Skip to main content

कविता

तेव्हा येईल अर्थ खरा जगण्याला

लेखक गोंधळी यांनी शुक्रवार, 16/03/2012 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
कधी करावे भांडण अंधाय्रा दु:खाशी कधी करावे स्वागत आनंदरुपी उजेडाचे कधी भरकटावे बिन्धास विचारांच्या जंगलात कधी उडावे उंच मनाच्या आभाळात कधी सुटावे सुसाट वाय्राच्या जगात कधी यावे पोहुन भावनांच्या समुद्रात कधी बघावे बसुन अनुभवाच्या शाळेत कधी दरवळावे होउन प्रेमाचा सुगंध मग बनावे प्रकाश दिवा होउन शेवटी व्हावे लुप्त मेणासारखे जळुन तेव्हा येईल अर्थ खरा जगण्याला जाताना ही मग खेद नसेही कुठला.

एक हिंस्र कविता (?)... (१८+ only)

लेखक अस्वस्थामा यांनी शुक्रवार, 16/03/2012 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
हाणा रे हाणा , या विडंबकांना.. हे चावताती, हळव्या कवींना.. टांगून उलटे, माळावरी अन.. नवकवितांची धुरी द्या हो त्यांना.. जशी कोवळ्या कवितांची, पिसे हे उपटती.. यांच्या बोडक्याचे, केस केस उपटा.. तरीही जर उरले, अतृप्त अस्वस्थ आत्मे, हृद्य गद्य ललितात यांना बुडवून टाका.. (अपूर्ण आणि विस्तारासाठी सर्वाना खुले आवाहन... आणि ह. घ्या. हे सांगणे न लगे.. )

खेळ नियतींचा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/03/2012 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
उडाली पाखरे परदेशी ,मोकळा चौसोपी वाडा. पोपडे पडे ओसरीस ,नाही अंगणी शेणसडा.. परसदारी तो औदुंबर, असे शांतपणे उभा. ना त्यास प्रदक्षिणा, ना कुणी राखे निगा. कोनाड्यातील आरसा ,उडाला त्याचा हि पारा भीतीवरील कुंकु खुणा, मिरवी सौभाग्याचा तोरा अडगळीतली रेशमी वसने, सांगे शृंगाराच्या कथा कोप~यातली उभी काठी, रडे वार्धक्याच्या व्यथा. कोप~यातल्या खाटेवर, श्वास मंदसा घुमे कुणाचा? ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ नियतींचा

ती वेळ निराळी होती . . . ..

लेखक अरूण म्हात्रे यांनी गुरुवार, 15/03/2012 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
छातीत फुले फुलण्याची वार्‍यावर मन झुलण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. डोळ्यात ऋतुंचे पाणी मौनात मिसळले कोणी वाळूत स्तब्ध राहताना लाटेने गहिवरण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. तू वळून हसलीस जेव्हा नक्षत्र निथळले तेव्हा मन शहारून मिटण्याची डोळ्यात चंद्र टिपण्याची . . . ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. ज्या चंद्र कवडशा खाली कुणी साद घातली ओली मग चंद्र वळून जाताना किरणात जळून जाण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. पाऊस परतला जेव्हा नभ नदीत हसले तेव्हा कोरड्या मनाने कोणी गावात परत येण्याची ती वेळ निराळी होती....

नभांगण...!!

लेखक वेणू यांनी गुरुवार, 15/03/2012 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुरावटींनी सजलेल्या, तर कधी उधळल्या गेलेल्या मैफिली.... घमघमलेली सांजरात अन् अर्धोन्मिलीत मोगरा.... 'आठवतंय का ते?'- सालांनंतरच्या भेटीतला, तुझा निरागस प्रश्न तेच, विस्मयी डोळे न् दुमडलेले ओठ! तुला विचारायचेच राहून गेले कधी वाकून पाहिलंस मनात माझ्या...? तू नेहमीच काठाशी वावरणारी..... 'अपनी धुन में मस्त' असं अधोरेखित जगणारी... जितकं तुला ओढू पाहिलं, अडकवु पाहिलं, तितकी निसटत गेलेली... 'बांधील प्रेमाचा व्यापार का?' ह्याच भोवती धुमसणारी समजलो नव्हतो, बंधनात अडकणारी तू नाहीस, जितकं स्वातंत्र्य नात्यात, तितकी माझी होशील ते! उमजताच, आलो हाक मारायला तोवर मनाचं नभांगण रिकामं करून गेलीस.... हाक

जगणे असेच का असते?

