Skip to main content

विडंबन - विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने

उपटसुंभ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
खासदार फोडू, सरकार पाडू. काढीत जाऊ आज "व्हिप" साजणी..! असंतुष्ट गाठू,पैशास वाटू कोटीत होई सारे ठीक साजणा..! नको काळजी तू कर खुशाल बंड, इलेक्शन विना रे दुजा काय छंद तुला देतो साथी ,मी हवी ती खाती, आत्म्यास तूही थोडे वीक साजणी..! संसदेत चाले अरे हा तमाशा. डाव्या उजव्यांची कशी एक भाषा प्रतिष्ठाच सारी धुळीला मिळाली. कसे गद्दारांचे आले "पीक"साजणा..! विश्वास निष्ठा लिलावात सारे. इथे नीतीमत्ता कुठे शोधता रे ! तू का मनाशी ,लाज वाटून घेशी ? अशी लोकशाहीची आहे "रीत" साजणी..! -- अभिजीत दाते मूळ गीत - धुंदीत राहू मस्तीत गाऊ चित्रपट - बाळा गाऊ कशी अंगाई

हे फक्त भारतीय चित्रपटातच घडू शकत.

नि३ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
बाघबानः अमीताभ आणी हेमा हे होळी नंतर (आठवा होली खेले रघुवीरा...गाण) सहा महिन्या करीता एकमेंकापासुन वेगळे होतात (म्हणजेच मार्च पासुन सप्टेंबर) आणी त्या सहा महीण्याच्या कालावधीत ते वेलेंटाईन डे साजरा करतात जो १४ फेब्रुवारी ला असतो ,करवा चौथ पण (जे साधारणता ऑक्टोंबर मधे असते). आता काही माझ्या क्रिकेट प्रेंमीसाठी ... लगानः ते म्हणतात की ही कहाणी १९व्या शतकातील आहे (भारत ईंग्रंजाच्या पारतंत्र्यात असतांना). त्या वेळेस क्रिकेट मधील एक षटक हे ८ चेंडु च असायच परंतु पिक्चर मधे ते ६ चेंडुच दाखवलय.

कुळथाचे(हुलग्याचे)पिठले

स्वाती दिनेश यांनी या दिवशी प्रकाशित केले.
शेखरच्या मागणीवरून ही पाकृ लिहिते आहे. कुळीथ पीठ १/२ वाटी,३ ते ४ हिरव्या मिरच्या,६ते ७ लसूण पाकळ्या,एखादे आमसुल,ओले/सुके खोबरे,कोथिंबिर,तेल,फोडणीचे साहित्य कुळथाच्या पीठात ३ ते ४ वाट्या पाणी घालून कालवून घ्यावे,त्यात मीठ घालावे. तेलाची खमंग फोडणी करावी.त्यात लसूण पाकळ्या,मिरच्या,आमसूल घालावे.व हे कुळथाचे पीठ घालावे.खोबरे व कोथिंबिर घालावे.खळखळून उकळू द्यावे,चांगले शिजू द्यावे.

छायाचित्र परिक्षण - ३ :)

विसोबा खेचर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, मिपाचे एक सन्माननीय सभासद सूर्य यांनी मिपावर 'छायाचित्र परिक्षण' हे एक सुंदर सदर सुरू केले आहे. याचे पहिले दोन भाग प्रसिद्ध झाले आहेत. त्यात मिपावरील काही तज्ञ छायाचित्रकारांनी संबंधित छायाचित्राबद्दल आपापले विवेचनही दिले आहे. आज आम्ही सूर्यदेवांच्या परवानगीविना (ते परवानगी नाकारणार नाहीत याची खात्री आहे म्हणून!) हा तिसरा भाग प्रकाशित करत आहोत. मिपावरील छायाचित्र तज्ञांनी व रसिकांनी खालील छायाचित्राचे परिक्षण करावे.

