Skip to main content

कविता

दिवसेंदिवस

लेखक शरद यांनी शनिवार, 31/03/2012 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसेंदिवस अनुराधा पाटील यांचा पहिला कवितासंग्रह "दिगन्त" १९८१ ला प्रसिद्ध झाला. दुसरा "तरीही" ८५ ला व तिसरा "दिवसेंदिवस" ९१ ला. आजच्या तरुण वाचकांना हे नाव कदाचित माहीतही नसेल पण २५-३० वर्षांपूर्वी समीक्षकांनी, लेखकांनी व कवींनी, हो, कवींनीही, त्यांच्या कवितेचे पोट भरभरून कौतुक केले होते. आज माझ्यासमोर आहे "दिवसेंदिवस". कविता वाचतांना आठवण येते पावसाळ्यात ढग दाटून आलेल्या संध्याकाळातील विषण्णतेची. अशा वेळी तुम्ही एकटे असतांना आठवणी जागृत होतात त्या बहुदा आल्हादकारक नसतातच. आणि त्यात तुमचा स्वभाव अंतर्मुख असेल तर जखमा भळाभळा वाहू लागतात.

ए माझे संजीवनी

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 30/03/2012 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
ए माझे संजीवनी, तुला माहीत नाही अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा ते कटाक्ष, ती चपळाई अन् जी तुझ्यात असे, नसे कुठे ती कला मनास मोहवी जी तुझ्यात असे, नसे कुठे मी तुझ्या, मी तुझ्या, डोळ्यात पावलो सर्व जगा तू मधुर जे बोल बोलशी हसून जराही सुंदरी तर अजूनही स्पंदने नशेत धुंद रंगती ए परी, ए परी, मी तुझा कायमच ग खुळा वक्त चित्रपटात बलराज सहानी असा दावा करतात की वय झाले तर काय झाले, अजूनही सारे कसे शाबूत आहे. तसेच. पूर्वीसारखे. शब्द पुरवले आहेत साहिर लुधियानवी ह्यांनी. अर्थातच हे गीत माझे नाही. हा आविष्कार मात्र माझाच आहे.
काव्यरस

म्हणून ......!!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 30/03/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणून ............ सावरायचे होते आता सगळ्यांनाच एकमेकांबरोबर स्वतालाच ............. कुठेतरी बिनसले कि सगळे संपले असे नाही ........ नाती अशी सहजासहजी तुटत नाहीत ..म्हणून.............. झाल्या असतील खुळ्या काही चुका सुधारून पाहू ना एकदा.......... नाही जगता येत 'तुझ्याशिवाय' सांगून पाहू एकमेकांना एकदा......... ...म्हणून ................. पाण्यात मिसळलेला रंग जसा वेगळा करता येणार नाही तसाच तुझ्या आठवणीचा पसारा आवरता येणार नाही दोन श्वासातले अंतरही मोजता येणार नाही ..म्हणून........... म्हणून.....

अल्लखकरण

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 30/03/2012 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
अल्लखकरण मी तुला पाहताच मनोमन बद्धरुपांतरण| रोजच ते अनुभववावे तव धन्यमरण|| ती आज आली घेऊन गुलमोहतरण| मला देतेसे चषक तेच अल्लखकरण|| अजूनी ते येतातच पाहताच झल्लकसरण| तसे पाहता नजरेचे हे विक्षेपसंक्रमण|| शब्दांचे असे कसे सदैव कर्षित्रचर्वण| एकटाभयाण विचार ते बिंबाणुश्रवण||

वळण

लेखक नपा यांनी गुरुवार, 29/03/2012 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वळणवर, वळताना नजर गेली इथवरच्या मार्गावरती दिसले माझेच पदचिन्हे स्पष्टपणे कधी योग्य, कधी अयोग्य कधी सन्तुलित तर कधी अनिर्बन्ध भयभीत वा निर्भिड थबकलो क्षणभर, स्वत:बद्दलचे समज गैरसमज धुसर झाले हे तर माझेच प्रतिबिंब.. आज़वरचे ..पण अगदि सत्य शहारलो, किती अनभिज्ञ होतो मी स्वत:ला.. वाट माझी खुणवत होती मन मात्र सुन्न होत् सावरलो, अन् पुन्हा लागलो अव्याहत प्रवासाला पूढच्या वळणावर थबकण्या करता..
काव्यरस

असे शब्द होते.. तसे शब्द होते..!

