सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ४

जेपी's picture
जेपी in काथ्याकूट
15 Mar 2016 - 10:23 am
गाभा: 

http://www.misalpav.com/node/32572 भाग २
http://www.misalpav.com/node/34076 भाग ३
****************************************************
मागील भागात १०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवा धागा काढत आहे.
****************************************************

प्रश्न - आपल्याकडे जलव्यवस्थापना बद्दल शिक्षण / प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम उपल्ब्ध आहेत आहेत का ?
असे अभ्यासक्रम कुठल्या संस्थेत उपल्ब्ध आहेत त्याची थोडक्यात महिती मिळेल का ?
(उदा.संस्थेचे नाव,ठिकाण्,अभ्यासक्रम)

=======================================================================
प्रतिसादासाठी धन्यवाद.

प्रतिक्रिया

आयला आधी नुस्तेच भाग-४ एव्हढे वाचले. मला वाटले कन्हैयाचा भाग-४ खरेच आला की काय?

मराठी कथालेखक's picture

15 Mar 2016 - 12:01 pm | मराठी कथालेखक

धागा क्र ३ वर विचारलेला (आणि अनुत्तरित राहिलेला) प्रश्न पुन्हा इथे विचारतो.

आस्थापनांनी (दुकान, हॉटेल ई) स्थानिक भाषेत नामफलक लावणे बंधनकारक आहे (म्हणजे महाराष्ट्रात मराठीतून सोबत इतर भाषेतून लावू शकतातच पण मराठी सक्तीचे) आता या नियमाची /कायद्याची अंमलबजावणी करणे हे कोणाचे कर्तव्य आहे ? मागे मी PCMC च्या संकेतस्थळावर दोन हॉटेल्सची तक्रार छायाचित्रांसकट टाकली होती मात्र ही गोष्ट PCMC च्या अखत्यारीत येत नाही असा शेरा देत ही तक्रार बंद करण्यात आली.
या संदर्भात कुणाकडे (मनसे सोडून) तक्रार करावी याचे कृपया नेमके मार्गदर्शन करावे

भाते's picture

15 Mar 2016 - 12:57 pm | भाते

राजकीय पक्ष किंवा सरकारी खात्यांकडे अधिकृत तक्रार करण्यापेक्षा मिडिया / सोशल मिडिया चा आधार घ्या. कदाचित काम होईल.
महाराष्ट्र टाइम्सचे मटा रिपोर्टर वापरून तुम्ही तक्रार करू शकता. निखिल वागळेच्या महाराष्ट्र१ वाहिनीवर कायअप्पा मार्फत तक्रार करता येते.
तक्रार योग्य वाटल्यास आणि त्याला प्रसिध्दी मिळाल्यास संबंधित यंत्रणा त्यावर कदाचित कारवाई करतील.
बातमी प्रसिध्द झाल्यावर कदाचित लाजेखातर हॉटेल्सवाले आपणहुन नामफलक बदलतील.

मराठी कथालेखक's picture

15 Mar 2016 - 7:06 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

निखिल वागळेच्या महाराष्ट्र१ वाहिनीवर कायअप्पा मार्फत तक्रार करता येते.

क्रमांक मिळू शकेल काय ?

भाते's picture

15 Mar 2016 - 11:02 pm | भाते

७५०६६८५३३२

अधिक माहितीसाठी हे पहा

मराठी कथालेखक's picture

15 Mar 2016 - 7:08 pm | मराठी कथालेखक

पण कारवाई करण्याचे अधिकार (वा जबाबदारी) अधिकृतरित्या नेमके कुणाकडे आहेत ?

प्रदीप साळुंखे's picture

15 Mar 2016 - 2:19 pm | प्रदीप साळुंखे
खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Mar 2016 - 2:33 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

जिज्ञासा--------
-----
-------
---------झी मराठीला कलर्स मराठी आवरटेक करेल का???

M.Tech. Civil Engineering(Water Management) http://www.sggs.ac.in/node/47
कधीकाळी माझा विचार पण होता हा अभ्यासक्रम करायचा

आदूबाळ's picture

15 Mar 2016 - 10:20 pm | आदूबाळ

स्लाऊ (Slough) मध्ये कोणी मिपाकर राहतं का? लँग्ली, मेडनहेड, विंडसर वगैरे आजूबाजूच्या भागातलंही चालेल.

श्रीरंग_जोशी's picture

17 Mar 2016 - 11:15 pm | श्रीरंग_जोशी

पिंक टाकणे* या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती काय असावी?

* प्रत्यक्षात पिंक टाकणे अभिप्रेत आहे, मताची पिंक नव्हे.

वर्तमान पत्रात बऱ्याचदा चंदनाची झाडे सराईत चोरट्यांनी चोरल्याचे आपण वाचतो, मला हे समजत नाही की आपल्याकडे सागाप्रमाणे किंवा इतर पिकांप्रमाने चंदनाची शेती करणे का अधिकृत नाही आणि हा कुठला न्याय तूमच्या जागेत तूम्ही चंदन वाढवा पण मालकी सरकारची

बहुगुणी's picture

18 Mar 2016 - 4:05 pm | बहुगुणी

हा प्रश्न मलाही कधीकाळी पडला होता. पण तुमची शंका वाचेपर्यंत पाठपुरावा केला नव्हता. मुळात चंदनाची शेती करणे का अधिकृत नाही आणि तूमच्या जागेत तूम्ही चंदन वाढवा पण मालकी सरकारचीहे गृहीतक खरं आहे का? या दुव्यानुसार नसावं. त्या संस्थळातील जाहिरातीचा भाग सोडला आणि इतर माहिती खरी आहे असं मानलं तर निदान गुजरात राज्यात तरी चंदनाच्या लागवडीची मालकी शेतमालकाकडे असते, सरकारकडे नाही. बिझिनेस स्टँडर्ड मधील या अन्य वृत्तानुसारही अशी चंदन लागवड करणं आता शक्य आहे.Till recently, there were severe restrictions on cultivation of sandalwood. If it happened to come up, the plant became the property of the state. The restrictions have been relaxed; cultivation is now allowed and one may apply for a government subsidy for doing so.

बर्‍याच मोठ्या खाजगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत असं या लेखानुसार दिसतं. लागवडीची मालकी सरकारची नसली तरी
the sector was under strict government control; the wood can still be sold only through government auctions anywhere असा उल्लेख लेखात आहे.

चंदनाची लागवड बेकायदेशीर नाही.सात बारा वर नोंद करावी लागते.मालकी शेतकर्याची असते सरकारची नाही.
पण योग्य भावा(जो फक्त गाभ्याला मिळतो) बरीच वर्ष लागतात.यास्तव लागवड कमी असते.
त्याचा फायदा चोर घे.

उगा काहितरीच's picture

18 Mar 2016 - 4:09 pm | उगा काहितरीच

एका माजी शेजारच्या घरी होतं एक चंदनाचं झाड . साधारणपणे १०-१५ फूट उंच होतं आणी एक दोन वीत असेल खोडाची जाडी. पण सुगंध वगैरे काही येत नसे. एके रात्री चोरट्यांनी अगदी जमिनीपासून कापून नेले. आता हे झाड लावणे इनलिगल असते का नाही माहीत नाही. अवांतराबद्दल क्षमस्व!

नाव आडनाव's picture

18 Mar 2016 - 6:02 pm | नाव आडनाव

पण सुगंध वगैरे काही येत नसे.
झाडाचा नाही, खोड कापल्या नंतर त्याच्या गाभ्याचा येतो वास. ते पण जर झाड मोठं आणि जुनं असेल तरंच. चोरी शक्यतो रात्री होते. झाड लावणं इल्लिगल असं काही नसतं. काही लोक लावतही असतील पण बर्‍याचदा झाड उगवलेलं असतं. आमचं पण एक झाड गेलं होतं चोरीला.

कपिलमुनी's picture

18 Mar 2016 - 10:21 pm | कपिलमुनी

चोर खोडाला ड्रिल करुन आधी गाभा तपासतात मगच कापायचे कष्ट घेतात

मराठी कथालेखक's picture

21 Mar 2016 - 12:55 pm | मराठी कथालेखक

मी एकदा Ebay वरुन चंदनाच्या सुमारे १०-१५ (नक्की आकडा आठवत नाही) बिया मागवल्या (खर्‍या होत्या की नाही माहित नाही) , वेगवेगळ्या ठिकाणी लागवड करुन पाहिली पण एकही बीज रुजले नाही.
सहज म्हणून मी हे आमच्या एका नातेवाईकांना सांगितले. हे नातेवाईक खेड्यात राहतात, त्यांची शेती आहे (चंदनाची लागवड मात्र करीत नाहित). पण त्यांनी सांगितले की चंदनाचे बी असे रुजत नाही. त्यांच्या ते बी पक्ष्याने खाल्ले आणि त्याच्या विष्ठेतून सांडून जमिनीवर पडले तर रुजते.
यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
१) हा समज खरा आहे कि खोटा माहित नाही
२) पण खरा असेल तर पक्ष्याच्या (यात कोणते पक्षी सामाविष्ट आहेत ते आधी बघायला हवे) विष्ठेत मिसळू पर्यंत वा मिसळल्यावर बिजावर काय परिणाम होतो , तसाच परिणाम इतर काही प्रकारे (कृत्रिमरित्या) साधता येईल का ?
३) तसा परिणाम कृत्रिमरित्या साधता येत नसल्यास पक्ष्या ऐवजी प्राण्यांच्या विष्ठेतून हा परिणाम साधता येईल का ?(पक्ष्यांपेक्षा पाळीव कुत्रा, मांजर, गुरे यांच्या विष्ठेच्या जागेबद्दल जास्त खात्री असल्याने आणि या प्राण्यांना मुद्दाम बिया खाऊ घालणे सहज शक्य असल्याने पक्ष्यांपेक्षा त्यांचा अधिक चांगला उपयोग होवू शकतो)

पण अगदी किंमत पडून चोरी थांबली जाईल इतक्या मोठ्या प्रमाणावर चंदनाची झाडे लागवड होईपर्यंत चंदनाच्या शेतीत कुणी गुंतवणूक करणार नाही (चोरीच्या भितीमुळे). आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर चंदनाची शेती होईपर्यत चोरी थांबणार नाही. थोडक्यात हे दुष्टचक्र भेदणे कठीण आहे.

