Skip to main content

मुक्तक

मिपा कट्टा पुणे २०२२....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 17/09/2022 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
सारे रोजचे तरीही..... हवे हवेसे वाटे निशाचे ते जाणे आणी उषाचे भेटणे गवाक्षातून झाके सोनसळी तिरीप पुन्हा नव्याने येतो जगण्या हुरूप सारे रोजचे तरीही..... पालवी फुटते रात्रीच्या स्वप्नानां अधिरते मन कवेत घ्यायाला गेले कालचे विरून निराशेचे सुर मन आभाळी आले ढग आशेचे भरून सारे रोजचे तरीही हवे हवेसे वाटे...... दमून भागून जीव झाला क्लांत पुन्हा घरट्यात येतो घ्याया विश्राम निवांत सारे रोजचे तरीही हवे हवेसे वाटे निशाचे ते येणे..... भगवंताचे देणे चाले असाच चरितार्थ सारे रोजचे तरीही..... कट्ट्यावर येवून साधावा परमार्थ. १७-९-२०२२ पुणे कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा l

परिचित, तरीही अपरिचित ‘दख्खन’

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 16/09/2022 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
दख्खन दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी.

आठवणीतला गणेशोत्सव

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 15/09/2022 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे साडेअकरा वाजले, आणि मी फोनाफोनी सुरू केली. पोलीस कंट्रोल, महापालिका, फायर ब्रिगेड, अन्य वर्तमानपत्रातल्या रात्रपाळीच्या रिपोर्टरांशीही फोनवर बोललो. नवी एडिशन काढावी लागेल असं काही फारसं घडलं नाहीये, याची खात्री करून घेतली, आणि मी आवराआवर केली. तो १९८९ सालातला गणेशचतुर्थीच्या आधीचा दिवस होता. चतुर्थीला सुट्टी होती. ‘उद्या अंक नाही’ अशी चौकट पेपरात ज्या मोजक्याच दिवशी छापली जाते, त्यापैकी हा एक दिवस! मी तयार होऊन थांबलो आणि काही वेळातच एक जाडजूड पिशवी खांद्यावर घेऊन सन्मित्र तानाजी कोलते Tanaji Kolte दाखल झाले. तानाजी तेव्हा माझा सीनियर सहकारी होता.

जळण नसलेल्या तिरडीवर...

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 10/09/2022 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
लेख केवळ मनोरंजन व स्वानंद हा उद्देश समोर ठेवून लिहीला आहे. खुप आधी लिहीला होता,अभद्र विषय असे लोकांचे म्हणणे. सणासुदीला कशाला अभद्र लिहायचे व आनंदावर विरजण टाकायचे म्हणून आता डकवत आहे. माझ्यापुरते म्हणाल तर, काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ ll -संत नामदेव स्मायलींची बाराखडी शिकवल्या बद्दल @टर्मिनेटर भौं चे विषेश आभार. 😀😁 ______________________________ आजकाल मिपावर कवितेच्या दुकानाकडे रसिक कमीच फिरकतात दोन आकडी वाचक तीन आकडी जरी झाले तरी धन्य वाटते.मधूनच एखादी"तुला काय ठाऊक सजणी" दामिनी सारखी चमकून जाते.

अनंत चतुर्दशी

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 09/09/2022 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज अनंत चतुर्दशी.दूरदर्शनवर गणपती विसर्जन व मिरवणुकीची दृश्ये दाखवत होते.लालबागचा राजा,कसबा गणपती, नागपूरचा राजा,कधी नाशिक कधी नागपूर शहरातली दृश्ये ,जणू दूरदर्शन संजय आणी मी धृतराष्ट्र. जसे वय वाढते तसे येणारा प्रत्येक दिवस भूतकाळात जरूर घेऊन जातो. तसाच आजचा दिवस सुद्धा.... एक दोन तीन चार .... माणिक मोती बडे हुशार.... आमच्या लहानपणीच्या गणेशोत्सवाची दृश्ये डोळ्यासमोर तरळून गेली. तेव्हा ना दूरदर्शन होते ना विज.