नरकयातना

मनस्वी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
देवगाव (ता. नगर) येथील या चिमुरडीच्या नशिबात पुन्हा आशेचे किरण खुलू शकतात; परंतु सुमारे एक लाख रुपयांच्या शस्त्रक्रियेनंतर. आर्थिक मदत मिळाली तरच या शस्त्रक्रिया होऊ शकतात. पैशांची जमवाजमव झाल्यानंतर पुण्यातील 'रुबी हॉल' मध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तेथे डॉक्‍टरांनी दोन अवघड शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्या. शस्त्रक्रिया झाल्या नाहीत, तर जिवाला धोका होऊ शकतो.

किती सत्य आहे

श्रीकृष्ण सामंत यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"माझं मन मला म्हणालं,आजच्या आज पेक्षा उद्दाचा उद्दा नक्कीच ग्रेट असणार.ज्या जगात माझी पिढी वाढणार आहे ते जग नक्कीच जास्त चांगलं असणार,वाईट नक्कीच नसणार." त्यादिवशी तळ्यावर मी प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो.नेहमीच्या वेळेवर प्रोफेसर काही आले नाहीत त्यावेळी मी समजलो की आता जास्त वेळ त्यांची वाट बघण्यात अर्थ नाही.म्हणून मी उठतो उठतो तोच त्यांचा नातु माझ्या मागे उभा असलेला दिसला.

भारतिय र्गुप्तचर विभाग सक्शमरित्या काम करते आहे?

मित्र जयन्त यांनी या दिवशी प्रकाशित केले.
चिन्या१९८५

माझ्यामते भारतीय गुप्तचर विभागाचे काम फारच ढिसाळ असले पाहीजे.आपल्याकडे इतके बाँब्स्फोट होतात्,इतक्या सार्‍या गोष्टी होतात पण तरीही फारच कमी गोष्टी थांबवल्या जातात. साहजिकच गुप्तचर विभागाचा दोष आहे.
28/07/2008 - 14:10 Permalink
खडूस

माझ्या मते केवळ गुप्तचर विभागाला दोष देऊन चालणार नाही. सर्वानी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे. डोळसपणे आजूबाजूला पाहून जर काही सन्शयास्पद घडत / वाटत असेल तर ताबडतोब पोलिसाना कळवायला हवे. फक्त सरकारने काम करावे मी घरी बसून टीका करणार ही व्रूत्ती सोडून एकत्रित आलो तर खरच परिस्थिती लवकरच बदलेल.
30/07/2008 - 20:11 Permalink
विजुभाऊ

या इथे कोणी हो किंवा नाही असे कोणतेही उत्तर दिले तर नक्की काय माहिती मिळणार आहे? हे असले धागे काढुन असा कोणता निष्कर्ष निघणार आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
30/07/2008 - 20:27 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊंशी १००% सहमत. आणि इथे मतं मांडणाय्रा लोकांना किती आतली माहिती आहे की त्यांच्या मताला काही वजन असावं? अदिती
30/07/2008 - 21:00 Permalink
प्राजु

अगदी बरोबर बोललात. हा विषय इथे चर्चा करून नक्की काय मिळणार आहे?? उगाच ट्रॅफिक जाम... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
30/07/2008 - 21:45 Permalink
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असे कौल उडवायला पाहिजे असे वाटायला लागले आहे. !!!! (स्वगत : मालकाशी आणि संपादकांशी चर्चा करावी म्हणतो) अवांतर : तस्से पाहिले तर कौलच नव्हे, तर अनेक गोष्टीं इथे आणि समाजात असतात आणि त्यावर आपण चर्चा करत असतो. ज्याचे निष्कर्ष नाहीत मग त्यावर चर्चा करु नये का ?
30/07/2008 - 21:54 Permalink
भडकमकर मास्तर