लेखक निश यांनी गुरुवार, 15/03/2012 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे असेच का असते? जगता जगता मरायचे असते. जगण्याकरिता लढणे असेच का असते? लढता लढता हरायचे असते. जगण्यातले सुख असेच का असते? सुखाचि वाट बघता बघता दु:ख भोगायचे असते. जगण्यातली आशा अशीच का असते? आशेवर जगताना निराश व्हायचे असते. जगणे हे स्वप्नासारखे का असते ? सत्यात येता येता मोडुन ते पडते. खरच जगण हे एक कोड असते. ऊत्तर सापडल अस वाटत असताना नव कोड देउन ते शोधण्यात संपायचे असते.

जोवरी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 15/03/2012 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
सागराच्या तळाशी किती रत्नराशी जगाच्या नकाशाशी झुंझतो शशी मानवाची स्थिती वादळे संगती मरणबाजार अवघा लढे पावसाशी जात जातीत भेदे कुणी क्षूद्र वंशी कळे ना कसे तो तयाचाच अंशी बिचारे विचारांचे क्षेत्र कोरडे स्नेह जाळून आळवे ती प्रार्थना कशी यातना ही खरी अंत तो तूच आहे पसारा दिगंत खंत पामरास दाहे जगावे उरावे जिणे तोषवावे जपावे झरे जोवरी श्वास वाहे ............................अज्ञात

अजि ये प्रोभाते - आज पहाटे रविकर आला

लेखक यकु यांनी गुरुवार, 15/03/2012 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
कवी मग तो कुठलाही असो, त्याच्यात ऋषि बनण्याची संभाव्यता असते. कारण मनाच्या एका विशिष्‍ट अवस्‍थेत त्याला जे झप्पकन दिसून जातं ते तेवढ्याच झगझगीतपणे व्यक्त होणार्‍या शब्दांत बांधण्याचे कसब कवीकडे असते. ऋषिलाही ते दिसत असते; पण त्याला कविता करण्‍याची गरज पडत नाही कारण ऋषिने पाहिलेले आणि समोर मांडलेले 'सत्य' असते. म्हणून ऋषिच्या वाणीला धर्मग्रंथांत स्‍थान मिळते. कवीची अवस्था मात्र जाणीवेच्या दृष्‍टीने काहीशी खालची मानली जाते कारण कवी सत्य आणि सामान्यत: जग जसे असते त्यातील सीमारेषेचे सतत अतिक्रमण करीत असतो.

आज कुणी का राम व्हावे

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 14/03/2012 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
कलियुगाचे वायदे नि, कायदे ही फोल सारे गीता वचने खरी इथे ना, शपथांना दे, मोल ना रे ........||धृ|| मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|१| शापित जरी त्या आणाभाका, जपले बंधही सरणाने करार नामे अती जाहले, पाळले ना मरणाने शिळा बनावे, कसे कुणी ..ना, राम स्पर्शितो चरणाने आज कुणी का राम व्हावे, भरत इथे निर्मळ ना रे......... |२| - संध्या
काव्यरस

प्रेमात ''हे'' -असच असतं ;-)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 14/03/2012 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/21009# मी आणी ती पोहोत होतो ती आणी मी पोहोत होतो पोहता पोहता येकदम डुबुक :-p होइल असं वाटलच नव्हत खरच पोहोताना हे असच होतं ;-) मी आणी ती लोळत होतो ती आणी मी लोळत होतो लोळता लोळता येकदम बुदुक :-p होइल असं वाटलच नव्हत खर्रच लोळताना---हे--असच होतं ;-) मी तीच्या घरी जायचो ती माझ्या घरी यायची येता जाता एक दिवस तिचा बाप (मला) धरेल असं वाटलंच नव्हतं खरच(?) प्रेमात हे-असच असतं...?
काव्यरस