घराची ऊब

लेखक मालविका यांनी बुधवार, 07/09/2022 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक घराला एक प्रकारचा उबदारपणा असतो. आणि साधारणपणे माणूस आपल्या घरात एकदम समाधानी असतो. कितीही दिवस बाहेर गेलं तरी घरी आल्यावर एक प्रकारचं समाधान, मोकळेपणा मिळतो तो काही वेगळाच. ४ दिवस घर बंद करून जावं तर आल्या आल्या घरात एक प्रकारचा वास येतो. जणू घर सांगत असत कि असं दारं, खिडक्या बंद करून मला सोडून तुम्ही कसे जाता? आधी घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या काय करायचं तर दारं खिडक्या मोकळ्या उघडून टाकायच्या. घराला स्वच्छ हवेचा श्वास घेऊ द्यायचा. मग घर पण कसं मोकळं होत. मनमोकळेपणाने तेही आपलं स्वागत करतं. आपलं घर आपल्याला आपल्या सुख दुःखासह सामावून घेत.

आईस्क्रीम!

लेखक उगा काहितरीच यांनी बुधवार, 07/09/2022 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
उण्यापुऱ्या ६०-७०-८० वर्षांचं आयुष्य आपलं. त्यातही जवळजवळ १/३ झोपेतच जाते. बाकी तर हिशोब सोडूनच द्या. जेव्हा पहिल्यांदा समज येते बहुतेकजण शाळेतच असतात. काही लोक कदाचित कॉलेज मध्ये वा पन्नाशीतही असू शकतात तो भाग निराळा ! त्या वयात मौज मजा म्हणजे काय हो मित्रांसोबत मनसोक्त खेळायला मिळणे, हातगाडीवर मिळणारे आइस्क्रीम खाणे, कधी मिळालेच तर रेस्टॉरंट मध्ये वडिलांसोबत जाऊन मसाला डोसा खाणे बस ! पण नाही एवढ्या साध्या गोष्टीचे पण काही परिणाम असू शकतात नाही का? दहावी / बोर्ड वगैरे राक्षस पण असतातच मानगुटीवर बसलेले. एकदा दहावी होऊ दे रे मग काय कॉलेज मध्ये कर जेवढी मौजमजा करायची ते.

रस्ते अपघातातील मृतांना श्रध्दांजली

लेखक Trump यांनी सोमवार, 05/09/2022 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ते अपघातातील मृतांना श्रध्दांजली. -- आज श्री सायरस मिस्त्री मरण पावले. भारताच्या प्रगतीला हातभार लावणारा कोणीही मनुष्य असा टाळण्याजोग्या अपघातात मृत्यु पावला की भयंकर वेदना होतात. एक माणुस घडवायला ३० - ३५ वर्षे लागतात. अशी उमेदीत माणसे सोडुन गेली की आपले नशीब कसले कपाळकरंटे आणि अजुन किती भोग भारतमातेच्या नशीबात आहेत त्याची जाणीव घ्यायला आपला आवाका कमी पडतो. आपण भारतीय किती नालायक आहोत याची भयंकर सल मनाला लागुन जाते. असली विषण्णता लवकर मनातुन जात नाही. ह्या यादीत श्री विनायक मेटे, श्री वांजळे, श्री भक्ती बर्वे इ. अशी कितीतरी नावे टाकता येतील.

त्यागी गजानना तुझ्या शौर्याला शतशः नमन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 02/09/2022 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
चैतत्न्याने प्रफुल्लित करणार्‍या सृष्टी आणि प्रकृतीच्या रक्षाबंधनाच्या कर्तव्याला पाळण्यासाठी साक्षात रुद्राच्या रौद्ररुपाला झेलणार्‍या त्यागी गजानना तुझ्या शौर्याला आमचे शतशः नमन असो.

चक्रव्युह....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 02/09/2022 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा सापळे इथे माणसाचे माणसाला पकडावया वैखरीतून पेरती मोहाचे दाणे सावज घेरावया अठरा औक्षहिणी सेना यांची,चक्रव्युह मांडला घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले कपटींनी कपट करून भ्रमणध्वनीतुन चोरले भेदिले शुन्यमंडळा, रिता केला भाता अभिमन्युचा राहीला न वाली कोणी राहीला न भ्राता..... २-९-२०२२
काव्यरस