गाभा:
https://m.timesofindia.com/india/tipu-a-symbol-of-communal-harmony-says-...
दक्शिणेतील औरंगजेब असणारा, हजारो हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांची कत्तल करणारा टिपू सुलतान हा पप्पूच्या मते धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे. मतांसाठी पप्पू आणि नीच खांग्रेसी किती खालच्या थराला जातात हे यावरून दिसते. हा नालायक काल वीर सावरकरांना नावे ठेवत होता आणि आज टिपूचे कौतुक! या यादीत टिपूच्या बरोबरीने औरंग्या, अफजलखान, खिलजी, गझनीचा महंमद इ.ना ही मानाचे पान द्यावे ही पप्पूकडे प्रार्थना.
प्रतिक्रिया
22 Mar 2018 - 11:44 am | विशुमित
अभिनंदन! सकाळीसकाळी मुसलमान शासकांचे नाव घेतल्याने रात्री साठलेली मळमळ बाहेर पडून आता जरा बरे वाटत असेल, नाही ?
22 Mar 2018 - 2:08 pm | श्रीगुरुजी
सकाळीसकाळी माझी पोस्ट वाचून अनेक दिवसांपासून साठलेली जळजळ कमी झाली का?
22 Mar 2018 - 2:11 pm | श्रीगुरुजी
बादवे, तुमच्या साहेबांना खांग्रेसने पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याची पुडी ऐकून महिरला असाल ना!
22 Mar 2018 - 3:38 pm | विशुमित
बिलकुल नाही..!!
पण तुम्हाला मळमळ झालेली दिसते.
22 Mar 2018 - 3:51 pm | श्रीगुरुजी
सुदैवाने जे होणारच नाही, त्याने आमच्यावर कोणताही परीणाम होत नसतो.
22 Mar 2018 - 4:20 pm | arunjoshi123
ती नावे अष्टौप्रहरी अंतःकरणात साठलेली असल्याने आत्मा शांत राहत असेल नाही?
22 Mar 2018 - 11:56 am | मराठी_माणूस
एक चांगली बातमी. एका हताश शेतकर्याला धीर देणे ही गोष्ट खुप सकारात्मक आणि दिलासा देणारी.
https://www.loksatta.com/mumbai-news/jalna-farmer-destroy-tomato-caulifl...
22 Mar 2018 - 12:25 pm | विशुमित
त्या शेतकऱ्याला मातोश्रीवर बोलवून घेतले ते बरे झाले. त्यानिमित्ताने त्याला मुंबई पाहायला मिळाली (पूर्वी पाहिली नसेल तर) आणि दुसरे म्हणजे मातोश्री मध्ये नेत्यांचे जीवन कसे आहे हे देखील अनुभवायला मिळाले असेल.
उद्धव ठाकरेंनी शक्य असेल तर आता त्या शेतकऱ्याच्या मळ्यात जाऊन प्रश्न जवळून समजून घ्यावा. त्याबरोबर शेतकरीपुरक निर्णय कॅबिनेट मध्ये कसे घेता येतील याकडे लक्ष द्यावे.
22 Mar 2018 - 12:41 pm | माहितगार
नेपाळी लोक पाले भाज्यांची आणि कोरीअन लोक फळभाज्यांचे टिकाऊ पदार्थ बनवतात म्हणे . ते पदार्थ आपल्याकडिल चवीस युक्त करुन वापरात आणता आल्यास पदार्थांचा टिकवणूक कालावधी वाढवता येईल का असा विचार आला.
टमाट्यांचा नाश करणे मात्र पटले नाही कारण टमाट्यांच्या कॅचपची मार्केटमध्ये डिमांड वाढली आहे. टमाट्याचे टिकाऊ पदार्थान रुपांतरक्ष्ण आणि विक्री अवघड नाही.
22 Mar 2018 - 12:46 pm | बिटाकाका
लोकसत्ता गंडलंय हो, लिंक मध्ये टोमॅट्टो लिहिलं आहे, बातमीत कोबी उध्वस्त केले आहेत.
22 Mar 2018 - 12:47 pm | बिटाकाका
आय मिन विडिओत कोबी नष्ट केले आहेत.
22 Mar 2018 - 5:25 pm | भीडस्त
अहो ज्या शेतकऱ्याला स्वतःचा माल रास्त किंमतीला विकणे दुरापास्त आहे , त्याला तुम्ही हा द्रविडी प्राणायाम करण्याचा सल्ला देताहात.
22 Mar 2018 - 12:16 pm | विशुमित
अयोध्येच्या जागेवर बौध्दांचा दावा...
तळे राखे तो पाणी चाखे अशी त्या अयोध्येतील जागेचे झाले आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news...
22 Mar 2018 - 4:07 pm | arunjoshi123
मुसलमानांकडून जागा घ्यायला हिंदूंसोबत बौद्ध सुद्धा?
22 Mar 2018 - 4:16 pm | मार्मिक गोडसे
बिच्चारे आदीवासी! ज्यांचा त्या भूमीवर हक्क आहे त्या जागेवर कितीही उत्खनन केलं तरी त्यांचे अवशेष सापडणे अशक्य आहे.
22 Mar 2018 - 4:23 pm | arunjoshi123
काय डोकंय! हिंदू डायरेक्ट अॅडवान्सड सिविलायझेशन सोबतच टपकले आभाळातून!!!
22 Mar 2018 - 4:27 pm | मार्मिक गोडसे
काय डोकंय! हिंदू डायरेक्ट अॅडवान्सड सिविलायझेशन सोबतच टपकले आभाळातून!!!
अपेक्षीत प्रतिसाद. हिन्दू ही जीवनशैली आहे असं ऐकलंय.
22 Mar 2018 - 4:50 pm | arunjoshi123
बरोबर ऐकलंय. पेपरात एक सदर असतं - लाईफस्टाइल म्हणून - तेच ते.
====================
बादवे, त्याला धर्म असं लोकल नाव आहे ज्याचा तुम्हाला विटाळ होतो.
22 Mar 2018 - 6:01 pm | मार्मिक गोडसे
बादवे, त्याला धर्म असं लोकल नाव आहे ज्याचा तुम्हाला विटाळ होतो.
स्वच्छंदी जीवनशैली अंगीकारल्यामुळे विटाळ बिटाळ काही होत नाही.
आणि हे लोकल नाव कोणत्या शतकात पडलं?
22 Mar 2018 - 1:33 pm | manguu@mail.com
http://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/others/bangalore/others/...
टिपू इंग्रजांविरुद्ध लढला म्हणजे तो freedom fighter होता.
इंग्रजांची माफी मागणारे , इंग्रजांचे मांडलिक राजे ह्यान्ना सन्मान दिला जात असेल , तर टिपूला कुणी सन्मान दिला तर इतरांच्या पोटात दुखायचे कारण समजले नाही.
22 Mar 2018 - 2:15 pm | श्रीगुरुजी
तुमच्यासारख्यांना ते कधी समजेल याची शक्यता शून्य आहे. कारण मुळातच . . .
22 Mar 2018 - 2:20 pm | manguu@mail.com
तुम्हाला समजले आहे , तर तुम्ही freedom fighter मानू नका.. तसेही तुम्ही कर्नाटकात नाही , त्यामुळे तुम्हाला सुट्टीही मिळणार नाहीच.
22 Mar 2018 - 2:41 pm | श्रीगुरुजी
>>> freedom fighter
LLRC
22 Mar 2018 - 2:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
योग्य बोललास रे मंगू. कर्नाटकातल्या मुकांबिका मंदीरात रोज टिपूची आरतीही म्हंटली जाते.( https://timesofindia.indiatimes.com/india/This-Karnataka-temple-holds-pu...) . अनेक देवळांना त्याने देणग्या दिल्या होत्या.
ईतिहास पुन्हा पुन्हा उकरून काढायचा,उजळणी करायची.. व संशयातीत वातावरण निर्माण करायचे..भाजपावाले अजून किती वर्षे हे करणार कुणास ठाउक. असो.
22 Mar 2018 - 2:25 pm | manguu@mail.com
ते परवा ते इंजिनवालेही खुसफुस करत होतेच , असे होणार म्हणून.
लिंगायतवाले वेगळी चूल मांडतात , तर काँग्रेस जबाबदार . टिपूच्या नावाने सुट्टी घेतली , आरती म्हटली , तर काँग्रेस जबाबदार.
