मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुटपाथवर कुडकुडणाऱ्या......

psajid · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दीपावली संपली कि आपल्याला थंडीची चाहूल लागते आणि मन म्हणते 'हो आता हिवाळा येतोय, थंडी सुरु झाली'. मग आपण मागील वर्षीचे स्वेटर मुलांना लहान होतायत म्हणून किंवा त्यांचा नवीन खरेदीचा हट्ट म्हणून मग मुलांसह सर्व परिवारासाठी उबदार कपडे, स्वेटर, शाल, रजई यांच्या खरेदीमध्ये व्यस्त होऊन जातो ! आपल्या कुटुंबियांची काळजी घेत असतानाच आपल्या आजूबाजूला भेटणारे उपेक्षित हे आपल्याच समाजाचा एक भाग आहे असे समजून आपल्या घरातील उबदार पांघरून, लहान होणारे स्वेटर किंवा जुने कपडे आपण कामाच्या ठिकाणी जात असताना किंवा मुद्दामहून तेथे जाऊन सिग्नलवर किंवा फुटपाथ वर दिसणाऱ्या गरीब मुलांना किंवा तेथील भीक मागणाऱ्या लोकांना देऊन रस्त्यावर कुडकुडणाऱ्या लोकांची आणि गरिबांची काळजी घेण्याची जाणीव किंवा सामाजिक बांधिलकीचे भान जपण्याचे आवाहन करतो ! - साजीद पठाण

वाचने 4607 वाचनखूण प्रतिक्रिया 24

psajid 04/11/2014 - 14:50
असेल कदाचित ! शब्द टंकताना व्यवस्थित आला नसावा ! आता बदल करू शकतो का ?

वेल्लाभट 04/11/2014 - 17:42
थोडा वेगळा अनुभव सांगू इच्छितो. अशीच जुनी पांघरुणं द्यायला मी एका ठिकाणी गेलो होतो, जिथे नेहमी भिकारी बसलेले असतात. गाडीतून पांघरुणं बाहेर काढू लागतो तोच सगळे बाजूला वेढा देऊन उभे राहिले. माझ्या हातातून पांघरुणं हिसकावून घेतली, आपापसात भांडू लागले, एकमेकांना शिव्या देऊ लागले. ज्यांना मिळाली नाही ते कुत्सित आणि तुच्छ नजरेने आमच्याकडे बघायला लागले. कुणाला काही देण्याचं समाधान मिळालं नाहीच. पण 'पांघरुणं जाऊदेत, पाकीट बिकीट सुरक्षित आहे' याचंच समाधान मानून परत यावं लागलं. यापेक्षा एखाद्या संस्थेच्या ठिकाणी (उदा. अनाथांच्या, आदिवासींच्या शाळा इत्यादी) दान करण्यात जास्त शहाणपण व समाधान आहे असं माझं मत आहे. तेही परस्पर नसावं. म्हणजे तुम्ही आम्हाला द्या आम्ही त्यांपर्यंत पोचवू असं नाही; तर आपलं आपण प्रत्यक्ष जाऊन देणे.

माहितगार 04/11/2014 - 17:51
साजीदभाऊ सिग्नलवर किंवा रस्त्यावर पळत भिक , विक्री, दान कोणताही प्रकार त्या गरीबांच्याच जीवाला धोकादायक, आपल्या बाकी सदभावना आणि उद्देशाबद्दल सहमत .

जेपी 04/11/2014 - 17:58
साजिद साहेब, कुठल्या उपक्रमाची माहिती असल्यास इथे देऊ शकता. फक्त विचार मांडुन थांबु नका.