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतर : तस्से पाहिले तर कौलच नव्हे, तर अनेक गोष्टीं इथे आणि समाजात असतात आणि त्यावर आपण चर्चा करत असतो. ज्याचे निष्कर्ष नाहीत मग त्यावर चर्चा करु नये का ? मला हा गुप्तचरखात्याचा विषय महत्त्वाचा वाटतो .....शीर्षक वाचून आत शिरलो तर घोर निराशा झाली.... चर्चा करावी पण कौल टाकणार्‍याने निदान हा कौल घेण्याचे कारण काय ? त्या कौलाबद्दल स्वतःची मते काय ? कौलाच्या निष्कर्षातून काय सिद्ध करायचा हेतू आहे?याबद्दल निदान स्वतः काहीतरी लिहावे ... नुसती एक ओळ टाईप करून त्यावर काथ्याकूट कसा करायचा? अवांतर : बरेच लोक हल्ली कोणत्यातरी वर्तमानपत्राचा दुवा देतात आणि म्हणतात वाचा.... अरे काय वाचा? का वाचा? ते तू का वाचलंस? तुला आवडलं का? असलं तर का? नसलं तर का? ते नको का लिहायला? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
31/07/2008 - 00:17 Permalink
छोटा डॉन

In reply to by भडकमकर मास्तर

भडकमकर मास्तरांशी सहमत. मी पण शिर्षक वाचुन आत शिरलो आणि घोर निराशा झाली. एका चांगल्या चर्चेची अपेक्षा होती पण सुरवात ही कौल टाकणार्‍याने करायला हवी ... फुकटचे कोंबडे लढवुन मजा बघण्यात काय अर्थ ??? विषय खरेच महत्वाचा आहे, चांगली चर्चा होऊ शकते ... निश्कर्ष काय निघतो व त्याचा उपयोग काय हे प्रश्न जरी वादाचे असले तरी विषय उत्तम ... पाहु दुसरा धागा सुरु करु ... पण हा असा कौल मात्र फक्त निर्रथकच ! सुस्पष्ट - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
31/07/2008 - 20:04 Permalink
धनंजय

कौलाचा निष्कर्ष हा नव्हे की खरोखर गुप्तचरविभाग सक्षम आहे की नाही. कौलाचा निष्कर्ष असा आहे की याबद्दल लोकांचे काय मत आहे. काही परिस्थितींमध्ये मूळ सत्यासत्याइतकीच "लोकांना काय वाटते" हा प्रश्नही महत्त्वाचा असतो. ठळक उदाहरण म्हणजे "अमुक बँक बुडणार आहे का?" बहुतेक लोकांना वाटत असेल की बँक बुडणार, तर त्याचा बँकेवर परिणाम होतोच. मग त्या त्या बँकेची वास्तविक परिस्थिती त्या मानाने भक्कम असली, तरी लोक आपले पैसे काढून घेतील, आणि बँक बुडेल... इ.इ. लोकशाहीत "सरकार वास्तविक काय करते" याच्याइतकाच "लोकांना सरकार काय करते असे वाटते?" हा प्रश्न महत्त्वाचा आहे. "सद्दाम-इराक कडे महाध्वंसक शस्त्रास्त्रे असल्याचे बुश सरकारची गुप्त माहिती खरी होती का?" या प्रश्नाइतकाच महत्त्वाचा प्रश्न आहे "लोकांना खरी वाटली का?" मग माहिती वास्तविक खरी असो नसो, अमेरिका युद्धात उतरणे अटळ होते. मोठ्या आणि दीर्घकालिक राज्यांची गुप्तहेरसेवा नेहमीच बरेच काहीकाही गुप्तपणे करत असते - ते आपल्याला ठाऊक नसते कारण त्या संस्था गुप्त आहेत. पण बहुतेक लोकांना आपला देश अति-सचोटीचा, अति-सहिष्णू, आणि लेचापेचेपणाकडे झुकणारा आहे असे वाटणे महत्त्वाचे आहे. नाहीतर बोजड सुरक्षाव्यवस्थेला बिनशर्त अधिकाधिक पैसे पुरवायला मतदार तयार होणार नाही. हिशोब मागेल. हिशोब दिला-घेतला की सुरक्षाव्यवस्था गुप्त राहाणार नाही. गुप्त राहाणार नाही तर कार्यक्षम राहाणार नाही - असा एक मतप्रवाह आहे. (सुरक्षाव्यवस्था गुप्त असणे अपरिहार्य आहे, म्हणून ती बिनहिशोबी =बोजड/भ्रष्ट असणे अपरिहार्य आहे.) या कौलातून "लोकांचे मत काय?" असा महत्त्वाचा कानोसा घेता येतो.
30/07/2008 - 22:48 Permalink
विसोबा खेचर

