Skip to main content

आदीत्य निसर्ग

लेखक तुका म्हणे यांनी मंगळवार, 16/03/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
अदित्य निसर्ग बन्गलो प्लौट्स बद्द्ल कुणि महिति देउ शकेल काय? गुन्तवणुक म्हणून अथवा रहण्याच्या द्रुष्टिने कसे आहेत. कुणी या स्किम मध्ये प्लौट्स घेतले आहेत काय?

~ गुढीपाडवा ~

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 16/03/2010 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्र महिन्याशी करूया पुन्हा मैत्र... नव्या वर्षाचे रंगवूया सुखद चित्र... सर्वांना गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा... --- निमिष सोनार, पुणे
काव्यरस

!!!! गुढीपाडवा!!!!

लेखक शार्दुल यांनी मंगळवार, 16/03/2010 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा,,,, आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!! ही आमची साधीसुधी गुढी,,,,,, परदेशात सण साजरा करण्याचा प्रयत्नच म्हणाना!!!!

टारझण मला खास वाटत नाहीत

लेखक बाबुराव यांनी मंगळवार, 16/03/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्धलेखनाच्या कक्षा ओलांडून तू मिसळपावच्या कुशीत शिरलास. [योग्यता नसतांना] याचे लेखन मोड, त्याचे तंगडे मोड, शब्दार्थापेक्षा इथं चिन्ह, तिथं चिन्ह, मिसळपावच्या बोकांडी हा उभा. वेळ जात नाय म्हणून यांच्या लेखनाच्या लाटावर लाटा, संकेतस्थळाचा भरतो नुस्ताच डाटा. दुर्लक्ष हाच एकमेव उपाय कारण वेळ आली आहे, याला करण्याची टाटा.
काव्यरस

पाईल्स कुठे आहेत?

लेखक नितिनकरमरकर यांनी मंगळवार, 16/03/2010 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्या कामानिमित्ते इंदोनेशियात जाकार्ताला रहातो. रोजच्या संभाशणासाठी इंग्लिशचा इतका प्रॉब्लेम येत नाही पण काही काही गोष्टीत मात्र फारच पंचाईत होते. त्याचाच हा एक छोटासा विनोदी किस्सा. इथे येऊन २ महिने झाले आणि अचानकच मूळव्याधीचा त्रास चालू झाला. *** "मोड" येणे म्हणजे काय त्रास असतो ते जो या अनुभवातून गेला आहे त्यालाच समजेल. आणि मी तर "पहिलटकरीण" होतो! आधी खरेतर असा त्रास कधी झाला नव्हता. इथल्या खाण्या मुळे असेल (*** साठी पु. ल. - रावसाहेब वाचा अथवा ऐका). भरपूर हिरव्या मिरच्या, लसूण असतो इथल्या भाज्यांमध्ये आणि ८-१० दिवसातून एकदा फणसा ची भाजी! यामुळे असावे.

गुढीपाडवा, आणि सामाजिक जबाबदारी

लेखक इंटरनेटस्नेही यांनी मंगळवार, 16/03/2010 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा, आणि सामाजिक जबाबदारी आपण सर्व गुढीपाडवा, दिवाळी, होळी अशा एक ना अनेक सणांच्या वेळांना शुभेच्छापर पत्र, एस.एम.एस. पाठवीत असतो. माझ्या मते, अशा संदेश सोबतच, आपला संदेश्याच्या शेवटी एक तळटीप म्हणून आपण: १. 'विजेचा काटकसरीने वापर करा.', २. 'वाहन चालविताना फोनचा वापर करू नका.', ३. 'अंधविश्वासाला बळी पडू नका.' ४. 'हुंड्याची मागणी करणे बेकायदा आहे.' अश स्वरूपाचे सामाजिक संदेश टाकल्यास, दीर्घ कालावधीने का होईना, निदान काही लोकांच्या वागण्यात अंशतः तरी फरक पडेल. माझ्या आशावादाला समर्थन मिळते कारण, बहुतांश लोक असे शुभेच्छापर संदेश आल्यावर तेच पुढे पाठवत असतात.

माया की माया

लेखक मराठे यांनी मंगळवार, 16/03/2010 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
निर्लज्जपणाची हद्द! "पुतळा उभारणीवर टीका करणार्यांना मी विचारते की, जिवंत माणसांचे पुतळे उभारू नयेत असं कुठल्या पुस्तकात लिहिलेय?" - इती (जिवंतपणी स्वतःचा पुतळा स्वतःच उभारणारी) मायावती आपल्या देशात करदात्याच्या पैशाचा अपव्यय कधी आणि कसा होतो ह्याचं आणखी एक उदाहरण. मायावतीचा २०० कोटींचा हार .नुसता राग राग होतोय. तिकडे कुठल्यातरी गावात जेवण आणि कपडे मिळणार म्हणून चेंगराचेंगरीत लहान मुलं मरतात आणी इथे हे !!!

म्हणतात...अंनिस प्रणित विधेयकाचे बारा वाजले?

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 15/03/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणतात...अंनिस प्रणित विधेयकाचे बारा वाजले? अंनिस वाल्यांच्या एका व्याख्येप्रमाणे, "उत्कटपणे कृतीशील झालेली विवेकशक्ती" म्हणजे 'श्रद्धा' - ती ज्याची जागृत झालेली तो पंढरीचा वारकरी हा सश्रद्ध आणि "मूल्य विवेक उन्नत करते" ती 'श्रद्धा' या दुसऱ्या व्याख्येनुसार समतेच्या लढ्याच्या विविध आघाड्यांवर वारसंप्रदायाने पुढाकार न घेतल्याच्या आरोपामुळे वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा जोपासतो ...नक्की काय?... ...निवाडा करताना भलेभले गोंधळलेले... ...