Skip to main content

)तुझ्या रेशमी केसांनी(

लेखक sur_nair यांनी रविवार, 14/03/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
विजुभाउंची कल्पना आवडली http://www.misalpav.com/node/11426. जरा वेगळा मार्ग निवडलाय पण प्रेरणा तुमचीच तुझ्या रेशमी केसांनी, केलीस काय किमया कित्येक गळे कापले, केलेस जीव वाया तुझ्या रेशमी केसांनी, आषाढमेघ लाजले श्वासात गंध भरुनी, उरात पूर वाहिले तुझ्या रेशमी केसांनी, उधाण येई अंधारा अवसेची रात्र काळी, कि देवळातील गाभारा? तुझ्या रेशमी केसांनी, भलतीच होय जादू वेणीत बांध यांना, नको मोकळे सोडू - आत्तापुरता एवढंच सुचतंय सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/
काव्यरस

))तुझ्या रेशमी केसांनी((

लेखक तुका म्हणे यांनी रविवार, 14/03/2010 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ: विजूभाऊचा हा मूळ धागा: http://www.misalpav.com/node/11426#comment-182034 रेशमी केसात तुझ्या जीव माझा गुंतला धुंद या काळ्या बटा, अन प्राण घेई मोगरा का आता गमजा करी? तारका नभातल्या भेटीत पहिल्याच तुझ्या, चंद्रमाही लाजला सोडू कसा हा नाद मी, सांग तू माझ्या फुला, प्रेमात तुझ्या भारावलो, सूर ऐसा लागला होतो खुळा, आहे खुळा, भान न त्याचे मला जादू भरले नैन तुझे हे, ठेवती न माझा मला, कळले मला ग प्रेम ते, उमजले का सांग तुला, जेव्हा तुझ्या हातास अलगद, हात माझा स्पर्शला
काव्यरस

प्लँचेटचे प्रयोग

लेखक हेमंत बर्वे यांनी रविवार, 14/03/2010 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला आठवतं आहे तेव्हापासूनच्या लहानपणाच्या आठवणी समर्थ नगरशी संबंधीत अशा आहेत. समर्थ नगर म्हणजे चुनाभट्टीचं समर्थ नगर. आमच्या समर्थ नगरातल्या इतर मुलांसारखाच मी पण होतो. फरक एव्हढाच होता की मी इतर मुलांपेक्षा मनस्वी होतो. आई शाळेत जायची , ताया दोन्ही माझ्यापेक्षा मोठ्या ,दादा म्हणजे दादा सगळ्यात मोठा.वडील अकाली गेलेले.त्यामुळे माझ्या मनस्वी वागण्याला मोकळा वाव मिळाला. आधी लहान म्हणून फारसं लक्ष कुणी दिलं नाही पण मग मनस्वी पणाल एक हट्टीपणाची झाक आली. शाळेत हुषार . पहील्या पाचात नंबर .शेजार पाजार सुशिक्षीत ब्रह्मवृंदांचा. पण इतर मुलांपेक्षा मी वेगळा होतो हे नक्की. सवयी स्वच्छ.

न येती उत्तरे

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 14/03/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
न येती उत्तरे
लेखन व दिग्दर्शन:- प्रमोद काळे संगीत:- अक्षय कुलकर्णी नेपथ्य: - सचिन भिलारे प्रकाश योजना:- अपुर्व साठे कलाकार:- हर्षद राजपाठक, मंदार कुलकर्णी निर्मिती: महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे मागच्या टायमाला हे नाटक बघायचं हुकलं. आज अचाकनक ठरवले कि जायच आन संमोहित झाल्यासारखा नाटकाला गेलो. सुदर्शन रंगमंच च्या प्रथेप्रमाणे चप्पल काढुन स्टँडवर लावली. मी हातात धरुन वरती ठेवतो म्हणजे तेवढच सेफ. नाहीतर निम्माजीव चपलेत अडकायचा. आतमधे गेल्यावर फॅन पाहुन खुर्ची पकडली.

ज्युरी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 14/03/2010 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वि न्यायदाना साठी न्यायाधिश साहेबांच्या व्यतिरिक्त ज्युरी असायचे..ति नेमकी पध्धत काय होति?...ति भारतात कधि पर्यंत चालु होति..ति कधि व का बंद झाली.?..या वर कुणी जाणकार माहिति देवु शकेल का?

)तुझ्या रेशमी केसांनी(

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 14/03/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या रेशमी केसांनी : एक सुडंबन विजुभाऊंनी विघडवलेलं सुघडवण्याचा माझा प्रयत्न. मूळ विडंबनाशी एकनिष्ठ राहाण्यासाठी यमक, वृत्त, कवितेचा स्वर व बरेचसे शब्द तेच ठेवलेले आहेत.
काव्यरस

कालाय तस्मै नमः ||

लेखक जयवी यांनी रविवार, 14/03/2010 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
जसा जसा काळ पुढे सरकतोय, तसं तसं जग बदलतंय.....फार बदलतंय. मूलभूत गरजा सुद्धा बदलल्या आहेत. आधी अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गोष्टी असल्या तरी आयुष्य निभत होतं. ह्या शिवाय जे काही हवं असायचं, त्या होत्या सुख सुविधा !! आता मात्र सगळंच बदललंय. अन्न, वस्त्र, निवाऱ्याखेरीज अजूनही खूप गोष्टी हव्या असतात जगायला आणि त्यांना सुख सुविधा म्हणून चालणार नाही.....त्या ही गरजाच झाल्या आहेत. इंटरनेट ही अशीच माणसानं स्वत:साठी निर्माण केलेली गरज. आधी कॉम्प्युटर्स नव्हते तेव्हा ही आयुष्य चालत होतंच की. पण आता जरा नेट बंद झालं की जीव अगदी कासावीस होतो. नेट बंद झालं की एकदम out of touch वाटतं.

सौंदर्यामधुन नित्य ती चालते

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 14/03/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
लॉर्ड बायरन् यांची "शी वॉक्स इन् ब्यूटी" ही कविता इंटरनेटवर मिळाली. आणि स्वैर अनुवाद करण्याची हुक्की पुन्हा आली. यात प्रत्येक ओळीसाठी बाराक्षरी छंद (६+६) वापरला असून शेवटल्या अक्षरांच्या आकार-इकार-उकारांमध्ये मूळ कवितेनुसार (१२१२१२; ३४३४३४; ५६५६५६) यमकांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

बाळाजी विश्वनाथ भट यांची मुत्सद्देगीरी

लेखक नितिनकरमरकर यांनी रविवार, 14/03/2010 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
बाळाजी विश्वनाथ भट "पेशवे" होण्या पूर्वीची ही कथा आहे. नक्की काळ माहीत नाही परंतू संभाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर ही घटना घडली असावी. कदाचीत राजाराम महाराजांच्याही म्रुत्युनंतर असावी. औरंगजेबाचे प्रचंड सैन्य महाराष्टात धुमाकूळ घालत होते. जवळ्जवळ सर्व किल्ल्यांना वेढे होते किंवा ते मुगलांच्या ताब्यात तरी होते. बरयाच वेळा मराठे स्वता: किल्ला मुगलांच्या ताब्यात देत असत आणि थोड्या दिवसांनी परत जिंकून घेत असत! असाच सिंहगडाला वेढा पडला होता. मुगलांचा किल्ला घेण्याचा उत्साह फारच होता! एक एक वेढा वर्ष वर्ष चालत असे. किल्ल्याला तशी फारशी तोशिश लागत नव्हती.