उगाच भूतकाळ उकरण्यापेक्षा प्रत्येकाला १५ लाख कसे देता येतील , हे पहावं .
22 Mar 2018 - 2:35 pm | श्रीगुरुजी
आयसिसमध्ये जा. १५ लाखांबरोबर स्वर्गात मानाचे पान, खजुरांनी भरलेली झाडे, दुधाच्या नद्या, पुष्ट बोकडांचे कळप, ७२ कुमारिका अशी चंगळ होईल.
22 Mar 2018 - 2:38 pm | पगला गजोधर
"१५ लाख खात्यात जमा करून देउ", म्हणणारे कोण ? आयसिसचे रिक्रुटर का ?
22 Mar 2018 - 2:40 pm | श्रीगुरुजी
आयसिसवालेच की. दुसरे कोण?
22 Mar 2018 - 2:48 pm | पगला गजोधर
नमो नमो
---""नमो नमोhttps://www.youtube.com/watch?v=YEBRWiBg10E""---
22 Mar 2018 - 3:16 pm | श्रीगुरुजी
प्रसंग १
एक गावकरी - या वर्षी आमच्या आंब्याच्या झाडाला इतका प्रचंड मोहोर आलाय की त्याला कै-या येऊन त्या सर्व काढून पिकवल्या तर गावात प्रत्येक घरात पेटीभर आंबे देता येतील.
दोन महिन्यानंतर गावक-याच्या दारावर टकटक ऐकू येते. दार उघडले तर बाहेर पगलाबाबू उभे.
"प्रत्येकाला पेटीभर आंबे देण्याचं तुम्ही वचन दिलंय. आणा आंबे." - पगलाबाबू
आजूबाजूचे गावकरी पोट दुखेस्तोवर हसतात.
प्रसंग २
एक विद्यार्थी - मला वर्षभर रोज नियमित मन लावून ४ तास अभ्यास करता आला तर मी पहिला येऊ शकेन.
निकालानंतर पगलाबाबू - तू पहिला येणार अशी प्रतिद्न्या केली होतीस. दाखव मार्कलिस्ट.
आजूबाजूचे पोट दुखेस्तोवर हसतात.
22 Mar 2018 - 3:36 pm | विशुमित
जुमलेधारींच्या स्वप्नरंजनाला पगले लोक (पग तुम्ही नाही बरं) भुलले म्हणायचं, नाही का?
22 Mar 2018 - 3:49 pm | श्रीगुरुजी
कोण जुमलेधारी आणि कसले स्वप्नरंजन? १९७१ चं "गरीबी हटाव" हे स्वप्नरंजन आठवलं का?
22 Mar 2018 - 4:33 pm | बिटाकाका
कुठे त्यांना समजावून सांगायचं प्रयत्न करत आहात, पंधरा लाखाचा विषय गल्लीतल्या तिसरीच्या पोरालाही कळतो. ज्यांना त्याचा वापर करायचा असतो त्यांनी आपली दावण कोणत्या पक्षाची आहे हे तपासून घ्यावे असा सल्ला देतो. मुद्देच काय आहेत बोलायला? १५ लाख? १० लाखांचा कोट? परदेशवारी? बायकोला का सोडले? आईची काळजी का नाही घेत? अमुक खातं अमुक शिकलेल्यालाच का दिलं? ९० वर्षाच्या नेत्याला का धोका दिला? वगैरे वगैरे....असो!
========================
गरिबी हटाव म्हणे, घोषणा देणार्यांचे वंशजच फाटलेले खिसे दाखवून आम्हीच अजून गरीब आहोत दाखवत आहेत. फिर जनता किस झाड कि पत्ती!
22 Mar 2018 - 3:49 pm | मार्मिक गोडसे
एक विद्यार्थी - मला वर्षभर रोज नियमित मन लावून ४ तास अभ्यास करता आला तर मी पहिला येऊ शकेन.
निकालानंतर पगलाबाबू - तू पहिला येणार अशी प्रतिद्न्या केली होतीस. दाखव मार्कलिस्ट.
आजूबाजूचे पोट दुखेस्तोवर हसतात.
म्हणजे पंतप्रधानांनी अभ्यास केलाच नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
22 Mar 2018 - 3:53 pm | श्रीगुरुजी
त्यांची विद्यार्थीदशा फार पूर्वीच संपली.
22 Mar 2018 - 4:03 pm | मार्मिक गोडसे
त्यांची विद्यार्थीदशा फार पूर्वीच संपली.
हो आता त्यांनी फेकुगीरीचे क्लास चालू केले आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची विद्यार्थीदशा कधी संपणार आहे? नेहमी अभ्यास करावा लागेल असं म्हणतात म्हणून विचारलं.
22 Mar 2018 - 8:05 pm | श्रीगुरुजी
ते क्लासबिस घेत नसतात. त्यांना बरीच महत्त्वाची कामे आहेत.
जोपर्यंत हे माफ करा, ते माफ करा, हे फुकट द्या, ते अनुदान द्या अशा मागण्या सुरू आहेत तोपर्यंत मुख्यमंत्र्यांची विद्यार्थीदशा सुरू राहील.
23 Mar 2018 - 12:34 pm | पगला गजोधर
.
संपली असेल पण ओरिजिनल सर्टिफिकेट काही पाहायला मिळाले नाही,
बाकी "ते अविवाहित आहेत" अश्या प्रकारची बातमीच्या कॅटेगरीतील, "ते पास झालेत" अशी बातमी आहे बहुतेक.
23 Mar 2018 - 2:10 pm | श्रीगुरुजी
>>> संपली असेल पण ओरिजिनल सर्टिफिकेट काही पाहायला मिळाले नाही,
आम्ही पाहिले बुवा. स्वत:च्या डोळ्यांवरील अंध मोदी द्वेषाची चाळीशी उतरवलीत तर तुम्हालाही दिसेल. त्यांनी सर्टिफिकेट खोटं असा दुष्प्रचार केला होता ते आता स्वत:चा खोटेपणा मान्य करून दिसेल त्याची माफी मागत सुटलेत.
>>> बाकी "ते अविवाहित आहेत" अश्या प्रकारची बातमीच्या कॅटेगरीतील, "ते पास झालेत" अशी बातमी आहे बहुतेक.
जेव्हा विरूद्ध बोलायला मुद्दे नसतात, तेव्हा हे असं होतं.
22 Mar 2018 - 3:41 pm | manguu@mail.com
आयसिसवाल्यांचे ते घेतील बघून.
हतो वा प्राप्यसि स्वर्गम् ---- तुम्ही तुमचे बघा... कुणीतरी परवाच बोल्लेत ... मंदिर बलिदान मांग रही है ..
22 Mar 2018 - 3:46 pm | श्रीगुरुजी
असं कसं. १५ लाख हवेत ना. आता पळ काढून नका.
23 Mar 2018 - 12:36 pm | पगला गजोधर
१५ लाख तर हवेतच (कारण ते आमचेच आहेत, कोणाचे पिताश्री त्यांच्या खिश्यातुन देणार नाहीयेत. रेफ : वरील भाषण)
पण हिंदू-आयसिस मध्ये न जाता मिळायला हवेत.
23 Mar 2018 - 12:39 pm | बिटाकाका
अरारारा! पैशे खिशातून काढून नेताना पिताश्री आठवले नाहीत, मात्र आणताना आठवत आहेत. दुर्दैव म्हणायचे दुसरे काय!
23 Mar 2018 - 12:46 pm | पगला गजोधर
त्यावेळी खिशातून पैसे काढून घेत असताना, आज "पैसे आणून देऊ" म्हणणारे काय करत होते हेही पाहणे रोचक ठरेल...
23 Mar 2018 - 1:21 pm | बिटाकाका
म्हणजे शेवटी त्या आणू म्हणणार्यांचा द्वेष करायचाच म्हणा! ते नेऊ देणारे दुर्लक्ष करण्याजोगेच आहेत म्हणा.
==========================
तुम्हाला काय वाटते पुढचे सरकार कुणाचे यावे?
23 Mar 2018 - 1:42 pm | पगला गजोधर
.
नेऊ देणाऱ्यांवर नापसंती म्हणून तर आणू-देऊ म्हणाऱ्याला मते मिळाली, पण नंतर कळलं ती फक्त जुमलेबाजी होती.
.
