या चित्रपटाच्या जशा जाहिराती बघून उत्कंठा व अपेक्षा वाढत होती, त्याच प्रमाणे चित्रपट अपेक्षा पूर्ण सुद्धा करतो असे माझे मत आहे.
सगळ्यात आधी हे नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट कोणत्याही जातीच्या, भाषेच्या, प्रांताच्या आणि धर्माच्या विरोधात मुळीच नाही. तर, तो आहे कुणाही च्यक्तीत असु शकणार्या न्यूनगंडाच्या भावनेच्या विरोधात. मग ती भावना कोणत्या ही कारणाने का आली असेना!
महेश मांजरेकरने अतिशय छान कथा लिहिली आहे. तसेच त्याचा अभिनय आणि संवादफेकही अतिशय छान, प्रभावी आणि प्रेरक! शिवाजी महाराजांचे आडनांव भोसले , म्हणून तेच आडनांव मुद्दाम या सिनेमात वापरले आहे.