Skip to main content

गेम ड्रोम - २

लेखक अद्द्या यांनी मंगळवार, 21/04/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा प्लान होता चांगला . अगदी माझ्या आवडीचा होता . पण सध्या कशातच मन नवतं . गेल्या २५ वर्षाच्या आयुष्यात फक्त तेच ५-६ दिवस होते . जेव्हा मला पूर्ण हरल्यासारखं वाटत होतं . नापास होणं मोठी गोष्ट नवती . आधी हि मासिक परीक्षेत झालो होतो . पण लगेच पुढच्या परीक्षेत त्याची भरपाई हि केली होती . एक तर पुस्तकि किडा नवतो . जमेल तेवढ्या स्पर्धा आणि खेळ खेळायचो . त्यामुळे मासिक परीक्षा कधीच गृहीत धरली नवती . सहामाही आणि वार्षिक परीक्षेलाच काय तो अभ्यास करायचो .त्यामुळेच कोणत्याही परीक्षेत नापास होण्याने कधीच एवढं वाईट वाटलं नसतं . पण . त्या रात्री आई बाबांना बोलताना ऐकलं मी . बाबा रडत होते .

झाडपण

लेखक नाखु यांनी मंगळवार, 21/04/2015 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
कधी खंत करी कधी ते एकटे झाड.. नक्की झाड वाकडे-तिकडे म्हणून वेगळे ! का गेंड्याच्या नाकावरच्या शिंगासारख्या टेकाड्-फोडावर आले म्हणून आगळे ! नक्की माहीत जरा जास्त्च तिरके उगवले होते ते जणू एअर इंडीयाचा महाराजा. हे तिरके म्हणून कुणी सरळमार्गी त्याच्या जवळ येत नसे. अगदी पायवाटही त्याचा अगदी सावलीचाही विटाळ नको म्हणून थोड्या अंतरावरून वळसा घालून उतरायची खालच्या वाडी-वस्तीत. त्या झाडाला जर बोलता आले अस्ते तर तेही ओरडून म्हणाले असते मी तुमच्यातलाच आहे.. गर्द देवराईला, ओढ्याच्या पांदीला आणी पिंपळपाराच्या फांदीला पण. मुकाट वरून बघायचे मी सगळ्या झाडांपाशी,झाडावर,झाडाखाली चैतन्यझरा सळसळताना... शा

रसपोळी आणि आभार

लेखक नीलमोहर यांनी मंगळवार, 21/04/2015 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
रसपोळी आणि आभार !! सर्वप्रथम मिसळपाव या संकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादकांचे मनापासून आभार. मिपाने आम्हा संगणक कामगार लोकांचे रोजचे यांत्रिकी जगणे खूपच सुसह्य केले आहे. कामे आटोपून थोडा निवांत वेळ मिळाला की लगेच आम्ही मिपाच्या आसऱ्याला (किंवा आश्रयाला) येतो. इथले लेख, कथा, कविता, भटकंती, पाककला, छायाचित्रण इ.

रात्र...!!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 20/04/2015 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
केली लाख आर्जवे तरी सांज हात सोडवून गेली नको नको म्हणताना मला ह्या रात्रीस बांधुन गेली मिटले सारे नकाशे सार्‍या दिशा विझुनी गेल्या होता जिचा दिलासा ती सावलीही पळून गेली येई काळोख अंगचटीस लोचट वारा झोंबे तनामनास उडताना घरावरी टिटवी अंगभर शहारा टाकित गेली मेघ नौबती झाडती आसमंत गडगडाटी हासे तो पोहचला वेशीवर वर्दी दामिनी देऊन गेली वाटे पळुनी जावे तर तो दारी उभा ठाकला मदतीस मारली आरोळी त्याच्या हसण्यात विरुनी गेली मग लेवुनी त्याची वासना रात्र पसरली या माळराना तो तोडित असता लचके चांदणी हुंदका दाबित गेली चंद्र लपला ढगाआड आसमंत निशब्द झाला मी फ़ोडित राहिले टाहो अन वैरी रात्र रंगात आली अखेर झाली

नावात काय आहे ????

लेखक नितिन शेंडगे यांनी सोमवार, 20/04/2015 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार !! नावात काय आहे , असे कुणीतरी म्हणून गेले आहे. पण खरेच का हो नावात काहीच नाही ???? खूप लोकांना आपल्या नावाचा अभिमान असतो, कारण काही ना काही असतेच हो. तसेच आपल्या गावाचा हि अभिमान असतोच, कितीही लहान गाव असू देत पण परमुलुखात त्याचे नाव निघाले की लई म्हणजे लई भारी वाटते . ह्या सोमवारी मुंबई वरून येताना गावाला जाणारी येष्टी मिळाली, म्हटले चला जावू त्याच गाडीने. लहानपण आठवले हो लगेच, प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच गाडीने गावाला जाणे होत होते. एकदम भन्नाट प्रवास असायचा, तो खंडाळ्याचा घाट, लोणावळा चिक्की आणि भिगवण ला जेवायला थांबणे… नुसता सुवर्णकाळ आठवत होतो.