मराठी कथालेखक's picture

21 Mar 2016 - 12:57 pm | मराठी कथालेखक

त्यांच्या मते बी पक्ष्याने खाल्ले आणि त्याच्या विष्ठेतून सांडून जमिनीवर पडले तर रुजते.

असे वाचावे

उगा काहितरीच's picture

22 Mar 2016 - 2:12 am | उगा काहितरीच

(पक्ष्यांपेक्षा पाळीव कुत्रा, मांजर, गुरे यांच्या विष्ठेच्या जागेबद्दल जास्त खात्री असल्याने आणि या प्राण्यांना मुद्दाम बिया खाऊ घालणे सहज शक्य असल्याने पक्ष्यांपेक्षा त्यांचा अधिक चांगला उपयोग होवू शकतो)

पक्षी बी गिळतात , प्राणी चावतात त्यामुळे प्राण्याच्या विष्ठेतुन आलेल्या बी पासून झाड निघणे अवघड आहे.पण मला वाटते की असेल दुसरी पण काही तरी पद्धत .

मोदक's picture

22 Mar 2016 - 9:54 am | मोदक

सहज आठवले म्हणून..

जगातली सर्वात महाग कॉफी.

https://en.wikipedia.org/wiki/Kopi_Luwak

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2016 - 12:07 pm | मराठी कथालेखक

मला वाटते गुरे अन्न फारशी चावत नाहित. शिवाय ते बी फारसे मोठे नव्हते.

भाऊंचे भाऊ's picture

23 Mar 2016 - 2:49 pm | भाऊंचे भाऊ

भागवतात वरणन आहे की राम वनवासी असताना भरत त्याच्या जेवणासाठीचे धान्य गाइला खायला घालत असे व तिच्या विष्ठेतुन ते बाहेर आल्यावर त्यावर प्रोसेस करुन त्याचे सेवन करत असे.. धन्य तो बंधु... असो रामायणात त्याच्यावर अन्याव झालेला नसल्याने मुद्दा इतकाच चर्चेत ठेउया की शक्य आहे विष्ठेतुन बाहेर येणारे पचलेले बी रुजणे नक्किच शक्य असावे.

सुनील's picture

23 Mar 2016 - 3:09 pm | सुनील

धन्य ते भागवत!!

कुठल्या स्कंधात हा संदर्भ आहे सांगा ना दादूस.

hmangeshrao's picture

23 Mar 2016 - 10:24 pm | hmangeshrao

भागवतातल्या वरणात भरताचं वांगं ?

चक्क रामायणातले संदर्भ आहेत. मग शंका नको.
बोलो प्रभू सियावर रामचंद्रकी जय.

मॉरिशस बेटावर बाहेरच्या जगापेक्षा वेगळे आणि एकमेव असे जैववैविध्य होते. दोदो पक्षी हादेखील मॉरिशसच्या जैववैविध्यातला एक प्रकार. मॉरिशसमध्ये एक प्रकारचे वृक्ष (Tambalacoque) असेच दोदो पक्ष्याच्या साहाय्याने रुजत असत. दोदो पक्षी या झाडाची फळे खात. त्यांच्या पचनसंस्थेत ह्या फळांच्या बिया रुजण्यायोग्य होत आणि दोदो पक्ष्याच्या विष्ठेतून बाहेर पडल्यावर जमिनीत रुजत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला मानवाचा पहिला स्पर्श पोर्ट्युगीज़ांच्या रूपाने मॉरिशसला झाला. पोर्ट्युगीज़ांची जहाजे दक्षिण आशियापर्यंतच्या प्रवासात मधला थांबा म्हणून या अनाघ्रात बेटावर थांबू लागली. पन्नास किलो वजनाचा फारसा उडू न शकणारा मांसल दोदो आयता खलाशांच्या जेवणाच्या टेबलावर आला. दोदोची बेसुमार शिकार झाली. बिचारा दोदो. माणसांचा धोका त्याला समजला नाही कारण माणूस हा आपला शत्रू आहे, त्याच्यापासून सावध राहावे हा इन्स्टिंक्ट त्याच्या जीन्समध्ये नोंदलेला नव्हता.
नंतर डच लोकांनी इथे गुन्हेगार वसाहत वसवली. त्यांच्याबरोबर खाद्य म्हणून डुक्कर आणि माकडें इथे अवतरली. माकडे कशी आली माहीत नाही, पण आली खरी. जहाजांच्या अन्नसाठ्यात वावरणारे उंदिरही बेटावर उतरले. डुक्कर आणि उंदिरांनी जमीन उकरून उकरून दोदो पक्ष्यांची अंडी शोधून खाल्ली. माकडांनी झाडावर किंवा जमिनीवर स्तब्ध बसणार्‍या उरल्यासुरल्या दोदोंची मारामारी करून त्यांना मारून टाकले. केवळ शंभर वर्षांत दोदो पक्ष्याचे अस्तित्व मॉरिशसमधून आणि जगातून कायमचे पुसले गेले. पण ही कहाणी इथेच संपली नाही. काही वर्षांपूर्वी एका वनस्पतिशास्त्रज्ञाला आढळले की एका विशिष्ट प्रजातीचे (Tambalacoque) वृक्ष फार कमी संख्येत मॉरिशसमध्ये आढळतात. त्यांचे जतन करण्याचे हर प्रयत्न असफल ठरले. त्या वृक्षाच्या फळांच्या बिया काही केल्या रुजेनातच. मग संशोधन करता असे आढळले की ही सर्व झाडे सुमारे तीनशे वर्षे इतकी जुनी आहेत. म्हणजे गेल्या तीनशे वर्षांत या झाडांपासून नवीन झाडे तयार झाली नव्हती. दोदोच्या अस्तकाळाशी हा काल जुळतो. मग अधिक अभ्यासावरून दोदो पक्ष्याचे आणि या वृक्षाच्या प्रजननाचे नाते स्पष्ट झाले. नंतर आता संशोधनान्ती एक दोदोसमान पक्षी प्रजाति आढळली जिच्या पचनसंस्थेत या झाडाच्या बियांवर दोदो पक्ष्यासारख्याच रासायनिक प्रक्रिया होऊ शकतात. या प्रजातीपासून या झाडाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न यशस्वी होऊ लागले आहेत.

झेन's picture

18 Mar 2016 - 7:46 pm | झेन

धन्यवाद बहुगूणी

माझ्या फ्लॅटच्या बाल्कनीत फक्त उन्हाळ्यात आणि ते ही दुपारनंतर उन येते.
आम्ही कुंडीत रातराणी, जुई , गुलाब ई फुलझाडे लावून बघितली. पैकी रातराणी अजिबात जगत नाही (सतत रोग पडत राहतो, कीटकनाशक फवारुनही फायदा होत नाही). जुई काही काळ बहरली पण त्यानंतर नाही, गुलाबाचेहि तेच. युरिया वा इतर रासायनिक खत वापरुन पाहिले
मला कुणी कमी उजेडात, कुंडीत वाढू शकाणार्‍या आणि बहरणार्‍या फुलझाडांबद्दल (शक्यतो सुगंधी आणि बारमाही बहरणारी फुले) माहिती देवू शकेल काय ?
केवडा /निशिगंध अशा परिस्थितीत बहरेल काय ?

ब़जरबट्टू's picture

5 May 2016 - 11:45 am | ब़जरबट्टू

अशीच परिस्थिती माझ्या बाल्कनीची आहे. उन येत नाही.. त्यामुळे कितीही फुलझाडे लावली तरी फ़ारतर सहा महिने जगातील. त्यातल्यातात भारतीय मुळ असणारी तर कठिनच. मी प्रयत्न केला, शेवटी थकुन आता फक्त शोभिवंत झाडे लावतोय..
कमी उजेडात वाढणारी उरोपियन झाडे एक वेळ येतील तरी.. उद्या ट्युलिप. ..

मराठी कथालेखक's picture

6 May 2016 - 6:05 pm | मराठी कथालेखक

ट्युलिपला सुगंध असतो का ?

