Skip to main content

कविता

आकाश उजळले होते,,,

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 08/03/2012 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आपल्या गुर्जींनी म्हणजेच अतृप्त आत्म्यांनी एका प्रतिसादात त्यांना सुरेश भटांच्या 'एल्गार'ची आठवण आली म्हणून सांगितले आणि आमच्याही मनात त्यासरशी त्यांची आठवण ताजी झाली. s.y ला असताना सुरेश भटांच्या गजला आमच्या अभ्यासक्रमात होत्या. खरं तर त्या वेळीच आमची आणि सुरेशभटांच्या गझलांची खरी ओळख झाली म्हणायची. त्यांच्या प्रत्येक गझलेमध्ये जणू एकप्रकारचा जादूच होता. आजही ती गझल वाचताना किंवा ऐकताना त्यातील श्ब्द न् शब्द मनाच्या खोल गाभार्‍यात कुठेतरी चर्रर्र करुन जातो. त्यातीलच गुगलमध्ये सापडलेली ही एक गझल=>
काव्यरस

मन-झोपाळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 07/03/2012 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
ओघळ पिकल्या पानांचे; सुकले देठ जरी अंकूर अजूनहि ओले; खोडात चिमुकले; गाभारी वारा,.. झाडून नेतसे हिरमुसलेले; गत वय माघारी झुळुकेत चिन्मयी कल्प उमलवे; नवजीवन दरबारी अंकीत कळ्या विलसती कोवळ्या वर्मावर अवतारी गंधाने भारी नवपर्णांकित शुभ्र परांची वारी किलबिल अवघी चौफेर; पिले पक्षिणी परतली माहेरी किमया ही ऋतु-तारुण्यबहर-रत प्रणयआभेची सारी यातना वेदना गळलेल्या; नत पायतळाशी; गोळा पाहून रम्य मय वसंत-शोभा; तृप्त ऋणांकित डोळा मजला ही भेटे अशी मनोरम रत्नजडित मधुशाळा अवकाशाचा अन झुले अंबरी मदनमस्त मन-झोपाळा ................................अज्ञात
काव्यरस

पालखी

लेखक चैतन्य दीक्षित यांनी मंगळवार, 06/03/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
पालखी काळाची थांबली एकदा, बदलण्या खांदा भोईयांचा | त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती, पेटवून ज्योती, अंतरात | पालखी काळाची गेली निघोनिया, ज्योत ठेवोनिया तेवतीच | आता वाट आहे पहायाची फक्त, 'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी | -चैतन्य

अंबरात फिरुनिया उगवतो....

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 04/03/2012 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
अंबरात फिरुनिया उगवतो, हासरा राजस तारा परिमळता देहातून गंधित, मोगरमोहर सारा................. || धृ || बालपणीचा काळ हरवला, गाव कुसाला सांगा हिरवाईचा ऋतू परतता, फुलल्या रेशीम बागा पूर्व दिशेला, भिजवुनि आल्या, कोवळ्या पाऊसधारा ......... || १ || स्वप्नांच्या गावात बोलले, बोल मनीचे कोणी निळ्या बोलक्या..
काव्यरस

संवाद करते मी विश्वेश्वराशी ..!

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 03/03/2012 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या प्रतिभेची लखलखती आभा . मान्यय माझी .. सांजावाती प्रभा :) तुमच्या यशाचा हा दुमदुमता डंका उध्वस्त राहु द्या माझी ही लंका :( सोन्याने सजावा हा तुमचा महाल सोडा हो चिंता, मी नाही बेहाल :cool: उजळावे दिव्यांनी तुमचे शिवार नकोय ते मला, चांदणे उधार :tired: तुमच्या दयेचा ना करते स्विकार उसन्या प्रतिमांचा त्रिवार धिक्कार , , सृजनआंगण फुलेल जेव्हां क्षितिजाला देईन धडका मी तेव्हां आकाशगंगेची फिरविन भिंगरी भिरकावून देईन गोवर्धन गिरी कशास करता हो तुलना कुणाशी संवाद करते मी विश्वेश्वराशी ..! :innocent: - संध्या

रस्ता

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 02/03/2012 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता उरल्या सुरल्या..

रस्ता

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 02/03/2012 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता उरल्या सुरल्या..

देखणी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 01/03/2012 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
नवी पालवी अन नवे अंतराणे जुन्या ओळखीचे नवे तेच गाणे उराशी किती भोवले पाहुणे हे गळाले आता जीर्ण शीण दीनवाणे पुन्हा पाखरे आळवीती तराणे जरेल्या तरूंचे उभरले कणे साद घाली कुणी देइ आमंत्रणे बघ उषा न्हाइली सज्जली अंगणे मनाची कुपी उलगडी आवरणे गुंफलेल्या स्वरांशी करी भाषणे देखणी सुप्तशी उंबराची फुले अमृताच्या सरी द्वैत पारायणे .......................अज्ञात
काव्यरस

एक कविता

लेखक राजो यांनी बुधवार, 29/02/2012 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती.

राजकारणी अन आपण.......... बरोबर ना ??

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 28/02/2012 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचाराचे रोज नवे प्रकरण ....देशद्रोह्यांचे लांगुलचालन | जातीच राजकारण करण ....झोळी स्वताची भरण | देशाचे लचके तोडण ....चालू आहे ताठ मानेन | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | जवान उपाशी-कसाब तुपाशी ....खेळीतात सैनिकांच्या जीवाशी | नक्षलवाद्याना धरलय हाताशी ....वैर याचं भारतामातेशी | घुसलेत अनेक बांगलादेशी....कारवाई न करण्याच ठरवलय मनाशी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | स्त्री असुरक्षित....बालके कुपोषित | गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत | शेतकऱ्यांना कापत.....स्वारी चालली देश लुटत | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | महिन्यातून एकदा तिहाराची वा
काव्यरस