.
ज्या सरकारवर आर एस एस व मनुवादी लोकांचा प्रभाव नसेल असे कोणतेही सरकार मला आवडेल. मग
पंडित जवाहरलाल नेहरूं सारखा पुरोगामी विचारांचा ब्राम्हण पंतप्रधान किंवा अबुल कलाम आझाद यांच्या सारखा पुरोगामी विचारांचा मुस्लिम पंतप्रधान झाला तरी , मला आनंद असेल.
23 Mar 2018 - 1:52 pm | बिटाकाका
आणण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न २ वर्षच असतील, ३ वर्ष असतील किंवा आणताच येणार नाहीत ही सर्व तुमची गृहीतके आहेत. कदाचित कायद्याने आणताही येणार नाहीत, पण प्रयत्न तरी होत आहेत. आश्वासन देताना पुढे स्विस देश काय काय धोरणे स्विकारतील ही गृहीत धरले होते हेही तुमचेच गृहीतक असावे. आम्ही अमुक करू म्हणजे तसा प्रयत्न केला जाईल असेच असते ना जाहीरनाम्यांमधे? आजपर्यंत कधीही तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यांबद्दल टीका करताना दिसला नाहीत, ते आवडले नाहीत म्हणून याना आणले वगैरे हे सोयीस्कर उत्तर झाले.
=========================
ब्राह्मण, मुस्लिम अत्यंत अप्रस्तुत आहे या उत्तरात असे मला वाटते. पण तरीही असं मुळमुळीत नको हो, भारतात सध्या काही अध्यक्षशाही नाही त्यामुळे ते सोडून द्या. सध्यातरी सरळ लढत भाजप वि. काँग्रेस अशीच आहे. भाजप हरावी असे आपल्याला वाटते हे तर उघडच आहे (निदान मला तरी तसेच दिसते) मग काँग्रेस जिंकावी असे आपल्याला वाटते का?
23 Mar 2018 - 1:56 pm | पगला गजोधर
आर एस एस व मनुवादी लोकांचा जोवर भाजपवर नियंत्रण असेल, तोपर्यंत भाजप हरावी हीच इच्छा आहे.
भाजप हरत असेल तर कोण जिंकतंय याचे मला सुखं ही नाही की दुःखही नाही.
23 Mar 2018 - 2:32 pm | बिटाकाका
तुमचा विरोध गोंधळलेला दिसतोय! नक्की मुद्दे/निकष ठरवले ना मग दोनतोंडी भूमिका घ्याव्या लागत नाहीत असे मला वाटते. जे निकष काँग्रेस सरकारला निवडून आणण्यासाठी/निवडून आलेले चालण्यासाठी आहेत तेच भाजपला लावले तर कुठेतरी बुद्धिवादी निवड होईल ना! नाहीतर मग सरळ मला भाजप/काँग्रेस आवडते, त्यांचे नेते आवडतात म्हणून समर्थन जाहीर करावं!
----------------------------------
भाजप धार्मिकता जोपासते म्हणून आवडत नाही म्हणाल तर काँग्रेसला त्या निकषावर पाठिंबा देणे हास्यास्पद आहे. जातीयवाद हा धर्मवादापेक्षा जास्त हानिकारक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
----------------------------------
थोडक्यात भाजप सरकार कसं चालवतोय, या देशात विकास कुठल्या दिशेने होतोय वगैरे मुद्दे गौण आहेत आणि तथाकथित मनुवाद, आर एस एस चं नियंत्रण वगैरे मुद्दे महत्वाचे आहेत.
23 Mar 2018 - 1:59 pm | पगला गजोधर
अजून एक पुरवणी :
"काँग्रेसमुक्त" म्हणजे काही लोकं, सोईस्करपणे "आर.एस.एस युक्त" असा घेणार असेल तर...
काँग्रेस माझ्यासाठी आर.एस.एस पेक्षा लाखोपटीने हितकारक.
23 Mar 2018 - 2:18 pm | श्रीगुरुजी
>>> पण नंतर कळलं ती फक्त जुमलेबाजी होती.
http://www.misalpav.com/comment/987973#comment-987973
>>>
ज्या सरकारवर आर एस एस व मनुवादी लोकांचा प्रभाव नसेल असे कोणतेही सरकार मला आवडेल.
LLRC
>>> पंडित जवाहरलाल नेहरूं सारखा पुरोगामी विचारांचा ब्राम्हण पंतप्रधान किंवा अबुल कलाम आझाद यांच्या सारखा पुरोगामी विचारांचा मुस्लिम
नेहरू आणि आझाद हे पुरोगामी? LLRC
23 Mar 2018 - 1:40 pm | manguu@mail.com
६० वर्षे काँग्रेसने घोटाळे केले म्हणे.
मग तेंव्हाचे विरोधी पक्ष काय करत होते ?
23 Mar 2018 - 2:01 pm | श्रीगुरुजी
>>> रेफ : वरील भाषण)
http://www.misalpav.com/comment/987973#comment-987973
22 Mar 2018 - 2:39 pm | श्रीगुरुजी
>>> संशयातीत वातावरण निर्माण करायचे..
माईसाहेब,
आज सकाळीच वाट्टं!
बादवे, "ह्यां"ना नवीन आयडी मिळाला का?
22 Mar 2018 - 3:08 pm | मार्मिक गोडसे
टिपू भारतीयच होता ना?
22 Mar 2018 - 3:18 pm | श्रीगुरुजी
टिपू अत्यंत क्रूर, अत्याचारी, धर्मांध मुस्लिम होता.
22 Mar 2018 - 3:43 pm | manguu@mail.com
मग कर्नाटक सरकार त्यांचा दरवर्षी happy birthday का करते ?
22 Mar 2018 - 3:45 pm | श्रीगुरुजी
याचे स्पष्टीकरण धाग्याच्या गाभ्यात आहे.
22 Mar 2018 - 3:54 pm | manguu@mail.com
कर्नाटकला कळवा
22 Mar 2018 - 6:09 pm | arunjoshi123
आपण लै वैविध्यपूर्ण लोक आहोत. बाबर, औरंगजेब, शिवाजी, संभाजी, दारा शिकोह, इंग्रज, परकीयांचे गुलाम, पेरियार, फुले, टिपू, गांधी, गोडसे, नेहरू, बोस, इ इ सर्वांचा बड्डे आपण करतो.
22 Mar 2018 - 6:05 pm | arunjoshi123
झाडून एकन एक भारतीय हा अत्यंत देशप्रेमी, सर्वगुणसंपन्न इ इ असावाच असं काही नसतं गोडसे. काही भारतीय ९९.९९९९% पाकिस्तान्यांपेक्षा विकृत असू शकतात.
===========
पुरोगाम्यांचं आणि बेस्सिक अकलेचं एवढं का वाकडं असावं?
22 Mar 2018 - 6:07 pm | मार्मिक गोडसे
झाडून एकन एक भारतीय हा अत्यंत देशप्रेमी, सर्वगुणसंपन्न इ इ असावाच असं काही नसतं गोडसे. काही भारतीय ९९.९९९९% पाकिस्तान्यांपेक्षा विकृत असू शकतात.
हे कोण ठरवतं?
22 Mar 2018 - 4:39 pm | arunjoshi123
https://www.dailyo.in/politics/veer-savarkar-bhagat-singh-mahatma-gandhi...
मोगलांची दोन दोनदा माफी मागणारे शिवाजी महाराष्ट्राचे आद्य दैवत कसे काय असू शकतात?????????????
===========================
तितकंच नव्हे -
गब्बर सिंगच्या चरणी वाकणारे अमिताभ आणि धर्मेंद्र बॉलिवूडचे सुपरस्टार कसे असू शकतात??????????????
================================================
तुम्ही नंतर काय धुळ उडवली ते आम्ही गिनत नाही, मग तो शिवाजी असो, सावरकर असो, अमिताभ असो. तुम्ही वाकले ना, काम तमाम!!!!!!!!!! काय मंगू, हेच ना तुझं लॉजिक?
==============
अरे हां मंगू, प्रत्येक नियमाला अपवाद असतोच. म्हणून सिरियल अपोलोजाय्जर - पुरोगामीकंठमणी नरोत्तम विरसिंह स्वतःठारपुरोगामी अरंरंरंविंदसाहब केजरीवालजी महाराज बनिये* - हे एक अपवाद आहे, त्यांच्या सुनिश्चित यू-टर्न ऑन अपॉलॉजि सहित!! बरोबर? शिवाजी कसा अपवाद असू शकतो? कारण शिवाजीला अपवाद म्हटलं कि मग सावरकाराला का नाही म्हणायचं हा अवघड प्रश्न उद्भवतो.
