मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

लाडका नातू..

आजी ·
मी आज तुम्हाला माझ्या आईने मला माझ्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मला ती अचानक आठवली. ती का आठवली यावर अजून माझा विचार आणि मौन चालू आहे. ही कथा म्हणजे काहीशी प्रचलित बोधकथाच आहे. त्यामुळे नवीन कथा म्हणून त्यात किती मूल्य आहे कोण जाणे. पण "मूल्य" या गोष्टीबद्दल मात्र ही कथा नक्की बोलते. एका गावात एक म्हातारे गृहस्थ राहत होते. त्यांचं वय असेल सत्तरच्या आसपास. त्यांना सगळे आबा म्हणून हाक मारायचे. आबा सत्तर वर्षांचे असले तरी काटक होते. व्यायाम करायचे. दिवसभर काबाडकष्ट करायचे. त्यांना बायको मुलं नव्हती. बायको पूर्वीच मरण पावली होती.

दहीभात...

किल्लेदार ·
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.

माझे संशोधन/अविष्कार - WD-40 सारखा spray!

शानबा५१२ ·
नमस्कार मिपाकर, सरळ मुद्द्यावर येतो. मला फार पुर्वीपासुन म्हणजे २००६, २००७ पासुन रसायनशास्त्रात पी.एचडी करायची होती. फास्ट फोर्वर्ड....ईन शोर्ट, मी खुप हातपाय मारुन मल हव्या त्या मेन्टर(रीसर्च गाईड) कडे त्या लॅबमध्ये प्रवेश ही मिळवला. परत, फास्ट फोर्वर्ड....घाणेरडे अंतर्गत राजकारण, खालच्या दर्जाचे, 'संशोधन' ह्या शब्दाला फाट्यावर मारणारे सो कॉल्ड वैज्ञानिक, नावडता विषय बदलुन न मिळणे, फेलोशिपचे फॉर्म भरुनही, पैसे नावाच साट पण न देणे ह्यामुळे मी १४ ते १५ महीन्यांनी पी.एचडीच्या सर्व स्वप्नांना पुर्णविराम दीला.

फुलपाखरू

मिडास ·
ऐन पावसाळ्यातला माळशेज घाट. बाकीचे मित्र मैत्रिणी इथे तिथे पांगले होते . मस्त हिरव्यागार धुक्यात ती आणि मी दोघे चाललो होतो. एका जलाशयाच्या काठच्या दगडावर जागा बघून आम्ही दोघे बसलो. त्या पाण्यावर पण धुक्याचा हलकासा तवंग पसरला होता. अचानक ते धुकं दाट होऊन आमच्या अवतीभोवती पसरलं . दुरून पावसाचा आवाज ऐकू येत होता. मंजुळ पाय वाजवत तो पाऊस हलकेच जवळ येऊन आम्हाला मिठीत घेतो. त्या गर्द धुक्याच्या मिठीमध्ये मी, ती, तो जलाशय आणि फक्त आमच्या करता पडत असलेला पाऊस. ती माझ्या जवळ होती पण आणि नव्हती सुद्धा. एकमेकांच्या हृदयाची धडधड त्या पावसाच्या आवाजात मिसळून गेली होती.

सांगलीचे कर्णमधूर लेझीम

स्वधर्म ·
आधी ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? या लेखाला प्रतिक्रिया लिहीली होती, पण खालील दुवे आधिक लोकांनी पहावेत असे वाटले, म्हणून सांगलीच्या लेझीम परंपरेचे दुवे छोटा लेख म्हणून देत आहे. बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय.

ढोल ताशा पथके की वेठबिगारी ?

राजेंद्र मेहेंदळे ·
नमस्कार मंडळी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!! कालच अनंतचतुर्दशी झाली आणि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशी अवस्था झाली. आधी महिनाभर तयारी आणि मग दहा दिवस जागून कामे करून थकलेले कार्यकर्ते मंडपातच आडवे झाले किंवा श्रमपरिहाराला गेले. पण दिवस भर आणि मग रात्रभर रस्त्यावर वादन करणारी आणि वेगवेगळ्या मानाच्या/ बिनमानाच्या गणपतींसमोर वादन करून सलामी देणारी ढोलपथके कुठे गेली?त्यांचे ते एकसारखे दिसणारे सुंदर झब्बे लेंगे, टोप्या, मुलींच्या नथी, साड्या आणि मुख्य म्हणजे ते अजस्त्र ढोल , कडकडते ताशे ,ते वाजवताना बेधुंद होऊन नाचणारे वादक , नाचणारे झेंडे ते सर्व कुठे गेले?

संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)

चित्रगुप्त ·
दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे : योगश्चित्तवृत्तिनिरोध: ('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे). अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध: ( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय) आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.

माईलस्टोन....

भम्पक ·
खरं तर दहावीलाच लक्षात आलेलं त्याच्या.परंतु कोणावरही उगीच दडपण आणून काही करायला लावणे हे त्याला पटण्यासारखे नव्हते.म्हणजे स्वतःच्या मुलाबाबत सुद्धा.तरी त्याचे जवळचे मित्र सांगायचे बरका त्याला की पोरांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन नाही चालत.अधून मधून टोकलं पाहिजे,रिव्ह्यू घेतला पाहिजे.तोही ठरवायचा पण पुन्हा तेच.होतंच नसे त्याच्याकडून.त्याला त्यावेळी त्याचा काळ आठवायचा की दादांनी कधीही त्याला टोकलं नाही की विचारले नाही.उलट त्याच्या कोणत्याही निर्णयांचे त्यांनी स्वागतच केले असायचे.अन त्यांचा विश्वास ही होता त्याच्यावर.तो सेम थिअरी लावीत होता स्वतःच्या पोराला.खरं तर त्याचं पोरगही खूप सिंसिअर.

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

मनस्विता ·
M&B अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे. त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून श्रावणी (माझी मोठी मुलगी) आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते.

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३ ·
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.