Skip to main content

मुक्तक

पूर्वेच्या समुद्रात - १७

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 20/02/2016 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात - १७ विशाखापटणमला रुग्णालयात काम करत असताना सकाळी १० वाजता बातमी आली कि नौदलाचे किरण हे विमान कोसळले आहे आणि त्याचा वैमानिक मात्र विमानातून बाहेर पडला आहे आणि त्याचा शोध जारी आहे. साधारण एक तासाने त्या वैमानिकाला घेऊन एक रुग्णवाहिका आमच्या रुग्णालयात आली. हा वैमानिक व्यवस्थित शुद्धीवर असून स्पष्टपणे बोलत होता. त्याची प्राथमिक तपासणी झाली तेंव्हा त्याने पाठ दुखते आहे हे सांगितले होते त्यामुळे त्याची रवानगी माझ्या विभागात( क्षकिरण) एक्स रे काढण्यासाठी झाली. हा वैमानिक मराठी होता नाव* संदीप टिपणीस(* नाव बदलले आहे). एक्स रे झाले आणि त्याची फिल्म येईपर्यंत आम्ही वाट पाहत होतो.

मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य

लेखक जेपी यांनी गुरुवार, 11/02/2016 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही. पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये" प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.

पूर्वेच्या समुद्रात --१६

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 10/02/2016 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात -- १५ अंदमानमध्ये असताना एक गोष्ट लिहायची राहून गेली ती येथे लिहीत आहे. पोर्ट ब्लेअर च्या आसपास गस्त घालत असताना आमच्या जहाजाच्या हेलीकॉप्टरची माणसे/ सामान वर खेचायची मोटर आणि कप्पी याची चाचणी करायची होती.म्हणून पायलट आणि इंजिनियर यांची चर्चा चालू होती. त्यासाठी त्यांना ज्याला चांगले पोहता येत होते असा कोणी तरी सडपातळ माणूस हवा होता . मी तेथेच उभा होतो आणि म्हणालो,"चला मीच येतो." त्यावर दोघे पायलट म्हणाले, "सर, तुम्ही"?

कुकुचकू - रुपये १२,०००/- फक्त !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 08/02/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्या दिवसांपूर्वी आमच्या ऑफिसमधली ज्येष्ठ (आणि श्रेष्ठ!) पार्शिण बरेच दिवस गायब होती. पारशी लोक हे तसे खुशालचेंडू आणि स्वच्छंदी असल्यामुळे ऑफिसातल्या कोणालाच तसं तिचं नसणं खटकलं नाही. मात्र बरेच दिवस होऊनही ती ऑफिसला न आल्यामुळे तिच्याविषयी थोडी चर्चा हळूहळू सुरु झाली. अखेर एक दिवस बाईसाहेब उगवल्या ती एक चित्तथरारक कहाणी घेऊनच ! तो अख्खा दिवस ती प्रत्येकाला वेगवेगळे गाठून तीच गोष्ट सांगत होती. खास लोकाग्रहास्तव तिने पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांसाठी ती हकीकत साभिनय करून दाखवली ती अशी : ह्या बाईची एक मुलगी मुंबईत बांद्रा इथे राहते.

आठवणीतल्या बाई!

लेखक पी महेश००७ यांनी रविवार, 07/02/2016 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा : जीवन शिक्षण विद्यामंदिर गाव ः पिंपळगाव बसवंत पागे बाई आणि घोडके बाई.... पहिली ते चौथीच्या काळातील या दोन शिक्षिका माझं आयुष्य समृद्ध करून गेल्या. त्यातल्या त्यात घोडकेबाई मला खूप चांगल्या आठवतात. सुमारे तीस वर्षांपूर्वीचं मला सगळंच काही आठवणार नाही; पण त्यांचं शिकवणं मला अजूनही आठवतं. आता ते धूसर होत चाललंय. मेमरी डिलीट होण्याच्या आत कुठे तरी स्टोअर करावं म्हणतोय.. म्हणूनच मी ते कुणाला तरी सांगतोय. ‘आटपाट नगर होतं’ या वाक्याने सुरुवात होणाऱ्या गोष्टी आठवतात. हा पतंग की पाखरू म्हणे मज आभाळी चल फिरू... या कवितेची चाल किती छान बसवली होती त्यांनी...!

अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी

लेखक माहितगार यांनी शनिवार, 06/02/2016 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
कविता हवी तशी जमली नाही, इतरांनीही कविता करून कावळ्यांना न्याय द्यायला हरकत नाही, आम्ही आमच्या परीने पैजारबुवांच्या आवाहनाला खालील प्रमाणे दाद दिली आहे. अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, आम्हा कावळ्यांचा अन मानवी बायकांचा संबंधच काय तुमच्या बायांनी आम्हाला फुकाचं बदनाम केलं हाय अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, तुमच्याकडन हाय दंडाच येण आमच घर मेणाच का शेणाच तुम्हाला काय देण घेण अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, तुम्ही कर
काव्यरस

खरेदी पाहावी करून !

