Skip to main content

कविता

कविता.

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 30/01/2008 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.... मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे, आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे.... मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.... तुझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा ....................... माझी स्वताची कविता.

अपेक्षा

लेखक अनिला यांनी गुरुवार, 24/01/2008 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यातल्या कवीला डोळे हवे ट्पोरेच हात सुकोमलच हवेत केस काळेभोर सुगन्धी कुरळेच हवे; फुलाबिलानी सजलेले. वस्त्र नेटकीच हवीत अंगासरशी तुझ्या कवितेत सामील व्हायला अन तू उगाळ्लेल्या माझ्या भावना, अन मी ही हवी विवस्त्र. तु़झ्या घराचे घर करायला, हसतमुख घराचे दार उघडायला, जेवणाचे सुगन्ध दरवळावयाला, रडत्या मुलाला शान्तवायला जबाबदारीची ओझी वाहायला. समारम्भात मिरवायला, मी तर हवी दक्ष, सावध, तुझाच घ्यायला पक्ष. तुझ्यातल्या कवीला माझ्या सारखी कोणीही चालते पैसे मोजून गप्प बसणारी, न मोजता मिळाली तर भीतीनी मूग गिळ्णारी. तुझ्या विश्रान्तीला माझी शान्तता हवी माझ्या विश्रान्तीला, फक्त तुझ थोड ह्र दय हव थोडी कद

वाच पुस्तके

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 23/01/2008 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
वाच पुस्तके जगण्याचे जर भान पाहिजे, वाच पुस्तके! जगती जर सन्मान पाहिजे, वाच पुस्तके! साहित्याविण अर्थहीन हे अवघे जीवन जिंदगीत जर जान पाहिजे, वाच पुस्तके संस्कारांनी घडतो माणूस... मोठा होतो मानाचे जर पान पाहिजे, वाच पुस्तके सहा रिपूंच्या हल्ल्यापासून वाचवणारा हृदयी जर भगवान पाहिजे, वाच पुस्तके आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके ----अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras

मिसळ पाव

लेखक मीनल गद्रे. यांनी बुधवार, 23/01/2008 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव.

सॄष्टीची युक्ती

लेखक मीनल गद्रे. यांनी मंगळवार, 22/01/2008 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मेघानी केली अवनीची पूजा कधी थेंबांनी आला पाऊस राजा हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. नवरस ,नव आल्हाद ताजा वाटे पूजेची मज मौजमजा मेघाची काय वर्णावी भक्ती कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती.

आनंदयात्री..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 22/01/2008 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता माझी नाही. कोणाची आहे ते ही नाही माहिति. मला आवडली म्हणून इथे देत आहे. अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर-भरती पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी प्रकाशाचा गर्भ जलवंती-पोटी अखंड नूतन मला ही धरित्री आनंदयात्री मी आनंदयात्री मेघांच्या उत्सवीं जाहलों उन्मन दवांत तीर्थांचे घेतलें दर्शन दूर क्षितिजाची निळी भुलावण पाशांविण मला ठेवी खिळवून अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री आनंदयात्री मी आनंदयात्री हलके कढून कंटक पायींचे स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे हासत दु:खाचा केला मी स्वीकार वर्षिलें चादंणें पिऊन अंधार प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं आनंदयात्री मी आनंदयात्री

"मैफिल"

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी सोमवार, 21/01/2008 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
हे तिचेच काव्य सारे ही तीचीच कविता मांडतो मैफिलीत आठवणींच्या मीच वक्ता मीच श्रोता होते माझेच स्वप्न खोटे कुणाचा राग कशास धरावा गाळुनी असहाय आसवे चार मैफिलीचा बेरंग कशास करावा येणार नाही ती हे ज्ञात असुनी वाट तिची पाहण्यास्तव जगतो रात्री चिंब भिजलेल्या पापण्या जगासमोर दिवसा कोरड्याच ठेवतो ओंजळीत साठऊनी थेंब थेंब तिला तिच्याच आठवणीत चिंब भिजतो अर्घ्य देऊनी प्रत्येक श्वासाचे मैफिल आयुष्याची रंगवतो

गद्य्-काव्य

लेखक वेडा यांनी रविवार, 20/01/2008 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
अंत आणि आठवणी ह्यांत जास्त चांगले कोण ? काल रात्री मी अन "ती"याच गोष्टीवर बोलत होतो आता विचारु नका "ती" कोण म्हणुन तुम्ही सगळे तिला "ती" म्हणुनच ओळखता आणि तिच्यामध्येच स्वतःचे प्रतिबिंब पहाता पण माझी "ती" आगळी आहे .. तुम्हा सगळ्यांच्या तिच्यापेक्षा वेगळी आहे असे प्रत्येकालाच वाटत असते म्हणा..

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

लेखक पुष्कर यांनी शनिवार, 19/01/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात.
Taxonomy upgrade extras

प्रेम

लेखक raje1981 यांनी शनिवार, 19/01/2008 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
असंही प्रेम असतं!! अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.... गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल! कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल? आजार? खून? का...