

रावणमामा

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 24/03/2017 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
रावणमामा रावण नावाभोवती अनुकूल प्रतिकूल अर्थाच्या वलयांनी एक अभेद्य भिंत शेकडोवर्षापासून उभी केली आहे. संदेहाच्या प्रतलावरून प्रवाहित असणारे हे नाव कधी होकाराचा, तर कधी नकाराचा आशय घेऊन संस्कृतीच्या पात्रातून वाहते आहे. काहींना या नावात नकाराच्या सुस्पष्ट रेषा दिसतात, तर काहींना विद्वत्तेची वलये. शेकडो वर्षे उलटूनही त्याभोवती असणारे संदेहाचे धुके काही विरळ होत नसल्याने नकार-होकाराच्या कृष्णधवल छटांमध्ये ते आपला चेहरा शोधते आहे. म्हणूनच असेल की काय, या नावाला आपलं अभिधान म्हणून मिरवणारे आसपास अपवादानेच आढळतात. राम नाव धारण करून अभिमानाने मिरवणारे लाखोने आहेत.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 24/03/2017 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

प्रमोशन

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/03/2017 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
माॅर्निंग ब्रेकची वेळ. ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.

गोविंदराव तळवळकर

लेखक विकास यांनी बुधवार, 22/03/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच कळले आणि नंतर वाचले की महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवळकर यांचे ह्युस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली. महाराष्ट्राच्या आणि त्यातही खासकरून मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रीय जगताची स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक-आगरकर, काळकर्ते परांजपे, न.चिं केळकर आदी अनेक दिग्गजांनी एक जडणघडण घातली. त्याच काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सुरवातीस आचार्य अत्रे, ह.रा. महाजनी आदींनी वैचारीक जडणघडण चालूच ठेवली.

नवप्रवर्तनाचा सोहळा

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 20/03/2017 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
४ ते १० मार्च राष्ट्रपती भवनाच्या आवारात ’नवप्रवर्तन उत्सव’ साजरा झाला. २०१५पासून हा उपक्रम सुरू आहे आणि यंदाचे तिसरे वर्ष होते. मला मात्र याची अजिबात कल्पना नव्हती. मुघल गार्डन पहायला म्हणून गेलो आणि बाहेर पडताना हे दिसले तर आत घुसलो. सुखद धक्का बसला. सर्वसामान्य माणसांच्या कल्पकतेला व्यासपीठ दिले होते. एक वैद्यकीय इनोवेशन्सना दिलेला विभाग सोडला तर उर्वरित सगळे संशोधक तुमच्याआमच्यासारखे सर्वसामान्य भारतीय होते. जवळपास सगळेच ग्रामीण भागातील रहिवासी. त्यांचे संशोधनसुद्धा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे.

अल्पसंख्यांकांचा प्रश्न! भाग २

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 19/03/2017 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
अल्पसंख्यांकांचा प्रश्न! भाग 3 (संदर्भ ग्रथ- अखंड भारत का नाकारला?-शेषराव मोरे, छायाप्रकाश,अन्वय, आकलन- नरहर कुरुंदकर, अल्पसंख्यांक वाद – मुझफ्फर हुसेन, अब्दुल कादर मुकादम, तारिक फतेह, अयान हिरसी आली इ. मुस्लीम सुधारक/ विचारवंतांचे वेळोवेळी आलेले लेख.) काही दिवसांपुर्वी ह्या लेखाचा पहिला व दुसरा भाग मी मिसळपाव वर टाकला. पण एकंदरीत मलाच तो फार त्रोटक वाटला म्हणून दुसरा भाग मी थोडी अधिकची भर घालून परत इथे टाकत आहे. पुनरुक्ती बद्दल खामास्व... मागील आठवड्यामध्ये ह्या लेखाचा पहिला भाग मराठी पिझ्झा वर प्रसिद्ध झाला. त्याचीच लिंक मी WhatsApp आणि फेस बुक वर प्रसिद्ध केली.

पण, लक्षात कोण घेतो!!!

लेखक विद्या चिकणे मांढरे यांनी शुक्रवार, 17/03/2017 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
परवा ऑफिसला जाताना बालगंधर्वच्या चौकात आले अन सिग्नल लाल झाला, म्हणून मग गाडी बंद करून सिग्नल पुन्हा हिरवा होण्याची वाट बघत उभी राहिले. तेव्हढ्यात साधारण अठरा-एकोणीस वर्षांची मुलगी गर्दीतून वाट काढत, सिग्नलवर थांबलेल्या काही निवडक लोकांना भेटून त्यांच्याशी काहीतरी बोलून त्यांना हातातल्या पुड्यातून एक-एक चॉकलेट काढून देताना दिसली. माझ्यासकट सगळेच 'ती नक्की काय बोलतीये आणि चॉकलेट्स का वाटतीये' या उत्सुकतेने तिच्याकडे बघत होते.

बाजारात तुरी.....

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 17/03/2017 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
१. महाराष्ट्रात तुरीची उत्पादकता एकरी ४०० किलोसुद्धा नाही. यंदाच्या शासकीय आकडेवारीचा संदर्भ घेतला तर 37,80,712 एकरांवर ११ लाख ७० हजार मेट्रिक टन तुरीचे उत्पादन झाले, म्हणजे साधारण एकरी ३०९ किलो. पण आकडेवारी अचूक नसते म्हणून आपण आपल्या सोयीसाठी वाढीव आकडा म्हणजे एकरी ४०० किलो उत्पादन धरूया. हमीभाव ५०५० रुपये प्रति क्विंटल आहे. पण आवक प्रचंड वाढल्याने आणि आधारभूत खरेदी केंद्रात नंबर येण्याची वाट पाहणे परवडत नसल्याने काहींनी खासगी व्यापाऱ्यांकडे जेमतेम ३००० रुपये प्रति क्विंटल दरानेसुद्धा विकली आहे. पण आपण मिळालेला सरासरी दर ४००० रु./क्वि गृहीत धरूया.

जाऊ शकते-तीच जात!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 16/03/2017 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
म. टा. व्रुत्ता प्रमाणे एक नवीन कायदा येतोय.. 'अंतर्जातीय विवाहितांच्या संरक्षणाचा'. सदर कायदा हा आमच्या मते अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे. https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17310118_1814617218860381_2113214286324950828_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dd09ddc726cae9ec913d2f3f4c972085&oe=59586BDB पण.....