Skip to main content

प्रकटन

“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/05/2024 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला. ते म्हणाले, “ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे. आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं. हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं शकतात. त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात. आपल्या जीवनातील सर्व कृती या एकाच उद्देशाकडे, आनंदी असण्याकडे,या मुख्य ध्येयाकडे,नेमस्त होतात. माझ्यासाठी, म्हणाल तर मी जगत असलेल्या जीवनाचा आनंद घेणं कठीण होईल, जर मी सर्व काही मला त्रास देत आहे अशी समजूत करून राहिन.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श(भाग २)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/05/2024 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तिला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची. सुम्या आपल्या नवर्‍याबरोबर पुण्यात रहायची.तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा.सुम्याला खूप आनंद व्हायचा. कोकणात आईकडून चवदार स्वयंपाक कसा करायचा ते शिकल्यामुळे तिच्या जेवणावर तिचा नवरा खूष असायचा. सुम्याला एकटी असताना गुरूनाथची खूप आठवण यायची.गुरूनाथसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायचा.पण ते प्रेम बालीश तरूण वयातलं होतं.भविष्य कसं असेल त्याची त्या वयावर पर्वाही नसते आणि जाणीवही नसते.

समुद्राच्या लाटांवर माझ्या विचारांची खलबल.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/05/2024 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी अ-वास्तव विषयावर लिहिणं सुद्धा मनोरंजक असू शकतं.माझा खालिल लेख तसाच काहिसा नमुना आहे. मला समुद्राजवळ बसून निळ्या काळ्या लाटांकडे पाहयाला आवडतं. मला असं वाटतं की जर मी तिथे बराच वेळ बसलो आणि माझ्या “मनाला” खरोखर इकडे तिकडे फिरू दिलं तर लाटांपर्यंत पोहोचेपर्यंत वाळूमध्ये, कमी झालेल्या पाण्यात पडून, माझं मन वाळूत रूतलं जाईल. आणि पुन्हा एखादी मोठी लाट येऊन पाण्याबरोबर फरफटत जाईल. आणि माझे विचार पुन्हा एकदा समुद्रात नेले जातील. किनाऱ्यावर माझं शरीर खारट वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन, माझ्या विचारांना मंथन करणाऱ्या लाटांच्या आवाजाचा आनंद घेत राहिन .मी अनेकदा माझ्या विचारांना उभारी देतो.

वाट पहाणं

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 09/05/2024 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
वाट पाहाणं “सखी,मंद झाल्या तारका आता तरी येशील का?” हे गाणं माझ्या कानावर पडलं.किती आतुरतेने सखा तिची “वाट” पहात आहे,हा विचार मनात आला आणि वाटलं, आपण आपल्या आयुष्यात किती वेळा वाट पाहतअसतो?आपण छोट्या छोट्या गोष्टींची वाट पाहत असतो. रेस्टॉरंट्समध्ये जेवणासाठी. नवीन चित्रपट पाहण्याकरता तिकिटांसाठी. नव्या फूलांचा सुगंधी वास दरवळून आणणाऱ्या वसंत ऋतु येण्यासाठी. आतुरतेने मोठ्या गोष्टींची वाट पाहतो. मेलमधील आपल्या स्वीकृत पत्रांसाठी.आपल्या कुटुंबांतील व्यक्ती परदेशी असताना काम झाल्यावर परत घरी येण्यासाठी. आपल्या सेवानिवृत्तीसाठी. करिअरच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी.

समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 08/05/2024 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई आणि मी संध्याकाळी तळ्यावर भेटल्यावर एका सामाजिक विषयावर चर्चा करीत होतो.विषय होता, "समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा" सुरवातीला भाऊसाहेब मला म्हणाले, "आपण आपल्या आयुष्यात निर्माण केलेली नाती, अनेकदा, त्यातून आपल्याला मिळणारे परिणाम काय आहेत ती ठरवतात. आपण आपल्या आयुष्यात लाखो लोकांना भेटतो. यापैकी अनेक भेटण्याचे प्रयत्न आपल्याकडून विसरले जातात. आणि पुन्हा कधीही त्याचा विचारही केला जात नाही. तथापि,आपण त्यातले काही प्रयत्न नेहमी लक्षात ठेवतो आणि त्यांना स्मृती म्हणून जतन करतो.