22 Mar 2018 - 5:05 pm | arunjoshi123
http://www.dailypioneer.com/todays-newspaper/nehru-termed-bose-your-war-...
नेताजी सुभाष चंद्र बोस यांना युद्धगुंड म्हणणार्या नेहरूंच्या वतीने "तुमच्या" प्रगल्भ पुरोगामी लिंगायतधर्मसंस्थापक पणतवाकडनं माफी घेणार का नाही?
22 Mar 2018 - 5:25 pm | अभ्या..
जोशानु,
ध्रुवीकरणातली तुमची मास्टरी बघता स्तिमित झालेलो आहे.
22 Mar 2018 - 5:51 pm | arunjoshi123
सर्व विचारसरणींमधिल महान महान आणि नीच नीच सवते काढायचे ध्रुवीकरण आवश्यक असावे.
22 Mar 2018 - 5:53 pm | चिनार
तू नॉर्मलला आला की त्यांना काय म्हणायचंय हे जरा इस्कटून सांगशील रे अभ्या...
22 Mar 2018 - 6:00 pm | arunjoshi123
पुरोगाम्यांना अक्कल माफ असते यावर वारंवार शिक्कामोर्तब होत असतं.
23 Mar 2018 - 10:20 am | चिनार
ओ मामा..तसं तुम्हाला काय म्हणायचंय हे तुम्हाला तरी कळतं का हा एक प्रश्नचं आहे. पण आंतरजालावर आणि वैयक्तिक आयुष्यात मला एखादी गोष्ट कळत नसल्यास एखाद्या जाणकाराकडून ती समजून घेण्याचे अधिकार मी राखून ठेवले आहेत. आणि जाणकार कोण हे ही ठरवण्याचे अधिकार माझ्याजवळच आहेत.
पुरोगामी वगैरे लेबलं लावून आमच्या अकलेची जाहिरात करू नका. तुमचा आणि आमच्या अकलेचा दुरुनही संबंध नाही. तुज आहे ना तुजपाशी, मग आमचं असेना का गहाण सावकारापाशी..!
23 Mar 2018 - 3:27 pm | arunjoshi123
याला पुरोगामी अहंकार म्हणतात: एखादी गोष्ट कळायची स्वतःची अर्हता १००% असतेच असते. दुसरा काय म्हणतोय ते न कळायचा कधीही प्रश्नच उद्भवत नाही. आणि उद्भवला तर असा मुद्दा आपल्या दृष्टीनं तर निरर्थक असतोच पण मांडणार्याच्या दृष्टीनंही निरर्थक असतो. याला म्हणतात कॉन्फिडन्स.
26 Mar 2018 - 1:30 pm | चिनार
एका वाक्यात उत्तरे द्या.
१. अहंकाराचे प्रकार किती आणि कोणते असतात?
अजो उत्तर : अहंकाराचे साधारणपणे तीन प्रकार असतात. साधा अहंकार, फोडणीचा अहंकार, आणि पुरोगामी अहंकार. याशिवाय गरज पडल्यास अहंकाराचे इतर प्रकार सोयीस्करपणे करता येतात.
..थांबा थांबा अजो..अहो किती बोलताय तुम्ही. एका वाक्यात उत्तर हवं होतं.
अजो: हे बघा ह्याला म्हणतात पुरोगामी अहंकार...!!
अजो ह्यांना शंभर पैकी शंभर मार्क्स...
22 Mar 2018 - 6:11 pm | उपेक्षित
महाराजांचा एकेरी उल्लेख अजिबात पटला नाही जोशी, तुमचे गेल्या काही दिवसातील प्रतिसाद पाहून अक्षरशः हसावे कि रडावे कळत नाहीये, कारण प्रतिसादाची पातळी खूप खालच्या थराची वाटली.
उत्साहाच्या भरात निदान आमच्या शिवाजी राजांना तरी सोडाल कि नाही ?
असो बाकी तुमची धुळवड चालू दे.
22 Mar 2018 - 6:12 pm | उपेक्षित
महाराजांचा एकेरी उल्लेख अजिबात पटला नाही जोशी, तुमचे गेल्या काही दिवसातील प्रतिसाद पाहून अक्षरशः हसावे कि रडावे कळत नाहीये, कारण प्रतिसादाची पातळी खूप खालच्या थराची वाटली.
उत्साहाच्या भरात निदान आमच्या शिवाजी राजांना तरी सोडाल कि नाही ?
असो बाकी तुमची धुळवड चालू दे.
22 Mar 2018 - 6:19 pm | मार्मिक गोडसे
आर्थिक संपन्नता आली की डेरींग वाढते.
23 Mar 2018 - 3:30 pm | arunjoshi123
हातात बांबूचे सुप्रसिद्ध पोकळ फोक आले तरी डेरिंग वाढतेच. पंतप्रधानांची सगळी झेड-कॅटेगिरी सुरक्षा कवचे तोडून त्यांच्या क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष वर मारण्याइतका आत्मविश्वास येतो गोडसेंना एका फोकामुळे!!!
23 Mar 2018 - 3:39 pm | मार्मिक गोडसे
पंतप्रधानांनीच तसे जाहीर चॅलेन्ज दिले होते व शिक्षा भोगायला तयार होते. झेड-कॅटेगिरी सुरक्षा तोडन्याचा संबंध येतोच कुठे?
23 Mar 2018 - 4:40 pm | arunjoshi123
अहो, एरवी एवढं पुरोगामी ज्ञानाचं प्रदर्शन करता, साध्या कायद्याच्या नि नैतिकतेच्या गोष्टी माहित नाहीत का तुम्हाला? उद्या एखाद्या स्त्रीनं असलंच आव्हान दिलं तर भर चौकात तिच्यावर अन्याय कराल काय? तो मोदी काहीही आव्हान देईल, तुमच्या जीभेला मर्यादा नको का? तुमची नैतिकता त्याच्यापेक्षा एव्हढी उच्च असल्याची ग्वाही देत फिरता, तर तो देखील करोडो लोकांचे आदरस्थान आहे हे उमगून बोलत चला ना.
==========================
देशाच्या विद्यमान पंतप्रधानांना भर चौकात बांबूच्या फोकानं बडवून काढीन हे कसले विचार आहेत?
23 Mar 2018 - 4:51 pm | मार्मिक गोडसे
अहो, एरवी एवढं पुरोगामी ज्ञानाचं प्रदर्शन करता,
कुठं केलंय?
खुद्द पंतप्रधानानी असली फालतू आव्हानं देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून जनतेला दिलासा द्यायला हवा होता.
23 Mar 2018 - 4:53 pm | सालदार
<तो मोदी काहीही आव्हान देईल>
मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि मुदलात त्यांनीच जबाबदारीने बोलणे अपेक्षित आहे. ते जर म्हणत असतील कि मला भर चौकात फटके मारा म्हणजे त्या म्हणण्याला देशाच्या पंतप्रधानांचे वजन प्राप्त होते हे विसरता कामा नये.
22 Mar 2018 - 6:31 pm | पगला गजोधर
जाऊ द्या, प्रतिसाद घाईत टंकताना नजरचूक झाली असेल जोशी यांच्या कडून.
त्यांचं सुद्धा तुमच्या आमच्या किंवा इतर मिपाकरासारखेच महाराजांवर प्रेम व आदर असेल असा माझा विश्वास आहे.
23 Mar 2018 - 3:30 pm | arunjoshi123
सही पहचाने हो.
22 Mar 2018 - 8:18 pm | श्रीगुरुजी
इथेही शिवाजी महाराज व थोरले बाजीराव पेशवे यांचा एकेरी उल्लेख आहे.
22 Mar 2018 - 9:08 pm | बिटाकाका
आता ते इकडे फिरकणार नाहीत. उत्तरे देने हे उत्तरदायित्व नसावे.