तुमची बाल्कनि वायव्येकडे ( north west ) आहे.सोनटक्का लावून पाहा.कितीही कोणतेही खत सूर्यप्रकाशाची वानवा कमतरता भरून काढू शकत नाही.

मराठी कथालेखक's picture

22 Mar 2016 - 12:09 pm | मराठी कथालेखक

सोनटक्का लावून पाहीन. सुगंध असतो का या फुलाला ? बारमाही फुलते का ?

मधुमालतीची कुंडीत उगवणारी जात छान बहरते वसंत ऋतूत आणि वासही छान येतो.
बोगनवेलीची कुंडीतली बरीच व्हरायटी मिळेल.वास नाही.पण बाग छान दिसते रंगीबेरंगी.
मोगरा उगवेल कुंडीत.पण फुलांची संख्या कमी आणि उन्हाळ्यात फुलं येतील.
गावठी गुलाबाला बारा महिने भरपूर फुलं येतात आणि सुगंधी असतात.
रातराणीला ऊन आणि पाणी भरपूर लागते.पसरायला जागा पण हवी.नाहीतर छाटत रहावे लागते.
तगरीची छोट्या फुलांची जात येते एक.दिसतेही छान आणि कायम फुलं.
गुलबक्षी,काटेकोरांटी, सदाफुली ,अबोली पण कुंडीत लावता येतात.कायम फुलं मिळतात.

मराठी कथालेखक's picture

25 Mar 2016 - 12:15 am | मराठी कथालेखक

धन्यवाद अजया.
मधुमालती आणि मोगरा लावून पाहीन.

कंजूस's picture

23 Mar 2016 - 8:26 pm | कंजूस

होय.सुगंधी असतात फुले.

मराठी कथालेखक's picture

25 Mar 2016 - 12:16 am | मराठी कथालेखक

धन्यवाद,
सोनटक्का लावून पाहीन..

उगा काहितरीच's picture

22 Mar 2016 - 6:43 pm | उगा काहितरीच

प्लास्टिकच्या बाटलीत मनपाने सोडलेले नळाचे पाणी कुठलीच प्रक्रिया न करता किती दिवसापर्यंत पिण्यायोग्य राहते ?

मनपाच्या पाण्याचं माहीत नाही, आणि मुळात प्लास्टिकची बाटली किती स्वच्छ आणि नवी आहे यावर पाण्याचं 'आयुष्य' ठरावं, पण साधारणत: दोन आठवड्यांत बाटली उघडून पाणी संपवावं असं या दुव्यावर दिसतं. चांगल्या खात्रीशीर कंपनीचं विकत घेतलेलं आणि न उघडलेलं प्लास्टिक बाटलीतील पाणी सहा महिन्यांपर्यंत चांगलं राहू शकतं असं या आणि या दुव्यांवरून दिसतं. (किंचित अवांतरः प्लास्टिकच्या वापराविषयी हेही वाचनीय आहे.)

श्रीरंग_जोशी's picture

22 Mar 2016 - 9:09 pm | श्रीरंग_जोशी

आपण स्वतः पाणी भरलं असल्यास त्या बाटलीवर जिथे बराच वेळ ठेवणार आहोत तिथे सुर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी. बाटली अपारदर्शक असल्यास सूर्यप्रकाश व हवेच्या संपर्कामुळे निर्माण होऊ शकणार्‍या बुरशीची शक्यता बरीच कमी होते.

टीप - मी वर लिहिलेलं शास्त्रियदृष्ट्या १००% अचुक असेल याची खात्री मी देऊ शकत नाही.

पिण्याच्या पाण्याच्या साठवणीसाठी सूर्यप्रकाशापासून दूर आणि थंड अशा जागेचा वापरच योग्य आहे. विशेषतः पारदर्शक बाटल्या वापरल्यास. याच्या समर्थनार्थ बरेच दुवे शास्त्रीय लिखाणात मिळतील. सध्या हे दोन दुवे:

1. City of Berkeley Water Storage Guide
2. Bottled Water Storage, यात दिल्याप्रमाणे:

When water (bottled water or tap water) is exposed to extended periods of direct sunlight or heat sources, algae or mold may infrequently develop.

..... plastic containers – whether used for bottled water or other beverages – are slightly permeable, which may allow ambient air gases such as vapors from household solvents, petroleum-based fuels and other chemicals, to affect the taste and odor of your beverage.

रुस्तम's picture

23 Mar 2016 - 3:23 pm | रुस्तम

co op housing society मध्ये किती रकमे पर्यंत खर्च करताना निविदा (Quotation) मागवावी लागतात.

३०,००० (तीस हजार) रुपयाचे एक काम आहे, तर त्यासाठी निवीदा मागवाव्यात का?

कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.

कामाचा अपेक्षित खर्च जर रू.10,000 च्या वर असेल तर कमीत कमी 3 निविदा मागवाव्यात.

Google :
MODEL BYE – LAWS OF COOPERATIVE HOUSING SOCIETY Maharashtra

रुस्तम's picture

13 Apr 2016 - 10:52 am | रुस्तम

धन्यवाद ससन्दीप

नाखु's picture

23 Mar 2016 - 3:37 pm | नाखु

वर उल्लेख केल्लेया चंदन झाडाबाबत इथे वाचा चंदन शेती

नाखु मुफ्त चंदनवाला

झेन's picture

23 Mar 2016 - 5:37 pm | झेन

नाखु सलाम तूमच्या अभ्यासाला, चिकाटीला आणि सकारात्मकतेला

नाना स्कॉच's picture

23 Mar 2016 - 6:15 pm | नाना स्कॉच

तावातावाने सगळे राजकाराणावर अन समाजावर काथ्या कूटत बसतात आज

"शहीद दिवस आहे" सगळेच विसरले??? अरेरे

असो!, माझ्यातर्फे तरी मी शहीद भगतसिंह , शहीद सुखदेव थापर अन शहीद शिवराम हरी राजगुरु ह्या तीन शहीदांना आदरांजली वाहतो

____/\____

.

उगा काहितरीच's picture

28 Mar 2016 - 12:06 pm | उगा काहितरीच

नेत्रदान केल्यावर तेच डोळे परत दान करता येतात का ? जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत डोळे टिकू शकतात?
(समजा अबक व्यक्ती ६० वर्षे जगली. मरणोपरांत नेत्रदान केले . ते कखग या अंध व्यक्तीला बसविण्यात आले , ज्याचे वय २० वर्षे आहे. कखग व्यक्ती ६० वर्षे जगली तर कखग ला पण मरणोपरांत नेत्रदान करता येऊ शकते का ? कारण डोळ्यांचे एकूण वय १०० वर्षे झालं असेल ना. जर असे करता येत असेल तर अबक व्यक्तीचे डोळे जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत वापरता येतील?) मिपावरील डॉक्टरांकडून उत्तर अपेक्षित ...

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2016 - 11:59 am | पिलीयन रायडर

१. वडिलोपार्जित घर आई-वडीलांच्या पश्चात वारसाच्या नावावर करायचे असेल तर कायदेशीर पद्धत काय?
(आई वडील हयात नाहीत. मृत्युपत्र केलेले नाही. वारसाचे वय ५५ आहे आणि त्यांना एक बहीण आहे जिचा ह्या घरावर काहीही दावा नाही.)

२. ह्यात पुन्हा एकदा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची फीस भरावी लागते का?

३. अजुन पुढच्या पिढीला हाच त्रास होऊ नये म्हणुन आत्ताच वारसा सोबत त्याच्या मुलांचीही नावे लागु शकतात का?

४. ह्या संदर्भात महाराष्ट्र सरकारचे जे नियम असतील ते कुठे वाचायला मिळतील का?

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2016 - 12:02 pm | पिलीयन रायडर

आणि एकंदरीतच आपली स्थावर जंगम मालमत्ता जास्त त्रास न होता आपल्या पश्चात आपल्या मुलांना मिळावी म्हणुन काय करायला हवे?

(म्हणजे माझा फ्लॅट हा माझ्यानंतर आपसुकच माझ्या मुलाला मिळत असतो की त्यासाठी मला तसे काही लिहुन ठेवावे लागते?)

मराठी कथालेखक's picture

30 Mar 2016 - 1:15 pm | मराठी कथालेखक

सहकारी सोसायटीत फ्लॅटकरिता समभाग प्रमाणपत्र (शेअर सर्टिफिकेट) मिळते , त्या समभागासाठी नॉमिनेशन (एक वा अधिक वारसांच्या नावे) सोसायटीत द्यायचे असते, पण त्याखेरीज अजून काही करावे लागत असेल तर माहित नाही.

बोका-ए-आझम's picture

13 Apr 2016 - 10:45 am | बोका-ए-आझम

तुमच्या स्वकष्टार्जित/वडिलोपार्जित मालमत्तेचा वारस हा तुमचा जोडीदार असतो, मुलं नाहीत. मुलांना मालमत्ता मिळावी असं वाटत असेल तर मृत्यूपत्र करणे हाच उपाय आहे. जर मृत्युपत्र केलेलं नसेल आणि मृत्यू झाला तर मालमत्ता जोडीदाराकडे by default जाते. रिलायन्सच्या अंबानी बंधूंमध्ये तोच तर वाद होता. धीरूभाई अंबानी मृत्यूपत्र न करता गेल्यामुळे सगळी मालमत्ता कोकिलाबेन अंबानींना मिळाली, जी त्यांनी आपल्या चार मुलांमध्ये वाटली, आणि तीही त्यांना हवी तशी.