ब्रम्हांडं आणि कृष्णविवर (ब्ल्याक होल)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 08/05/2024 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी प्रो.पोंक्षना, कृष्णविवर(ब्ल्याक होल) ह्या विषयावर बोलून थोडी माहिती द्यावी अशी विनंती केली. ते म्हणाले, “ कृष्णविवर,म्हणजेच ज्याला,ब्ल्याक होल म्हणतात ते, आपण पाहू शकत नाही, असं असूनही आपण दावा करतो की ते अस्तित्वात आहे. आपण हा दावा कोणत्या आधारावर करतो?

काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 06/05/2024 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण मला आठवतं, अलीकडे मी जेव्हा कोकणात रजा घेऊन गेलो होतो, तेव्हा नेहमीच्या शिरस्त्या नुसार ,चक्क ढगा विरहीत रात्र शोधण्याच्या प्रक्रियेत, यशस्वी होत आहे असं पाहून, त्या रात्री समुद्राच्या चौपाटीवर वाळूत बसून तारे पहाण्याचा छंद पूरा करण्याच्या इराद्याने, चौपाटीवर गेलो होतो. योगायोगाने,ती अमावास्येची रात्र होती.उशिरा घरी आल्यावर,जेवण आटोपून झोपण्याच्या उद्देशाने,पाठ टेकून डोळे मिटून मनाने परत चौपाटीवर गेलो.आणि डोक्यात विचार यायला लागले. आकाशात काळ्याकुट्ट रात्री, म्हणजेच अमावास्येच्या रात्री, ताऱ्यांकडे पाहण्यात,कल्पनेच्या आधाराने त्यांच्या जवळ पोहोचण्या

वय निघून गेले

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 05/05/2024 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
परवा प्रो.देसाईंचा ७४ वा जन्म दिवस.वय जसं निघून जातं तसं आयुष्यात होणाऱ्या चमत्कारांचा आणि सत्यतेचा अर्थ पटायला लागतो.स्पष्ट विचार प्रदर्शीत करताना संकोच आड येत नाही.प्रत्येकाच्या आठवणीतल्या यादीत फरक असणं स्वाभावीक आहे. भाऊसाहेब मला म्हणाले “माझ्या काही आठवणी आहेत.त्या मी तुम्हाला सांगतो.तुम्ही त्या कवितेत उतारा.गद्या पेक्षा पद्यात ऐकाला मला बरं वाटेल” असं म्हणून त्यानी मला आपल्या आठवणी सांगितल्या.त्या मी खलील कवितेत लिहिल्या.

एका मधमाशीचं प्रेत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 05/05/2024 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आजोबांच्या शेतात एक मोठ्ठं फणसाचं झाडं होतं.बरेच पक्षी निरनिराळ्या फांद्यांवर घरटी बांधून रहायचे.एका उंच फांदीवर एक मोठं मधमाशांचे पोळं होतं.पण आणखी काही फांद्यांवर लहान लहान पोळी होती. ज्याजावेळेला मध काढून घेण्यासाठी लोक यायचे तेव्हा मी शेतातून कुठेतरी लांब जात असे. मला असं वाटतं की मधमाश्या मारल्या जाऊ नयेत. जेव्हा या उडणाऱ्या मधमाशीसारख्या कीटकांपैकी एखाद्याच्या बाह्यांगावर चिरडण्याचा दाब पाडला जातो हे मी पाहतो तेव्हा मला माझ्या पोटात गोळा आल्याचं जाणवतं.