दूर क्षितीजावर सूर्य ढगात लपला
केशराची रांगोळी नभी फ़ेकून चालला
उंच उडते पाखरू पाही रंगांची लीला
सय ये पिल्लाची प्राण पंखात आला
आकाशी केशर मंद किरमिजी झाले
उडणारे पाखरु पंख मारून थकले
दाटला अंधार दोन ठिपक्यांचे डोळे
पाही मनात पिल्लू दूर घरी थांबले
घरट्यात भुकेले मूक घाबरून
शुष्क चोंच आं वासून वासून
मी आणिला न दाणा शोधून
पिल्लू बघे बाहेर आससून
चित्र मनोहारी ह्या क्षीतिजी राही
दाद जग देई पाखरू त्राही त्राही
बेरंगी रंगातून कसे भूक साही
दूर क्षीतिजी पिलू वाट पाही
भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग
निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद
नको ते क्षीतिज नको ते मंदरंग
भुकी जीवाला एक घासही उदंड
आई वडिल, भाऊ-बहिण
यांशिवाय एक नातं असतं मित्रत्वाचं
जीवाभावाच्या मैत्रीचं.
झाडाला स्थिरावण्यासाठी
गरज असते मुळांची
समाजात जगण्यासाठी
गरज असते खर्या मित्राची.
मुळाच्या आधारावरच वृक्ष विस्तारतो
विश्वासाच्या आधारावरच मैत्री विस्तारते.
असंच नातं प्रत्येकानं जपावं
मायभूमीचं नवं रूप साकारावं.
विश्वासाचं ते नातं
गळ्यातलं ताईत बनतं
मात्र केवळ विश्वासघातामुळे
फाशीचा ते दोर बनतं.
आता
मागच्या जुलै महिन्यात इयत्ता सहावीच्या माझ्या भाचीला भेटायला गेलो होतो. तेव्हा त्या भेटीदरम्यात तिने एक छोटीशी मुक्त छंदातली कविता माझ्यासाठी लिहून दिली. ती अशी...
सर सर सर वारा सुटला
काळ्या ढगांना घेऊन आला||
रिमझिम रिमझिम पाऊस आला
इंद्रधनुष्य खुलवू लागला ||
वीज कडाडली कड कड कड
थेंबे बरसली टप टप टप||
झाडे वेली फुलपाखरे
आनंदली पशु पाखरे ||
धरतीचा हा सुगंध आला
आसमंती दरवळू लागला ||
धरती माता आनंदली
खुदू खुदू हसू लागली ||
--कु. प्राजक्ता वांजरखेडकर, अंबाजोगाई, इयत्ता ६वी
कवितेची पार्श्वभूमी:
काल संध्याकाळी प्राजुशी फोनवर बोलताना तिने सहज एक ओळ सांगितली. ती ओळ अशी --
हृदयात सागराच्या फेसाळती लाटा
प्राजु म्हणाली, "बघ, तुला ह्या ओळींवर पुढे काही करता येतं का? गझल, कविता काहीही !"
नंतर रात्रीपर्यंत हा विषय डोक्यातून निघून गेला होता. असं म्हणतात आपण रात्री झोपतो तेव्हा आपलं सुप्त मन जागंच असतं. पहाटे तीन-साडेतीनला झोप चाळवली गेली तेव्हा दुसरी ओळ सुचली. अर्धवट झोप, अर्धवट जाग अशा अवस्थेत कधीतरी डोक्यात बहुतेक कवितेचा आकृतिबंध आला.
अजब यांना 'जायचे आहे कुठे?' हा पडलेला प्रश्न बघून, आम्हाला बहुतेक रोज रात्री पडणारा प्रश्न डोळ्यांसमोर न येता तरच नवल!
काल रात्री प्रश्न पडला, खायचे आहे कुठे?
चापली अंडा-करी, 'संदेश'* तो आहे कुठे?...
ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती
ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?...
सॅलडे तर येत होती, जात होती नेहमी
मी म्हणालो, पण मला लाडू बघू आहे कुठे?...
दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी?
कोण तो?
काय सान्गु तुम्हाला, मराठीचा बाज
विदर्भाच्या राणीला, कोल्हापुरी साज,
मराठ्वाड्याला ते, कोकणचे पाणी,
देउन उरला आहे, हा महाराष्ट् आज !
मराठीची लव्हाळी, रोजच नव्हाळी,
जशी देते कळी, गन्ध मन्द !
मराठी तर आहे, आताशी तारुण्यात,
जसे गीत गात, रती यौवनाचे !
माझ्या मराठी मायेचा, वाण आहे जोरकस,
इतर आहेती निकस, हिच्यापुढे !
माझ्या मराठी मायेची, लागली दिगन्ताला आस,
त्यानेही मग कास, हिची धरली !
शब्द ते हो आले, भाषेत या माझ्या,
अर्थ देउन सारस्वता, धन्य केले !
कैवल्य ही आहे, माझ्या या भाषेत
ज्ञानियाच्या वेषात, अवतरले !
नामयाच्या भिन्ती, लावल्या नाथानी,
कळ्स तुकयाने, उभविला !
हा भक्
खेळ नेहमीचाच.. एक ओळ मला सुचली ती अशी -
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
.....
पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं.
हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत.
अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी!
बघुयात कुणाचे कसे कसे डोके चालते ते ;)
मुमुक्षु