विवेकपटाईत 04/11/2014 - 18:14
दान देण्याआधी दान कुणाला द्यायचे आहे, हे ठरवावे लागते. अन्यथा 'वेल्लाभट्टनां जो अनुभव आला, तोच अनुभवावे लागेल. दिल्लीत जनकपुरीतल्या बी ब्लॉक इथल्या 'सनातन धर्म मंदिरात' दरवर्षी 'गरम पांघरून' उत्तम दर्ज्याचे (दिल्लीत थंडी भारी असते) वाटले जातात. पण त्या आधी महिनाभर कार्यकर्ते, जवळपासच्या झुग्गी कोलोनीत आणि फुटपाथ वर राहणार्यांचा आणि इतर गरजू लोकांचा सर्वे करतात, गरजूंना कूपन देतात आणि नंतर 'गरम पांघरून' वितरण करतात. त्या नंतर ही कार्यकर्ते, पुन्हा ते पांघरून वापरल्या जात आहे कि नाही हे पाहतात. अश्यारितीने दान योग्य गरजू लोकांपर्यंत पोहचते.

हे खरे पण वेल्लाभट म्हणतात ते मीही अनुभवले आहे....त्यांना दोष देता येत नाही कारण कुठलीही 'मुल्ये' जपण्याची त्यांच्याकडून अपेक्षाच ठेवता येत नाही...रोजच्या जगण्याची मारामार इथपासून आठवड्याला ५०-७० हजार गल्ला जमवणारे सगळे तिथे बरोबरच असतात ...ठाण्याच्या ३ हात नाक्याचा एक अपंग दाढीवाला टोपीवाला याचक प्रत्यक्षात व्यवस्थित पैसे बाळगून असणारा इसम आहे असे ऐकिवात आहे ...

एस 04/11/2014 - 23:30
जुने कपडे, अंथरूण, पांघरूण वगैरे द्यायला गेल्यास ते मयताचे असतील असे समजून नाकारण्याचे प्रकार घडले आहेत. अर्थात हे सर्रास घडत नसावं अशी आशा आहे.

भिंगरी 04/11/2014 - 23:41
हल्ली नवरा बायको आणि लहान मुल असे कुटुम्ब रस्त्यात भेटते आणि आमचे पैसे हरवले तिकिटासाठी पैसे द्या असे सांगुन लुबाडण्याचे प्रकार फारच वाढले आहेत.

In reply to by भिंगरी

नाखु 05/11/2014 - 09:09
अशा एक-दोन लोकांना चला मी तुम्हाला तिकिट काढून देतो म्हट्ल्यावर "तुम्हाला कशला त्रास, पैसे द्या आम्हीच काढतो" असे विनवू लागले. माझा हेका पाहून तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर नकोच (तिकिटाची) मदत हे ही मला सुनावले गेले. छोट्या मुलासाठी खावू देऊ लागलो तरी पैसेच मागत होते.शेवटी माझा आग्रह पाहून त्या कुटुंबाने पुढच्या रस्त्यावर पोबारा केला पण मी मागे येत आहे का हे दृश्टीआड होईपर्यंत बघत होते.

स्पंदना 05/11/2014 - 06:19
लेखाचा उद्देश समजला. अन झालेली चर्चा सुद्धा ठिकच. तरीही साजीद भाई हे असे नको असलेले कपडे जमा करुन ते जर अनाथाश्रमात वा वृद्धाश्रमात दिलेत तर जास्त योग्य प्रकारे वापरले जातील. भिक मागणे हा धंदा असल्याने, त्या धंद्याला अनुसरुन वेषभुषा करावी लागते हे ध्यानी घ्यावे. बेळगावात पंधरा वर्षाची पोरगी अंगचटीला जाऊन भिक मागताना पाह्यलीय. अश्यांना, चल घरी भांडी घासून दे मग पैसे देते म्हंटल तर तोंड वेंगाडुन गेली.

In reply to by स्पंदना

काळा पहाड 05/11/2014 - 15:32
सरकारच्या कृपेने भारत हा फुकट्यांचा देश झालेला आहे. मते मागणारे, आरक्षण मागणारे, सब्सिडी मागणारे, फुकट कर्ज मागणारे, लाच मागणारे, टोल मागणारे, सर्व्हिस न देता सर्व्हिस टॅक्स मागणारे.. यादी अनंत आहे.

