आता मला वाटते भिती

आता मला वाटते भिती कोठे गुंड त्रास देती कोठे पोलीस मार खाती अशा या समाजाची आता मला वाटते भिती कधी तरुणाईचे भांडण तर कधी रस्त्यावरचे भांडण सुशिक्षित समाजातले असंस्कृत जन अशा या जनाची आता मला वाटते भिती रामराज्याची अपेक्षा पण वागण्याची रावणनिती या समाजाला आता नाही कोणाची भीती अशा या समाजाची आता मला वाटते भिती या समाजाच मी एक भाग मला माझ्या सावलीची आता मला वाटते भिती राजेंद्र देवी

एकेकाचे जगणे

लेखनविषय:
कुणाला कशाची पडलेली असते अन कुणाला कशाची कुणाला काय भावतं अन कुणाला काय कुणाला काय सलतं अन कुणाला काय अन ज्याला जे भावतं, जे सलतं त्याला तेच महत्वाचं वाटतं …. कुठे 'गोली मार भेजे में' कुठे 'जिस्म' कुठे 'जय जय राम कृष्ण हरी' कुठे 'जय हिंद' कुठे 'गांधीगिरी' कुठे 'नथ्थुराम' कुठे काय नि कुठे काय या ना त्या प्रकारे घेतो प्रत्येकजण जगणे मोल कुठे सोनेरी कुठे बिलोरी कुठे बेगडी …. पण प्रत्येकाने मोजलेली किंमत मात्र असते अस्सल - रक्ताची अश्रूंची हृदयाची आत्म्याची

रात्रीस खेळ चाले....

लेखनविषय:
रात्रीस खेळ चाले.... गूढं त्या महाली केस सोडून ती बसलेली काळा मिट्ट अंधार अन काजव्याने पण मान टाकलेली अचानक एक टिटवी ओरडली आढ्याशी भुते खदखदली वारा नव्हता तरी अचानक तावदानाची दारे खडखडली रात्र खूपं वाढलेली कोल्हे कुत्री केकाटली झरोक्यातून सावली उतरली मांजराने बाहुली पळवली.... राजेंद्र देवी

जाणिवांच्या जखमा

काव्यरस
हे असे दिवसा उजेडी आभाळ आंधारू नये करावे उपकार कुणी केस मोकळे सोडू नये. हसतोच आहे हाय मी मंदिरात अन् मसणातही काय याला दुःख कसले?असे कुणा वाटू नये. काल शिकलो मी धडा प्राक्तनाच्या बेदिलीचा क्षणासाठी तोडले मोगऱ्याला , मग वाटले तोडू नये का अशा जाणिवानां होतात जखमा सारख्या? काळीज चिरणार्या अशा आठवां कुणी काढू नये. ....म्हैश्या

गुडगांव

लेखनविषय:
आपणच खरवडून काढावे आपल्या अजस्र जखमेवरच्या अपक्व खपल्यांचे तुकडे.... तसं हे शहर भयाण स्वप्नांच्या रात्रीनंतर दिवास्वप्नांच्या भीतीने टक्क जागे राहावे..... तसं हे शहर सागराचा थांग घेताना अथांग व्हावे नदीने अन् त्याचा माज करावा...... असं हे शहर उत्फुल्ल पाण्यात कळकट शेवाळी तवंग तरंगावा..... तेच हे नगर एका पराभवातून अलगद दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या विजयाचा आनंदोत्सव.... .....गुडगांव

गुडगांव

लेखनविषय:
आपणच खरवडून काढावे आपल्या अजस्र जखमेवरच्या अपक्व खपल्यांचे तुकडे.... तसं हे शहर भयाण स्वप्नांच्या रात्रीनंतर दिवास्वप्नांच्या भीतीने टक्क जागे राहावे..... तसं हे शहर सागराचा थांग घेताना अथांग व्हावे नदीने अन् त्याचा माज करावा...... असं हे शहर उत्फुल्ल पाण्यात कळकट शेवाळी तवंग तरंगावा..... तेच हे नगर एका पराभवातून अलगद दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या विजयाचा आनंदोत्सव.... .....गुडगांव

मी एकटी ....

मी एकटी .... एल तीरावर मी एकटी पैलतीर त्याला नाही समोर पसरला अथांग दर्या साजणाचा पत्ता नाही परतुनी आले सारे अजून तो आला नाही रात्रीचा चंद्र देतसे तो येईल याची ग्वाही रंग हळदीचा अन मेंदीचा अजून उतरला नाही स्वप्नांचे जहाज बुडाले साजणाचे तारू वाचले का नाही ? बघत बसते खुणा वाळूतल्या निरखीत असते लाटांनाही नकोत रत्ने मज सागरा का साजण माझा परत देत नाही ? राजेंद्र देवी

यार देवदार

लेखनविषय:
पहिल्यांदाच हिमालयात जाऊन आल्यावर लिहिलेल्या या ओळी.. मराठीत भाषांतर करण्याची गरज वाटत नाही. काय म्हणता ? यार देवदार मैंने सोचा न था की तुम चंद मुलाक़ातों में ही यूँ दिल में बस जाओगे अपनी महकती हुई ख़ामोशी मेरे ज़ेहन में यूँ रख जाओगे अपने गूंजते हुए सन्नाटों में यूँ बार बार बुलाओगे तुम्हें देखा तो तुम अजनबी से लगे थे तुम्हें छोड़ कर आया हूँ तो किसी अपने की तरह याद आते हो तुम, यार देवदार

पाऊस

लेखनविषय:
काल खूप दिवसांनी तुला पावसात चिंब भिजताना पाहिलं.. आणि छत्री मध्ये असूनसुद्धा माझा मन भलतंच शहारलं....... जोरदार वाऱ्याने त्यात अजून कहर करावा छत्रीचे तीन तेरा वाजवून त्याने आपला इरादा स्पष्ट करावा.... समोरचा अथांग सागर जणू पावसाने कुशीत घेतलेला आता नजरेसमोर फक्त तू... आणि नजरेत तुझ्या प्रेमाचा ओलावा... समोरून बेफाम लाटा.. वरून चिंब धारा.. पायाखाली गुदगुल्या करणारी वाळू अन सर्वांगला शहारणारा वारा... पूर्ण निसर्गचं आपल्या साथीला असतांना कॅमेरा क्लिक ची गरजच कशाला... निथळलेला तुझा तो चेहरा माझ्या नजरेत मी कधीच टिपलेला... पापण्यांवर जमलेले थेंब हळुवार गालावरून ओघळत होते.... उगाच केसांना दिले

मृगजळ दिसण्याआधी ....

लेखनविषय:
एक नव्हतो आपण कधीच , तरीही आजपर्यंत दोघंही एकचं .... ! तू तुझी कारणं शोधत राहिलीस , अन मी माझ्या पळवाटा .... ! पीळ नको देऊस विचारांना , नियतीच्या खेळातले आपण खेळणं ' ! 'रानटी' भविष्याच्या ' रानात ' , कल्पनेच्या स्वप्नांला , अस्तित्वाच 'मरणं ! ' 'घाण' तू ही नव्हती , मीं ही नाही ...... मी सूर्य बघत राहिलो , तू आकाशगंगा ! खरं ते खरंच असत , जस तू अन मी .... पळणाऱ्या वेळेत , आंनद घे ... पळण्याचा ! जसा मी होतो , मस्त होतो , तुही 'मस्तच' होती , मृगजळ दिसण्याआधी ! तक्रार नाही नियतीची , पळणाऱ्या वेळेत , आंनद घे ... पळण्याआधी !
Subscribe to कविता