श्रीविठ्ठल : मला उमगलेला
श्रीविठ्ठल :मला समजलेला
१९७८-७९ साल असावं. डॉ.रा.चिं.ढेरे यांचे "महाराष्ट्राचा देव्हारा" हे पुस्तक हातात पडलं. त्या आधी ५-६ वर्षे त्यांचे "लोकसंस्कृतीची क्षितिजे" हे पुस्तकही घेतले होते. शहरात वाढलो, शिक्षण झाले त्यामुळे लोकसंस्कृतीशी ओळख
तोंडदेखलीच. पण मी या पुस्तकाने प्रभावित झालो. त्यांची विद्वत्ता हा काही माझ्या तोकड्या ज्ञानाच्या कक्षेतला भाग नव्हता पण त्यांची शैली, भाषाप्रभुत्व, माहिती गोळा करण्याकरिता घेतलेले श्रम, नित्कर्षाला येईपर्यंत केलेली मांडणी यांनी मी प्रभावित झालो. त्यामुळे "श्रीविठ्ठल:एक महासमन्वय" या लेखाने मी भारावलोच. परत आम्हा दोघांमधला एक धागा, संत साहित्य यावरील श्रद्धा, हाही एक भाग होताच. या लेखात त्यांनी विठ्ठलाचा विचार त्याचे लोकधर्मी रूप, पांडुरंग शब्द कसा आला, बौद्ध अवताराचा परिणाम, कानडा विठ्ठलु इ. गोष्टींचा उहापोह करीत
केला आहे. आजचे माझे लिखाण मात्र थोड्या निराळ्या मार्गाचे आहे. पुढील माहिती नवीन नक्कीच नाही पण एकत्रित सापडेल एवढेच.
.
प्रथम विठ्ठल आणि इतर देव विष्णु, शंकर, देवी, गणपती, राम, कृष्ण इ. यांच्यामधील प्रमुख फरक पाहू.
(१) इतर देवांसारखा विठ्ठलाचा उल्लेख कोणत्याही श्रुति-स्मृति-पुराणात नाही. तसा हा नवा कोरा देव आहे.
(२) कोणी संकटात सापडला म्हणून याचा अवतार झालेला नाही. रावणाचा त्रास त्रिलोकाला झाला, राम आला. कंस-कौरावादी दुष्टांच्या संहाराला कृष्ण अवतारला. कोणताही भक्त संकटात आहे म्हणून विठ्ठल एखाद्या दैत्याचा संहार करत नाही. फार काय, याच्या हातात हत्यारच नाही !
(३) पुडलिकाने धावा केला म्हणून हा आलेलाच नाही. इतर वेळी भक्ताला देवाला भेटावयाची आंस असते, येथे देवालाच भक्ताला भेटावयाची ओढ लागलेली दिसते. बर हा भक्तही great, देव आला तर याने त्याच्याकडे ढुंकुनही पाहिले नाही, मागे एक वीट भिरकावली व "रहा उभा" म्हणाला. देव बिचारा अजून त्या विटेवरच "युगे अठ्ठाविस" उभाच आहे.
(४) पूर्वीची प्रथा पाहिली तर याचे भक्त याला सखाच समजत. "प्रथम भेटीं आलिंगन ! मग वंदावे चरण" !! आता ही प्रथा नाही पण पूर्वी होती. (भृगूने विष्णूला मारलेली लाथ हा आक्रस्थळेपणा सोडला तर) इतर देवांना हे चालेल असे वाटत नाही.
(५) भक्तावर संकट आले की तो देवाची आराधना करतो. काही लाच देतो, फार झालं तर देवालाच पाण्यात घालतो. विठ्ठलाकडे असे काही नाही. क्लेश झाले तर तो आपल्या पूर्वसंचिताचा भाग आहे, मुकाट्याने सोसावयाचे. वाटले तर विठ्ठालाने आपल्याला सहन करावयाची ताकद द्यावी एवढीच प्रार्थना करावयाची. आपला त्रास देवाने आपल्या डोक्यावर घ्यावा हे अमान्य. एकदा चुकून तुकारामबोवांनी "आपले अभंग इंद्रायणीत बुडवले" म्हणून नदीकाठी धरणे धरले. देवाने १३ दिवस पाण्यात राहून ते संभाळले. नंतर बोवांना इतका पश्चात्ताप झाला की त्यांनी जाहीर केले की "एकदा चूक झाली पण आता कोणी मान कापायला आला तरी तुला त्रास देणार नाही."
(६) वारी एकमेकाद्वितीय. काशीयात्रा एकदाच करावयाची, तीही आयुष्याचे शेवटी. इतरही तश्याच. नवस फेडावयाला वा करावयाला. एकट्यने वा फार फार तर कुटुंबाबरोबर. पण दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करवयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत, आपल्या गावातून निघणार्या दिंडीबरोबर. जातांना बरोबर काय असते ? न येऊ शकणार्यांचे मन व ज्ञानेश्वर-तुकारामादी संत संगत आहेत हा विश्वास ! परत येतांना ? जीवनातले कष्ट उचलावयाची उभारी व पुढच्या वर्षीही येण्याचा निश्चय. दिसते असे कोठे इतर ठिकाणी ?
