Skip to main content

कविता

हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले कि..

लेखक निशांत_खाडे यांनी बुधवार, 24/02/2016 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले की स्मृतीतला गाव दिसू लागतो त्या गाव वेशी उभा मीच मजला पाहून अनोळखी हसू लागतो दशकान्तुनी उभ्या तिथल्या विक्राळ वटाच्या सावलीत जरासा बसू पाहतो स्मरणे ती जुनी अन बदलांच्या खुणा उद्विग्न नास्तिकासम तपासू पाहतो. पोपटी तृणांचा जुन्हा तो जिव्हाळा बदलाच्या भ्रांती फसू लागतो लोभस ते जग कधीचे संपले खरा भावनांचा उन्हाळा पुन्हा दिसू लागतो.. (कविता अपूर्णच आहे. अकरावीत असताना केव्हातरी लिहिली होती. बऱ्याच वेळा पूर्ण करण्याच्या प्रयत्न केला पण हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यात तो इतका भव्य वाटणारा पण आशयाने जवळपास शुन्य होता कि ते कधीच जमले नाही.
काव्यरस

आम्हाला इंग्लिश येतंय

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 23/02/2016 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा मराठी, इंग्रजी, भाषेबद्दलचं प्रेम, इंग्रजीत वाटणारा उच्चभ्रूपणा, मराठी बोलण्यातला न्यूनगंड, हे आणि संबंधित सगळे विषय काही नवीन नव्हेत. पण कधी जुने होणारेही नव्हेत. मराठी भाषा सप्ताह सुरू आहे.

श्रावणसर

लेखक रातराणी यांनी सोमवार, 22/02/2016 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिटल्या डोळ्यांत माझ्या स्वप्न तुझे जागते घे मिठीत गुंफुन सख्या ही रात्र आहे सरते कसा संपेल अबोला मी शब्द जोगवा मागते तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते हुरहूर ही असे मनी तरी का शांत शांत वाटते तप्त धरेवर जशी अचानक श्रावणसर कोसळते उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते
काव्यरस

कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते ..

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 21/02/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवस पुरणारे अत्तर असते प्रेम तसे मग बाकी खडतर असते सुटकेचा आयास निरर्थक असतो कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते आपण अपुली सांभाळावी दुनिया सूख जरासे दु:ख निरंतर असते आकाशाला हातच पोचत नाही नी स्वप्नांचे व्यस्त गुणोत्तर असते प्रश्न तुला मी तोच कितीदा केला तुझे आपले एकच उत्तर असते कुठून कोठेतरी जायचे नुसते.. प्रेम शेवटी एक अधांतर असते डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

शहरातुन गावाकडे...........!

लेखक एकप्रवासी यांनी शनिवार, 20/02/2016 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
शहरातुन गावाकडे होणारा प्रवास थेट भूतकाळात घेऊन जातो आधूनिक वादळात हरवलेल्या मनाला गावची जुनी ओळख करून देतो खिडकीतून दिसणारी पळणारी झाडे कुठे नदीचे किनारे नारळ पोफळीच्या बागांत स्वैर घोंगावणारे वारे नटलेल्या हिरव्यागार शेतामध्ये पिवळ्या फुलांची बहार उंच उंच कड्याकपारीतून कोसळते शुभ्र पाण्याची धार दूर डोकावणारी कौलारू घर त्यातून उठणारा स्वैपाकाच धूर आजीच्या हातच्या जेवणाची आठवण करून देते पुरेपूर सौंदर्य निसर्गाचं न्याहाळताना गाडी कधीच वेशीवर येउन थांबलेली तरळून गेलं डोळ्यासमोरून जुनं गाव
काव्यरस

योद्धा

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 20/02/2016 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
एक योद्धा होता तो शून्यातून सगळं विश्व निर्माण करणारा योद्धा जो हात तो धरायचा त्या मनगटांमधे जोर यायचा जो माणूस तो जोडायचा तो पोलादी होऊन जायचा हजार हत्तींचं बळ दिलं होतं त्याने एका मरगळलेल्या पिढीला ईतकं की पुढे दोनेक पिढ्या पेटत राहिले होते ते निखारे त्याच्या स्वतःच्या आतलं वादळ त्याने भिनवून टाकलं होतं हजारो-लाखो नसांमधे त्याने कधी कुणापुढे हात नाही पसरले उलट जे हात पसरत होते त्यांच्या धमन्यांमधे असं काही रक्त खेळवलं की न भूतो असा पराक्रम घडवला त्या हातांनीही त्याने दाखवून दिलं जगाला.....कसं 'लढायचं' असतं त्याने दाखवून दिलं जगाला.....राष्ट्रनिर्माण म्हणजे काय असतं आणि त्याची माणसं ?
काव्यरस

संध्याछाया..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/02/2016 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/t31.0-8/fr/cp0/e15/q65/11700956_972982042788082_3452425137241717189_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9 संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते.. एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते. माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!? दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी? हिशोब मी हि कशास बांधू?

मेहबूब मेरे...

लेखक विनायक पन्त यांनी मंगळवार, 16/02/2016 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
ईद के दिन कही घर से बाहर ना निकलना, लोग चान्द समझके कही रोजा ना तोड दे, खफा हो कर खुदा कही... चान्द जैसे मुखडे बनाना ना छोड दे...
काव्यरस

आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते..

लेखक पिके से पिके तक.. यांनी रविवार, 14/02/2016 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते, स्वतावरच विश्वास ठेवून बेण स्वताच फसते... आपल्या "माँ" ची सेवा सोडून याले "राधे माँ" लागते, फक्त "माँ" च काहून तर मग सोबत "बापू" पण लागते, याचा डोक्यातले दही डोक्यातच कसे नासते, स्वतावरच विश्वास ठेवून बेण स्वताच फसते आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते.... प्रेमिकेला प्रियकरापेक्षा आजकाल कांदा जास्त रडवते, नाते संबंध आजकाल फक्त "Whats App" घडवते, नोटांचा काल खंड गेला, आता खरेदी "card" वरच असते, स्वतावरच विश्वास ठेवून बेण स्वताच फसते आपल्याकडे बुवा असलेच काही तरी असते.... नुसती माणसेच नाय तर Technology पण smart झाली, "मन कि बात" करायला redio ची गरज आज आली,
काव्यरस