तर्राट जोकर's picture

30 Mar 2016 - 1:24 pm | तर्राट जोकर

ही मालमत्ता कोणत्या स्वराज्यसंस्थेत येते? म्हणजे नगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादी. त्यानुसार पुढचं सांगता येईल.

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2016 - 2:00 pm | पिलीयन रायडर

महानगरपालिका

कपिलमुनी's picture

31 Mar 2016 - 3:40 pm | कपिलमुनी

१. बहिणीचे संमतीपत्र लागेल . १०० रु च्या स्टँम्पवर करता येते.
२. घर स्वतंत्र आहे की सहकारी सो. मध्ये यावर बरेच बदल होतील
३.पुन्हा ड्यूटी / रजिस्टेशन भरावे लागत नाही
३. स्वतंत्र घर असेल तर हो .
४ माहीत नाही

पिलीयन रायडर's picture

31 Mar 2016 - 3:43 pm | पिलीयन रायडर

घर स्वतंत्र आहे. सहकारी सोसायटी वगैरे नाही. बहीण सही देऊ शकेल. त्यांची हरकत नाही.

कुणाला ह्या संदर्भातले नियम कुठे ऑनलाईन माहिती असतील तर कृपया दाखवावे.
ज्या वकीलाला हे प्रश्न विचारले तो तर घराच्या सध्याच्या किंमतीनुसार स्टॅम्प ड्युटी / रजिस्ट्रेशन भरावे लागेल आणि त्याच्या % मध्ये वकीलाला फीस द्यावी लागेल असे म्हणत आहे.

तर्राट जोकर's picture

31 Mar 2016 - 3:57 pm | तर्राट जोकर

कपिल मुनि म्हणतात ते लिहायला आलो होतो.

अधिक माहितीसाठी ही बातमी: http://consumerresources.in/2015/05/21/no-stamp-duty-required-for-transf...

रक्ताच्या नात्यातल्या नातेवाईकांकडे मालमत्तेचे हस्तांतरण करतांना कोणती ही स्टँप ड्युटीची गरज नाही. महाराष्ट्र शासनाचा जी आर २०१५ मधे काढलेला.

पिलीयन रायडर's picture

31 Mar 2016 - 5:16 pm | पिलीयन रायडर

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-waives-stamp-...

ह्यात हे वाक्य पहा...

Immovable property — land, house or flat — can now be transferred to one's children or blood relatives without paying stamp duty for registration.......

....... In other decisions announced in the House on Wednesday, those with 500sq ft or smaller homes do not have to pay the increased property tax and the government will allow twice the transfer of development rights to a landowner in lieu of land surrendered for a public amenity.

म्हणजे ५००स्क्वे.फु पेक्षा मोठं घर असेल तर फिस लागु आहे का? की माझा काही घोळ होत आहे?

तर्राट जोकर's picture

31 Mar 2016 - 3:59 pm | तर्राट जोकर

तसेच या प्रकरणात कोणी प्रतिवादी (मालमत्तेवर हक्क सांगनारा) नसेल तर वकिलाची काही गरज आहे असे वाटत नाही.

पिलीयन रायडर's picture

31 Mar 2016 - 5:17 pm | पिलीयन रायडर

पण मुळात ज्यांच्या नावावर घर आहे, ते हयात नाहीत. त्यांनी कुठे मृत्युपत्र वगैरे केलेले नाही. म्हणजे आधी हे कसे दाखवायचे की आम्हीच बाबा वारस ह्यांचे?

आणि दुसर प्रश्न.. ह्यात आता पुढच्या पिढीचीही नावे लावुन टाकता येतील का म्हणजे परत पुन्हा हीच भानगड नको..

तर्राट जोकर's picture

31 Mar 2016 - 7:27 pm | तर्राट जोकर

मॄत्यूपत्र नसेल व कोणी दावा सांगणारा नसेल तर काही फरक पडत नाही. बरेच लोक मृत्युपत्र न करताच मरण पावतात. वारस सिद्ध करण्याचे कागदपत्र राशनकार्ड व इतर ओळखपत्रे, वारस सिद्ध करणारे जुने दस्तावेज, प्रमाणपत्रे, तलाठ्याची प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला, वैगरे पुरतील. (माझे ज्ञान ह्याबाबतीत तोकडे आहे. ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणारी वारसा प्रकरणे बघितली आहेत. तेवढा अनुभव. पक्की कायदेशीर माहिती तज्ञ देऊ शकतील.)

माझ्यामते तरी ही एकदम नॉर्मल केस आहे. तुमचा वकिल फी काढण्यासाठी गोंधळात तर टाकत नाही ना अशी शंका आली? तुम्ही सविस्तर धागा काढलात तर जास्त चांगली मदत होईल व इतरांनाही वारसाहक्क हस्तांतरनाच्या सर्व बाजूंचा उहापोह करणारा एखादा धागा संग्रही ठेवता येईल.

बोका-ए-आझम's picture

13 Apr 2016 - 10:49 am | बोका-ए-आझम

मृत्युपत्र नसेल आणि कुणी वारस नसेल तर फ्लॅट सोसायटी ताब्यात घेऊ शकते. आणि तुम्ही जे पुरावे सांगितलेत ते बरोबर आहेत पण त्याला कोर्टात आव्हान देता येऊ शकतं. अगदी टोकाच्या केसेसमध्ये कोर्ट डीएनए तपासणी करुन वारसाहक्क सिद्ध करायला सांगू शकतं. म्हणूनच मृत्यूपत्र करुन सर्व गोष्टी clear करणं महत्वाचं.

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 11:13 am | तर्राट जोकर

ह्या प्रस्तुत केसमधे थेट वारस जीवंत आहे व त्यावर प्रतिदावा करणारं कुणी नाही. ह्या स्थितीत फ्लॅट ताब्यात घेण्याचा अधिकार सोसायटीला कसा आहे?

बोका-ए-आझम's picture

13 Apr 2016 - 6:07 pm | बोका-ए-आझम

वारस नसेल तर असं म्हटलंय ना मी. वारसांना वारस आहोत हे सिद्ध करण्यासाठी एक अॅफिडेव्हिट करावं लागतं बहुतेक. चडकवून सांगतो.

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 6:21 pm | तर्राट जोकर

ओके. धन्यवाद. प्रश्नकर्त्याने प्रस्तुत केलेली परिस्थिती बघुन माझे उत्तर होते. ते तेवढ्यापुरते मर्यादित असले व जास्त गोंधळ निर्माण करणारे नसले तर बरे असे वाटले होते.

मृत्युपत्र आवश्यक आहेच ह्यावर दुमत नाही. पण बरेच लोक ध्यानीमनी नसतांना मरण पावतात. मृत्यूपत्राबद्दल काही गैरसमज व अंधश्रद्धाही जुन्या लोकांमधे आहेत. अशा परिस्थितीत वारसाचे सर्व पुरावे असतील आणि मृत्यूपत्र नसेल तर बहुतेक) हिंदू कोडबिलाप्रमाणे सर्वात जवळच्या व थेट वारसाकडे मालमत्ता हस्तांतरण होते. ह्यास प्रतिदावा करणारे उद्भवले तर मात्र केस कोडतात जाते. कोर्टाच्या पायरीपाशी माझे ज्ञान संपते. इथून पुढे त्या क्षेत्रातले अनुभवी जास्त उपयुक्त माहिती देऊ शकतात.

सुबोध खरे's picture

26 Apr 2016 - 8:49 pm | सुबोध खरे

हिंदू वारसा कायद्याप्रमाणे एखादा माणूस जर मृत्युपत्र न करता गेला तर त्याची संपत्ती बायकोला ५० % आणि इतर ५०% त्याच्या मुलांना विभागून जाते.
पत्नी पण हयात नसेल तर ती मालमत्ता सर्व मुलांमध्ये( मुलगा किंवा मुलगी) समान वाटणीने जाते. बहुसंख्य लोक मृत्युपत्र न करता मरतात तेंव्हा वारसांना कोर्टात जाऊन वारस खत करून घ्यावे लागते. वारसांचे कागदपत्र( शाळेचे लिव्हिंग सर्टिफिकेट, दहावी बारावीचे सर्टिफिकेट, रेशन कार्ड ई.) तपासून कोर्ट तसे वारस खत देते यानंतर ती मालमत्ता वारसांना मिळू शकते
http://www.holisticinvestment.in/without-will-hindu-succession-act/

तर्राट जोकर's picture

26 Apr 2016 - 9:02 pm | तर्राट जोकर

धन्यवाद डॉक्टर.

