Skip to main content

काही प्रसंग

लेखक सुज्ञ यांनी बुधवार, 29/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
काही प्रसंग. वेळ: तुमच्या मनात येईल ती … स्थळ: तुम्हाला वाटते तेच. प्रसंग पहिला सर्वच लोक आपापली वैचारिक समृद्धी किती प्रगाढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसाठी ते इथे जमलेले आहेत. दुसरा माणूस आपल्याकडे बघतोय हे बघित्यावर वा! क्या बात है! स्स ! असे मोठमोठ्यानदा उद्गार काढतात. कोणी टाळ्या पिटलयास आपणही पिटतात. थोडक्यात असे 'रसिक' लोक इथेच सापडतात. एक साधारण माधाम्वार्गीय स्त्री : अग मालीनितैंच गाणं आजकाल किती कंटाळवाण होतं नं दुसरी : हो नं गं खूपच संथ गाइल्या नं.

कमल घर (एक वात्रटपणा)

लेखक शरद यांनी बुधवार, 29/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कमल घर चार एक वर्षांपूर्वी मी "उपक्रम"वर हायकूवर एक लेख लिहला होता.नेहमीच्या ५-७-५ या तंत्राची माहिती दिल्यावर कवी श्री. राजेश घासकडबी यांनी एक पृच्छा केली कमल घर बघ कमल घर कमल बघ ह्याला हायकू म्हणावयाचे का ? माझा यावरचा प्रतिसाद थोडा दीर्घ व अवांतर असल्याने प्रतिसाद म्हणून न देता एक नवीन चर्चा विषय म्हणून मांडला होता. चर्चा का हे पुढे वाचल्यावर लक्षात येईल. फारा वर्षांपूर्वी सत्यकथेत एका लेखिकेची एक कविता प्रसिद्ध झाली. त्यावेळी कवीमंडळात ही एक फार मानाची गोष्ट होती. आता आम्हाला कळली नाही, पण हे काही नवीन नव्हते. नेहमीचीच ओरड. खरी गंमत पुढील अंकात. त्या लेखिकेने पत्रच लिहले.

तसे देव मोकळेच असतात..!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 28/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या देव एकटेच असतात काल सहज त्याची आठवण आली तिला आणि ती अशी येथे दूर ...दूरदेशी आणले तिने जुजबी देव नाही असे नाही लंगडा बाळकृष्ण एकटाच घरी सोबत विठ्ठल रुखमाई आणि शंकराची पिंड त्याच्या समोर नंदी तेवढीच एकमेकाची एकमेकाला सोबत नाही असे नाही रात्रीच्या अंधारात त्याना दिसणार मात्र काहीच नाही कालच कशी कुणास ठाऊक आभाळातील ढग बघून तीही उदास ,खिन्न आणि आली आठवण देवाची दिसून गेले उदास देवघर किती दिवस प्रसाद सोडा किती महिन्यात त्याना कोणी आंघोळ देखील घातली नाही कसे करमत असेन त्यांना..?

मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 28/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता. या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा.

पुण्याचे उणे

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 28/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
(श्रीरंग जोशी यांनी चेपुवरील एक ढकल संदेश खफवर टाकला आहे पुण्याची महती सांगणारा ! त्यावरुन थोडे चिन्तन घडले, त्यातून हे मुक्तक प्रसवले आहे.) पुण्याची मुम्बई झाली आहे हो ! छाती फुटेस्तोर पळावे लागते आज काल पुण्यात देखील! आय टी वाल्यांनी वाट लावली आहे पुण्याची ! हिन्जवडी आणि हडपसर या दोनी दिशांना २४ तासाचा जाम करुन ठेवला आहे. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. इतके की, आता त्यांना देखील ते परवडेनासे झाले आहेत. मला व्यक्तिशः सकाळ संध्याकाळ दिड तास-दिड तास प्रवास करावा लागतो. आणि विकेण्डला देखील मुंबै च्या लोकांनी पुणे जाम करुन ठेवले आहे. पुणे हे मुंबई नसल्याने हा असला भार पुण्याला पेलवत नाही.