=========================
वरील प्रतिसादात जोशींनी केलेले महापुरुषांचे सगळे उल्लेख हे उपरोधिक आहेत असे माझे अतिसामान्य ज्ञान सांगते. कोणाच्याही महाराजांबद्दलच्या प्रेमाबद्दल आक्षेप घेणारे सगळे मला दांभिक वाटतात. महाराजांबद्दल खोटा आदर दाखवण्याची गरज का भासते, महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मराठी माणसात तो भाव, प्रेम, आदर जन्मजात आहे असे वाटत नाही का?
24 Mar 2018 - 7:42 pm | उपेक्षित
अरुण जोशी या माणसाशी व्यक्तिगत काहीही दुष्मनी नाहीये रादर खरडीत काही गप्पा पण झाल्या आहेत आमच्या. त्यांची काही ललित डोळ्याखालून घातली आहेत त्या आधारे एक वाचक या नात्याने त्यांना जे वाटले ते लिहिले आहे.
जोशी समजून घेईल असे वाटले होते पण .... असो.
बाकी बीटाकाकाला फाट्यावर मारत आहे. उगा अंगावर आलास तर शिंगावर घेईल इतकेच सांगतो बीटा ला.
24 Mar 2018 - 9:42 pm | बिटाकाका
मग माझ्याशी काही दुश्मनी वगैरे आहे का तुमची?
=====================
तुम्ही जसे मत मांडलेत तसे मी मांडले, जनरल पद्धतीने, वैयक्तिक नाही. माझ्या प्रतिसादातील तुम्हाला काही खटकले असेल तर सांगा. मला मानापमानाचं काय नसतं, माफी मागायला कमीपणा वाटत नाही.
=====================
मला वाटते एकमेकांना वाईट, हेतुपुरस्सर वैयक्तिक उणेदुणे बोलणे यात मोठे कौशल्य नाही. उलट एकमेकांना आदराने कसे बोलावे हेच मोठ्या प्रयत्नाने शिकले आहे. त्यामुळे तुमचा माझ्याबद्दलचा एकेरी उल्लेख फाट्यावर मारने जास्त सोपे आहे.
=====================
तरीही तुम्हाला त्याच भाषेत मला बोलायला हवे (किंवा माझी तीच लायकी आहे) असे वाटत असल्यास प्रतिसाद नाही दिलात तरी चालेल, शुभेच्छा!
25 Mar 2018 - 2:40 pm | उपेक्षित
दुष्मनी काह्याला असल मामा ? उगा तुमच्या फालतू धुळवडीत आमास्नी वढू नगा इतकेच सांगतो, बाकी माफी बीफी नगा मागू मामा हा विषय इथेच सोडतोय मी तुम्ही पण सोडलात तर उत्तमच राहील.
आपल्याला ना त्या पप्पू राहुल्याच सोयर हाये ना त्या उद्धट शहा-मोदी जोडीच सुतक, तुमचे चालुदे बाकी.
२०१९ साली चुकून भाजप आली तर मला व्यक्तिशः मनोहर पर्रीकर यांना PM झालेले बघायला खूप आवडेल... असो हे होणे शक्य नाही हे माहिती आहे.
23 Mar 2018 - 3:13 pm | arunjoshi123
आंतरजालावर भाषा कशी असावी याबद्दल लोकांच्या अपेक्षा आहेत हे बघून हायसं वाटलं. आपल्या देशाची सर्व आदरस्थानं एका मर्यादेतच संबोधली जावीत अशी अपेक्षा सर्वांकडूनच असावी. देशाची सर्व आदरस्थानं असोच, इथे संवाद करणार्या सर्व व्यक्तिंना देखील एका किमान आदरानं संबोधावं असा संकेत सर्वांसाठीच लागू असावा.
========================================
जोपर्यंत मी दिलेल्या, द्यायच्या व्यक्तिगत आदराचा प्रश्न आहे, इतिहासातले शिवाजी (महाराज) असोच, मला आजच्या संभाजी ब्रिगेडच्या अनेक कार्यकत्यांचा देखील आदर आहे. (ब्रिगेडी लोकांशी इतका संवाद करतो म्हणजे सन्मान असेलच ना, नाहीतर सोडून दिलं असतं. संवाद करून पत्करलेल्या पराभवापेक्षा असा असंवाद अधिक अपमानकारक असतो. ) म्हणजे मी ब्राह्मण असलो आणि ते ब्राह्मणद्वेष्टे असले तरी त्यांचा संभाजी (महाराजां) बद्दलचा अभिमान खराखुरा आहे हे सत्य आहे नि तो सन्मानास पात्र आहे.
===================================================
आदरणीय व्यक्तींची एक लिग असते ज्यांच्याकरता एकवचन वापरतात. देव आले न म्हणता देव आला म्हणतात. राम बोलला, कृष्ण बोलला असं म्हणतात. ज्ञानेश्वररावपंत न म्हणता ग्यानबा, ग्यान्या म्हणतात. तुका, तुक्या म्हणतात. भगत सिंग, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, यांना पण ऐकेरीच संबोधतात.
फक्त शिवाजी म्हणताना एकेरी आणि महाराज किंवा शिवाजी महाराज अनेकवचनी लिहितात असं माझं निरीक्षण आहे. पुस्तकी, शहरी, बामनी भाषेत शिवाजी महाराज असं म्हटलं जातं. गावाकडे महाराज शब्द नाही आला तर - "शिवाजीनं मोगलांला अस्ला गुंगारा दिला, अस्ला गुंगारा दिला, कि ...." अशा प्रकारची वाक्यरचना करतात. यात ओतप्रोत आदर असतो.
======================
शिवाजी महाराजांना एकेरी बोलू नये अशी जालावर उघड व्यक्त केली जाणारी अपेक्षा महाराजांची प्रतिमा महाराष्ट्रात पातळ झाल्याचं लक्षण असावं. म्हणजे पुतळ्याची बिटंबना वारंवार होऊ लागली तरच पुतळ्याकडे फिरकणार्या व्यक्तिकडे अधिकाधिक शंकेनं पाहिलं जाऊ लागतं, मग तो किती का चांगला भक्त असेना.
====================================
भारतात समबुद्धी, सेक्यूलरीझम आणि पुरोगामीत्वाचा प्रभाव वाढल्यापासून शिवाजींचे शत्रू श्री औरंगजेबजी यांना देखील आदराने संबोधावे लागेल असे दिसते. ते तर असोच, औरंगजेबजींचे छान छान आजोबा अकबरजींना सुद्धा आम्हाला एकेरी बोलून सवय आहे. ती ओसामाजींचे भक्त दिग्विजयसिंगजी सगळंच कंफ्यूजन करून ठेवलं आहे. सावरकर अतिरेकी, विवेकानंद धर्मांध, देवी दुर्गा वेश्या, बोस युद्धगुंड ही आपली संस्कृती होऊ लागली आहे.
23 Mar 2018 - 3:43 pm | पुंबा
तिसर्या आणि चौथ्या परिच्छेदांशी संपूर्ण सहमत आहे.
23 Mar 2018 - 3:58 pm | विशुमित
छान प्रतिसाद.
समबुद्धी, सेक्यूलरीझम आणि पुरोगामीत्वाचा प्रभाव यावर खापर फोडलेले फक्त पटले नाही. सुरवात बरीच आधी झाली आहे फक्त त्याची कॉउंटर रेअकशन आता पाहिला मिळत आहे. म्हणून कदाचित तुम्हाला ते रुचत नाही आहे.
22 Mar 2018 - 4:17 pm | arunjoshi123
मुसलमान शासकांनी सरदारकीचे टेंडर काढले तर आपल्या निविदा टाकणारे मराठे किती प्रचंड होते!!! त्यांचे निविदाकारांचे वंशज मिपावरही सक्रीय आहेत. भारताची लायकीच गुलामगीरीत राहायची आहे.
===============
शिवाजीच्या काळातल्या आणि आजच्या घरभेद्यांत एक गुणात्मक फरक काळामानाप्रमाणे निर्माण झाला आहे. तो म्हणजे देशद्रोहाबद्दलचा आत्माभिमान आणि निराधार इतिहासाची खात्री.
22 Mar 2018 - 4:29 pm | विशुमित
मराठे आता असणारी जात म्हणून पकडली की महाराष्ट्रात राहणारे सगळे म्हणजे 'मराठे'?
22 Mar 2018 - 4:44 pm | arunjoshi123
कोणत्याही अर्थानं घ्या, दोन्ही अर्थानं ते विधान सत्य आहे. जातीचे मराठे देखील गुलाम होते आणि महाराष्ट्रात राहणारे जातीचे मराठे नसलेले पण बरेच निविदावाले होते.
