मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांतरस

इनो संपल्या नन्तर .....

विजुभाऊ ·
लेखनविषय:
हे काय नशीबी आले...हे भाग्य हे असले कसले बघ निघुन गेले सारे साथी...माझे मनोगतही फ़सले मी डोळे उघडुन बघतो..तेंव्हा माझे मला कळते घ्यायला घास मोठा गेलो ...तेंव्हा दंताडच हरवुनी बसले बहर माझा लिहिता लिहिता केंव्हाच सुकोनी गेला फ़ुका कौतुक होत होते...तेही आता अंतरले उरल्या कथा ;जेवण यादी .प्रतिसाद नाही मिपावरती विखार माझा फ़ुसका ठरला...अन विचार वैभव हरले आता शिव्या उरल्या ओठी...... पोटी परी जळजळणे ईनो घेउन.जिवंत रहाणे हेच नशिबी केवळ उरले उपक्रम एकटाच राबवीत बसलो ऐसा मीच मला म्हणूवूनी थोर..

कान्हा

कोमल ·
काव्यरस
श्रावणाच गाण तुझ्या ओठी सुरु होत, ऊन पावसाशी झिम्मा, मन खेळत बसतं॥ इन्द्रधनुच्या कमानीत तुझी कमनीय काया, माझ्या मनाला मोहते,तुझी सप्तरंगी छाया॥ ओठी बासरी तुझ्या, तिचे वेडे खुले सुर, चिंब पावसात भिजे, मन बनून मयूर॥ माथ्यावरी सजे मोरपिसं, जणू पाचूचा खड़ा, आला बघा गं सयांनो, माझा कान्हा-सावला॥ त्याच्या सोनेरी देहाची, सोन्या सारखी किरणे, तशी सोनेरी शेवंती, गाते पहाटेचे गाणे॥ माझ्या सावल्या देहात, "सावल्या"चेच चैतन्य, दर्पणात पाहे मी, माझ्या सावल्या चे बिंब॥ नाही मी राधा, अन मीरा ही नाही तरी तुझीच आस कान्हा धरून मी राही... तरी तुझीच वाट कान्हा पाहत मी राही॥

सार्‍या जातींना खड्यात जावूद्या

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
सार्‍या जातींना खड्यात जावूद्या
सार्‍या जातींना खड्यात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||धृ|| नका कुणी हो जातपात मानू नव्या कल्पना अंमलात आणू जुने विचार मसणात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||१|| ह्या जातींनी काय नाय केलं माणसामाणसात भांडन लावून दिलं सख्खेशेजारी वैरी होती एकमेकांचे गळे कापती मी उच्च तू निच ते म्हणती असलं वाईट वागणं तुम्ही थांबवा या जातींना खड्यात जावूद्या ||२|| ब्राम्हण, मराठा, शिंपी, सोनार तेली तांबोळी कुणगर, महार कोळी कोष्टी कोकणा भामटा भिल्ल रामोशी मातंग बेमटा किती जात

मैत्री...

कोमल ·
लेखनविषय:
काव्यरस
दोन मनांना सांधाणारा पूल म्हणजे मैत्री.. ग्रीश्मातालं शेवंतीच फूल म्हणजे मैत्री.. अवघड वळणावर मारलेला 'कट' म्हणजे मैत्री.. आयुष्यातली गोड्गुलाबी पहाट म्हणजे मैत्री.. तुटत्या तार्र्याकड़े मागितलेली इच्छा म्हणजे मैत्री.. रिकाम्या बेंच वर केलेली प्रतीक्षा म्हणजे मैत्री.. परिक्षेआधी मारलेली नाईट म्हणजे मैत्री.. प्रिंटआउट वरून झालेली फाईटही मैत्रीच.. गालावरचा अश्रु अन खळी सुद्धा मैत्री.. हाडाहुन राकट अन मनाहुन हळवी अशी ... ही तुझी माझी मैत्री...