In reply to by धनंजय

धन्याशेठशी सहमत आहे! बाय द वे, माझं मत - मुळीच सक्षम नाही. नाहीतर इतके धडाध्धड बाँब फुटलेच नसते! आजकाल साला कुठेही कधीही बाँब फुटू शकतो आणि त्यात निरपराध लोकांचा बळी जातो. उपयोग काय त्या गुप्तचर विभागाचा? फुकटचा पगार खातात साले! तात्या.
31/07/2008 - 08:39 Permalink
विजुभाऊ

ठळक उदाहरण म्हणजे "अमुक बँक बुडणार आहे का?" बहुतेक लोकांना वाटत असेल की बँक बुडणार, तर त्याचा बँकेवर परिणाम होतोच. मग त्या त्या बँकेची वास्तविक परिस्थिती त्या मानाने भक्कम असली, तरी लोक आपले पैसे काढून घेतील, हे उदाहरण गैरलागु आहे. कारण बॅन्क बुडत असताना त्यातले शक्य तेव्ढे पैसे काढता येतात. गुप्तचर विभाग अक्षम आहे असा निष्कर्ष निघाला तर काय करायचे. हल्ली सरकारच डोके ठिकाणावर आहे का? असले अग्रलेख लिहुनही उपयोग होत नाही. सरकार बदलणे हेही हाताबाहेरचे आहे. देश बदलणे म्हणावे तितके प्रॅक्टिकल नाही. मग कौलाचा निष्कर्ष काय येतो याचा काय फरक पडणार आहे. आणि तो निष्कर्ष काढुन आपण तरी काय मिळवणार आहोत? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
31/07/2008 - 09:37 Permalink
धनंजय

In reply to by विजुभाऊ

ठळक उदाहरण नेमके गैरलागू आहे - पण ते दिले कारण त्याविषयी एकमत आहे. त्याच्या उपमेने पुढील नेमके उदाहरण लावावे. नेमके उदाहरण "सद्दाम-इराककडची शस्त्रास्त्रे/अमेरिकेची गुप्तहेर संस्था/लोकांचे गुप्तहेरसंस्थेबद्दल मत" हे होते. "अमेरिका युद्धात उतरणार" हे निश्चित भाकित "अमेरिकन लोकांना अमेरिकेची गुप्तहेर संस्था सक्षम वाटते" यावरून सांगता आले होते. "सद्दामकडे शस्त्रे खरोखर होती की नव्हती", किंवा "अमेरिकन गुप्तहेर संस्था खरोखर सक्षम आहे की नाही" या प्रश्नांचा काही लोकांचे मत कळण्याचा मला फायदा हा - १. माझे मत वेगळे असेल, अमेरिकेने युद्धात उतरू नये असे वाटत असेल, तर लोकांमध्ये "सद्दामकडे शस्त्रास्त्रे नाहीत/अमेरिकन गुप्तहेर संस्था या बाबतीत सक्षम नाही" अशी माहिती पसरवणे. २. मला अमेरिकेच्या-इराकच्या भल्याचे सोयरसुतक नसेल, पण भारताचे धोरण आखायचे असेल, तरी "अमेरिका युद्ध करणार" हे भाकित उपयोगी आहे. ३. मला अमेरिकेच्या-इराकच्या भल्याचे सोयरसुतक नसेल, भारताचे धोरण आखण्यात माझा हात नसेल, तरीही मोठ्या युद्धामुळे शेअरबाजार बदलतोच. मी माझे पैसे युद्धसामग्री-उत्पादकांमध्ये आणि तेल-उत्पादकांमध्ये अधिक गुंतवावेत. ४. माझ्याकडे शेअरबाजारात गुंतवण्यासाठी पैसे नसतील तरी युद्धामुळे इंधनतेलाचा भाव वाढणार असे भाकित लक्षात घेऊन काटकसर वाढवावी. विजुभाऊ म्हणतात : "मग कौलाचा निष्कर्ष काय येतो याचा काय फरक पडणार आहे." वरील चार मुद्दे अशा प्रकारे व्यापक ते वैयक्तिक अशा सर्व स्तरांवर ही माहिती उपयोगी आहे. ज्यांना लोकमत बदलता येते, ज्यांना सरकार बदलता येते, ज्यांना अर्थकारण बदलता येते, आणि ज्यांना स्वतःची काटकसर बदलता येते, सर्वांसाठीच अशा प्रकारच्या कौलाचा फायदा करून घेता येतो. मी मुद्दामून अमेरिकेचे उदाहरण दिले आहे. इतक्या तटस्थपणे स्वदेशाबद्दल बोलायची आणि ऐकायची आपल्याला सवय नाही. वाचकाने स्वतःचा दृष्टिकोन आणि उद्दिष्ट्ये जाणून या कौलाचा उपयोग "स्फोट/भारतीय गुप्तहेर संस्था/संस्थेबद्दल लोकांचे मत" या विषयाला लावून घ्यावे. अमेरिकेबद्दल मुद्दे १-४ सारखेच मुद्दे आजमवावे. ज्या कुठल्या स्तरावर आपल्याला कार्यशक्ती आहे, तिथे निष्कर्षाचा फायदा करून घ्यावा.
31/07/2008 - 19:53 Permalink
चतुरंग