अनाहिता इन रसायनी

लेखक मितान यांनी सोमवार, 20/04/2015 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा कट्टा होऊन तीन चार महिने होऊन गेले. सर्व अनाहितांना पुन्हा भेटण्याचे वेध लागले. मग प्रस्ताव आला. निमंत्रक मुंबईकर अनाहिता. चर्चा झाल्या. ठिकाणं चाळली गेली. तारखांसाठी पानं फडफडवून झाली. कुठून कोण कोण येणार याची यादी झाली. आणि शेवटी कट्टा ठरला. बहारीनहून विशाखाताई आणि जर्मनीहून स्वातीताई याच काळात पुणे मुंबईत येणार होत्या. त्या दोघींनीही यायचं नक्की केलं. उत्साह अजून वाढला. ठिकाणाच्या बाबतीत अजून गोंधळ होते. त्या चर्चांचा कंटाळा येऊन अजयाने तिचं घर हे ठिकाण फायनल केलं ! आणि काउंटडाऊन सुरू झाला. तेवढ्यात ते मेलं अनाहिता बंद पडलं. मग कसंकाय वर भागवलं.

अकादमी 7 :- रगड़ोत्तम भारती बापूसाहेब

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 20/04/2015 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
अकादमी मधे आता जवळ जवळ 8 महीने झाले होते, गेट च्या आत यायच्या आधी जो एक होमसिक हळवा बापूसाहेब होता तो 8 महिन्यात कुठे अन कधी गेला हे आजकाल मला पडलेले कोड़े होते, जवळपास सगळ्यांचीच अवस्था तशीच होती , आलो तेव्हा फिजिकल करताना आमची होणारी अवस्था आठवुन आम्ही आपापसात हसत असु त्या दिवसांत. आमच्या ट्रेनिंग चा एक एक पदर हळुहळु उलगडत होता. आता जे मोड्यूल होते ते होते बेसिक माउंटेनियरिंग उर्फ़ प्रार्थमिक गिर्यारोहण. वेगवेगळी गिर्यारोहणाची इक्विपमेंट त्याचे उपयोग इत्यादी ह्यात शिकवले जात असे. कारण मैक्सिमम ड्यूटी तिकडेच असणार होती आयुष्यभर. ह्यात नैसर्गिक प्रेरणे ने हीरो होता आमचा सांगे.

मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है ....

लेखक कहर यांनी सोमवार, 20/04/2015 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है .... "५.३० पहिला गजर झाला ५ मिनटात उठुया" "अरे दुसरा गजर झाला ? साला ५ मिनटात ६.१५ कसे वाजले " "६.३५ झालेत आताशी ? आज दाढी करायला वेळ आहे आपल्याला " "७.२५ वाजले ? बाप रे उशीर झाला ..

कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 20/04/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाची देवाला विनंती: असूनही रणरणत्या उन्हाची वेळ का चालवलायस तू पावसाचा खेळ? बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ? देवाचे सडेतोड उत्तर: माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ
काव्यरस

गुजरात.......५...... बडोदा-लोथल-जामनगर

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 20/04/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
बडोद्याला परत आल्यावर प्रथम शोध घेतला मला आवडणार्‍या एका पदार्थाचा. "उंधियो' याचा उच्चार हाच असवा असे वाटते. परंतू बडोद्यातील उंधियो हा पुण्यातील बाकरवडी असावी. बर्‍याच ठिकाणी उंधियो संपला अशा पाट्या लागल्या होत्या. शेवटी अलकापुरीत एका दुकानात आम्हाला तो गवसला. दुकानदाराने तो संपत आल्यामुळे जे काही राहिले होते ते प्रथम दाखविले व मग घेण्याचा विचार करावा असे सुचविले. गुजरातमधे एकंदरीत मला प्रामाणिकपणा आढळला. म्हणजे सुटे पैसे प्रत्येक ठिकाणी परत मिळत होते. सिगरेट योग्य भावात सगळीकडे मिळत होती. बडोद्याला दोन वस्तूसंग्रहालये आहेत त्यातील एक राजघराण्यातीला कोणाचा तरी मृत्यू झाल्यामुळे बंद होते.