एक गाव मां एक राजा रास. त्याले एक पत्नी आणि पोरे रातस.
राजा एकदम साधा माणूस रास. त्यान गावं बी खूश रास. राजा ना पोरे आण प्रजा ना पोरे एकच शाळा मा जातस.
एक दिन काय व्हस ; दुसरा गाव ना राजा त्याले निरोप धाडस. " तू मनासंगे युद्ध कर , मी तुले हराई टाकसू"
मग राजा बोलस त्याले तु मन गाव बरबाद करी टाकशी त्यानापेक्षा आपण एक युक्ती करु. अमना गामना गावं मां आपण एक वादविवाद स्पर्धा ठेऊ . जर तुमी माले हारी टाक तर हाई गावं तुनं . राजा अशी अट टाकस.'त्या प्रमाणे एक दिन तो दुष्ट राजा येस येवाण ठरावस.
हाउ दुष्ट राजाणा जोडे एक मांत्रीक रास.
पेरणाखुरपणी
संयम संपला संतापाने, फुलला माझा श्वास
लागलात जर मागे माझ्या, घेइन मिपा संन्यास ||१ ||
इक्षुदंडी कविता लिहिता, धावत येती टवाळ
प्रतिसादांच्या उतरंडीने, मन होते किती घायाळ ||२ ||
पान खाऊन येती दाजीबा पिंकाच्या टाकीत चुळा,
चार शब्दही कौतुकाचे लिहीले न माझ्या भाळा ||३ ||
एकएक प्रतिसाद वाचून माझे अंगअंग शहारले
श्वास होतो विग्दद, हे माझे विश्वची न उरले |||४ ||
प्रतिसादांनी तुमच्या राया स्वत्व माझे हरवले
कॅलेंडरी कविता करता माझे भान हरपले ||५ ||
असेल तुमची प्रीती म्हणूनी, कितीदा दुर्लक्ष मी क
पेरणा सांगायलाच पाहिजे का दर वेळी?
चालः- गे मायभू तुझे मी
नोटा
नोटा कितीक असती
हजार पाचशेच्या
नाही कुणास मुल्य
कागद वाटती साऱ्या
दूरस्थ आयकर विभाग
ठाऊक पाहतो मजला
डोळ्यांत् कॅशियरच्या
अनुकंप दाटलेला
झालो विवश परंतु
बोलणार काही नाही
निःशब्द भावनांना
होळीच साक्षी राही
अत्यंत भित्रे
08112016
पैजारबुवा,
हाफ चड्डी गँग (पार्ट -१)
संध्याकाळचे सात-साडेसात झाले असतील. देवापुढे दिवा लावून आज दिवसभरात लावलेल्या दिव्यांची उजळणी करत होतो. मला अगदी स्पष्ट आठवतंय शुभंकरोतीच्या एकूण शृंखलेतील शेवटचा श्लोक गात(वाचा रेकत) होतो. मी म्हणत होतो की,
"सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो"
पुढला कलंक लागण्याआधीच आयमीन ऊच्चारण्याआधीच एका सृजनाचं वाक्य कानी पडलं. माझा सख्खाशेजारी 'राजेश' होता तो.
ये बाजी!! कुणीतरी तुला शोधतंय बहुतेक. ते ऐकून माझ्या काळजात धस्स-बिस्स अजिबात झालं नाही कारण एव्हाना माझा गजनी झाला होता.
पोर्तुगीज भाषेत एक म्हण आहे "ए ओकासीआओ फाज ओ लाडराओ" आपल्या मराठीत त्याचा अर्थ होतो कि,
"चोर संधी निर्माण करतो आणि संधी सापडली तर सगळेच चोर होतात"
याच भाषेत अजून एक म्हण आहे, ती अशी कि "क्यूएम कॉन्टा उम कॉण्टो, आऊमेन्टा उम पोण्टो" अर्थात, गोष्ट सांगणारा आपली भर घालतोच, आपल्या पदरचं, आपल्या बाजूनेच सांगतो.
मानव ऋषीने मोठ्या प्रयत्नाने दगडांना घासून अग्नी प्रज्वलित केली. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना सुरु केली. हे अग्नी, सर्व संसारिक सुख आम्हाला प्रदान कर, गाई- म्हशी, दूध-तूप, धन-धान्य प्रदान कर. आम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंवर विजय मिळवून दे. "अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम:". 'तथास्तु' एक आवाज ऐकू आला. मानव ऋषीने पाहिले, हवन कुंडातून एक धुम्र्वर्णी अशरीरी आकृती, हात जोडून उभी होती. मानव ऋषीने प्रश्नार्थक नजरेने बघितले. मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझे भोजन आणि मानवाच्या इच्छा पूर्ण करणे, हाच माझा धर्म. आज्ञा करा, ऋषिवर.
CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही.
वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.
४ फेब्रुवारी २०१७
आमच्यावेळी पालकसभा व्हायच्या. पालकांना वर्गात बसवून आम्हा वर्गातल्या "निवडक" आठ-दहा मुलांना सर्व पालकांसमोर उभे केले जायचे. अश्या निवडक मुलांमध्ये नसल्यास तो आपला अपमान समजून मी नेहमीच त्यात असेन ही काळजी घ्यायचो. आणि मग आमची खर्या अर्थाने ‘शाळा’ घेतली जायची. त्यानंतर एक राऊंड घरीही व्हायचा तो वेगळा.
पण आज परीच्या शाळेत पॅरेंट टीचर मिटींगला गेलेलो. फेस टू फेस. टीचर दोन आणि पॅरेंट मी एकच. आणि सुरु झाला नुसता कौतुक एके कौतुकाचा पाढा. शी इज वेरी वेरी रेज टू वेरी वेरी ब्राईट स्टुडंट. ती हे करते आणि ती ते करते, तिला हे ही जमते आणि तिला ते ही जमते.
बोब्बी..एक लोककथा
एका गावात एक ब्राह्मण रहात असतो..त्याला ३ सुंदर कन्या असतात.पण त्या तिघित पण वाचा दोष असतो म्हणजे तिघिहि बोबड्या बोलायच्या..
मुली लग्नाला आलेल्या असतात..
मुलाकडचे मुलिस पसंत करायचे पण ्ति बोबडे बोलायला लागली कि नकार द्यायचे.
नकार घंटा ऐकुन बिचारा पिता दुखी होत असे..
त्या गावात एक लग्नाळु ब्राह्मण येतो..
वधुपिता ब्राहमण त्याला हेरतो व त्याची आपुलकिने चौकशी करतो..
व त्याला सांगतो कि मला ३ लग्नाळु मुली आहेत ..दिसायला सुंदर ग्रुहकृत्य दक्ष आदी आहेत
तिघी पण पाठच्या आहेत आपणास जी पसंत असेल तिच्याशी मी आपले लग्न लाऊन देईल..
लग्नाळु ब्राह्मण त्या प्रस्तावाला होकार देतो...
आनंदित झाले