==================
ते विठ्ठल (विठू महार फेम) बघितलेले संत जातीचे मराठे नव्हते, पण विजापूरचे गुलाम होतेच ना!
22 Mar 2018 - 4:52 pm | विशुमित
दोन्ही अर्थाने कसे काय घेता येईल ?
एक काय ते सांगा.
:::::::::
तुम्ही ज्या विठठला बद्दल बोलत आहात तो संदर्भ नाही समजला.
22 Mar 2018 - 5:16 pm | manguu@mail.com
त्याना दामाजीपंतांचा संदर्भ द्यायचा आहे.
22 Mar 2018 - 4:39 pm | डँबिस००७
मतांसाठी पप्पू आणि नीच खांग्रेसी किती खालच्या थराला जातात हे यावरून दिसते.
आणी त्यांचे समर्थक सुद्या !
22 Mar 2018 - 6:50 pm | manguu@mail.com
BJP IT cell founder Prodyut Bora quits party; attacks PM Modi, Amit Shah's style
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bjp-it-cel...
``` "Madness has gripped the party. The desire to win at any cost has destroyed the very ethos of the party. This is not the party I joined in 2004,"
Modi had "damaged the democratic tradition of the country
```
22 Mar 2018 - 6:56 pm | विशुमित
पोट भरल्यावर ढेकर देणारच की असा युक्तिवाद चालू होईल.
23 Mar 2018 - 2:35 pm | श्रीगुरुजी
अजून एक यशवंत/शत्रुघ्न/अरूण/नाना
23 Mar 2018 - 3:37 pm | arunjoshi123
मंगु, फेब २०१५ ची बातमी मार्च २०१८ मधे का देत आहेस?
23 Mar 2018 - 5:29 pm | श्रीगुरुजी
एकदा मोदीद्वेष रोमारोमात भिनला की स्थळ काळ वेळ अशा सगळ्या गोष्टींचं भान हरपतं.
22 Mar 2018 - 7:36 pm | गामा पैलवान
आर्थर रोड कारागृहात मल्ल्याला हवा, पाणी मिळणार का याची ब्रिटनच्या न्यायाधीशांना चिंता लागून राहिलीये : https://www.loksatta.com/desh-videsh-news/uk-judge-expresses-concern-ove...
हाहाहा ! एलेलारसी !!
मी काय म्हणतो की न्यायमूर्ती एमा बाईंनी आर्थर रोड कारागृहाची आजिबात चिंता करू नये. नुकतेच सुप्रसिद्ध व्यापारी श्री. दाऊद इब्राहिम यांनी आपणांस अटक करून भारतात अतिसुरक्षित अशा आर्थर रोड तुरुंगात ठेवावं अशी मागणी केली होती. तुरुंगाच्या सुरक्षेची चिंता दाऊद इब्राहिमला नसेल तर कोणालाच असायची गरज नाही!
-गा. पै.
अधिक माहिती : हाच तुरुंग यापूर्वी बॉंब लावून फोडला होता आणि रमा नाईकची हत्या केली होती.
22 Mar 2018 - 8:00 pm | पगला गजोधर
गामाजी,
असा आपल्याला, आपल्या मनाप्रमाणे पाहिजे तो तुरुंग व त्यातली कोठडी, डिमांड करून घेता येते का ?
22 Mar 2018 - 8:09 pm | गामा पैलवान
माहित नाही.
-गा.पै.
22 Mar 2018 - 8:12 pm | गामा पैलवान
बाँब लावून ऑर्थररोड तुरुंग फोडून बाबू रेशीमची हत्या केली गेली. रमा नाईकची नव्हे. चुकीबद्दल क्षमस्व.
-गा.पै.
23 Mar 2018 - 12:24 pm | पगला गजोधर
काय हे गामाजी, आपल्या सारख्या राष्ट्रप्रेमी माणसाने अशी माफी मागू नये. कारण एक तर राष्ट्रप्रेमातील आपल्यासारखी व्यक्ती चूक करत नाहीच, आणि झालीच त्या चुकीची मजाल आपल्या हाताचे साथ सोडण्याची, आपल्या प्रखर जाज्वल्य राष्ट्रप्रेमाच्या प्रभावळीत ती चुक क्षणार्धात भस्म होऊन जाईल.
माफी फक्त बापुड्या आपटार्ड लोकांनी मागायची असते
(हळू घ्या)
22 Mar 2018 - 7:44 pm | मार्मिक गोडसे
चंद्राबाबू नायडूंमुळे नितिशकुमारांनाही बिहारच्या special status आठवण झाली. प्रत्यक्षात नितिशकुमार क्षणभरही ही मागणी विसरले नव्हते असं ते म्हणतायेत.
22 Mar 2018 - 11:14 pm | manguu@mail.com
मोदी सरकारनं विदेशी पैशाच्या पोल फंडिंगसाठी कायदाच बदलला .

गेल्या आठवड्यात 18 सुधारणा असलेलं वित्त विधेयक 2018 हे अर्ध्या तासात प्रचंड गोंधळात मंजूर करण्यात आलं. या 18 दुरुस्त्यांमध्ये 2010च्या फॉरीन काँट्रिब्युशन अॅक्ट, 2010 चाही समावेश आहे. राजकीय पक्षांना विदेशातून मिळणाऱ्या आर्थिक रसदीची चौकशी होणार नाही अशी महत्त्वाची तरतूद यामध्ये करण्यात आली असून भाजपा व काँग्रेस हे दोघेही लाभार्थी असल्याची चर्चा होत आहे. विरोधकांनीही या बदलावर सूचक मौन बाळगलं असून नरेंद्र मोदी सरकारच्या या कृत्याविरोधात कुणीच आवाज उठवलेला नाही, अपवाद एका नेत्याचा, सुब्रमण्यम स्वामींचा.
भ्रष्टाचारविरोधात आघाडी उघडणाऱ्या स्वामींनी एशियन एजच्या या संदर्भातल्या लेखाचा उल्लेख करत ट्विट केलं असून या विधेयकातील दुरूस्तीचं वर्णन टेरिबल म्हणजे भयानक असं केलं आहे. विशेष म्हणजे हा कायदा 1976 पासून पूर्वलक्षीप्रभावानं लागू होणार आहे. पाच महिन्यांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं मोदी सरकारला आदेश दिला होता की, काँग्रेस व भाजपा दोघांनीही या कायद्याचं उल्लंघन केलं असून योग्य ती पावलं उचलावीत. दिल्ली हायकोर्टानं गृह मंत्रालयाला शेवटची संधी दिली होती कारण इंग्लंडस्थित वेदांता रिसोर्सेच्या भारतीय उपकंपनीकडून देणग्या स्वीकारताना भाजपा व काँग्रेस दोघांनीही कायद्याचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं होतं.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-government-legalized-fore...
23 Mar 2018 - 5:24 pm | arunjoshi123
तसं तुमचं वाचनकौशल्य १००% बरोबर आहे. पण माणसानं संध्यानंद सिरियसली वाचू नये हे ही तितकंच खरं आहे.
=====================
भारतीय कंपनी म्हणजे तुमच्या मते काय?
22 Mar 2018 - 11:30 pm | मार्मिक गोडसे
हमाम में सब नंगेl
23 Mar 2018 - 3:39 pm | arunjoshi123
तुम्ही अंतराळवीराचे जॅकेट घालून आंघोळ करता का?
23 Mar 2018 - 3:41 pm | मार्मिक गोडसे
तुम्ही अंतराळवीराचे जॅकेट घालून आंघोळ करता का?
नाही कळलं.
23 Mar 2018 - 2:12 am | manguu@mail.com
सत्तेत आले आणि ह्यांच्यापैकी कुणीतरी पचकले - साईबाबा देव नाहीत , ते मुसलमान होते. हिंदुनो , त्याना नमस्कार करू नका . ( कुणी ऐकले नाही , हा वेगळा भाग )
नंतर इंदिरा , राहूल , नेहरू यांच्यावर चिखलफेक .
गांधींवर चिखलफेक ( पण गांधीजींच्या चरख्यासमोर त्यांच्याच पोजमध्ये फोटू मात्र ह्यान्ना पाहिजे. गंमतच !! )
कम्युनिस्टचा पुतळा फोडला.