(७) आणखीही सांगता येतील पण तूर्तास इतकेच पुरे.
आता हा विठ्ठल असा निराळा कां याचा विचार करू. प्रथम कोणत्याही पुराणोक्त देवाबद्दल काही बोलतांना, लिहतांना ते पूर्वासूरींच्या लिखाणाविरुद्ध नाही याची काळजी घ्यावी लागते. पण विठ्ठल हा कोरा देव असल्याने तुम्हाला त्याच्या कोणत्याही कथा लिहण्यास वाव मिळतो. संतांनी याचा पुरेपुर फायदा घेतला. आज तुम्हाला विठ्ठलाबद्दल जे वाचावयास मिळते ते या संतांनी लिहलेले. जर नामदेवाला वाटले हा विठ्ठल माझा सखा आहे तर मग त्याने खुशाल लिहावे की देव माझी खीर पितो. आणि मग जनीने तरी का मागे रहावे ? तिने या विठाईला वेणीफणी करावयास लावले, पाणी भरावयास लावले व शेण्याही गोळा करण्याचे काम सोपावले. जर एखाद्या न्हाव्याला वाटले की आज हजामत करण्याऐवजी विठुनामाचा गजर करावा तर त्याचे रूप घेऊन बादशहाची हजामत करणे हे विठोबाचेच काम झाले. आता चोख्या महाराला मंदीरात जाऊन दर्शन घेण्याचे कारणच उरले नाही. देवच त्याचे घरी जेवावयास येऊ लागला. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात विठ्ठलाला कामाला जुंपले. तुमच्या घरांत पाच पंचवीस वर्षे काम करणारी मोलकरीण तुमच्या घराचीच एक व्यक्ती होते. तिला घराचा लळा लागतो. तसे विठ्ठल-भक्त यांचे झाले. विठ्ठलाला भक्तांवाचून चैन पडेना. जेव्हा ज्ञानेश्वर नामदेवाला घेऊन तीर्थयात्रेला जातो म्हणाले तेव्हा नामदेवासारखेच विठ्ठलाला विरहाचे दु:ख सहन होईना ! चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेव कीर्तन करे तेव्हा भक्तांबरोबर विठ्ठलही नाचत असे. म्हणजे भक्त विठ्ठलनामात रमलेले तर प्रत्यक्ष विठ्ठल नामदेवाच्या दर्शनात रमलेले. संतांनी त्याला आई म्हणून बोधिले असले तरी प्रमुख भाव सख्य. या भावनेमुळे संत देवाशी खच्चुन भांडतात. नामदेवांच्या आईचे देवाशी भांडण नळावरच्या भांडणांची आवृत्ती आहे. या संतांनी स्वत:करिता देवाकडे काही मागितले नाही व मग ती प्रथाच पडली.
विठ्ठलभक्तांची एक खासियत. त्यांना मोक्षाची आंस नाही. त्यांनी एकमुखाने त्याची गरज नाही असे सांगितले. आपल्या धर्मातील अंतिम पायरीला ठुकरावले आहे. पंढरीपुढे वैकुंठ दुय्यम आहे. त्यांना भक्तीसुखापुढे, नामसंकिर्तनापुढे मुक्ती त्याज्यच वाटते. नामदेवांपासून तुकारामांपर्यंत सगळ्यंचे अभंग याला साक्ष आहेत. म्हणजे ते द्वैतवादी आहेत कां ? विठ्ठल निराळा व आपण त्याचे भक्त असे ते समजतात कां? अजिबात नाही. तुकारामांच्या प्रसिद्ध अभंगात ते सांगतात
आहे ऐसा देव वदवावी वाणी ! नाही ऐसा मनी अनुभवावा !!
हा अद्वैत, इतक्या रोखठोक शब्दांत बोवांनीच सांगावा. हे कोडे उलगडावयाची ही जागा नाही. (मिपावर अनेक व्यासंगी मंडळी आहेत,ते मार्गदर्शन करतीलच.) आपण आज एवढेच बघणार की या महान चळवळीचे उद्गाते नामदेव महाराज, विठ्ठलाला खीर पाजणारे,
प्रस्तराचा देव ! बोलत भक्तांते !
सांगते, ऐकते ! मूर्ख दोघे !!
या पायरीला कसे पोचले?