विजुभाऊ 05/11/2014 - 14:39
साउथ अफ्रीकेत बरेचदा गरीब लोक अक्षरशः पुठ्ठ्याच्या बॉक्ष मधे रहातात्/झोपतात. कडाक्याच्या थंडीत त्यांच्याकडे पाम्घरुणे वगैरे नसतात. प्ण थोडी चौकशी केल्यावर असे कळाले की एह असे बाहेर रहाणारे लोक बहुतेक वेळा इतर देशांतुन पळून आलेले असतात. त्याशिवाय त्यात बरेचदा ड्रग अ‍ॅडिक्ट्स , गुन्हेगारीमुळे घरातून हाकलेले असे लोक असतात. अर्ध्या बीरच्या बदल्यात कोणाच्याही सोबतीसाठी तयार होणारे तरुण /मुली असतात. त्याखेरीज त्यांना मदत करायला गेल्यावर त्यानी लोकानांवर हल्ले केल्याच्या घटना वाचनात आहेत. मदत करायची असल्यास रोटरी सारख्या कोणत्यातरी संस्थेमार्फत करावी. त्यामुळे निदान ती सत्पात्री मदत तरी होईल.

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड 05/11/2014 - 15:33
त्याखेरीज त्यांना मदत करायला गेल्यावर त्यानी लोकानांवर हल्ले केल्याच्या घटना वाचनात आहेत.
अशांना मदत करायला जायचंच कशाला?

इनिगोय 06/11/2014 - 08:36
मुंबईतील डाॅक्टर विवेक कोरडे व मुंबई सर्वोदय मंडळ काश्मिरमधील पूरग्रस्तांसाठी ब्लँकेटस् जमा करत आहेत. लोकसत्तातील (मुंबई वृ) बातमीनुसार त्यांना आर्थिक मदत हवीय. संपर्क करून ब्लँकेटस्, गरम कपडे देऊन चालेल का हे विचारता येईल. पत्ता - मुंबई सर्वोदय मंडळ, 299 ताडदेव रोड, नाना चौक, मुंबई - 7

psajid 06/11/2014 - 13:02
कुणाचं असं, कुणाचं तसं, कुणाचं कसं आणि कुणाचं कसं - कसं अनुभव ! मात्र मला या लोकांचा चांगला अनुभव आला आहे. मी माझ्या मित्राला डेक्कन जिमखान्याच्या सिग्नलवर एका वृध्द माणसाचे आशीर्वाद घेताना प्रत्यक्ष पहिले आहे. माने नामक माझ्या मित्राने भर ऊन्हात अनवाणी चालणाऱ्या त्या वृद्धास आपल्या पायातील चप्पल देऊ केली होती. शेवटी अनुभव दोन प्रकारचे असतात, कोणता जवळ बाळगायचा हे ज्याने त्याने ठरवायचे. फार पूर्वी एक गोष्ट ऐकली होती - एक शिक्षक वर्गामध्ये एक मोठा पांढरा रंगाचा कोरा कागद घेऊन येतात आणि मुलांना विचारतात कि, "तुम्हाला हे काय दिसतंय ?" विद्यार्थी सांगतात कि, "सफेद कागद !" मग शिक्षक त्या कागदावर एक शाईचा डाग काढतात आणि मग विचारतात "आता काय दिसतंय ?" मुले सांगतात कि, "काळा डाग !" शिक्षक विचारतात "आणखी काय दिसतंय ?" विद्यार्थी म्हणतात "सर तिथे फक्त काळा डाग आहे !" यावर शिक्षक म्हणतात कि "तुम्ही काळा डाग पाहताना त्या भोवतीचा मोठ्या आकाराच्या सफेद कागदाला विसरून चालणार नाही, त्याचीही दखल तुम्ही घेण्याची गरज आहे." इथे प्रतिक्रिया वाचताना मला त्या गोष्टीची आठवण झाली. भले त्यांचामध्ये काळे डाग असतील, भलेही त्यांच्यामध्ये अपरिपक्वपणा असेल मात्र तो त्यांच्या परिस्थितीने त्यांना दिलेला असावा असे मला वाटते. मी गरजू लोकांसाठी आवाहन केले होते - ज्यामध्ये भीख मागणाऱ्याबरोबरच जे खरंच असहाय्य आहेत, अपंग, पंगु आहेत परिस्थितीने लाचार, हताश आहेत. मग दुष्काळ पडला म्हणून रोजगारासाठी आपली घरं-दारं सोडून आलेले लोक असतील अश्यांना मदत करण्याविषयी लिहले होते मदतीचा मार्ग मग तो समाजसेवी संस्थेचा असू दे वा रोटरी क्लब चा मदत करण्याची भावना असावी इतकेच ! म्हणतात नाण्याला दोन बाजू असतात आपण छापा पहावा ! बाकी तुम्ही ज्ञानी आणि बुद्दीवंत आहातच ! धन्यवाद !