लेखक रसप यांनी गुरुवार, 29/03/2012 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
असे शब्द होते तसे शब्द होते जसा अर्थ घ्यावा तसे शब्द होते कुणा ना कळावे खरे काय होते असे मुक्त वेडे तुझे शब्द होते श्रवून जाहले ते लिहून घेतले ते जपून ठेवले ते खुळे शब्द होते जगी जाणकार कुणी ही असू दे कविता म्हणाया खुजे शब्द होते प्रतिभेस माझे साष्टांग नमन समजलेच नाही कसे शब्द होते अनुवाद व्हावा जरा इंग्रजीत मराठीत बहुदा न हे शब्द होते ऐकता वाचता जाहलो "आडवा" तरीही उरावर उभे शब्द होते..!! (एक जुनीच कविता) ....रसप.... ०३ जानेवारी २००९ http://www.ranjeetparadkar.com/2009/01/blog-post_03.html
काव्यरस

इडंबन की जय हो...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 29/03/2012 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंप्रेरणा :- ज्या http://www.misalpav.com/node/21154 या धाग्या वरुन हे गीत स्फुरले, त्या धाग्याचे हे गीत म्हणजे स्वयं-उपशमनच आहे ;-) भगवंता रे भगवंता,खरच सांग.....हे काय झाले? टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?

तो

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 29/03/2012 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
तो पोखरतोय आतून............. उत्खननातून; एकेक कविता बाहेर काढतोय.............. कींमती जगणं आणि जगण्याची किंमत ह्यांची तौलनिक मिमांसा करतोय............... खर्‍या खोट्याची आपल्या परक्याची रुजवात घालून देण्यासाठी आलाय तो.................... आयुष्यभराच्या ओळखीचे; परिचय झालेत त्या निमित्ताने................. मुखवट्यापलिकडचे चेहरे दृष्टीपथात आलेत........... झटताहेत सर्वच कर्तव्यापोटी आपापली कामे सांभाळून.................... कुणी; जणीव करून देताहेत आल्याची; एक उपचार म्हणून................ खरं तर आता कार्य थांबलंय................ उपयुक्तताही संपलीय................. अस्तित्व आहे ते केवळ; कुणाच्यात
काव्यरस

माझी अधुरी कविता

लेखक रसप यांनी बुधवार, 28/03/2012 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी जपली जीवनभर जी वसने सारी ती विरली ओसाड शून्य नजरेच्या स्वप्नांची चौकट झिजली भुरभुर कापूस धुक्याचा चौफेर पसरला आता रस्ताही संपुन गेला ह्या वळणावरती येता काजळल्या क्षितिजापाशी नि:शब्द गुंतली किरणे श्वासांना अवजड झाले श्वासांचे ओझे बनणे माझ्यामागे शब्दांचे उद्विग्न उसासे काही त्या शेवटच्या पानावर गवसेल सांडली शाई तू नकोस माझ्यासाठी थेंबातुन वाहुन जाऊ माझ्या अधुऱ्या कवितेने तू नकोस भारुन जाऊ ....रसप.... http://www.ranjeetparadkar.com/2012/01/blog-post_30.html
काव्यरस

बीज अंकुरे अंकुरे.... (अष्टाक्षरी)

लेखक वेणू यांनी बुधवार, 28/03/2012 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
बीज अंकुरे अंकुरे रुपं नव्हाळ मातीला, गर्भारता देह तिचा रंग केतकी कांतीला! बीज अंकुरे अंकुरे माझे स्वप्न तुझ्या डोळा, सूर ल्याले रे तुझे मी शब्द शब्द झाला खुळा... बीज अंकुरे अंकुरे जमिनीला लागे ध्यास, वाढ वाढावे गं रोप नको आभास आभास... बीज अंकुरे अंकुरे आता स्वप्नांना आकार, उद्या उमलेल पातं घरी बहार बहार.. बीज अंकुरे अंकुरे म्हणे करा तपासणी, जर देशी वंशा दिवा आकाशास गवसणी! बीज अंकुरे अंकुरे, का हा वणवा पेटला? नवा जन्म रुजताना कुणी गळा गं घोटिला? -बागेश्री ब्लॉगवर पूर्वप्रकाशित : http://venusahitya.blogspot.com/