बाबासाहेब , घटना , आरक्षण यावर वादावादी सुरुच आहे.
आता टिपू सुलतान !
एकंदर , दुसर्या कोणत्याही समूहाला जे जे उत्तम , उदात्त उन्मत वाटते , त्याला खाली खेचायचे कारस्थान सुरु आहे.
स्वत:च्या पक्षाचा ४० आणि बापपक्षाचा ९० वर्षांचा तजुर्बा ! पण इतराना दाखवायला स्वत:चा असा एकही फोटो , एकही पुतळा नाही. ह्याची किती ही खदखद !!
पुतळा उभारतात ! कुणाचा ? पटेलांचा !! हे म्हणजे दीवारमध्ये ' मेरा बाप चोर है ' असे त्याच्या हातावर ज्याने गोंदवले , त्याचाच पुतळा साक्षात बच्चनने उभारण्यासारखे झाले !!
23 Mar 2018 - 8:02 am | विशुमित
हा हा हा...!!
23 Mar 2018 - 9:24 am | मार्मिक गोडसे
हा हा हा हा हा.....
23 Mar 2018 - 10:19 am | श्रीगुरुजी
उष्ट्रानां विवाहेशु गीतो गायंति गार्धभानि
परस्परं प्रशंसयंते , अहो रूपं अहो ध्वनि|
23 Mar 2018 - 12:38 pm | पगला गजोधर
#GCNA
23 Mar 2018 - 3:36 pm | manguu@mail.com
राणेंनाच राज्यसभाप्रवेशे गीतो गायन्ति शहा:
परस्परं प्रशंसयंते , अहो ढोकळां अहो हापूसम्|
23 Mar 2018 - 10:58 am | बिटाकाका
अमुक एक नेते आमच्या "समूहाचे" हीच तर ती विषवल्ली! ती आमची खाजगी मालमत्ता आहे आणि ती आम्हीच वापरणार! तुमचं स्वतःचं आणा, आमचे का चोरताय, व्वा! हा देशाचं स्वतःची खाजगी मालमत्ता समजल्यावर नेते किस झाड कि पत्ती म्हणा! समूह खूपच गोड शब्द वापरला म्हणा, वास्तवात वोट बँक म्हणायचं असेल!
==========================
सावरकरांवर गुण उधळणारे, श्यामाप्रसाद मुखर्जी, गोळवलकर, टिळक यांच्यावर चिखल फेकणारे वगैरे डोळ्यात खूपत नसतील हो, दांभिकपणा लपता लपेना! मोदींनी गांधींबद्दल काढलेला अपशब्द दाखवा. नाहीतर अंधविरोधकांना मग मोदी गांधीप्रेमी आहेत म्हणायला काय दांभिकपणा कि जळफळाट आडवा येत असेल?
==========================
सामान्यज्ञान वाढवा, भारतात पटेलांचा पुतळाच फक्त उभा राहतोय/राहिलाय का? पण फक्त "गांधी" आडनाव असलेलेच पुतळे, नाव बघायची सवय असलेल्याना बाकी कुठलं दिसतंय म्हणा!
23 Mar 2018 - 11:06 am | विशुमित
<<मोदींनी गांधींबद्दल काढलेला अपशब्द दाखवा.>>>
==>> ते कधी काढणार पण नाहीत कारण त्यांना चांगले माहित आहे सत्तेवरून पायउतार होऊन देश सोडून जावे लागेल.
समर्थक काय गांधीजींचे कोणते ही मॉर्फ फोटो शेर करत राहतील. ओ कोई बडी बात नहीं है!
23 Mar 2018 - 11:15 am | बिटाकाका
चिट भी मेरी पट भी मेरी! मांझं ते मांझंच, तुजं तेबी मांझंच!
23 Mar 2018 - 6:03 pm | arunjoshi123
आरेसेस वाल्यांनीच गांधीजींची हत्या केली असा अनेक पुरोगाम्यांचा जडविश्वास असतो. असाच सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे असा देखील दृढ विश्वास असतो. आणि लोकशाही प्रक्रियेने भाजप सरकार आले आहे हे ही दिसत असते. आणि अपशब्द काढले तर पायउतार व्हावे लागेल याचीही खात्री असते. सगळा आनंदीआनंद!!
23 Mar 2018 - 11:23 am | sagarpdy
तरीही, पुतळ्याचं राजकारण कशासाठी ? त्यातही एक पुतळा ठीक आहे, शिवाजी आणि पटेल दोघांचेही भव्यदिव्य पुतळे कशासाठी ? तेही एका बाजून राज्याची तिजोरी रिकामी आहे अशी बोंब करत ?
जोरदार सहमत.
23 Mar 2018 - 11:32 am | बिटाकाका
याचं उत्तर काही अवघड नाही, व्होटबँक साठी.
=========================
पण राजकारण करतानाही भान ठेवले तर पुतळ्यांसोबत पर्यटन व्यवसाय वाढू शकतो याचा विचार केला जातोय हेही नसे थोडके. पूर्णत्वास जाणार कधी आणि कसे ते माहित नाही पण दोन्हीही प्रोजेक्ट अप्रतिम आहेत (दोन्ही पुतळ्यांच्या वेबसाईटवर जाऊन एकदा बघाच, नुसते पुतळे नाही तर संपूर्ण व्यावसायिक पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता आहे). पूर्ण झाले तर नक्की तिकीट काढून बघायला जाईन.
=========================
तिजोरी रिकामी असण्याचा आणि असल्या प्रोजेक्ट्सचा असा डायरेक्ट संबंध जोडणे पटत नाही. त्या हिशेबाने भारतात कुठलाही प्रोजेक्ट करूच नये आणि प्रत्येकाच्या तोंडात अन्न पडावं म्हणून फक्त मोफत अन्नछत्रे उघडावीत कारण तीच सगळ्यात प्राधान्याची गोष्ट आहे.
23 Mar 2018 - 4:28 pm | arunjoshi123
मंगू, "ह्यांचेपैकी"चा तशास तसा अर्थ काढला तर "तुमच्यापैकी" कोणीतरी ३९ भारतीयांना ते हिंदू आहेत म्हणून इराकमधे मारले आणि बांग्लादेशींना ते मुस्लिम आहेत म्हणून सोडले. कसले हो तुमच्यापैकी लोक?
=====================================================
तुमच्यापैकी सगळेच नेहमी हेच नै का म्हणत असतात कि ह्या शंकराचार्यांनी देश चालवला, ब्राह्मणी पापं केली, करवून घेतली. साईबाबाच्या जन्माच्या काळात १८३८ ला लोक शंकराचार्याला एवढे मानत असते तर साईबाबा एवढा मोठा झालाच नसता. आज शंकराचार्याला कोणी मानत नाही हे ही आपणच म्हणता हे वेगळंच. म्हणजे फक्त पापं खांद्यावर द्यायची असली ब्राह्मण पुढे करायचे.
=========================================================
आता तुम्ही मोदींवर जी फुलं उधळतात ती आम्हाला पण थोडी द्या, आम्ही फुलं उधळू यांच्यावर.
१० लाख लोकांच्या हत्येचे शिंतोडे आहेतच गांधीजींवर.
उरलेले देखील फोडायला पाहिजेत. लेनिन पापी होताच मुळी.
हि काय शास्वत सत्ये आहेत का?
भारतात फ्रेंचांचे राज्य आले असते तर, मंगूच्या पुरोगामी लॉजिक प्रमाणे, इंग्रजांना जाऊन मिळालेले सर्वजण देशप्रेमी ठरले असते.
तुम्ही आहात प्रतीतिहासलेखक वर खेचायला.
एकही पुतळा कसा नाही? शिवाजी महाराजांचा फोटो नि झंडा लावून संघाच्या शाखा चालतात. महाराजांचे पुतळे तुम्हाला दिसत नाहीत का?
=======================
ज्याच्या हातावर गोंदवले वा ज्या बापाला चोर म्हटले, ते प्रत्यक्षात काही चोर नव्हते हा इतिहास आपल्या दोघांनाही माहित आहे, अजून काय पाहिजे?
23 Mar 2018 - 4:57 pm | मार्मिक गोडसे
पुतळा उभारतात ! कुणाचा ? पटेलांचा !! हे म्हणजे दीवारमध्ये ' मेरा बाप चोर है ' असे त्याच्या हातावर ज्याने गोंदवले , त्याचाच पुतळा साक्षात बच्चनने उभारण्यासारखे झाले !!
