(हि कथा संपूर्ण काल्पनिक आहे. काळ - १९९८-९९)
बयो !!!!
बऱ्याच तात्पुरत्या नोकऱ्या झाल्या होत्या. कोणत्याच नोकरीत राम वाटत नव्हता. आणि पगारातपण म्हणावी तशी वाढ होत नव्हती. काय करावे काळत नव्हते. स्वतः चा व्यवसाय करायचे डोक्यात होते पण आपल्याला जमेल का ?, भांडवल कुठून आणायचे?, तोटा झाला तर काय ?, असे असंख्य प्रश्न भंडावत होते.
घरी सर्वांना माझी अस्वस्थता जाणवत होती. आईला माहित होते कि याचे काही ठीक चालले नाहीये. तिने सरळच विचारले,
"काय रे काही प्रोब्लेम आहे का?"
"नाही, काही नाही".
"मग असा का घुम्यासारखा बसून असतोस? कसला विचार करतोस एवढा?"
"काही नाही, हे असंच चालू राहिलं तर कठीण आहे.