मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

महात्मा गांधीं म्हणालेत, "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल”

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी काल प्रो. देसायांना म्हणालो, “रागाची भावना, रागाची जोमाने येणारी इर्षा,जंगली राग जो तुमच्या शरीरात फोफावतो तुमच्या मुठी घट्ट करून, तुमचं मन आसूरी करतं, तुमच्यातली श्वापदांची उत्कट प्रवृत्ती बाहेर आणतो. दुसऱ्यांवर दुःख ओढवण्याची अंगातली तळमळ,असं केल्यावर वाटणारी समाधानी आणि तृप्तीची तळमळ. या सर्व सूडाच्या भावना आहेत. या सूडाच्या भावना,वैयक्तिक वेदना आणि दु:ख यांचा एक समूह आहे.

लपविलास तू हापूस आंबा -- विम्बल्डन

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.” आता मुंबईत लवकरच पाऊस येईल.केरळात पाऊस पडायला लागला.दहा जून पर्यंत पाऊस मुंबईला येईल.बाजारात निरनीराळे प्रकारचे आंबे दिसत असतील.

आ. ई. तु झी. आ. ठ. व. ण. ये. ते

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं. मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली! “आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)” म्हणजेच, “अगं मी येते!, अरे मी येते!

आवेग हृदयाचा की मनाचा असावा

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आवेग हृदयाचा की मनाचा असावा मी श्री समर्थांना म्हणालो, “कधीकधी, असे लोक असतात जे त्यांचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.ते जितक्या जास्त वेळा प्रयत्न करत राहतात तितकेच ते हार मानण्यास तयार नसतात.अधिक हट्टी होतात.जीद्दी होतात . तसंच असेही लोक असतात जे फक्त उदिष्ट सफल करण्याचा जुजबी प्रयत्न करत असतात.आणि नंतर ठराविक वेळ प्रयत्न करून झाल्यावर ते प्रयत्न करायचं सोडून देतात. आणि निश्चिंत होतात. खूप उशीर होईपर्यंत ती व्यक्ती स्वतःला बांधून ठेवत नाही. किंबहुना,त्याने कधी थांबायचं हे त्याला माहीत असतं, कारण तो त्याची शक्ती, वेळ आणि स्वत:ची भावना ओळखून असतो.

द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

चित्रगुप्त ·
. चित्रकारः John William Waterhouse. (1888) Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.

एखाद्या ठिकाणाची आठवण करून देण्याची शक्ती वासात,गंधात, असते.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तो दिवस मला आठवतो.शेतात कामकरणाऱ्या माझ्या सकट इतर कामगारांना एक दुर्गंध येत होता.शोधता शोधता एका पिंपळाच्या झाडाखाली एका झुडपात दुर्गंध तिव्र झाला. झुडूप विस्कटून पाहिल्यानंतर एक रान-मांजर मेलेलं आढळलं. रात्री घरी गेल्यावरही तो दुर्गंध माझ्या नाकात “वास” करून राहिला होता. निसर्गाने पृथ्वीवरच्या बहुतेक जीवांना वास अनुभवण्याची दिलेली क्षमता पाहून मला निसर्गाचं कौतुक करावसं वाटतं. मी,अगदी साध्या गंधाच्या सामर्थ्याचंही कौतुक करतो. हा एक विलक्षण प्रकार अनुभवता येतो. वास सौम्य ही असतो तसाच तो जहरी असतो. काही गंध क्षणभंगुर असतात आणि काही वर्षानुवर्षे टिकून राहतात.

चाय की चर्चा..

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
या लेखाचं शीर्षक "चाय पे चर्चा" असं नाही बरं का. मला चाय पे चर्चा करून माझ्या एरियातल्या कोणत्याही समस्या मांडायच्या नाहीत. किंवा कोणतीही राजकीय चर्चा करायची नाही. मला ॲक्चुअल चहा याच विषयावर लिहायचं आहे. चहाला चाय म्हणतात. चा म्हणतात. च्या म्हणतात. टी म्हणतात. प्रत्येक भाषेत चहासाठी शब्द आहे. यावरूनच त्याची जागतिक लोकप्रियता दिसून येते. मला चहा आवडतो. खूप आवडतो. पण म्हणून मी सारखा सारखा चहा पित नाही. फक्त दोनदा. सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी. संध्याकाळी एक वेळ नसला तरी चालेल. पण सकाळचा मस्ट. मात्र मला चहा जसा आवडतो तसाच बनलेला हवा.

“आई” म्हणजेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलीजन्स

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“आई” म्हणजेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलीजन्स आज खूप दिवसांनी आम्ही तिघं, म्हणजे मी, प्रो.देसाई आणि प्रो.पोंक्षे एकत्र तळ्यावर जमलो होतो.आज प्रो.पोंक्षे आम्हाला त्यांच्या अलीकडेच्या सायन्स मेळाव्याच्या गप्पागोष्टी आणि त्यांना आवडलेलं सर्वात उत्तम भाषणाचा आढावा वजा मनोरंजक माहिती सांगणार होते. सुरवात करताना ते हसत हसत म्हणाले, “ ह्या तरूण प्रोफेसरचं भाषण मला प्रभावशाली वाटलं.तो सुरवात करताना म्हणाला, महाराष्ट्रात मातेला “आई” म्हणतात.

मी आणि समुद्रकिनारा

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निळा समुद्र, गरम वाळू, छोटे मासे, खारी हवा, समुद्राची झुळूक आणि तो उबदार सूर्य. ह्या माझ्या लहानपणी उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा समुद्रकिनाऱ्यावर खूप जीव होता.. मला वाटतं की, समुद्रकिनारा आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते. मला असं वाटतं की समुद्रकिनाऱ्याकडे मी त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो मला आठवतं की एकदा आम्ही गोव्याला गेलो होतो,तो बिच वेगळा होता, पाहून मी थक्क झालो होतो. पण कोकणातला, माझ्या आजोळ जवळचा बिच मला निराळा वाटायचा.

दर्शननं केला प्रवास

पराग१२२६३ ·
मिरजेत दर्शन दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं.