तिच्या मनातून.....................
आज या अथांग उत्तुंग हिमालयाच्या पायथ्याशी येऊन पोचलेय...
त्याचे अस्तित्व अगदी एखाद्या गंभीर पण आश्वासक मुनींसारखे भासतंय ...
असे वाटतंय की कितीतरी काळापासून प्रवास करतेय, करतेय ....... ते शेवटी या इथे पोचण्यासाठीच.
आत्तापर्यंत सोबत असलेले सगळेच निघून गेलेत पुढे, कधीचेच.
पण मला भीती वाटत नाहीये, कसलीच नाही, कधीच वाटली नाही, ना माणसांची, ना संकटांची, ना परिस्थितीची, ना जगण्याची, ना मरणाची!
पण मला आता अजून पुढे मात्र जाता येत नाहीये.... खरें तर माझी तशी इच्छाही नाही.
मला खरोखरच कधी कसली इच्छा होती का?
मला तरी आता आठवत नाही.
होती ती फक्त आग, प्रचंड आग!
माझ्यासकट सगळे काही जाळणारी आग.
मिसळपाव