वारस लावण्याकरिता संबंधित तलाठी किंवा प्रोपर्टी कार्ड असेल तर उपाधीक्षक भूमिअभिलेख यांच्याकडे अर्ज करावा. अर्जात मयताचे सर्व वारसांची नावे असणे आवश्यक आहे. यापैकी ज्यांना त्या मिळकतीवर हक्क नको आहे अशा वारसांनी सोबत हक्कासोड पत्र करून द्यावे.
वारसांची नावे लावण्याकरिता कोणत्याही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची फीस भरण्याची आवश्यकता नाही.
आत्ताच वारासांसोबत त्यांच्या मुलांची नावे लावण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कधीही तुमच्या मुलाना मालमत्ता हस्तांतरण करू शकतात.

palambar's picture

18 Apr 2016 - 12:02 am | palambar

www.maharashtra.gov.in वर कायदे / नियम विभागात कदाचित कळू शकेल.

एक सरकारी नोकरीचा अर्ज भरत असताना त्यात मराठी भाषा येत असल्या बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते, असे प्रमाणपत्र असते हेच मला पहील्यांदा समजले, हे प्रमाणपत्र कोठे भेटते यासंबंधी कोण मार्गदर्शन करु शकेल काय?

दहावीची परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र हा मराठी भाषा येत असल्याचा पुरावा समजाला जातो.

दहावीची परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र हा मराठी भाषा येत असल्याचा पुरावा समजाला जातो.

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2016 - 6:21 pm | मराठी कथालेखक

binaural beats , theta waves , lucid dreaming ई बद्दल कुणी अधिक माहिती देवू शकेल वा धागा काढू शकेल काय ? (जालावरील दुवे वा उतारे देण्यापेक्षा सोप्या शब्दात धाग्यावर टंकल्यास अधिक चांगले)

सस्नेह's picture

6 Apr 2016 - 5:22 pm | सस्नेह

ओळखीत एका मुलाचे लग्न झाल्यानंतर एक वर्षात बायकोला टी. बी. झाला आणि त्याकरता तपासण्या करत असताना HIV टेस्ट पॉझिटिव्ह आली.
नवऱ्याची केली असता ती निगेटिव्ह आली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सध्या दोघे वेगळे रहात आहेत. बायको डायवोर्स देत नाही.
त्या मुलाला डायवोर्ससाठी कायदा मदत करू शकेल का ?

तर्राट जोकर's picture

6 Apr 2016 - 5:32 pm | तर्राट जोकर

नक्कीच. दुर्धर (बर्‍या न होऊ शकणार्‍या ) आजाराच्या निमित्ताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करु शकतो. कायद्यासमोर सर्व बाबी कायदेशीर कागदपत्रांद्वारे सिद्ध होत असल्यास घटस्फोट लवकर मिळेल.

बोका-ए-आझम's picture

13 Apr 2016 - 6:17 pm | बोका-ए-आझम

हा फसवणूकीचा मामला आहे. इथे माहितीच दिलेली नाही. मुलगी HIV +ve अाहे आणि मुलगा -ve याचा एक अर्थ असाही आहे की लग्नापूर्वी असं असल्याची माहिती दिलेली नाही. ही फसवणूक आहे. समजा उलट असतं तर मुलीने घटस्फोट मागितलाच असता की नाही? Mutual Consent किंवा परस्पर सहमतीने घटस्फोट होत नसेल तर कोर्टात जाणे हाच एकमेव उपाय ठरतो आणि कोर्ट फसवणूक हा मुद्दा ग्राह्य मानेल आणि पोटगी द्यावी लागणार नाही.

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 6:35 pm | तर्राट जोकर

तुमच्या मुद्द्यात तथ्य आहे. पण थोडी गुंतागुंत असु शकते बोकाभाऊ, प्रश्नकर्त्याने इथे पूर्ण केस मांडलेली नाही. इथे काही प्रश्न निर्माण होतात.

१. एच आय व्ही पॉझिटीव असणे व एड्स असणे ह्या दोन वेगळ्या वैद्यकिय स्थिती आहेत. इथले डॉक्टर जास्त योग्य पद्धतीने सांगू शकतील.

२. प्रस्तुत केसमधली मुलगी ही एच आय व्ही ग्रस्त कशी झाली ह्याचा खात्रीशीर पुरावा व कारणमिमांसा कळायला हवी. कदाचित संक्रमित रक्ताच्या संपर्कात आल्यानेही एच आय व्ही बाधीत झालेली असु शकते.

३. लग्नापुर्वी असुरक्षित लैंगिक संबंध किंवा मुळातच लैंगिक संबंध ठेवणे गैर वा बेकायदेशीर नाही. हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे.

४. संसर्गबाधीत मुलीस ह्या अवस्थेची लग्नापुर्वी माहिती होती काय हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

५. लग्नानंतर कुणा परपुरूषाच्या संपर्कात येऊन हे झाले असेल तर केस फारच क्लिअर होइल. पण ह्या स्टेजला तुटपुंज्या माहितीवर हे बोलणे अनुचित वाटते.

घटस्फोट मिळेल पण केस गुंतागुंतीची होईल जर मुलीने पोटगीसाठी अप्लाय केले तर.

१. सध्या दोघे स्वतंत्र रहात आहेत. त्यमुळे मुलगी एड्सग्रस्त आहे का याची तपासणी करणे अवघड आहे.
२. तसेच लग्नाच्या वेळीही मुलगी आजारी होती व लग्नानंतर वर्षाच्या आताच हा प्रकार झाला. त्यामुळे आजाराची सुरुवात कशी झाली हे मुलाच्या बाजूकडील लोकांना सांगता येणे अवघड आहे. मुलीकडचे अर्थातच सांगत नाहीत.
३. मुलीचे लग्नापूर्वी काही लैंगिक संबंध होते किंवा काय हे कळायला मार्ग नाही.
४. वरीलप्रमाणेच.
५. समजायला मार्ग नाही. मुलगा रिक्षा चालवतो त्यामुळे दिवसभर घराबाहेर आणि दोघे स्वतंत्र रहात असल्याने सासू-सासऱ्यांची नजर नव्हती.
एकूणच मुलाला यातून कायद्याची मदत, तीही पोटगी द्यावी न लागता होईल काय हा प्रश्न आहे.

तर्राट जोकर's picture

18 Apr 2016 - 12:38 pm | तर्राट जोकर

कायद्याची मदत होईल व पोटगी न द्यावी लागता होईल. परंतु... ह्यात 'परंतु' आहेच कारण दोन्हीकडचे वकील केस कशी लढतात त्यावर सर्व अवलंबून आहे. मी वर उपस्थित केलेले मुद्दे मुलीचा वकील उपस्थित करेल तर मुलासाठी केस किचकट होईल. अर्थात किचकट, अशक्य नव्हे. अगदी सहज सुटका सोपी नाही. मुलाच्या वकिलाला मुलीचे विवाहपुर्व/अनैतिक लैंगिक संबंध सिद्ध करावे लागतील. कोर्ट मुलीच्या तपासणीचा आदेश देऊन केव्हापासून ती बाधित आहे ह्याची खातरजमा करुन घेईल. बोका ह्यांनी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीपासून मुलाच्या वकिलाने रोख 'फसवणूकीच्या उद्देशाने लग्नापुर्वीचे सत्य लपवून ठेवले' ह्या मुद्द्यावर ठेवला तर फायदा आहे. तरी माझ्या मते दोन वर्षे तरी केसला मरण नाही. अर्थात हे अनेक परमुटेशन कॉम्बीनेशनवर अवलंबून आहे.

सस्नेह's picture

18 Apr 2016 - 2:34 pm | सस्नेह

धन्यवाद, तजोभाऊ. वकिलांचा सल्ला लवकरच घेत आहे. तथापि, अलीकडे वकिलांचासुद्धा भरोसा नाही. कायदा नक्की काय सांगतो हे वकील नक्की सांगतील का याची ग्यारंटी काय.

तर्राट जोकर's picture

18 Apr 2016 - 2:13 pm | तर्राट जोकर

स्नेहांकिताताई, कायदा हे फक्त शस्त्र आहे ज्याला स्वतःची शक्ती नसते ती वापरणार्‍यावर अवलंबून आहे. वकील कसा आहे ह्यावर बरेच अवलंबून आहे. दोन्ही वकील व न्यायाधिश असलेल्या पुराव्यांचा उपलब्ध कायद्याच्या आधारे काय निर्णयापर्यंत पोचतात एवढे बघणे हातात असते. कायदा स्वयंभू नाही तसेच प्रत्यक्ष केसमधे कोणकोणते कायदेशीर संदर्भ केससाठी उपयुक्त ठरतील हे शोधणे वकिलाच्या बुद्धीमत्तेवर अवलंबून आहे. त्यामुळे चांगल्या वकिलाशिवाय पर्याय नाही.

हा प्रश्न इथे मांडण्यामागची तुमची भूमिका कळली होती, जसे की कोणते कलम किंवा तत्सम कायदा सहाय्यक ठरेल असे काही विचारणे. तसे सकृतदर्शनी आपली केस कायदेशीररित्या सोपी व सुटसुटीत वाटते. पण शेवटी अनेक गोष्टींवर निर्णय अवलंबून आहे इतकेच. जमले तर केसचा निर्णय कळवाल. धन्यवाद.