चिनी चित्रकार आणि नेपाळी छायाचित्रकार

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी मंगळवार, 28/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी माझी भलतीच निराशा झाली, सारसबागेत दीपोत्सव असतो दर वर्षी...सुंदर आकारात मांडलेल्या पणत्या ही खरच मेजवानी असते डोळ्यांना, खास करून पहाटे ४-६ या वेळेतल्या अंधारात. त्यातूनही त्या प्रकाशात मधेच अनेक प्रसन्न, गोड चेहरे पाहून अधिकच छान वाटायला लागतं. पणत्या लावण्यासाठी लोकं मध्यरात्री २ पासून जागा धरून ठेवायला कमी करत नाहीत. आणि नंतर मात्र creativity चा जो काही कस लावतात ना...कमाल!! पण आजचा चित्र वेगळच होतं, तोच canvas ठेऊन चित्रकार बदलल्यासारख बदललेलं चित्र...चिनी लोकांचं आपल्या बाजारपेठेतल आक्रमण. ५० रुपयाला मिळणारा तो हॉट एअर बलून. सगळीकडे तेच तेच आणि तेच. एका दिवाळीत चित्र बदलल.

आल्प्सच्या वळणांवर - भाग ६ - इंटरलाकेन आणि विल्डर्सविल

लेखक मधुरा देशपांडे यांनी मंगळवार, 28/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ सकाळी उठून बाहेर पाहिले तर वरुणराजा कोसळत होते. घरातून बागही दिसत नव्हती एवढे दाट धुके होते. थोडा वेळ वाट बघुयात नाहीतर पडू बाहेर, असा विचार करून आवरले. यापूर्वीचा आमचा अनुभव बघता संपूर्ण सहलीत जर पाउस आलाच नसता तर खरं तर आश्चर्य वाटले असते.

दोन गिलास पाणी !

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 27/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
हताश, निराश आणि भकास नजरेने मी माठाच्या नळाकडे बघत होतो. त्या वयात या शब्दांचा आणि त्यामागच्या भावनांचा अर्थही मला समजत नसावा. समजत होती ती फक्त तहान. तिच गळ्यातून उचकटून त्या माठावर मारावी आणि फोडून टाकावा माठ असा विचार मनात तरळून गेला. पण तसे केले असते तर आईने खूप मारले असते.. दोन दिवसापासून अख्या मोहल्ल्यात पाणी आले नव्हते. काल सुरुवातीला चांगले वाटले होते. सकाळी सकाळी भांड्यांच्या आवाजाने झोपमोड झाली नव्हती. आईने आंघोळ चार तांब्यातच उरकायला लावली होती. तोंड धुताना दोनच चूळा मारल्या तरी बाबा रागावला नव्हता. उलट त्याने सुद्धा माझेच उरलेले अर्धे गिलास पाणी वापरले होते.

आयुष्यः एक मृगचक्र!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 27/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य हे मृगजळाचे चक्रव्यूह (मृगचक्र) असते असे मला वाटते म्हणजे नेमके काय? जे आयुष्य आपल्याला मिळते ते असते एक आभासी तात्पुरते जग... त्यात आपण फ़क्त काही काळासाठी आलेलो असतो... आज आपण जगण्यासाठी काम करतोय की काम करण्यासाठी जगतोय अशी स्थिती अनेक क्षेत्रात आहे. जगण्यासाठी आपण पैसा कमावातोय की पैसा कमावण्यासाठी जगतोय तेच समजत नाही. आज जगच असे बनले आहे की आपण या आभासी कर्माच्या चक्रव्युहातून मरेपर्यंत सुटत नाही... जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे जग आहे आणि आपण नाही तेव्हा जगही नाही. निदान आपण जगातून गेल्यानंतर आपल्यासाठी तरी ते जग अस्तित्वात नसतं.

अंधार क्षण भाग २ - प्रतिकार (लेख ५)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 27/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग २ - प्रतिकार या भागातल्या कथा ह्या आक्रमकांच्या  अत्याचारांविरुद्ध उभ्या राहाणा-या आणि त्यांचा प्रतिकार करणा-यांच्या कथा आहेत. दुस-या महायुद्धातल्या प्रतिकार चळवळींचा इतिहास पाहिला तर आपल्याला दोन प्रकारचे लोक भेटतील - एक म्हणजे आपल्या तत्वांवर ठाम असलेले आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी कुठलीही तडजोड न करणारे; आणि दुसरे कुंपणावर बसलेले आणि थोड्याफार स्वार्थी किंवा व्यक्तिगत हेतूंपायी प्रतिकार चळवळीत आलेले. माझा असा विश्वास आहे की पहिल्या प्रकारचे लोक दुर्मिळ होते. अशा चळवळी  मुख्यत्वेकरून दुस-या प्रकारच्या लोकांनीच भरलेल्या होत्या. फ्रान्सचंच उदाहरण घ्या.