मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

" निरंतर "

पेशवे बाजीराव तिसरे ·
लेखनविषय:
विसरुन सर्व गेले इतक्यात लोक मजला ह्रदयी कधी जयांच्या मी वस्ती करुन होतो.. कोण राहीले निरंतर येथे हे मलाच का ऊमजेना अस्तित्व पुसुनी जाण्याची का मी भिती धरुन होतो.. बांधती जीवा ह्या अजुनी चार धागे त्या विश्वासाचे धावतात शरीरामधुनी वेग बनुनी ते श्वासांचे.. आहेस तु सन्निध स्वरसाज बनुनी ह्या गीताचा जाणवे आधार अजुनी त्या समर्थ हातामधल्या हाताचा.. राहिल अस्तित्व माझे शाश्वत सखे तुझ्या दोन नेत्रांमधुनी येइल तुलाही प्रचिती नकळत ओघळणारया त्या दोन आसवांमधुनी..

" एकान्त "

पेशवे बाजीराव तिसरे ·
लेखनविषय:
बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा.. असा एकान्त मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा.. अशा एकान्ताच्या क्षणी ती बसते समोर येऊनी.. मग तीच होते कविता माझी व्यक्त होते शब्दातुनी.. मनात वाजत राही आठवणीचा पावा.. वेदना सगळ्या जुन्याच परि चेहरा नवा.. नव्या त्या चेहरयाचे नवे नवेच ते पाणी.. ओठावरती येते तरी का जुनीच विराणी.. असा एकान्त हवा विसर जगाचा पडावा.. स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा..

" सखी "

पेशवे बाजीराव तिसरे ·
लेखनविषय:
भंगलेल्या शब्दास माझ्या सप्तस्वराची साथ तू . . वेदनेच्या वादळातही सावरणारा तो समर्थ हात तू . . दिवस उजळून टाकणारी प्रसन्न ती पहाट तू . . संपूच नये प्रवास जिचा ती रम्य वाट तू . . सुख तू दुःख तू सकाळ तू दुपार तू . . मन पुलकित करणारी तीच श्रावणधार तू . . काय सांगू माझ्याकरिता काय आहेस तू . . गुदमरलेल्या जीवनाचा श्वास तू विश्वास तू . . सखी माता भगिनी सर्व नात्यांचे नाव तू . . दाटतो देवासमोर जो तोच सात्त्विक भाव तू ..

विरोप

अनिला ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तुज पत्र लिहाया झाले मी आधिरा टिचकीने एका ताव मिळे लिहाया @च्या गोलात पत्ताही दडे नेमका टपटपली अक्षरे उलगडती भाव मनीचे अक्षरेही घेती आकार रंग निराळे मज भासे ते ते लिहिले विद्युत डाकी टिचकीने एका क्षणात तुजला धाडी पावली लगोलग मज रे पोच पावती भासली जणू रे तुझीच ही सावली या कृती जरी असती यांत्रिक तावातिल शब्द सुवासिक मंत्रित मी मंत्रमुग्ध अन धुंद भान गंधित तुज होईल का रे आशीच ही लागण उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तव पत्र पहाया झाले मी अधिरा

किनारा..

पेशवे बाजीराव तिसरे ·
लेखनविषय:
माणसाने समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा.. लाटेसार्खे येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा.. किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा... त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी.. पण त्या लाटेत गुन्तायचे नसते किनारयाने कारण निमिशात त्याची स्वप्ने भन्गतात एका नविन आघाताने... म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...

वाटा

रचनाद्लाल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोणास कधी कळतात वाटा वेड्या कोठून कश्या वळतात वाटा। एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना सोडूनी हात कधी पळतात वाटा। पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा। पाहूनी त्या वळणावर आसवांना, काळोखाआड कधी गळतात वाटा। कोणी बोले दुनिया तर गोल आहे फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा? तीही सोडून मला वळनात गेली तीच्या वाचून मला छळतात वाटा। हो येथेच सुरवात , इथेच अंत

असंही प्रेम असतं!!

तुमचा आनंद ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
असंही प्रेम असतं!! अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.... गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल! कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल? आजार? खून? का...

सुखाच्या शोधात.... (दु:ख)!!!

छत्रपति ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
दु:खाच्या घरी एकदा जमली होती पार्टी दारु बीरु पीऊन अगदी झींगली होती कार्टी... दु:ख म्हणाले " दोस्तानों! बिलकुल लाजू नका इतके दिवस छ्ळल म्हणून राग मानू नका! मनात खूप साठल आहे काहीच सुचत नाही माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय आता राहवत नाही...

या सुन्दर जगात

विवेक विद्वास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
या सुंदर जीवनात कधी कधी... पडायच असत प्रेमात कधी कधी... बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी... पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत विचारात गुंतल्यासारख कधी कधी... अन पाहताना तिच्याकडेच विचारात गुंतायच असत कधी कधी... रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच... जागुन अशी रात्र काढावी कधी कधी... नंतर "जागली होतिस का रात्री?" म्हणून विचारावे कधी कधी... मागायचा असतो देवाकडे... हात तिचा चोरुन कधी कधी... द्यायच असत आश्वासन त्यालाही पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी... चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या विषय तिचा निघाल्यावर कधी कधी... असते रागवायचे लटकेच "अस काही नाहिये" म्हणून कधी कधी... विरहात तीच

शिघ्रकविता

बहुरंगी ·
लेखनविषय:
या कवितेचा रचयीता(शिघ्रकवी) मी नाही, तसेच तो कोण आहे हे देखिल मला माहित नाही. चु.भु.द्या.घ्या. ... मि रानात ............... तु वनात मि वनात ............... तु झाडात मि झाडात ............... तु फ़ांद्यांत मि फ़ांद्यांत ............... तु पानांत मि पानांत ............... तु फ़ुलात मि फ़ुलात ............... तु कळ्यात मि कळ्यांत ............... तु .. . . . . . . . . . . *तु बुचकळ्यात ...* :))))))