Skip to main content

मांडणी

विलक्षण २.०

लेखक दीपक११७७ यांनी शुक्रवार, 11/01/2019 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
बांबूच्या झाडाला फुले येणे हि एक विलक्षण घटना आहे. बरीच बांबूची झाडे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ठराविक कालावधीत बहरतात व मग नष्ट होऊन जातात. हा ठराविक कालावधी बांबूच्या प्रजाती निहाय वेग-वेगळा आहे. जसे; 1. Bambusa bambos या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे. 2. Phyllostachys bambusoides या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर १३० वर्षांनी एवढा आहे. 3. Chusquea abietifolia या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे. 4. Phyllostachys nigra f.

दुधातील ए -१ व ए -२ घटकांबाबत भ्रामक प्रचार

लेखक vcdatrange यांनी मंगळवार, 08/01/2019 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
पौराणिक कथा, संस्कृती व आहारात भारतामध्ये दुधाला वैशिष्ठपूर्ण स्थान आहे. दुधाला संपूर्ण अन्न मानले गेले असले तरी काही लोकांच्या मते दुध हे प्रोस्ट्रेट ग्रंथी व बीजांडा (ओव्हरी) चा कॅन्सर, टाईप-१ डायबेटीस, मल्टीपल स्क्लीरोसिस, रक्तातील क्लोरेस्टरॉल ची उच्च पातळी, वजन वाढणे व हाडांची ठिसूळपणा इत्यादी विकारांसाठी कारणीभूत आहे. निसर्गोपचारात, अस्थमा व सोरीयासिस च्या रुग्णांना तर दुध सेवन थांबविण्याचा सल्ला दिला जातो.

संक्रांतीला कल्पकतेचं वाण

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 04/01/2019 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरायणची सुरुवात झाली की, हळदी-कुंकू समारंभाची लगबग सुरु होते. हळदी कुंकूवाची परंपरा जुनी असली तर त्याचं महत्व आजही तितकचं टिकून आहे. हळदी कुंकू लावून तिळगूळच्या लाडवासोबत वाण देण्याची प्रथा अजूनही कायम आहे. हळदी-कुंकु कार्यक्रमाचे धार्मिक महत्व किती ते माहित नाही. पण असे कार्यक्रम सर्वांनाच आवडतात. सर्व महिला मस्तपैकी नटुन-सजुन येतात, गोड गोड गप्पा मारतात, नविन ओळखी होतात, एकाच कॉम्प्लेक्समध्ये असुनदेखील कधी न बघितलेल्या महिला एकमेकींना भेटतात. यंदा वाणाला दुसरं काही देण्याच्या ऐवजी फुलांची किंवा भाजीपाल्याची रोपे वाटली तर.!

आरंभशूर

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 02/01/2019 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
``तूच ठरवतेस, आज व्यायाम सुरू करायचा. आज डायरी लिहायला सुरुवात करायची, आजपासून कामात जास्त लक्ष द्यायचं, टाइमपास करायचा नाही, सोशल मीडिया कमी वापरायचं, व्हर्च्युअल जगात जास्त वावरायचं नाही, सकाळी लवकर उठायचं, माती नि मसणं करायचं!`` ``मग?`` ``मग` काय `मग`? तू मागचापुढचा विचार न करता संकल्पांना होकार देऊन टाकतेस आणि आम्हाला ते पाळत बसावे लागतात ना!``

वृक्षवल्ली आम्हा सोयरी

लेखक नायकुडे महेश यांनी शनिवार, 29/12/2018 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
जसे वाळवंटी असे निर्जरा, जसे सागराच्या तळाशी धरा, तसा एक तू जीव या भूवरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।। कुणी वृक्षप्रेमी पुकारी तुला, तया जीवनी एक आधार तू, कुणी वृक्षवैरी न ठावे तुला, करी स्वप्न साऱ्यांचे साकार तू, जसा देव नांदे सदा अंतरी ... वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।।
काव्यरस

जेवीद्वि व्रत - द्विभूक्त्स्य वजनो दास:

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 23/12/2018 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट नगर होते. तेथे एक मध्यवयीन, मध्यमवर्गीय सद्गृहस्थ रहात होता. खाऊन पिऊन सुखी होता, चरबी आणि ढेरी बाळगून होता परंतु शारीरिक समस्येमुळे त्रासाला होता. वाढता रक्तदाब आणि रक्तातील वाढत्या साखरेमुळे पिडला होता. प्रयत्न करूनही कमी न होता, कलेकलेने वाढणारे वजन आणि पुढे येणारी ढेरी यामुळे गांजला होता. वजन आणि ढेरी कमी करण्याचे विविध प्रयत्न करून थकला होता. वाढत्या वजनाबरोबरीने येणारे विविध आजार त्याला भीती दाखवत होते. काही विशिष्ट व्यक्ती समोर आल्यावर पोट आत ओढून ओढून दमला होता. वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी अर्धबरीच्या सूचना ऐकून ऐकून कंटाळला होता.

शेतकरी दीन

लेखक vcdatrange यांनी रविवार, 23/12/2018 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
२३ डिसेंबर - राष्ट्रीय शेतकरी दिन शेतीतल्या 'श' ची देखिल माहिती नसलेल्या माझ्यासारख्या सामान्याने याबाबत कसंमांडावं म्हणुन बिचकत होतो. कामानिमित्त माती, पर्यावरण आणि हौसेपोटी 'Own Grown' म्हणजे स्वत:च अन्न स्वत: पिकवा या प्रवासा थोडा अभ्यास होतोय. कृषीक्षेत्रातील किटकनाशकांचा वापर, आरोग्यावरचे दुष्परिणाम याचबरोबर अजुनही म्हणावा तसा चर्चिला न गेलेला एक मुद्दा आहे. किटकनाशकांसोबतच शेतीमध्ये तणनाशकांचा वापर वाढलाय. गवत कुळातील या वनस्पती पुर्वी हाताने उपटुन बांधाच्या बाहेर टाकल्या जात. यातील सुमारे ५० ते ६० प्रकारच्या वनस्पती आयुर्वेदीय औषधी निर्माणात वापरली जातात.

उद्योग/व्यापार : प्रस्तावना

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 24/11/2018 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणूस उद्योग/व्यापारात मागे का? ह्या विषयावर आजपर्यंत शेकडो-हजारो लेख, व्याख्याने आणि भाषणे झाली आहेत. असे लेख लिहिणारे आणि व्याख्याने-भाषणे देणाऱ्यांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता प्रामुख्याने ज्यांनी आयुष्यात कधीच उद्योग/व्यापार केला नाही असे लोकं तसेच व्याख्याने किंवा भाषणे देणे हाच ज्यांचा उद्योग आहे असे “लोकां सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या सदरातील लोकं आणि पु.ल. देशपांडेंनी 'पुणेकर,मुंबईकर कि नागपूरकर?' मध्ये म्हंटल्या प्रमाणे " दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्‍हाईक - हे सूत्र आहे इथलं! त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते.

अच्छे चाचा कच्चे चाचा

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 14/11/2018 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

समलिंगी संबंध ..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 10/11/2018 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी मिपा वर आले आहे.. पुन्हा थोडी आता लिहित जाईन म्हणते.. तुमची मदत लागेल.. एक लेख लिहिते आहे.. समलैन्गिकत्व ... लहानपणी म्हणजे साधारण ७वी मध्ये असताना एक मैत्रीण, घरी आलेले वर्तमान पत्र शाळेत घेऊन आली. आल्या आल्या तो पेपर हातात नाचवत म्हणाली.. ए हि बघा बातमी.. एका मुलीनं मुलीशीच लग्न केलं! असं म्हटल्या बरोबर आम्ही सगळ्याजणी त्या पेपर वर तुटून पडलो. नेमकं कसं कसं काय काय घडलं हे वाचायला प्रचंड उत्सुक होतो. बातमी निपाणी गावातली होती. हे असं काही घडणं म्हणजे किती चुकीचं वागतायत अशीच समजूत लोकांची होती, तेव्हाही आणि काही प्रमाणात आत्ताही!