In reply to by धनंजय

धनंजयचा रोख हा तुमच्या 'सर्कल ऑफ इंफ्लूअन्स' मधे तुम्ही प्रभावी काम/बदल करु शकता, तिकडे आहे. 'सर्कल ऑफ इंफ्लूअन्स' - म्हणजे एखाद्या निष्कर्षातून जेव्हा काही निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपली पोच जिथपर्यंत आहे त्या परिमितीत आपण त्या निष्कर्षाचे फायदे अनुभवू शकतो. तुम्ही स्वतः, तुमचे कुटुंब, तुमची मित्रमंडळी, परिसरातले लोक, तुमचा निवडणूक वॉर्ड, शहर, तालुका, जिल्हा..ह्या क्रमाने ते वर्तुळ विस्तारत जाऊ शकते! चतुरंग
31/07/2008 - 20:03 Permalink

गटारी अमावस्या

अमोल केळकर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
गटारी अमावस्या - गेले काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबर सारखेच या दिवसा कार्यक्रम आखले जातात. श्रावण महिन्यात मांसाहार साधारण पणे केला जात नाही. पुढील संपुर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरु होण्यापुर्वीच्या अमावस्येदिवशी भरपेट मांसाहार ( पेयपान ) करुन पुढील महिन्याची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. ( मुंबईत बहुतेक श्रावण सुरु होण्यापुर्वीचा शेवटचा रविवार गटारी म्हणुन साजरा केला जातो. ) यामागचे काय शास्त्र आहे ? काय रुढी आहेत ? हे या चर्चेतुन माहित करुन घ्यायला आवडेल.

मिसळपाव आज पुणे मिरर मधे...

नीलकांत यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज मिसळपाव बद्दल टाईम्स ऑफ इन्डीयाच्या पुणे मिरर या वर्तमानपत्रात बातमी आली आहे. मिसळपावकरांनी बंगलुरूमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जी तात्काळचर्चा केली आणि त्याला बंगलुरूवासी मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यात माहिती दिलेली आहे. मिसळपावचा एक फोटो (स्नॅपशॉट) देऊन ५ नं पानावर ही बातमी आहे. पुणे मिररचे स्वतंत्र संकेतस्थळ नसल्यामुळे बातमीचा मथळा देत आहे. Potpourri of information Misalpav.com is one the websites which has been pivotal in relaying news from the blast-torn cities of Bangalore and Ahmedabad.