Skip to main content

प्रतिभा

खेळ दोन ओळींचा - ४

लेखक राघव यांनी गुरुवार, 05/03/2009 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मागल्यावेळी सारखाच. फक्त यावेळेस दुसरी ओळ दिलेली आहे अन् पहिली जमवायची आहे! ..... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या ओळीशी निगडीत अशीच पहिली ओळ असायला हवी! शुभेच्छा!! मुमुक्षु

तुझे आगमन

लेखक जागु यांनी गुरुवार, 05/03/2009 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज तु जेंव्हा येशील सुर्य तुला लाजलेला असेल चंद्र खट्याळ तुला डोकावत असेल चांदण्या लागतील कुजबुज करु दवबिंदुंची पाझर होईल सुरु रातराणी लागेल सुगंध पसरवू वार्‍याची झुळूक देईल चाहुल तुझ्या आगमनाची पाहुन तुला मी होईन बावरी राधा झाली होती जशी कृष्णासाठी तु शोधशील माझ्या नजरेतील प्रिती ठेवील गुपित नजर माझी झुकली गारवा करेल आतुर तुला स्पर्शासाठी मीही असेन बेफान तुझ्या अंधारी गाढ मिठीसाठी.
Taxonomy upgrade extras

(उगिच भेटली घाटावर ती)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 05/03/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर ओळख सारी धुवून गेली बर्‍याच दिवसांनंतर फेस धवल तोंडाला आला धुके दाटले डोळीं लालकेशरी चार शलाका फुलून आल्या गाली चपलेचाही प्रसाद आला शिवीआरतीनंतर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर पेकाटाची मोडुन हाडे हाती घेतला हात (वळ्णावरती अवघड इतक्या सहज घातली लाथ) धडपडलो अन् धूम ठोकली मान घातली खाली त्या मौनाचा अर्थ सांगण्या मागे धाउन आली बुक्क्यांची मग उधळ्ण झाली कुठेकुठे ति भयंकर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर प्रेरणा: पुष्कराज यांना सहज वाटेवर भेटलेली कविता

(रांधण्याची शिकवणी)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/03/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा मागल्यासारखंच! हे रामदास काही उ(हु)च्च लिहून जातात आणि आमचा धर्म आम्हाला सोडवत नाही हो! त्यांची 'गाण्याची शिकवणी' वाचली आणी आमच्या वेगळ्याच शिकवणीचे तास डोळ्यांसमोर येऊन गेले!

(कोण म्हणतो रात्र झाली )

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 04/03/2009 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आताच अमुच्या जेवणाची आता कुठे सुरवात झाली बघुया चला - या फोडणीची नुकतीच टेट्रापॅकमधुनी डालड्याला जाग आली पदरही खोचला हिने अन् जिरे-मिरीची आग झाली प्रियेस माझ्या आजतर मी दगडफुले कित्येक वाहिली हिंग कुटला मी असा की धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवणाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण भूक बाकी - कहर आहे! समजून घ्या; खाण्याला, गाण्याला नि विडंबनाला वयाची अट नसते :)

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा!!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 03/03/2009 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
परवा संध्याकाळपासून इथे बर्फवृष्टी सुरु होती काल संध्याकाळी संपली! मिसळपावावरही अशीच धमाल हास्यवृष्टी घडवून आणण्यात कमालीचा उ(हु)च्च सहभाग असलेल्या सगळ्या बिनीच्या कलावंतांना ही आरती समर्पित!

बोंबलाया दाहि दिश्या

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 28/02/2009 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
सखारामजी गटणेजी ह्यांनी दिलेल्या जाहिर आव्हानास हे आमचे प्रत्युत्तर ! निसतला ग्लास ओन्जलितुन तो मल कुन्वित आहे वस घेत्तो मोकले की मी अत्ता ओकलो आहे एकु द्या मज शिविगल त्य्य काउन्तरच्या खुर्चितु नी मद्यगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति फुन्क्लि जी धुरादे घामबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या नाकासवे ग्लासतुन बात्ल्यातुन मदिरेची ही स्पन्दने उतुन्ग लाथा देती मज ही आच्मने हलूच ते ग्लास चुम्बनि जाती मित्रचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते गुजरात मी की मद्यबंदीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्य

परिकथेतील राजकुमारा...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 28/02/2009 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
"आई आई ए आई अग बाहेर येना पटकन.. " दादा ओरडतच घरात शिरला. मी नेहमीसारखीच हॉलमध्ये बसले होते. "अरे काय झाले असे ओरडायला एकदम?" आई विचारतच बाहेर आली. "आई हा माझा मित्र .. अरे आत ये ना बाहेर का उभा आहेस असा?" दादा बाहेर डोकावत म्हणाला, दादाच्याच वयाचा एक देखणा रुबाबदार तरुण थोडासा लाजतच घरात शिरला. "आई हा अभिमन्यु, माझ्याच कॉलेज मध्ये शिकतो, आज सकाळी फिरुन येताना माझी आणी एका रिक्षावाल्याची टक्कर झाली जोरात, ती लोक दादागीरी करायला लागले, पण तेव्हड्यात हा अभी आला म्हणुन सुटलो बघ मी." "छोर ना यार" अभिमन्यु म्हणाला. बाप रे हा कोणी दुसर्‍या जातीतला आहे का काय ?

सन्मान! एका रानातल्या कवीचा..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 28/02/2009 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक अतिशय आनंदाची बातमी..! शेतकरी कवी, रानकवी, ना धो महानोर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा जनस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे समजते.. महानोरांसारख्या अस्सल मराठी मातीतल्या एका कवीचा साक्षात कुसुमाग्रजांनीच केलेला हा गौरव आहे असेच म्हणावेसे वाटते..! कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..! -- तात्या अभ्यंकर.

निर्बलता

लेखक शिवापा यांनी शुक्रवार, 27/02/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी स्पष्ट आठवते. टेकडीचा रस्ता. उतरलेली उन्हे. तुझा हात, विस्कटलेले केस ओलेते डोळे अणि तापलेले श्वास. काही क्षणांचा प्रवास. दरम्यानचे वाढलेले अंतर मनाच्या इच्छा, मिठीच्या अपेक्षा. पण आपण ठरलो नदीचे दोन किनारे. आज इतक्या दिवसानंतर डोळे न्याहाळाताहेत खिडकीच्या झरोक्यातून आत येऊ पहाणार्या आंब्याच्या डहाळीला. हि फांदी मी कितीतरी वेळा तोडली असेल. पण काहि दिवसांनतर ती पुन्हा हिरवी होते. परत एकदा घरात डोकावन्याकरीता आतुर. मग विशाद वाटतो. किती निरंतरता आहे तिच्या प्रयासात आणि किती निर्बलता होति माझ्या प्रयासात.