सस्नेह's picture

18 Apr 2016 - 2:40 pm | सस्नेह

न्यायप्रक्रिया ही कायद्याची निर्णायक अवस्था आहे.
केसचा निर्णय =))
..आताशी कुठे सल्ला घ्यायचा आहे. यानंतर कायदेशीर नोटीस इ. प्रक्रिया मग केस न्यायप्रविष्ट आणि मग निर्णय. बरंच मोठा पल्ला आहे. तुमच्या मते निदान दोन वर्षे.

तर्राट जोकर's picture

18 Apr 2016 - 2:41 pm | तर्राट जोकर

आमच्याकडून शुभेच्छा. त्या मुलासोबत चांगलेच होवो अशी प्रार्थना करतो.

mugdhagode's picture

28 Apr 2016 - 4:05 am | mugdhagode

मुलीला एच आय व्ही आहे , मुलाला नाही तर कोर्ट घटस्फोट मंजुर करेल.

एच आय व्ही मुलापासुन मुलीला झालेला नाही हे तर १०० % सत्य आहे. त्यामुळे त्याला घटस्फोट मिळायला अडचण नसावी.

पोटगी बाबत सांगु शकत नाही.

वरकरणी तरी मुलीकडुन फसवणुन केल्याचे वाटते.

ते सिद्ध करणे अवघड आहे.

पण घटस्फोटाला अडच्ण येणार नाही.. त्यासाठी वकिली य्कुक्तिवाद वगैरे काहीही लागणार नाहीत.

सस्नेह's picture

28 Apr 2016 - 1:25 pm | सस्नेह

पोटगी हाही विषय महत्वाचा आहे. फसवणूक सिद्ध झाल्याशिवाय पोटगीतून सुटका मिळत नाही असे काही आहे का ?

कपिलमुनी's picture

3 May 2016 - 3:40 pm | कपिलमुनी

लग्नानंतर मुलगी जर दवाखान्यात अ‍ॅडमिट झाली असेल, किंवा बाहेरुन रक्त द्यावा लागला असेल, एखादा ऑपरेशन झाले असेल तर त्या द्वारे संसर्ग होउ शकतो.
फसवणूकीचा गुन्हा दाखल करायला ती लग्नापूर्वीपासूनच hiv + होती असे सिद्ध करावे लागेल.

सुबोध खरे's picture

4 May 2016 - 7:19 pm | सुबोध खरे

मुनिवर
रक्त दिल्यामुळे HIV + होण्याचे प्रमाण दहा हजारात एका पेक्षा कमी आहे याचे कारण सर्वच्या सर्व रक्तपेढ्यात रक्त तपासूनच घेतले जाते. शल्यक्रिया करणारे डॉक्टर सुद्धा रुग्णाची शल्यक्रिया करण्याचे अगोदर पूर्ण रक्त तपासणी केल्याशिवाय शल्यक्रिया करीत नाहीत. अगदी लोकांच्या नाही तरी स्वतःच्या सुरक्षितते साठी. दवाखान्याच्या सुईने किंवा "थिएटर" मध्ये सुई टोचल्याने HIV + झालो हे १०० %मिथ्या आहे.
हो तसे "ड्रग्स" घेताना तीच सुई बर्याच लोकांनी वापरल्यामुळे थोड्याप्रमाणात HIV + आढळतात. पण त्याला बर्याच वेळेस ड्रग्स घेतली जातात तेंव्हा असे होते.
बहुसंख्य HIV + लोक हि कारणे सर्रास देतातच कारण आपला बाहेरख्यालीपणा उघडपणे काबुल करण्याची हिम्मत लाखात एखाद्याची असते.
तेंव्हा या सर्व सबबी "लंगड्याच" असतात

लग्नापासूनच ती आजारी होती. लग्नानंतर प्रथम तपासणी केली तेव्हा HIV डीटेक्ट झाला.

रॉजरमूर's picture

19 Apr 2016 - 10:19 pm | रॉजरमूर

समजा उलट असतं तर मुलीने घटस्फोट मागितलाच असता की नाही?

अगदी बरोबर ही बघा आजचीच या विषयावरील बातमी .

तर्राट जोकर's picture

6 Apr 2016 - 5:34 pm | तर्राट जोकर

पण पोटगी व इतर बाबींबद्दल पूर्ण केस समजून घेतल्याशिवाय सांगने कठिण आहे. ह्यातला विशेषज्ञ वकिल आपल्याला मदत करु शकेल. अर्थात हे तुम्हाला माहित आहेच.

पिलीयन रायडर's picture

8 Apr 2016 - 11:12 am | पिलीयन रायडर

Gratuity नक्की कधी मिळते. ढोबळपणे ५ वर्ष म्हणतात पण ते मुळात काही तरी १७०० दिवस / क्ष्क्ष आठवडे... असं काही तरी आहे ना? म्हणजे ४ वर्ष ८/१० महिने असं काही तरी ते गणित होतं.. मागे एकदा HR च्या सेशन मध्ये हे सांगितलं होतं पण नीट लक्षात नाही. कुणाला नक्की माहिती आहे का?

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2016 - 2:53 pm | श्रीगुरुजी

ते कंपनीच्या धोरणावर अवलंबून आहे. साधारणपणे कंपनीत किमान ५ वर्षे काम केले तर Gratuity साठी तुम्हाला पात्र धरतात. पण ही मुदत प्रत्येक कंपनीनुसार बदलू शकते.

http://hrsuccesstalk.blogspot.in/2013/03/13-facts-one-should-know-about-gratuity.html

इथे तिसर्‍या प्रश्नात असं सांगितलंय की मद्रास उच्चन्यायालयाच्या निर्णयानुसार चार क्यालेंडर वर्षे पूर्ण व पाचव्या वर्षातील २४० कामाचे दिवस काम केलेले असल्यास ग्रॅच्युटिस पात्र ठरावे. मात्र त्यानंतरही ग्रॅच्युटी कायद्यात बदल न झाल्याने, हा निर्णय कदाचित फक्त तमिळनाडू राज्यात लागू होत असावा.

पिलीयन रायडर's picture

8 Apr 2016 - 3:45 pm | पिलीयन रायडर

हो, हा निर्णय वाचला मी. पण मला नाही वाटत तो बरोबर आहे. किंवा महाराष्ट्रात लागु आहे.

हे ही बघा

http://www.gratuity.org.in/gratuity-eligibility.php

मराठी कथालेखक's picture

8 Apr 2016 - 5:24 pm | मराठी कथालेखक

बरोबर... मला एका कंपनीने सहा महिन्याच्या (पुण्यातली एक अमेरिकन, आयटी प्रॉडक्ट कंपनी) नोकरीवर ग्रॅच्युइटी दिली होती.

ग्रॅच्युईटी अ‍ॅक्ट १९७२ मध्ये "फाईव्ह ऑर मोअर दॅन फाईव्ह इयर्स ऑफ कंटिन्युअस सर्व्हिस..." असं काहीसं आहे, आणि कंटिन्युअस सर्व्हिस कशी मोजायची यावर काही नियम आहेत.

कोणी सीएस किंवा वकील अधिक सांगू शकेल.

पिलीयन रायडर's picture

8 Apr 2016 - 3:18 pm | पिलीयन रायडर

हो. जालावर शोधले असता बरीच वेगवेगळी माहिती मिळाली. पण एका ठिकाणी अगदी ठामपणे लिहीले आहे की ४ वर्ष ७ महिने झाले तरी ६ महिन्याच्या वर गेल्याने त्याला वर्ष धरायचे. मग ग्रॅचुइटी मिळते. शिवाय वर्ष ३६५ दिवसांचे नसते, ५ दिवसांचा आठवडा असेल तर १९० दिवसांचे असते. असे काही काही लिहीले आहे. म्हणुन जॉइनिंग डेट नंतर बरोब्बर पाचच वर्ष काम केलं पाहिजे असं काही नाहीये म्हणे. मला ४ वर्ष १० महिन्यांनाही रक्कम कॅलक्युलेट करुन दिली.

तर एका ठिकाणी ४ वर्ष ११ महिने १० दिवस झाले असतानाही दिली नाही असेही सांगितले आहे.

फारच परस्परविरोधी माहिती आहे.

भारत भ्रमण करण्यासाठी हार्ले डेव्हिडसन बाईक वरून निघालेल्या 'लेडी ऑफ द हर्ली' म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरच्या बायकर विणू पालिवाल यांचे अपघातात दु:खद निधन....

आबा's picture

12 Apr 2016 - 11:17 pm | आबा

शंकराचार्य पदासाठीच्या पात्रतेचे निकष काय आहेत ?

अगोदरचा आचार्य दुसरा नेमून निवृत्त होतो.निवडणूक नसते.

नाखु's picture

13 Apr 2016 - 8:41 am | नाखु

खेळकर प्रतिसाद :

अगोदरचा आचरट दुसरा नेमून प्रवृत्त होतो.अडवणूक असते का नाही ते माहीत नाही शात्रात बघावे लागेल पण शास्त्रच माहीत नाही.

करमणूकी नाखु

प्रचेतस's picture

13 Apr 2016 - 8:44 am | प्रचेतस

बुवा सांगू शकतील.
ते धर्मसुधारक आहेत.

