राजपुत्र आणि प्रधानपुत्र खूप जिवलग मित्र असतात. दोघेही शूरवीर असतात. दोघांनाच दूर दूर जंगलात शिकारीला जाण्याचा छंद असतो. एकदा असेच ते दोघे अरण्यात शिकारीसाठी जातात, बरेच प्रयत्न करुनही शिकार मिळत नाही. ते असेच घनदाट जंगलात पुढे जात राहतात. शिकार केल्याशिवाय परत यायचं नाही म्हणून चार पाच दिवस झाले तरी तिकडेच मुक्काम करतात. झाडांची फळे खाऊन, झऱ्याचं पाणी पिऊन तहान भूक भागवतात.
पाचव्या दिवशी ते एका तळ्याकाठी येतात. तळ्याकाठी त्यांना एक अतिशय सुंदर, लावण्यवती तरुणी दिसते. तिच्या हातात एक लाल असतो. त्या लालमधून लालसर प्रकाश बाहेर पडत होता.