मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कला

शिव: मूर्तीशास्त्र

प्रचेतस ·
लेखनप्रकार
भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात. लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे.

प्रात्यक्षिकः चित्रे माऊंट कशी करावीत

चित्रगुप्त ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कागदावर केलेले चित्र माऊंट कसे करावे, याचे प्रात्यक्षिक या लेखात बघा. साहित्यः कागदावरील चित्र, माऊंट बोर्ड, स्टीलची पट्टी, मोजण्याचा टेप वा स्केल, पेन्सिल, माऊंट कटर, जाडा पांढरा कागद, कटिंग मॅट (किंवा साधा पुठ्ठा), सेलोटेप वा अन्य चिकट टेप. . कृती: १. चित्र माऊट बोर्ड वर ठेऊन बघितले. बोर्ड एका बाजूने पांढरा, आणि दुसरी बाजू राखाडी असा आहे, यापैकी कोणताच रंग चित्राला उठाव देणारा वाटला नाही, त्यामुळे बोर्ड रंगवून घ्यायचे ठरवले.

चित्रकला

अनिल तापकीर ·
लेखनविषय:
लहानपणी चित्र काढायला खुप आवडायचे वहिची बहुतेक पाने चित्रांनीच भरलेली असायची. काही वेळा छड्या मिळायच्या तर काहीवेळा शाब्बासकी पुढे बाकीच्या व्यापामुळे चित्र काढणे थांबले सरावही बन्द झाला पण मधेच केव्हातरी लहर येते आणि अशी चित्र साकारतात mazi kala आनि हे चित्र गावी मंदिरासमोर रांगोळीतुन काढलेrangavali

मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)

चित्रगुप्त ·
लेखनप्रकार
यापूर्वीचा भाग: कुणी घडवून महाभारत? (भाग १) नारदमुनी उवाच: गंगेसारखी सर्वांगसुंदर, कामनिपुण भार्या आणि उत्तम लक्षणांनी युक्त असा एकुलता एक पुत्र देवव्रत यांच्या वियोगाने शंतनु फार कष्टी झाला. अशी काही वर्षे गेल्यावर एक दिवस गंगा देवव्रताला घेऊन शंतनुकडे आली, आणि मुलाला बापाचे स्वाधीन करून वनात परतली. देवव्रत आता चांगला सुदृढ, बुद्धीमान तरूण झालेला होता. त्याच्यावर राज्याची धुरा टाकून शंतनु पुन्हा मृगया आणि भोगविलासात रमला. तिकडे वनवासी लोकांपैकी धीवर जातीच्या प्रमुखाची ‘काली’ नामक कन्या मासे विकण्यासाठी हस्तिनापुरात जात असे.

तुमको देखा तो ये खयाल आया …

निमिष ध. ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक गरीब मध्यममार्गी विद्यार्थी, आपले एम ए चे शिक्षण घेणारा. छंद म्हणून शायरी करणारा. आपल्या घरापासून दूर कॉलेज असणाऱ्या शहरात राहणारा. नेहमी चहासाठी कॅन्टीन मध्ये दोस्तांबरोबर गप्पा मारत बसणारा. त्या नायाकामध्ये आणि आमच्यात खूप साधर्म्य होते कॉलेज जीवनात त्यामुळे की काय पण इतर बी ए पास आणि नुसत्या गाड्या उडवणाऱ्या हिंदी चित्रपट नायकांपेक्षा तो खूप जवळचा वाटायचा. जरी त्याच्या चित्रपटांत आणि आमच्या कॉलेज जीवनात एक-दीड पिढीचे अंतर होते तरीही तो जणू आपले प्रतिनिधित्व करतो आहे हे पाहून बरे वाटायचे.

द बॉक्सिंग डे बॅटल

जे.पी.मॉर्गन ·
रोमान्स.....काय सेन्श्युअस शब्द आहे ना? नाही... अमेरिकन्स सारखं "रोमॅन्स" नका म्हणू.... रोमान्स! अंगावरून मोरपीस फिरवावं तसा आठवण बनून अंगावर रोमांच उभा करणारा रोमान्स.....पुण्याच्या गुलाबी थंडीत भर दुपारीसुद्धा एकत्र घेतलेल्या वाफाळत्या चहाची ऊब देणारा रोमान्स.....चोरट्या कटाक्षांमधला रोमान्स.....चुकूनच झालेल्या सुखद पुसट हस्तस्पर्शांमधला रोमान्स......'मला कळलंय सगळं' सांगणार्‍या स्मितहास्यातला रोमान्स! ह्या वेळी बरेच वर्षांनंतर पुण्यात सलग बरेच दिवस गुलाबी म्हणावी तशी थंडी पडलीये. (८ - ९ डिग्री म्हणजे पुण्यासाठी गुलाबीच!). आणि ते ही ऐन डिसेंबरात !