ती एक खासगी संस्था आहे आणि त्यांचे निर्णय नाही पाळले म्हणून काही अडणार नाही समाजाचे.समाजही त्यांच्या आत्रगत व्यवहारात लक्ष घालू शकत नाही.आद्य शंकराचार्यांनी आठव्या शतकात ही चळवळ सुरू केली आणि बुद्ध धर्माची उसळती लाट थोपवली.भारतातले सर्वच जण एकाच धर्मात येतील हे मानणे अतिशयोक्ती आहे.त्यांच्या मठाधिपतीलाही परंपरा,वेद वगैरे,अद्वैत मानावेच लागेल जरी आता काही पीठाधिपती वेगळी वैयक्तिक मते मांडताना दिसतात.हिंदूधर्म फारच लवचिक आहे तसा कर्मठही आहे.

आबा's picture

13 Apr 2016 - 9:26 am | आबा

आणि आधीचा आचार्य, पुढच्याची निवड कोणामधून करतो?!
काहीतरी निकष असतीलच ना??

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 9:53 am | तर्राट जोकर

ती एक पूर्ण स्वतंत्र व्यवस्था आहे. महंत, महामंडलेश्वर, आणि काय काय उपाध्या विकत मिळतात. त्यांची स्वतःची राजकारणं असतात. खेचाखेची असते. आखाडा संस्कृतीबद्दल शोध घेतला तर शंकाराचार्य कुठून येतात हे कळेल. आता वेळ नाही म्ह्णून टंकत नाही. शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा संबंध नाही हे हिंदूंना कळेल तो सुदिन.

+१
सहमत!

'इतरां'कडे पाहून 'आपल्यालाही' कोणीतरी सर्वोच्च 'अधिकारी पुरुष*' असावा या 'हव्यासा'तून हे घडवले गेले असावे.

*: इतर धर्मात जर स्त्रिया सर्वोच्च धर्मगुरू पदावर असत्या, तर कदाचित हिंदूंनीही एखादी स्त्री शंकराचार्यपदी स्वीकारली असती.

फक्त बाटलीबंद पाणी (मिनरल वॉटर ) जर पिण्यासाठी रोज वापरावे लागत असेल्,तर ते आरोग्यासाठी कसे असते.?
चांगले..वाईट की काहि फरक नाही..

उगा काहितरीच's picture

14 Apr 2016 - 10:45 am | उगा काहितरीच

माझ्या मते काही विशेष फरक पडत नसावा, पण एकदा शुद्ध पाण्याची सवय लागली तर चुकून/नाइलाजने अशुद्ध पाणी पिण्यात आले तर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असावी. अर्थात हा माझा समज जाणकारांच्या प्रतिक्षेत...

मार्मिक गोडसे's picture

14 Apr 2016 - 11:10 am | मार्मिक गोडसे

पण एकदा शुद्ध पाण्याची सवय लागली तर चुकून/नाइलाजने अशुद्ध पाणी पिण्यात आले तर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असावी

जंतुसंसर्गाला निदान उपाय तरी आहे, परंतू पाण्यात विरघळलेल्या विषारी घटकांमूळे किड्नीसारखे अवयव कायमचे निकामी होऊ शकतात. बाटलीबंद पाण्याचा TDS १५० पेक्षा कमी नसावा व ३०० पेक्ष अधिक नसावा.

तर्राट जोकर's picture

14 Apr 2016 - 12:12 pm | तर्राट जोकर

बरोबर.

सामान्यपणे विहिरी, नद्या, धरणे, कालवे इत्यादी नैसर्गिक स्रोतांमधून थेट कुठलेही शुद्धीकरण न करता येणार्‍या पाण्याचा टीडीएस सुमारे ६०० ते ९०० असतो. गेल्या अनेक दशकांपासून होत असलेल्या बेसुमार रासायनिक खतांच्या वापरामुळे हा टिडीएस वाढत जात आहे. असे पाणी पिणे पार्किन्सन्स सारख्या अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरत आहे.

बिसलेरीच्या पाण्याचा टिडीएस ३० असतो तर घरातल्या आरओ चा १०० च्या आत. सतत फिरत्या नोकरीवर असणार्‍यांनी कमी टिडीएस असणारे पाणी प्यायले पाहिजे. शुद्धीकरण न केलेल्या पाण्याचे सतत सेवन टाळले पाहिजे.

मार्मिक गोडसे's picture

14 Apr 2016 - 12:17 pm | मार्मिक गोडसे

बिसलेरीच्या पाण्याचा टिडीएस ३० असतो

The composition of Bisleri Water in milligrams per litre (mg/l):

80-150ppm TDS
6.5-7.5-ph factor
75ppm-Calcium
200ppm-Chlorides
30ppm-Magnesium

तर्राट जोकर's picture

14 Apr 2016 - 12:28 pm | तर्राट जोकर

सर, बिसलेरीचा ३० हा टीडीएस स्वतः मोजलेला आहे टीडीएस मीटरने. अधिकृत माहिती वेगळी असु शकते.

मार्मिक गोडसे's picture

14 Apr 2016 - 12:42 pm | मार्मिक गोडसे

अधिकृत माहिती वेगळी असु शकते.

असू शकेल. टेक्निशनकडून खात्री करुन घेतो.

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Apr 2016 - 1:02 pm | श्री गावसेना प्रमुख

20 पेक्षा कमी टीडीएस असलेले पाणी प्यायल्याने काय होऊ शकते

संदीप डांगे's picture

3 May 2016 - 3:44 pm | संदीप डांगे

२० पेक्षा कमी टिडीएस प्रकृतीस योग्य नाही. पिण्यायोग्य पाण्याचा टीडीएस हा ६० ते ३०० च्या रेंजमधे असावा. मुतखड्याचा त्रास टीडीएस जास्त असल्याने होतो हा गैरसमज आहे. तो काढून टाकावा. पिकांसाठी मात्र टीडीएस १०० च्या आसपास लागतो. पिकांचे पाणी आणि पिण्याचे पाणी वेगवेगळे असावे.

मितभाषी's picture

14 Apr 2016 - 12:07 pm | मितभाषी

'बळी' देणे हा शब्दप्रयोग कसा रूढ झाला असावा.

NiluMP's picture

14 Apr 2016 - 9:20 pm | NiluMP

I had home loan with HDFC for 18 year, with "HOME Suraksha Plus" Home loan protection policy.

I have closed the said loan within 5 years.

My questions are :

1. What will happen to that Policy?

2. Will I get any refund?

Sorry for typing in English.

रुस्तम's picture

15 Apr 2016 - 10:48 am | रुस्तम

You can surrender the policy and get remaining money back. Contact HDFC Ergo and surrender policy ASAP.

NiluMP's picture

15 Apr 2016 - 1:29 pm | NiluMP

Thanks for your reply.

तुम्हाला मिळालेले policy document वाचुन बघा. त्यात अटि दिल्या असतिल.

उगा काहितरीच's picture

14 Apr 2016 - 10:37 pm | उगा काहितरीच

जागेची वाटणी करताना (वडिलोपार्जीत घर) काही भागाची किंमत इतर जागेच्या तुलनेत जास्त असेल (मेन रोड वगैरे कारणांमुळे )आणी एका भावाला जास्त किंमत असलेली जागा हवी असेल तर दुसऱ्या भावांना क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्त जागा घेण्याचा अधिकार आहे का ?

वडिलोपार्जित मालमत्ता हि सरस निरस मानाने वाटणी केली जाते. म्हणजे, मालमत्तेचे मूल्य, स्वरूप इ. लक्षात घेऊन हिस्से वाटणी केली जाते.

नाव आडनाव's picture

16 Apr 2016 - 9:02 am | नाव आडनाव

अँड्रॉईड ओ.एस. ऑटो अपडेट होत नसेल तर दुसरा काही ऑप्शन आहे का अपडेट करण्यासाठी? माझा टॅब मायक्रोमॅक्स पी ६०० आहे. कंपनी ओ.एस. वर्जन आहे अँड्रॉईड ४.०.४.
"सिस्टिम अपडेट" -> "रिमोट अपडेट" मधे गेलो तर "Your system is currently up to date" असा मेसेज येतोय. सेटिंग्स मधे रिमोट अ‍ॅड्रेस यू.आर.एल. देऊन अपडेट होइल का? तसं असेल तर यू.आर.एल. काय द्यायची?

प्रसाद भागवत's picture

17 Apr 2016 - 7:53 pm | प्रसाद भागवत

महत्वाचे -

आजकाल पुणे शहराजवळ 5 लाखात घर..अशी मोठी जाहिरात केली जात आहे, मला या जाहिरातीतील घर घेण्यांत रस आहे. या आधीही 'भारतीय जनघर योजना' नावाने स्वस्त घर योजनेच्या जाहिराती पाहिल्या. जाहिरातीतील भाषा छायाचित्रे , रंगसंगती व योजनांची नावे ई. पहाता ह्या योजनांना सरकारी पाठबळ असावे असे वाटते..

वस्तुस्थिती काय आहे ?? कोणी जाणकार माहिती देवु शकेल काय??

