मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालकथा

बालकथा - वेदिका शहाणी झाली.

nanaba ·
श्रुतिका आणि वेदिका दोघी छान मैत्रिणी होत्या. बागेत रोज भेटायच्या, मजा करायच्या. श्रुतिकाला वेदिका फार आवडायची. तिचे नीटनेटके कपडे, गळ्यातल्या छान छान माळा,गोड गाणी म्हणणं, गोड बोलणं. वेदिका होतीही मोठी हुशार आणि दिसायची पण कित्ती छान! श्रुतिकाला फार वाटायचं की आपल्याला पण वेदिका सारखं सगळं छान जमलं असतं तर! सुट्टीत श्रुतिका वेदिकाकडे रहायला गेली. दोघी पहिल्यांदाच एकत्र रहात असल्याने दोघीही जाम खूष होत्या. वेदिका च्या आईन श्रुतिका येणार म्हणून तिची आवडती इडली केली होती. दोघी खायला बसल्या. श्रुतिकाने सगळं छान संपवलं , पण वेदिका मात्र अखंड बडबड करत बसलेली.

सात वेळा मेलेला माणूस "The Dead Man"

rushikapse165 ·
खेळ.खेळ म्हणजे खेळच.मग तो कुठलाही असो.आजकाल एक नवा ट्रेंड चाललाय,काय तर,90'Kids.तसा मी काही नव्वदच्या दशकातील नाही.आणि नसलो तरी मी काही दुर्देवीही नाही,कारण माझा जन्म तो २००० सालचा,त्यामुळे संगत होती ती नव्वदच्याच दशकाची. तो काळही तसाच होता.T.V.नावाचा प्रकार तितकासा सगळ्यांकडे नसायचा.त्यात त्यावेळच्या रामानंद सागरांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांनी अगदी दशक उलटल्यानंतरही आपलं वर्चस्व प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं होतं,आणि त्यामुळे ज्याघरी T.V.त्याघरी संध्याकाळी गर्दी हे ठरलेलं.आणि दुसरं काय तर?क्रिकेट,त्यावेळी क्रिकेट म्हणलं की सचिन अाणि सचिन म्हणलं की क्रिकेट,एवढंच गणित.आणि आमच

डोक्याला शॉट [चतुर्थी]

गड्डा झब्बू ·
मला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना. ***** ब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या. काशी यात्रेहून परत आल्यावर चिन्मयही आता पूर्वीपेक्षा जरा बरा वागू लागल्याचे पाहून त्यांनी अप्पा राशीनकरांकडे त्याला कुठेतरी नोकरीला लावण्यासाठी शब्द टाकला. अप्पांनीही त्वरित त्यांच्या परिचयाच्या सरकारी कामांचे कंत्राट घेणाऱ्या एका कंत्राटदाराकडे त्याला नोकरीला लावले होते.

संपला फ्रेंडशिप डे......

सुधीर मुतालीक ·
कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!! ‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण!

बालकथा: रामूची हुशारी

पाषाणभेद ·
बालकथा: रामूची हुशारी एक छोटे गाव होते. त्या गावात रामू नावाचा पोरका मुलगा राहत होता. जवळचे कुणीच नसल्याने तो एकटा राहत होता. बारा तेरा वर्षांचा रामू कोण कुठला कुणालाच माहीत नव्हता. तो सार्‍या गावाचाच मुलगा झाला होता. गावात मिळेल ती कामे तो करायचा. कुणाची गुरे चारून आण, बांधावरचे गवत कापून दे, कुणाचे धान्य पोहचवून दे तर कुणाच्या घरची इतर कामे करून दे असले वरकाम करून तो पोट भरे. गावकरीही त्याच्या एकटेपणाची जाणीव ठेवून होते. त्याचा स्वभावही मनमिळावू आणि पोटात राहून जगण्याचा होता. असेच एकदा त्याला एका आजीने जळणासाठी लाकडे तोडून आणण्यास सांगितले.

shinchan :एक उत्तम स्ट्रेस बस्टर

Prajakta२१ ·
सध्या लॉकडाऊनमुळे टीव्ही बघण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे घरून काम करून आणि बाकीची कामे, फोनाफोनी करून झाल्यावर तेवढाच विरंगुळा उरतो टीव्ही सोडून करण्यासारखे खूप आहे हे कळते तरी वळत नाही असो पण सारख्या न्यूज चॅनेलवरच्या करोनाच्या घाबरवणाऱ्या बातम्या,सासू सुनांच्या कौटुंबिक भांडणाच्या अमरत्व लाभलेल्या सिरिअल्स ,त्यातच पौराणिक देवादिकांच्या अमरचित्रकथा ,तेच ते चित्रपट (उदा. सोनी -सूर्यवंशम ,झी-हम आपके है कौन ,हम साथ साथ हे आणि राजश्री production चे सिनेमे ,कलर्स -कारण जोहर चे सिनेमे ) ते संपले कि दक्षिण भारतीय डब केलेले अतर्क्य आणि अचाट सिनेमे ह्यातून बघायला काहीच उरत नाही.

पोपटाचा दिवस

हृषीकेश पालोदकर ·
दुपारच्यावेळी आम्हा पोरांचा खेळ ऐन भरात आलेला होता. गावातले बहुतांश लोक शेतात गेल्याने आमच्या आवाजाव्यतिरिक्त गल्ली तशी शांत होती. जेवणासाठी ज्याला त्याला आपापल्या घरून बोलावणे येऊन गेलेले होते. पण पुढचाडाव झाल्यावर जाऊ, असे म्हणत सगळेजण रंगात आलेला गोट्यांचा खेळ पुढे नेत होते. तेवढ्यात मांजरीचा ओरडण्याचा आणि पक्षाच्या किंचाळण्याचा कर्कश आवाज कानावर आला. वळून पाहिले तेव्हा आमच्या वाड्यातल्या लिंबाच्या झाडावर काहीतरी झटापट झाल्याचा अंदाज आला. तसेच आम्ही ताडकन आठ दहा जणं तिकडे धावत गेलो. आम्ही पोहोचलो आणि तेवढ्यात झाडावरून एक पक्षी खाली फडफड करत पडला.

बोध कथा – Revisited

शेर भाई ·
फार फार वर्षांपूर्वी इसापनीती का पंचतंत्र आता नक्की आठवत नाही, पण एक गोष्ट ऐकली होती. त्याच हे एक remix. एका राज्यात एक राजा असतो आणि त्याला अचानक एक दिवस दोन शिंग येतात. त्याच ते गुपित कोणालाच माहित नसते कारण शिंग तो आपल्या मुकुटाखाली दडवत असतो. मग थोड्या दिवसानी जेव्हा राजाचे केस वाढतात तेव्हा शाही हजामाला बोलावले जाते. आता त्या शाही हजामाला आपण नाव देऊ “बंडू”. कारण शाही हजाम पेक्षा बंडू छोटुस बर. तर बंडू राजाचे केस कापायला येतो, आणि बघतो तर काय.........................