मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छगनलालांचे सापळे (भाग ८)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीचा भाग : http://misalpav.com/node/29328 ========================================================================== किरण हा साहेबांचा तिसरा मुलगा.आला तोच मुळी तोंडात पानाचा तोबरा भरून.त्याने स्वतःहून काहीच न विचारल्याने, मी पण जास्त लक्ष न देता, स्वतःला कामात जुंपून घेतले.तो त्याच्या मनाचा राजा तर मी माझ्या मनाचा बादशा.गेला उडत. साधारण पणे १च्या सुमारास साहेबांचा फोन आला.त्यांना रिपोर्ट केला आणि जेवायला बसलो.सुदैवाने माझ्या जेवणाच्या डब्याची जबाबदारी आमच्या एका शेजार्‍याने घेतल्याने, ती चिंता न्हवती.पहिल्या दिवसापासूनच मी एक धोरण ठेवले होते, की कामगारांना जास्त दडपण द्यायचे नाही.त्यांना वि

छगनलालांचे सापळे (भाग ७)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लेख थोडे लहान आहेत, हा आरोप मान्य आहे...पण मला थोडा-थोडाच भाग टाकणे शक्य होत आहे.तसदीबद्दल क्षमस्व.

छगनलालांचे सापळे (भाग ६)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीचा भाग : http://misalpav.com/node/25470 हा भाग डोक्यात फार आधीच तयार होता...पण काही कारणांमुळे लिहायला उशीर झाला...दिरंगाई बद्दल क्षमस्व....

(दोन दिवस मुंबईत गेले,दोन दिल्लीत गेले)

अमोल केळकर ·
लेखनविषय:
कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून..... (मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे) ------------------------------------------------------ दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले दरवेळी बंडखोर वळविले असे नाही,पण असेही क्षण आले तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. भोळ्या जनतेचा विचार हरघडी केला अन नेता झाल

तेलणीशी रुसला वेडा - मानवी स्वभावाची सामुहीक असहकार चळवळ

माहितगार ·
लेखनप्रकार
'अहं' बद्दल पुढेचर्चा करण्यापुर्वी या विषयावर बरच मंथन चिंतन करूनही मला स्वतःला याबाबत खुपसे सुधारता आलेले नाही ही माझी स्वतःची मर्यादा सुरवातीसच स्विकारून, समुहाचा घटक म्हणून मानवी समुह ते समुह सहसंबंधातील रुसवा फुगवा अभ्यासण्याच्या दृष्टीने काही लिहावे हा मनात विचार असतानाच संत तुकाराम महाराजांची खालील गाथा वाचनात आली.
तेलणीशी रुसला वेडा | रागेँ कोरडें खातो भिडा || 1 || आपुले चित्त आपण पाही | संकोच तो न धरी कांही || 2 || -संत तुकाराम (गाथा क्र.

फुटपाथवर कुडकुडणाऱ्या......

psajid ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दीपावली संपली कि आपल्याला थंडीची चाहूल लागते आणि मन म्हणते 'हो आता हिवाळा येतोय, थंडी सुरु झाली'. मग आपण मागील वर्षीचे स्वेटर मुलांना लहान होतायत म्हणून किंवा त्यांचा नवीन खरेदीचा हट्ट म्हणून मग मुलांसह सर्व परिवारासाठी उबदार कपडे, स्वेटर, शाल, रजई यांच्या खरेदीमध्ये व्यस्त होऊन जातो !

एक लक्ष वाचक - एक प्रवास

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज ३ नोव्हेंबर, सायंकाळी ८ वाजता कॉम्पुटर चालू केला, सहज लक्ष गेल ब्लॉगला वाचक संख्या एक लक्षाच्या वर गेलेली होती. जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती, आपला ब्लॉग कुणी वाचेल याची कल्पना ही केली नव्हती. चिरंजीवाना शिक्षणात मदत होईल या हेतूने कॉम्पुटर (लेपटाॅप) घरात आला. अर्थातच मला ही तो वापरायला मिळालाच. उत्सुकता म्हणून कुठे मराठी वाचायला मिळेल या उद्देश्याने अंतर्जालावर शोध घेऊ लागलो. सर्व प्रथम मराठी सृष्टी ही वेबसाईट दिसली. वेबसाईट वर मराठीत लिहा, आपल्यातील लेखकाला जागवा. असे आव्हान होते.

आजोबा...!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
आजोबा जर कागद असते तर त्यानं त्यांची नाव केली असती आजोबा जर डोंगर असते तर त्याने खोल उडी घेतली असती आजोबा अंगणात उभे असले की त्याला चक्क झाड वाटतात हाताच्या फांदीला लोंबकाळलं की आजोबा चक्क झोका होतात झोका घेताना तो कधीच घाबरत नाही डोळे मिचकावून बघितले की भीती कसली वाटत नाही …. आजोबा काही काम करताना करतो त्यांचं लक्ष विचलित घुसळतो अंग नि अंग हलकेच घुसतो मिठीत .... आजोबांना वाटून जाते तो .म्हणजे .. मी आहे ...? का … मी म्हणजे…. तो आहे .....?? मग फुटून जातो मायेचा पाझर आजोबांच्या काळजातून .... आणि आजोबा बघू लागतात मायेच्या पाझरणा-या झ-याला आपल्याच रक्तातून …!! प्रकाश

अंधार क्षण भाग २ - अलेक्सेई ब्रिस (लेख ७)

बोका-ए-आझम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधार क्षण - अलेक्सेई ब्रिस इतिहास समजून घेण्यातली एक मोठी अडचण म्हणजे ऐतिहासिक घटना या एकेकट्या, स्वतंत्र आणि काळ्या दगडावरची रेघ अशा रीतीने पाहण्याची आपली सवय! रेड आर्मीने स्टॅलिनग्राडची लढाई जिंकली, चर्चिलने ब्रिटनला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढलं, हिटलर आणि नाझी दुस-या महायुद्धात पराभूत झाले - ह्या गोष्टी आज सूर्यप्रकाशाइतक्या सत्य वाटतात आणि आहेतही, पण त्या अनुभवलेल्या लोकांच्या मनातले विचार जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर या सत्य म्हणून आपण गृहीत धरत असलेल्या गोष्टी जेव्हा तेवढ्या स्पष्ट नव्हत्या, त्या वेळचा विचार आपल्याला करावा लागेल.