आणि रजनीकांत रडला - धूम ३

मृत्युन्जय ·
१८ मे १९७४ भारतीय इतिहासात एक अतिशय क्रांतिकारक घटना घडली. पोखरण मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेण्यात आली आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रमुखांनी डॉ. होमी सेठनांनी पंतप्रधानांच्या सचिवांना दूरध्वनीवरुन ही रोमांचकारक बातमी देताना सांकेतिक भाषेत सांगितले "आ़णि बुद्ध हसला. काही लोकांच्या मते "आणि बुद्ध हसला" वगैरे असे काही सांगितले गेले नाही. ही नंतर बुद्धजयंतीचे निमित्त साधुन काही लोकांच्या डोक्यातुन निघालेली सुपीक कल्पना असेल. डिसेंबर २०१३ मध्ये एक अशीच अजुन एक क्रांतिकारक घटना घडली. धूम ३ प्रदर्शित झाला.

दिवस आठवले आपल्या जुन्या मैफिलीचे.....

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे ·
लेखनविषय:
सुर पडता कानावर बासरीचे ढवळुन निघते भावविश्व अंतरीचे लेखणीतुनी मांडतो दु।ख मनीचे आठवती दिवस आपुल्या मैफिलीचे....... नवखे होतो आपण सारेच येथे धडपडत होतो आपण सारेच येथे नवनिर्मीतीची होती कास मनी खुप यश मिलवण्याचा ध्यास मनी कधी भेट झाली कधी मित्र झालो कधी सुर जुळले कधी एक झालो काही होते खास तुझ्यात काही मझ्यात काही होते खास आपल्यात रियाज झाले, बैठका झाल्या कागदावरी काही कविता आल्या सुराला शब्द शब्दाला सुर भेटले पहिल्या मैफिलीचे तेथेच ठरले पहिला कार्यक्रम, दुसरा कार्यक्रम बोलता बोलता तीन कार्यक्रम झाले नुसते झाले नव्हे यशस्वी झाले नाहि!

गाणं की खाणं?

बुडबुडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल दि.१२/१२/१३ पासून सुरु झालेल्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये 'गानप्रेमी' रसिकांपेक्षा 'खाणं'प्रेमी रसिकच जास्त होते असं मला वाटत.पोट भरण आणि ते रिकाम करण हे नैसर्गिकच आहे त्याबद्दल काहीच वाद नाही पण त्याचा गाजावाजा किती आणि कुठे करावा याचे मात्र भान राखले पाहिजे. जर या दोन्ही पैकी एकही गोष्ट होत नसेल तर गाजावाजा करण ठीक आहे. :P मध्यंतरामध्ये निवेदक काही जाहिराती वाचून दाखवत होते आणि माझ्या शेजारी बसलेल्या टिपिकल पुणेरी नाकात बोलणा-या कुटुंबातील एक जण 'वाह.. व्वा.. Heaven' अस ओरडला. आता जाहिरातीमध्ये याला काय भारी वाटले म्हणुन त्याच्याकडे बघितले तर महाशय थालिपिट खात होते..बर तो मराठी नसता..

हरवले मधुमुरलीचे सूर.........

तिरकीट ·
लेखनप्रकार
"शेठ, निलेश बोलतोय...काय चाललय?" "अरे वा!.....बोला.....मी मस्त, तु काय म्हणतोयस..?" बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नाही...समाधानी आवाज ऐकला की खुप बरं वाटायचं.. खरं तर त्याने फोन उचलुच नये असंही वाटायचं...त्याला फोन केला की छान बासरी ऐकु यायची, त्यानेच कुठल्यातरी मैफिलीत वाजवलेली....मधुकंस असेल बहुतेक..त्याचा आवडता राग.... उणीपुरी ५-७ वर्षांची ओळख आमची....कॉलेजमधल्या कुठल्याश्या स्पर्धेमधे झाली असेल......तेव्हा १-२ वेळेला भेटलो असु.