म्हणजे ज्या व्हिलनने(सिनेमातील) लिहिले त्याचा.
23 Mar 2018 - 6:00 pm | arunjoshi123
ते गोंदवणारे व्हिलेन आहेत का नाहीत हे अगोदर सांगा. व्हिलेन नसले तर दुसरं उदाहरण द्या.
23 Mar 2018 - 5:02 pm | मार्मिक गोडसे
एकही पुतळा कसा नाही? शिवाजी महाराजांचा फोटो नि झंडा लावून संघाच्या शाखा चालतात. महाराजांचे पुतळे तुम्हाला दिसत नाहीत का?
शिवाजी महाराज संघात होते?
23 Mar 2018 - 5:30 pm | manguu@mail.com
शिवाजी महाराज संघात होते?
जोशीना कोण विचारणार ?
महाराजांचा झेंडा आणि संघाचा झेंडा एकच , हे वाचून तर आणखीनच डोळे विस्फारले.
( दोन्ही भिन्न आहेत ना ? एकाची टोके टोकदार असतात आणि दुसर्याच्या टोकाला छोटे त्रिकोण असतात ना ? की दोन्ही सारखेच ? )
23 Mar 2018 - 5:33 pm | श्रीगुरुजी
ते खान्ग्रेस, भ्रष्टव्याधी, शिवसेना इ.त सुद्धा नव्हते.
23 Mar 2018 - 5:50 pm | मार्मिक गोडसे
बरोबर आहे, परंतू त्यांना पुतळ्यांसाठी उधारी करावी लागत नाही.
23 Mar 2018 - 5:54 pm | बिटाकाका
जरा इस्कटून सांगाल का? उधारी म्हणजे काय? कोणते पुतळे कोणाच्या मालकीचे आहेत?
23 Mar 2018 - 5:57 pm | arunjoshi123
पैले भाजपचे आणि सपाचे उधारिवरचे पुतळे वापस करा.
23 Mar 2018 - 5:49 pm | arunjoshi123
कमाले!!!!!
मग तर आज जो काही काँग्रेस पक्ष आहे त्यात टीळक, नेहरू, महात्मा, बोस, इ इ कुणीच नव्हते. हे जे गांधी, पटेल, नेहरू, बोस, जिन्ना, इ इ काँग्रेसी नेते होते त्यांचे पुतळे उभारायचा खरा अधिकार बंशज म्हणून भाजपचाच आहे.
१. इंदिरा गांधी काँग्रेसपासून फुटल्या आणि वेगळा पक्ष स्थापन केला. त्या वेगळ्या पक्षाला काँग्रेसची निशाणी मिळाली नाही.
२. मूळ पक्ष ज्या पक्षांत सामिल झाला त्याच्यांपैकी आज फक्त भाजप उरला आहे.
३. आजची काँग्रेस मूळपासून फुटलेली आणि सुजलेली (आणि पुन्हा सुकत असलेली) शाखा आहे.
४. ओरिजनम काँग्रेस जनसंघात समाविष्ट झाली म्हणून नेहरू, गांधी, नि पटेल, नि टीळक यांचे पुतळे मूलतः भाजपचेच आहेत. काँग्रेसने "हम खूद चोर है, बाप भी चोर है" हे उघडं न पाडलं तर बरं.
===========================
इंदिरामायला मतं पडली म्हणून तिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) मधलं इंदिरा गाळायला निर्वाचन आयोगानं अनुमती दिली. आता भाजपला मतं पडली आहेत तेव्हा त्याच न्यायानं भाजपला ओरिजनल काँग्रेस म्हणावे.
===============================================================================
http://qr.ae/TU1veQ
23 Mar 2018 - 7:04 pm | मार्मिक गोडसे
आता ६० वर्षातून त्यांची किती वर्ष वजा करायची?
24 Mar 2018 - 1:28 pm | arunjoshi123
१९६७ पूर्वीची सगळी.
24 Mar 2018 - 2:08 pm | मार्मिक गोडसे
हे आता अंधभक्तांना सांगा समजाऊन. १९६७ पूर्वीची सगळी खापरे डोक्यावर घेऊन मिरवतील हौसेने.
26 Mar 2018 - 3:09 pm | sagarpdy
म्हणजे तुम्हाला अजो यांचा युक्तिवाद मान्य आहे का ?
26 Mar 2018 - 3:20 pm | मार्मिक गोडसे
अंधभक्तांना मान्य आहे का?
26 Mar 2018 - 4:08 pm | sagarpdy
ते त्यांना विचारा
23 Mar 2018 - 5:56 pm | arunjoshi123
अरे भाऊ, मी ही तेच म्हणतोय. पटेल, नेहरू, गांधी, टीळक हे तरी कुठे काँग्रेसमधे होते?
ओरिजनल काँग्रेस जनसंघ आणि समाजवादी पक्षात समाविष्ट झालीय. तरी तुम्ही काँग्रेसवाले ते पुतळे आमचेच असं म्हणता ना? मग महाराज संघात असायची काय गरज आहे? ते आमचे म्हटलं कि त्यांचे पुतळे आमच्या पार्टीचे!! सिंपल!!
23 Mar 2018 - 6:08 pm | arunjoshi123
महाराज जर संघात नव्हते तर त्यांनी राज्य स्थापन का केले? मंजे संघाची नि महाराजांची असामाईक राज्यस्थापनेची / चालनाची उद्दिष्टे कोणकोणती?
23 Mar 2018 - 10:17 am | श्रीगुरुजी
देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन!
23 Mar 2018 - 10:39 am | मार्मिक गोडसे
शहीद भगतसिंह , सुखदेव व राजगुरू यांना श्रध्दांजली.
23 Mar 2018 - 10:43 am | विशुमित
रोचक बातमी...
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/rat-scam...
23 Mar 2018 - 11:24 am | बिटाकाका
अत्यंत थर्ड क्लासपणाचा प्रकार दिसतोय (आकडे खरे असतील तर, सरकारकडून उत्तर यायला हवं). ज्यांच्या नाकाखाली असली फालतुगिरी झालीये, त्या संबंधित मंत्र्यांनी (मुख्यमंत्र्यांनी) त्या मंत्रालयाचा राजीनामा देऊन चौकशीला समोर जायला हवे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असले अहवाल मंजूर केले त्यांच्याकडून उत्तर मिळणे गरजेचे आहे. कुठली तरी कंपनी येते काय, उंदीर मारायचे आकडे देते काय आणि मारले म्हणून सांगते पण, सगळंच हास्यास्पद!
======================
प्रकरण खरे असेल तर खडसे १- मुख्यमंत्री ०.
======================
मंत्रालयात एवढे उंदीर होते म्हणजे, त्या करणी माता उंदराच्या मंदिरासारखी परिस्थिती होती कि काय?
23 Mar 2018 - 11:46 am | माहितगार
महानगरांमधील उंदीर समस्या वास्तव असावी पण कार्यवाही स्वरुप पाहता लालूजी हा शब्द आठवला
23 Mar 2018 - 11:56 am | बिटाकाका
मंत्रालय किती स्क्वेअर फुटांचं आहे माहित नाही पण ३ लाख जरी असलं तरी प्रत्येक स्क्वेअर फुटाला एक उंदीर हे जरा अतीच होतंय :).
23 Mar 2018 - 12:01 pm | माहितगार
कुछ तो झोल है .
23 Mar 2018 - 1:41 pm | माहितगार
हा प्रॉब्लेम इंग्लंडात कसा सोडवला जातो त्याची बातमी
उंदीर आणी प्रशासन
उंदरांचा प्रॉब्लेम महाराष्ट्र विधान सभेत पोहोचेल हे ब्लॉग लेखक डॉ. प्रकाश देवांना २०११ मध्ये कसे कळाले माहित नाही. पण त्यांचा उंदीर आणी प्रशासन
हा ब्लॉग जाम खुसखुशीत आहे वाचनानंद आवश्य घ्या आणि प्रशासन आणि व्यवस्थापन या बद्दल जरासे बौद्धीकही.
23 Mar 2018 - 1:43 pm | माहितगार
मुंबईतील उंदीर या विषयावर मिपावरही एक विनोदी लेख (२००९) दिसतो आहे.