"केशवं प्रतिगच्छति" या न्यायाने आपण पोचतो "ज्ञानियांचा राजा गुरू महाराव" ज्ञानदेवांपाशी. या नाथपंथीय बालयोग्याच्या ध्यानात आले की या अथांग,अजाण जनसमुदायाला वाचवावयाचे असेल तर वारकरी समुदाय हाच एकमेव वर्ग आपण लक्षित केला पाहिजे तेव्हा त्यांनी प्रथम नामदेवांना त्यांच्या भक्तीतील त्रुटी ध्यानात आणून दिल्या व सर्व जातींतील संतांना आपले तत्वज्ञान प्रेमाने समजावून दिले. सर्वांच्या सोबत वेळ काढावयाचा म्हणून तीर्थावळीत वेळ घालविला. अल्प काळांत सर्वांना हा "महाविष्णुचा अवतार" आपला सखा, आई वाटू लागला. त्यांनी ज्ञानेश्वरी एखादेवेळी कळण्यास अवघड जाईल म्हणून अभंग रचले. सर्वांभूती परमेश्वर हे पटवून देऊन जातींमधील उच्चनीचपणाचा फोलपणा उघड केला. आपण त्या ईश्वराचेच अंश आहोत हे कळल्यावर मुक्ती ही मागण्याची गोष्ट नाही. सांसरिक क्लेश मला होत नाहीत, माझ्या शरीराला होतात हे कळल्यावर त्यांचे त्रास होणे कमी झाले. थोडक्यात वारकरी पंथाच्या भक्तीला ज्ञानाची जोड दिली. या भक्तीला एका उंचीवर नेऊन ठेवले. आपले चित्विलासवादी अद्वैत बेमालुमपणे त्यांच्या भक्तीत मिसळून टाकले. इतक्या हळुवारपणाने, माउलीच म्हणतात तसे
का कमलावरी भवरं ! पाये ठेवति हलुवार !
कुचुंबेल केसर ! इया शंका !!
ज्ञानेश्वरीत हे ओवीओवीत सांगितले म्हणून नामदेव म्हणतात ’ एक तरी ओवी अनुभवावी " थोडक्यात विठ्ठलाची भक्ती कशी करावी याचाच धडा घालून दिला. विठ्ठल, त्याची भक्ती व भक्त यांना एकरूप केले.
हाच मला उमजलेला विठ्ठल.
( या व मागील सोयराबाईवरील लेखांत प्रत्येक संबंधित जागी अभंग नाही तरी त्याचा भाग द्यावा असे वाटत होते. पण लेख वाढवणार तरी किती? क्षमस्व.)
शरद
वर्गीकरण
हिंदु धर्मात वेळोवेळी एक नवी
In reply to हिंदु धर्मात वेळोवेळी एक नवी by स्पंदना
+१
In reply to हिंदु धर्मात वेळोवेळी एक नवी by स्पंदना
जेंव्हा जेंव्हा या धर्मात
अतिशय उत्तम लेख.
सुंदर
फारच सुंदर लेख. एका नविन
सुंदर लेख.
सुरेख लेखन !
शरद सरांचा नेहमीप्रमाणेच
काय बोलावे..
In reply to काय बोलावे.. by राघव
+१
अप्रतिम !!
विठ्ठलाविषयीच पण थोडे अवांतर
In reply to विठ्ठलाविषयीच पण थोडे अवांतर by रमेश आठवले
'कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू ‘
In reply to 'कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू ‘ by सस्नेह
नै, ती कथा अंमळ वेगळी आहे.
In reply to नै, ती कथा अंमळ वेगळी आहे. by बॅटमॅन
विजयनगरचा राजा पंढरपुरातली
In reply to विजयनगरचा राजा पंढरपुरातली by प्रचेतस
अर्थातच. कथेचे एकूण नेचर
In reply to अर्थातच. कथेचे एकूण नेचर by बॅटमॅन
माझ्या माहितीत तरी नाही.
In reply to माझ्या माहितीत तरी नाही. by प्रचेतस
रोचक आहे!
In reply to विजयनगरचा राजा पंढरपुरातली by प्रचेतस
दोन पैसे.
In reply to विजयनगरचा राजा पंढरपुरातली by प्रचेतस
तिरुपती मध्ये तामिळ शिलालेख
In reply to विठ्ठलाविषयीच पण थोडे अवांतर by रमेश आठवले
विठ्ठलाच्या दर्शनास जातो हे बर्याच लोकांना माहित नसावे.
खूपच छान
सुरेख लेखन शरदसर.
पण विठ्ठल हा कोरा देव
लेख खूपच आवडला
विठ्ठल आणि इतर देव , वारी आणि
In reply to विठ्ठल आणि इतर देव , वारी आणि by बाळ सप्रे
हेटाळणी
In reply to हेटाळणी by शरद
भक्तावर संकट आले की तो देवाची
In reply to भक्तावर संकट आले की तो देवाची by बाळ सप्रे
हेटाळणी ? नाही बाबा
आवडला लेख.
वाचनीय लेख
छान लेखन
मस्त लेख!
उत्तम लेख आणि सप्रे यांना
सुंदर लेख