लेखक चिनार यांनी शनिवार, 06/02/2016 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
अमेझॉन अनं फ़्लिपर्काटचा जमाना आहे. सगळं काही एका क्लिकवर मिळतं. मोबाइल काय अनं कपडे काय अनं दागिने काय जे म्हणाल ते मिळेल. खिशात पैसे नसतील तर सुलभ हप्त्यांची सोय सुद्धा उपलब्ध आहे. शक्य तेवढं ह्या मोह्मायेपासून लांब राहण्याचा मी प्रयत्न करतो. कारण एक तर आपल्याला खरेदीचा कंटाळा! त्यात ,"पैसे काय झाडाला लागतात का रे ?" हे मध्यमवर्गीय संस्कार ! त्यामुळे मी या विषयावर लिहिण्याच तसं काही कारण नाहीये. पण कालपरवा एक घटनाच अशी घडली की मला ह्याचा गांभीर्याने विचार करणे भाग पडले. झालं असं की, आमच्या कंपनीच्या क्लायण्टला प्रायोगिक तत्वावर एक प्रोजेक्ट करून द्यायचा होता.

..

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 04/02/2016 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
..मोकलाया दिशा दाही मठाधीपती.... तांब्या s मठ्ठा .... sपकॉर्न...पकॉर्न ... पाsपकॉर्न...पापकॉर्न....पॉपकॉर्न झाडाची फांदी ....संस्कृती ...विडंबन अमेरीकन स्त्रीवाद.... ... जिलेबी... जिलेबी...जिलेबी... नेलपॉलीश..टिंगलटवाळी ....व्यव व्यव व्यवच्छेद लक्षण...आरक्षण .. स्त्री पुरुष.. लाळ... गळत्येय... 'आनंदाचा प्रसंग आहे, दोन थेंब घे.... किलर खंडया.... अं हं खंडया किलर... रोहिथ वेमुला.... जात.... लदाख सायकलने बापरे!

काटा वजनाचा --४

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 03/02/2016 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
काटा वजनाचा -३ काटा वजनाचा --४ आतापर्यंत आपण वजन जास्त म्हणजे किती आणि ते का वाढते याची साधारण कारणे पाहिली काही लोक आपल्याला भरपूर खाताना दिसतात तरीही त्यांचे वजन वाढत नाही. याउलट बहुसंख्य स्थूल लोकांची एक तक्रार असते कि आम्ही एवढा डाएट करतो तरी आमचे वजन कमी होत नाही. या दोन्ही गोष्टीत थोडे फार तथ्य आहे याचे विवेचन. काही वैद्यकीय शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडला कि जसे आपल्या मेंदूत एक थर्मो स्टेट(THERMOSTAT) असतो जो शरीराचे तापमान स्थिर ठेवतो तसाच एक एडीपोस्टेट (ADIPOSTAT) असतो.

जिलबीचं प्रमाण किती असावं ?

लेखक नीलमोहर यांनी मंगळवार, 02/02/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पे र णा: http://www.misalpav.com/node/34693 नमस्कार मंडळी, मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो. पण कधी कधी मिपावर चांगल्या लेखांशिवायही वाचकाने रहायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी बोर्डावरचे उत्तमोत्तम लेख खाली ढकलून तुम्हाला उपाशी सोडून स्वतः जिलब्या टाकत बसेल याची काही गॅरंटी नाही. आणि मग भुकेलं वाटायला लागलं की वाचनभूक शमवण्यासाठी अनेक जिलब्यांचा प्रवास सुरु होतो. अशाच एका मिसळपावात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी एखादा मिपाकर म्हणतो, 'घे कै होत नै', 'एक तुकडा घे', 'बरं दोनच वेटोळे घे', 'धागा पडला राव तुझा जाऊ दे, चलता है', 'नाही म्हणू नको यार', 'धाग्याची शंभरी झाली लेका, बाकीच्यांचा कसा पापड मोडला असेल बघ' .. इ. इ. आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच जिलबीची' टाकण्यास सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा जिलबी टाकण्याचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. 'भस्म्या' होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकूटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात, म्हणजे मिसळपाव, इथले मिपाकर, वेगवेगळे अतरंगी आयडी, यात एक जिलबी म्हणा किंवा ईम्रती म्हणा एखाद दुसरा तुकडा घेतला की सपक रूटीन लाईफ एंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात जिलबी आरोग्यासाठी चालू शकते ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी टाकावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण टाकूच नये ना? जागतिक ऑनलाईन आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त बँडविडथ, हाथ धुवून मागे लागलेला बॉस, आणि विविध रिकामी कामे सोबत असतांना जिलबीचं प्रमाण किती असलं पाहिजे ? जिलबी खावी की न खावी? गोड / आंबट/ आंबट गोड / अतिगोड / मधुर अशा विविध चवी आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणणं तीन पाच र्‍हस्व प्रतिसादात विविध मुद्द्यांशिवाय आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांच्या जिलब्यांचा रतीब पाडण्यापेक्षा भरकटलेला मुद्दा विदाऊट स्पष्टीकरण आलं, भरल्या ताटी कोणाचं काही प्रबोधन न करता रिकामा टीपी झाला तर त्याचा फायदा अनेक जिलब्यांचे अजीर्ण झालेल्या मित्र मैत्रिणींना होईल म्हणून हा काथ्याकूटाचा प्रपंच. ता.क: मी अशा गोष्टींपासून एक हात दूर(राहू शकत नाही). उगं माझ्याकडे संशयाने पाहिले तरी काही एक बिघडणार नाही. धन्यवाद. खुलासा संपला.