Skip to main content

समीक्षा

रसग्रहण : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.

लेखक अनंता यांनी मंगळवार, 05/05/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! चांगले, समृद्ध करणारे, ऐकावे असे काही! मध्ये सुन्या - सुन्या मैफिलीत माझ्या ...ऐकण्याचा योग आला. वाचून अगदीच राहवेना. गाणं ऐकून कधी समाधी लागली तेच कळलं नाही! सुरेश भटांची सुरेख शब्दरचना, पं. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, स्मिता पाटीलचा जिवंत अभिनय आणि दीदींच्या सुरांचे नक्षीदार कोंदण! केवळ अप्रतिम.हजार ऑस्कर एका पारड्यात नि हे गीत एका पारड्यात! समाजातील उपेक्षीतांसाठी झटणार्‍यांच्या वैयक्तीक आयुष्यात जेव्हा वादळ उठते, तेव्हाच्या मनोवस्थेचं वर्णन भटसाहेबांनी अचूक पकडलेय.

गाभ्रीचा पाऊस - परीक्षण

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 05/05/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
गाभ्रीचा पाऊस हे नाव थोडेफार ऐकले होते. कोणत्यातरी महोत्सवात दाखवला होता आणि कदाचित पारितोषिक ही मिळाले म्हणून. पुण्यात होतो तेव्हा लागला नव्हता आणि कोठे परीक्षण ही वाचले नाही. मग येथे अमेरिकेत लॉस एन्जेलिस आणि नंतर बे एरियात याचे शो झाले. त्याबरोबर निर्माते प्रशांत पेठे ('वळू' सुद्धा यांचाच) आणि लेखक्-दिग्दर्शक सतीश मन्वार (उच्चार नीट माहीत नाही) हे ही आले होते. मी बे एरियात सॅन होजे ला दाखवला येथील 'कला' या संस्थेने, तेव्हा बघितला. चांगला चित्रपट आहे, बघण्यासारखा.

गल्लीत नुसता गोंधळ.. दिल्लीत मुजरा नाहीच.

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 02/05/2009 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी असते हे आता मान्य करण्यासारखे आहे.) तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत.

दुनियादारी - माझ्या नजरेने !

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 01/05/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले.

वादळवारा

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 17/04/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो अंदाजे तासी ६०-७० च्या ही पेक्षा वेगाने वारा वाहत होता, स्थळ : फार्म हाऊस, मानेसर, गुडगांव.

"लक बाय चान्स"

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 17/04/2009 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
हा चित्रपट येऊन काही महिने उलटले तरी पहाण्याचा योग कालपर्यंत आला नव्हता. अनेक चित्रपट पाहिले जातात पण थोडेसेच लिहिण्यासारखे असतात. "लक बाय चान्स" हा त्यापैकी एक. डिस्क्लेमर : पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये. हा चित्रपट एका होतकरू , चित्रपट-नायक बनू पहाणार्‍या तरुणाच्या - "स्ट्रगल"च्या दिवसांची कहाणी रेखाटतो.

पुस्तक परिचयः कालगणना

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 11/04/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू.२००/- फक्त.
पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही.

द शॉशँक रिडेम्शन

लेखक सुमीत भातखंडे यांनी बुधवार, 08/04/2009 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
१९९४ साली रिलीज झालेला, आणि आज एक क्लासिक म्हणून मानला गेलेला एक अप्रतिम चित्रपट. टिम रॉबिन्स आणि मॉर्गन फ्रीमन यांच्या अप्रतिम अभिनयानी नटलेला असा हा एक सर्वांगसुंदर चित्रपट आहे. कथानायक अँडी डूफ्रेन (टिम रॉबिन्स) याने शॉशँक स्टेट प्रिझन मधे घालवलेला जवळ्-जवळ २० वर्षाचा काळ, आणि तिथे त्याला करावा लागलेला अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना, आणि "Fear Can Hold You Prisoner, Hope Can Set You Free" ही टॅगलाईन सार्थ ठरवणारा सुरेख शेवट, हे या चित्रपटाचं मुख्य कथासुत्र. कथेचा थोडक्यात सारांश असा: साल १९४७.

समीक्षा: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 06/04/2009 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
या चित्रपटाच्या जशा जाहिराती बघून उत्कंठा व अपेक्षा वाढत होती, त्याच प्रमाणे चित्रपट अपेक्षा पूर्ण सुद्धा करतो असे माझे मत आहे. सगळ्यात आधी हे नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट कोणत्याही जातीच्या, भाषेच्या, प्रांताच्या आणि धर्माच्या विरोधात मुळीच नाही. तर, तो आहे कुणाही च्यक्तीत असु शकणार्‍या न्यूनगंडाच्या भावनेच्या विरोधात. मग ती भावना कोणत्या ही कारणाने का आली असेना! महेश मांजरेकरने अतिशय छान कथा लिहिली आहे. तसेच त्याचा अभिनय आणि संवादफेकही अतिशय छान, प्रभावी आणि प्रेरक! शिवाजी महाराजांचे आडनांव भोसले , म्हणून तेच आडनांव मुद्दाम या सिनेमात वापरले आहे.