In reply to by psajid

स्पंदना 07/11/2014 - 03:56
गैरसमज होतोय. कागदावरचा काळाडाग इतका पसरला आहे की पूरा कागदच काळा झालाय, अन ही सत्य परिस्थीती आहे. वेडा माणुस असेल तर मी त्याची असहायता समजू शकते, पण भिकार्‍याची असहायता मला नाही समजत. कारण भिक मागणे हा धंदा झालाय. मुंबईत अन कोल्हापूरात सुद्धा, दोन तीन लहाण मुले घेउन एक बाई अंगावर फकत पोत लावून यायची भिक मागायला. बाईची लाज म्हणुन साड्या गाऊन दिले तर दुसर्‍या दिवशी पुन्हा पोत लावून हजर दुसर्‍या गल्लीत. काय म्हणायच याला? रस्त्याच्या कडेल हुकमी ढळढळा अश्रु ढाळणारे पाहिलेत. काय म्हणे कसला आजार झालाय. एक्स रे आहे. तारिख पाह्यली एक्स रे ची तर हेऽऽ पुरातन काल. कमल हसनच्या पुष्कर मधला भिकारी ही खरी वस्तुस्थीती आहे. त्यामुळे मानसिक संतुलन ढळलेले सोडुन दुसरे कोणीही लाचार, असहाय्य नसते हे ठाम मत आहे.

In reply to by psajid

प्रसाद१९७१ 07/11/2014 - 14:48
साजीद - वृद्ध लोकांना मदत करावीच, नैसर्गिक आपत्ती मधे सापडलेल्यांना पण मदत करावी. पण २०-५० वर्ष वयाच्या धडधाकट माणसांना का म्हणुन मदत करायची? बरे ती माणसे परिस्थिती नाही म्हणुन पोरे जन्माला घालायची थांबवत नाहीत. पोसायची ताकद नसताना मुल जन्माला घालणे हा फौजदारी गुन्हा समजायला पाहीजे. लोकांना हे मत आवडणार नाही हे मला माहीती आहे. कोथरुड्ला माझ्या आईच्या सोसायटी मधे केर काढायला शोधुन माणुस मिळत नव्हता, शेवटी एक नेपाळी मिळाला. ज्यांना Handyman म्हणले जाते अशी अनेक कामे आहेत आणि ती करायला माणसे मिळत नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

अर्धवटराव 07/11/2014 - 23:27
टॅक्स चोरी करणार्‍या मंडळींकडुन हि आर्ग्युमेण्ट बरेचदा ऐकली आहे. त्यांचं म्हणणं असं कि सो कॉल्ड गोरगरीबांना सवलती देताना त्या घेणार्‍या व्यक्तीची पहिले नसबंदी करावी. अन्यथा आम्हि आमचे कष्टाचे पैसे अशा लोकांवर का उधळावे. मला त्यात बरच तथ्य वाटलं. हेच रेफ्युजी लोकांच्या बाबतीत देखील...

विजुभाऊ 07/11/2014 - 14:07
माझ्या मामानी बडोद्यात भिकार्‍यांसाठी स्वच्छतेच्या /आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. कोणीही भिकारी स्वछ्च रहाण्यासाठी पुढे येत नव्हता. स्वच्छ राहीले तर भीक मिळणार नाही अशी सर्वांचीच धारणा होती

प्रसाद१९७१ 07/11/2014 - 14:50
रस्त्यावरच्या अनोळखी भिकार्‍यांना मदत करण्यापेक्षा आपल्या कडे कामाला येणार्‍या लोकांना ती मदत करावी. जेणेकरुन आपण कष्ट करणार्‍या माणसांना मदत करतो आहे हे नक्की होइल.