किती दिवस झाले माहेराला गेले नाही

पाषाणभेद ·
काव्यरस
मंडळी, आज वेळ मिळाला म्हणून लगोलग दोन कविता डोक्याला दोन कवीता सुचवू दिल्यात. (आपल्यावर होणार्‍या अन्यायाबद्दल क्षमस्व.)
किती दिवस झाले माहेराला गेले नाही

दारासमोरचा रस्ता

अवलिया ·
लेखनविषय:
काव्यरस
दारासमोरचा रस्त्यावर असलेले अनेक खड्डे काही लहानपणी गोट्या खेळतांना पडलेले क्रिकेटचे स्टंप लावतांना काही तर काही असेच काळाच्या खुणा बाळगण्यासाठी तयार झालेले. चुकार दगडं मधुनच वर येत पायाला टोचत आणि धुळमाती अंगावर उडवत खेळतांना वेळेचे भान नसे. पावसाळ्यात डबके झालेल्या रस्त्यावर थपथप भरलेल्या पाण्यात मारलेल्या उड्या अन् पायाला लागलेला चिखल घरभर पसरत असे. आता डांबरीकरण झाल्यावर मऊसुत रस्त्यावरुन चालतांना उगाचच पाय कुठेतरी ठेचकाळतो काहीतरी टोचतं आणि चिखल लागल्याचा भास जाता जात नाही.

मैत्रीचे गणित -

विदेश ·
काव्यरस
मैत्रीमधे वजाबाकी दोषांची करावी मैत्रीमधे बेरीज ती गुणांची करावी मैत्रीत हवा गुणाकार मैत्रीत नको भागाकार मैत्रीच्या गणितांमधे शून्याला नकोच आधार ! खेळता खेळता आकड्यांनी मैत्रीचे धागे विणावे विणता विणता धाग्यांनी जाळे सुंदरसे बनवावे मैत्रीच्या जाळ्यात खूप खूप गुरफटावे मैत्रीचे नंतर गणित आयुष्यात ना सुटावे !!

मुलीची आई

शुचि ·
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या सासूबाईंनी केलेली कविता खाली देत आहे - मुलगी जन्मली सगळे म्हणाले लक्ष्मी आली घरी खूप बरं वाटलं, कारण आईच ना मी ||१|| अंगणातल्या चिमण्या घरीदारी नाचतात तरी घरट्याकडे वळतात, सांजेच्या वेळात ||२|| झगे परकरपोलके झाले साड्याचोळ्या ल्याल्या पहातापहाता जरा मोठ्याच दिसू लागल्या ||३|| शिकल्या सवरल्या स्वावलंबी झाल्या आणि मन पोखरू लागल्या, उदासी सावल्या ||४|| आईचं काळीज धडधडू लागलं पण कर्तव्याची जाण मन खाऊ लागलं ||५|| मुलीची जात नाही रहाणार घरात जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६|| तेव्हा वाटलं आत्या व्हावं मावशी व्हावं भावाबहीणींची व्हावं ताई,पण कठीण होणं मुलीची आई

गंध मायेचे..

मेघवेडा ·
लेखनविषय:
काव्यरस
रामप्रहरी माय न्हाणी चेतवी, हो धूम्रसंधी मायमायेनेच होई धूरही इतका सुगंधी! गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे देवचाफ़ा, मोगरा, जास्वंद, प्राजक्ता; अनंता वाही सादर रोज माय, घे सुगंधा भाग्यवंता माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती बोरकरांच्या ’खूप या वाड्यास दारे’ या कवितेने

वाटंतं....

अज्ञात ·
लेखनविषय:
काव्यरस
चांदण्यारात्री गवताच्या पात्यावरच्या दवाबिंदुला फुंकर मारून त्या ओघळणार्या मोत्यांना पाहताना... वार्याच्या खोड्यांमुळे नदीच्या हलणाऱ्या चंदेरी पदराला पाहून... पहाटेच्या गार वार्यात कासेला बिलगून पच पच आवाज करून दुध पिताना वासराला पाहून... मंदिराच्या धुपाने भरलेल्या गाभार्यात घंटानादात मंद तेवणाऱ्या सामायीला पाहून... सांजवेळी वाळूत हळुवारपणे पावलांना शिवून परत मागे पळून जाणार्या अल्लड लाटांना पाहून... एखाद्या तेजोवालायाधारी तपास्वीसारखा स्वतःच्या द्वैताची आहुती देऊन अद्वैत दिनकरला सागरात विलीन होताना साक्ष देताना... वाटतं आयुष्य इथेच थांबावं...