मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिभा

उदास मन

जागु ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मन आज उदास उदास झाल आहे भावनांही काहीशा रेंगाळत आहेत. हृदयाला ठोकेही नकोसे झाले आहेत शब्दही ओठामगे हळूच दडले आहेत डोळ्यांच्या कडांना मात्र ओलावा हवा आहे चालही काहीशी संथ झाली आहे एकांतवासाकडे वळण घेत आहे प्रकाशही नकोसा वाटत आहे भर दिवसा रातकीडा किरकिरत आहे. कुणास ठाऊक आज असे का झाले आहे ? सुखाचा सगळीकडे पसाराच पसारा आहे पण मन पसार्‍यात दु:खाचा शोध घेत आहे.

(कहर)

परिकथेतील राजकुमार ·
लेखनविषय:
अर्पिलास जरी तुझा अकल्पित कहर मला तू, रिती तरीही निबंद प्रतिभा माझी राहिली कशी? टंकताना प्रतिसादाचे नव्हते भान मजला, आता हे अवैचारीक प्रतिसाद राहू दे तुझ्याचपाशी! कुपितले, खिशातले लेख आगळे कसे , कधी अन कुणी टंकले, कुणास ठावे? खरडीखरडींवरी आवाहनाच्या कळ्या ठेवुनी, उडून गेले ते वैचारीक समुपदेशनवाले उधळलीस तू विडंबने माझ्या भग्न मनावर तुरट कडवट नासक्या शेंगदाण्याची काय करू मी?

काही नोंदी, अशातशाच...

श्रावण मोडक ·
शहाद्याहून धडगावच्या दिशेने एस.टी. निघाली. अंतर साधारण पासष्ठ किलोमीटरचे. त्यापैकी सुमारे चाळीस किलोमीटरचा रस्ता घाटाचाच. सातपुड्याचं पहिलं पूड चढून गेल्यानंतर काही काळात मोबाईलची रेंज जाते. त्यामुळं अगदी न कळतच माझी नजर मोबाईलच्या स्क्रीनवर गेली. बॅटरी पूर्ण होती. म्हणजे मोबाईल चालू-बंद असा करीत वापरला तर तीन दिवस त्याची साथ-सोबत होण्यास हरकत नव्हती. निश्चिंत होऊन मी बाहेर नजर वळवली. बसनं घाटाचा मध्य गाठला तेव्हा पुन्हा एकदा माझं लक्ष मोबाईलवर गेलं आणि चमकलो. मोबाईलची रेंज आली होती. अर्थातच, माझ्या सेवादात्याची नव्हे तर दुसऱ्याच सेवादात्याची. दोघंही खासगी क्षेत्रातीलच.

रसराजेश्वर..!

विसोबा खेचर ·
साला, मुक्तछंदातल्या आमच्याही या काही ओळी.. मार्च अर्धा संपला जवळजवळ! तो आता येणारे, तो येतोय, येऊ घातलाय..! चला त्याचं स्वागत करुया, सज्ज राहूया, गुढ्यातोरणं उभारून! तो राजा आहे, तो बादशहा आहे तो सम्राट आहे..! तो साक्षात चक्रवर्ती आहे..! तो माणसाला माणूस जोडतो, तो मनातले सारे विकार करतो नाहीसे एका क्षणात.. तो वाटतो फक्त प्रेम

(आज)

चतुरंग ·
लेखनविषय:
क्रांतीताईंची 'आज' ही सुंदर कविता वाचली आणि मग "त्याचे उत्तर माहीत असूनही दिले नाहीस तर डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील" ह्या वेताळाच्या धमकीप्रमाणे, "तुझ्या धर्माला जागला नाहीस तर ह्या ओळी रात्री छळू लागतील" ह्या भीतीने मला हे लिहिणे भाग पडले!

वर्षाव अमृताचा..

प्राजु ·
लेखनविषय:
कंपीत गात्र होई तू छेडिल्या सुरांनी श्वासात खोल जाई मिसळून रातराणी बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी उठती अनेक हलके हलके तरंग कोठे गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी (हळुवार मंद होई हा दीप तेवणारा वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी) वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे उजळून जात काया, लावण्य हे नुराणी घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा ..

लव्ह मॅरेज की ऍरेंज ? तुम्ही नाव द्या.

जागु ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आठवतो तुला तो दिवस? ज्या दिवशी आपण गुंतलो एकमेकांत! आधिच निरोप आला होता फक्त पाहायला येणार आहात आधीही पाहील होतस लांबुन मी तुला आणि तु मला आवडले म्हणूनच आलास परत तुझ्या परीवाराला घेऊन मला दाखवायला अन निरखायला. आतच बसले होते मी धडधडणारे ठोक्यांवर मात करत. एकीकडे तुला पाहण्याची ओढही होती तुही आवडला होतास मला म्हणूनच तर हुरहुर चालू होती मला बोलावल तुझ्या आत्पेष्टांनी मी आले तुमच्या समोर थरथरणार्‍या कप बशांना सावरत ! सगळ्यांची नजर एकदाच माझ्यावर शांत झाली, कपबशांची किणकिण मात्र जास्तच जाणवू लागली. मला बसवले तुमच्या सोबत तुझ्याच माणसांनी आणि विचारले , "आमचे घर सांभाळशील का ?

पिकले पान

मी गौरी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी गौरी.... मिपाची एक नवी सभासद.... रेखाटन हा माझा फावल्या वेळात जोपासलेला एक छंद. हे मी काढलेले असेच एक ..तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

पेपिनचे पाचकपात्र

शरदिनी ·
लेखनविषय:
ही माझी कविता रेशीमनिळाई या काव्यसंग्रहात प्रसिद्ध होणार होती....

सामुद्रधुनी

शरदिनी ·
लेखनविषय:
जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून शांततेची कबुतरे उडताना पाहून गालिब म्हणाला वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव गुंत्यातला तोरा मिरवत घाटातली वळणे घेताना चुकून मॅडोना म्हणाली जितं जितम् जितम् प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेताना सजणी म्हणाली "अय्या, याला काय अर्थ आहे?"