सस्नेह's picture

18 Apr 2016 - 12:13 pm | सस्नेह

जाहिरातीत दिलेल्या पत्ता किंवा फोन नंबरवर चौकशी करा.

भीमाईचा पिपळ्या.'s picture

18 Apr 2016 - 9:32 pm | भीमाईचा पिपळ्या.

प्रधान मंत्री आवास योजना व ह्या स्किमचा काहीही संबंध नाही. सबब वेट अ‍ॅण्ड वाॅच.

जाहिरातीतील भाषा छायाचित्रे , रंगसंगती व योजनांची नावे ई. पहाता ह्या योजनांना सरकारी पाठबळ असावे असे वाटते..

फुटलाय फुगा आता .

प्रसाद_१९८२'s picture

17 Apr 2016 - 8:11 pm | प्रसाद_१९८२

दरवेळी कोकणात जाताना घाटात सुचना लिहिलेल्या असतात. त्यामध्ये प्रामुख्याने दिसणारी आणि लक्ष वेधून घेणारी सुचना म्हणजे >>वेडी वाकडी वळणे वाहने हळू चालवा<< ही असते. आता वळणे वाकडी असू शकतात पण वळणे "वेडी" असणे कसे शक्य आहे?

तर्राट जोकर's picture

17 Apr 2016 - 8:24 pm | तर्राट जोकर

'वेडं' करणारी काही 'वळणे' पाऊल 'वाकडं' पडण्यास कारणीभूत ठरतात. ;)

नाखु's picture

18 Apr 2016 - 3:00 pm | नाखु

रस्त्यातील अनोळखी परंतु लक्ष्यवेधी "वळणदार" प्रलोभनांकडे वेडी वाट करू नये म्हणून असेल.

कोकणात भुते आहे असे म्हणतात.

खखो भुते आणि कोकण जाणे (आणि आता मुवीही)

भीमाईचा पिपळ्या.'s picture

20 Apr 2016 - 9:05 pm | भीमाईचा पिपळ्या.

वेडी वाकडी वळणे
यावरून सकाळ मुपिची "घाटात फूटला घाम" नामक कथा आठवली. प्रतिक्रिया भन्नाट आहेत. फुल्टू टाइमपास. =))
मोबाईलवरून लिंक देता येत नाही. स्वारी.....

मराठी कथालेखक's picture

18 Apr 2016 - 11:32 am | मराठी कथालेखक

आजकाल गुलाबाची वासाची फुले मिळेनाशी झालीत.
वासाची फुले कुठे मिळू शकतील (पिंपरी-चिंचवड /पुण्यात)
वासाच्या गुलाबाचे रोप कुठे मिळू शकेल ?

चांदणे संदीप's picture

18 Apr 2016 - 11:55 am | चांदणे संदीप

देहूतून तळेगाव चाकण रस्त्याकडे म्हणजेच भंडारा डोंगराकडे जाताना नदीपुलापासून अर्धा-एक किमीवर डाव्या बाजूला छानशी छोटीशी नर्सरी आहे. गुलाबाची रोपे'च' तिथे प्रामुख्याने मिळतात. तिथे हमखास वासाची फुलाबाची रोपे मिळतील.

Sandy

मराठी कथालेखक's picture

18 Apr 2016 - 12:35 pm | मराठी कथालेखक

नर्सरीच नाव सांगू शकाल काय ? जमल्यास google map वर location देवू शकता का ?

चांदणे संदीप's picture

18 Apr 2016 - 1:14 pm | चांदणे संदीप

ही घ्या गुगल भाऊने दिलेली लिंक...

https://www.google.co.in/maps/@18.7323466,73.7579163,143m/data=!3m1!1e3?hl=en

इतक काय अवघड नाहीये खर... तुम्ही, सांगितलेल्या रस्त्यावरून सावकाश गेलात की डाव्या बाजूला दिसेलच. रस्त्याला लागूनच आहे. आणि बहुधा त्या रस्त्यावर तेवढी एकच आहे.

Sandy

मराठी कथालेखक's picture

18 Apr 2016 - 3:42 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

माझ्याकडे सुगंधी, गुलाबी रंगाच्या गुलााचा वेल होता आठ दहा वर्षांपुर्वी तो नंतर जगला नाही.त्याच्या पानांना हात लावला तरी सुगंध येत असे.नंतर त्याच नर्सरीत तो गुलाब मिळेना.

मराठी कथालेखक's picture

18 Apr 2016 - 3:42 pm | मराठी कथालेखक

आता वासाचा गुलाब मिळणे का बंद झाले असावे ?

सुनील's picture

18 Apr 2016 - 3:53 pm | सुनील

बंद बिंद नाही झाला हो. माझ्याकडे आहे. कल्याणच्या पाठारे नर्सरीतून आणला होता गेल्या वर्षी. २०-२५ फुले दिली आत्तापर्यंत. गेल्या दोन महिन्यांपासून मात्र फूल नाही.

मराठी कथालेखक's picture

18 Apr 2016 - 4:07 pm | मराठी कथालेखक

१००% बंद नसेलहि पण रस्त्यावर जे फुलविक्रेते असतात त्यांच्याकडे वासाचे गुलाब अजिबात मिळत नाहित.

साबुदाणा खिचडी रामबाण पाककृती हवीये. होना, माझी साबुदाणा खिचडी नेहमी चुकते. कधी कोरडी तर कधी लिग्दा होतो. काहीतरी सोपा उपाय सांगा. मला आता जास्त खटपट करण्यात रस राहिला नाही. खूप वेळा चुकलो आहे.

मराठी कथालेखक's picture

18 Apr 2016 - 4:09 pm | मराठी कथालेखक

साबुदाणा हा एक अत्यंत निकृष्ट, खाण्याच्या लायकीचा नसलेला पदार्थ आहे. तो खावू नये हेच चांगले.

विजय पुरोहित's picture

18 Apr 2016 - 4:14 pm | विजय पुरोहित

गोंडस बाळ, मुळात शाबुदाणा चांगल्या क्वालिटीचा मिळाला तर खिचडी खराब होत नाही. याबाबत एखाद्या सुपर मार्केटमध्ये घेतलेला, चांगल्या पॅकिंगचा, महाग किंमतीचा शाबुदाणा देखील चांगलाच असेल याची खात्री नाही. असा शाबुदाणा देखील बाद निघतो याचा मला अनुभव आहे. साबुदाणा आपल्या खात्रीच्या दुकानदाराकडून कायम विकत घ्यावा. मी साता-याला कधी गेलो की मग एकदमच दोन तीन किलो घेऊन ठेवतो. सुट्टा पण अतिशय चांगल्या क्वालिटीचा मिळतो. अर्थात मी उपास बिलकुल करत नाही की साबुदाणा अगदी प्रत्येक आठवड्यात खात नाही. वर म.क. यांनी म्हटल्याप्रमाणे तो आरोग्याला चांगला नाहीयेच.

साबुदाणा या पाककृतीचे सर्व यश तो भिजवण्यात सामावलेले आहे. साबुदाणा भिजवताना पाण्याचे कर्रेक्ट प्रमाण तुम्हाला जमले तर तुम्ही पाकृ आयपीएलच्या सेमिफायनलीत गेलात असे समजायला हरकत नाही.
हा (साबुदाणा) साधारण आठ तास भिजला की उपसून मोकळा करून अर्धा तास ठेवायचा आणि मग त्याला मीठ साखर लावून ठेवायचे. मग छानपैकी कढईत मस्तपैकी भरपूर तूप घालावे आणि हिरव्यागार मिरच्यांची जिऱ्यासहित फोडणी करावी. (गॅस पेटता असावा याची खबरदारी घेणे ) मग त्यात अघळपघळ बचकभर शेंगदाण्याचा कूट घालावा आणि मग भिजवलेल्या साबुदाण्याला त्यात लोळवावे. इथे मावेओ असेल तर साबुदाणे कढईशी चिकटपणा न करता मऊसूत सळसळीतपणा धारण करतात.
आणि मग काय, वर खोबरे कोथिंबीर पेरा आणि हाणा !

रुस्तम's picture

19 Apr 2016 - 11:22 pm | रुस्तम

तांदूळ भिजवतो तस भिजवायच का?

सस्नेह's picture

21 Apr 2016 - 10:54 am | सस्नेह

पसरट भांड्यात साबुदाणे घालून एकदा धुवून पूर्ण पाणी काढावे. मग साबुदाण्याच्या वर न येईल इतपत पाणी घालून चार ते सहा तास झाकून ठेवावे.
हे झाले जनरल. पण प्रत्येक साबुदाण्यात पाण्याचे प्रमाण हे त्याच्या क्वालिटीवर अवलंबून असते. भिजल्यावर मोकळा झाला पाहिजे इतपतच पाणी घालावे. साबुदाणा नवीन आणला की एकदा ट्रायल घेतल्याशिवाय अंदाज येत नाही.

रुस्तम's picture

21 Apr 2016 - 11:02 am | रुस्तम

धन्यवाद ताई

लालगरूड's picture

20 Apr 2016 - 6:00 pm | लालगरूड

private company मध्ये मेडिकल टेस्ट मध्ये काय काय तपासले जाते ....