(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत
तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस
*
देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही
तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते?
पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर
शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास
तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या
चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस?
भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली
परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?