Skip to main content

गाव, शहर आणि बरंच काही

लेखक अभिशेखि यांनी बुधवार, 06/05/2015 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
नशीब फक्त माणसांनाच असतं असं नाही. ते जमिनीच्या तुकड्यालासुद्धा असतं . कुणाच्या नशिबी समुद्राची साथ असते तर कुणाच्या नशिबी पर्वतांची रांग. नुसतं नशीबच नाही, स्वभाव असतो प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला. चेहरा असतो, भूतकाळ असतो आणि वर्तमानसुद्धा. तो तुकडाही तसाच होता. त्याला आठवतं तेव्हापासून समुद्राची सोबत होती. परदेशी पाहुणे आणि परदेशी माल ह्यांची नवलाई त्याला कधीच नव्हती. त्याच्या किनाऱ्याला गलबत लागायची आणि मालाच्या किंमतीची खलबतं व्हायची. आजूबाजूच्या प्रदेशात सत्ता कुणाचीही असेना ह्याच्यावर राज्य व्यापारी लोकांचंच असायचं.

विश्वास श्वासावरचा

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 06/05/2015 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
रोज पुन्हापुन्हा तो बाहेर पडतो संगे फक्त कोरडा उःश्वास घेतो हजारो वर्षापासुन तो तिला शोधतो ती अजुनही असल्यावर विश्चास ठेवतो प्रत्येकाच्या शरीरात जावुन तो पाहतो तिच्या अोळखीच्या खुणा शरीरात शोधतो पवनाच्या रुपातुन तो मला रोज भेटतो पुन्हापुन्हा तिचे कुशल मला विचारतो प्रत्येक श्वासातुन मी समजावु पाहतो श्वासाशिवायच्या शरीरास मी तरी नाकारतो तो मात्र अजुनही विश्वास ठेवतो तिच्या श्वासहिन शरीरास शोधत राहतो श्वासाशिवाय तो तरी भटकत राहतो श्वासावरच्या विश्वासास ठोकरु पाहतो.....

कॉफी, समुद्र, कोर्ट, आणि बरंच काही...

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 05/05/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दीड-दोन महिन्यात जरा चंगळच केली. तशी नाटक-सिनेमाच्या बाबतीत आम्ही ती नेहमीच करत असतो पण गेल्या दीड-दोन महिन्यात जरा जास्तच केली. सिनेमा-नाटक माझं पहिलं प्रेम! कुठल्याही वेळेला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे किंवा नाट्यगृहात जाऊन नाटक बघणे हा माझा सगळ्यात आवडता छंद. प्रत्येक चित्रपट किंवा नाटकाच्या बाबतीत लेख लिहिणे शक्य नाही म्हणून काही नाटक-चित्रपटांविषयी थोडं लिहिण्याचा हा एक प्रयत्न. कॉफी आणि बरंच काही... एक छान, गोड प्रेमकथा. हळूवार फुलत जाणारी. आजच्या काळाला अनुसरून असणारी गोष्ट. वैभव आणि प्रार्थना हे एकाच पुणे-स्थित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत असतात.

ही वाट भटकंतीची १४: गोवा - भाग १

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 05/05/2015 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ म्हणजे खुप कमी ट्रीप झालेले वर्ष असे मला वाटत होते. पण सहज काल ट्रवल डायरी हातात आली, आणि आपण २०१४ ला नाही नाही म्हणता, ऑफिस मधील टीम बरोबर गोवा(मार्च), कोलाड व्हाईट वाटर राफ्टींग( ऑगस्ट), आनि काशीद बीच(डिसेंबर) या ट्रीप केल्या आहेत शिवाय स्वता, दूधसागर ट्रेक ( सप्टेंबर) आणि विसापुर ( जुलै) आणि अजिंठा-वेरुळ फॅमिली ट्रीप (डिसेंबर) केलेली आहे असे जानवले. म्हणजे ट्रेक खुप कमी केले आहेत पण २०१४ सहलींच्या बाबतीत अगदीच नाखुष करणारे नव्हते जेव्हडे मी समजत होतो. फक्त ही माहीती मी इतर कोठे लिहिली नव्हती बस्स.

एलापुरातील चित्रे - उत्तर अजिंठा चित्रशैली.

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 05/05/2015 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
अजिंठा लेणीसमूहाच्या निर्मितीनंतर विशेषतः पहिल्या क्रमाकांचा विहाराचा निर्माता राजा हरिषेणाच्या मृत्युनंतर वाकाटकांच्या वैभवशाली राजवटीचा लवकरच अस्त झाला. तदनंतरच्या धामधुमीच्या काळात चालुक्य, कलचुरी अशा राजवटींनंतर येथे राष्ट्रकूटांची प्रबळ सत्ता निर्माण झाली. कलचुरींच्या काळातच एलापूर - वेरूळ येथे लेण्यांची निर्मितीची सुरुवात होऊ लागली त्या शिल्पकलेचा राष्ट्रकूटांच्या कारकिर्दित कळस गाठला गेला.

छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 05/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल या स्पर्धेलाही छान प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे जरा कमी आली पण सगळीच अतिशय सुंदर होती. पहिल्या क्रमांकावर आलेले छायाचित्र वगळता इतर सर्वांनाच फार थोड्या फरकाने गुण मिळालेत.

एक आठवण - उन्हाळ्याच्या तो दिवस

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 05/05/2015 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या १०-१२ वर्षांपासून दिल्लीत ही नागपूर सारखा उन्हाळा पडू लागला आहे. मे महिन्यातच तापमान ४५ अंशापर्यंत जाते. सोफ्यावर बसून विजय वर्तमान पत्र वाचत होता, लू लागून मरणार्यांच्या आंकड्यांवर त्याची नजर गेली. वाचता-वाचता, अतुलचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. पाच वर्षांपूर्वीचीच मे महिन्यात असाच उन्हाळा होता. आकाशात सर्वत्र पसरलेली राजस्थान मधून येणारी लाल धूळ आणि प्रचंड गरम वारे, दिवसाकाठी घर बाहेर निघणे दुष्कर होते. त्या दिवशी शनिवार होता, विजय काही कामानिमित्त, आर के पुरम येथे स्थित भिकाजीकामा पेलेस येथे गेला होता. काम संपवून, दीड एक वाजेच्या सुमारास बस घेण्यासाठी तो बस स्थानकावर आला.

झोपलेले नशिब

लेखक खंडेराव यांनी मंगळवार, 05/05/2015 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची. अशीच काही वर्षे गेली. घरात अजुन एक बाळ आले. कोळ्याला वाटायला लागले, सभोवताल बदलतच नाहीये. तीच झोपडी, तेच जुने कपडे. रात्रीची झोप उडाली. एक दिवस स्वप्नात एक म्हतारा आला. स्वप्नात आला कि खरोखर आला हे काय कोळ्याला कळाले नाही. त्याने कोळ्याला सांगितले, की तुझे नशिब झोपलेले आहे. ते जोपर्यंत जागे होत नाही, काहीही बदलणार नाही.

काय दुखलंय...?

लेखक संदीप डांगे यांनी मंगळवार, 05/05/2015 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रश्नाचे उत्तरः प्रसंग एकः बांद्र्याचे जे जे होस्टेल. रात्रीचे २ वाजलेत. अगदी पाप्याचे पितर असलेला एक मुलगा लघुशंकेला गेला असता चक्कर येऊन तिथेच पडला. बेशुद्ध झाला नाही. पण अंगात उठण्याचे त्राण बिल्कुल नाही. त्याला उचलून रेक्टरच्या गाडीत घालून जवळच्या एकमेव उपलब्ध असलेल्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटल मधे नेले. निवासी डॉकने छातीला स्टेथो लावून तपासले. काही प्रश्न विचारले. ताबडतोब रक्त/लघवी तपासणी, छातीचा एक्स-रे वैगेरे काढायला लावला. आम्ही जाम टेंशनमधे.

सांगली किंवा मिरज मध्ये कधी कट्टा झाला आहे का ?

लेखक दा विन्ची यांनी सोमवार, 04/05/2015 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
सांगली किंवा मिरज मध्ये कधी कट्टा झाला आहे का ? batman आणि point blank सोडून कुनी स्थानिक मेम्ब्र हाईत काय ?