Skip to main content

सिद्धगडाची ११५० फुटी कातळभिंत

लेखक सतीश कुडतरकर यांनी शुक्रवार, 08/05/2015 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
सिद्धगडाची ११५० फुटी कातळभिंत- दिवाळीची चाहूल लागली की सगळेजण नव-नवीन खरेदीचे बेत आखत असतात. पण आम्हा गिरीविराजकरांचा बेत काही वेगळाच असतो. आमचे पाय डोंगरमाथ्याकडे धाव घेण्यासाठी आसुसलेले असतात.

जकार्ताच्या आठवणी : १ : तयारी

लेखक आकाश खोत यांनी शुक्रवार, 08/05/2015 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझी सध्याची कंपनी अ‍ॅमडॉक्सच्या कृपेने मला माझ्या पहिल्या विदेश दौऱ्याची संधी मिळाली. प्रोजेक्टच्या काही कामासाठी मला इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे जवळपास एक महिना जाण्यासाठी विचारलं होतं. अर्थात, मी क्षणभरही उशीर न करता होकार दिला. माझ्या अशा संधींच्या गतेतिहासाप्रमाणेच हि संधीसुद्धा एका क्षणी गेल्यातच जमा होती. पण परत पारडं पालटलं आणि जाण्याचं नक्की झालं. याआधी माझ्या आधीच्या कंपनीमध्ये मी चीनला एक वर्षासाठी जाणार होतो. माझं वर्क परमिटसुद्धा बनलं होतं. पण ऐनवेळी आमच्या कस्टमरने तो प्लान रद्द केला आणि माझी संधी हुकली.

खड्डा आणि मी

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 08/05/2015 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शहरात एक सुप्रसिद्ध खड्डा आहे.संपूर्ण महाराष्ट्र्ात जरी एक वेळ दुष्काळ पडला तरी तो तेव्हा एखाद्या नदीसारखा दुथडीभरुन वाहत असेल यात शंका नाही तर इतर खडड्याप्रमाणेच याही खड्ड्याचे पुनर्निमाण नेहमीच होत असे. अहो खड्डे आहेत म्हणुन तर लोक गाड्या हळु चालवतात अशी मी स्वताःची समजुत करुन घेतली आहे त्या दिवशी मी महत्वाच्या कामानिमित्त [कोणते ? राष्ट्रउभारणीचे अत्यंत गुपित कार्य होते ते] त्या रस्यावरुन निघालो होतो.एक ब्रह्नानंदी टाळी लावलेला टॅम्पो रस्त्यात हळुवारपणे चालला होता.इतर कोणत्याही सांसारिक गोष्टिप्रमाणे त्याला मागच्या कोणत्याही ओरडणारया वाहनाची तमा नव्हती.

पदपथ झोपण्यासाठी नसतो, पण..

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 08/05/2015 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
मानवस्वरूपाभिमानी, दबंगोत्तम, वाण्टेडनामधारी युगपुरुष श्री सलमानानंद यांच्यावर येऊ घातलेल्या कारावासरूपी अग्निदिव्यामुळे सकल भूतलतारामंडलात होहो हाहाकार होऊ घातला आहे. पैकी काहीजण जालीय गुंजारवाद्वारे पदपथशयनाच्या प्रसाराबद्दल आपल्या रोषयुक्त भावना दाहक शब्दात प्रकट करीत आहेत. तसेच काही स्वघोषित विवेकाधिपती याउलट भूमिका घेऊन सदर तारे-तारकांचा उद्धार करीत आहेत. या दोहोंना विचारले जावेत असे काही प्रश्न: १. पदपथ हा झोपण्यासाठी नसतो. पण गाडी चढवण्यासाठीही नसतो. या मुद्द्यावर मौनव्रत बाळगण्याचे काय कारण असेल? २. पदपथ जसा झोपण्यासाठी नसतो, तसाच सामान्य रस्ता हा वाहने उभी करून ठेवण्यासाठी नसतो.

सलमानचा जामिन !

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 08/05/2015 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
उच्च न्यायालयाला योग्य वाटत असेल तर त्यांनी सलमानला जामिन जरूर द्यावा. नंतर त्याची निर्दोष सुटका सुद्धा करावी. फक्त जामिनाच्या किंवा सुटकेच्या निर्णयाला खालील पुरवणी जोडावी १. विनापरवाना (without license) गाडी चालवणाऱ्या चालकावर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये. कारण -- अपघात करण्याचा त्यांचा हेतू नसतो. २. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये. कारण -- प्रत्येक नियमाला अपवाद असलाच पाहिजे. ३. मद्य पिऊन गाडी चालवताना एखादा अपघात झालाच तर केवळ ताकीद देऊन सोडून द्यावे. कारण -- इतर वेळी त्यांचे समाजातील वर्तन चांगले असते. ४.

१० हजार एकर जमीन बांगलादेशला दिली

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 08/05/2015 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
भारत-बांगलादेश यांच्यामधील जमीन देवाण घेवाणीचे विधेयक सर्व संमतीने पास झाले. सरकारला यासाठी सर्व विरोधी पक्षांनीही सहकार्य केले. या विधेयकाबाबत काही मतभेदाचे मुद्दे होते. बांगलादेशला जमीन देण्याला भारतातील काही गटांचा विरोध होता. त्यांना ही एक प्रकारची माघार वाटत होती. आजच्या पास झालेल्या विधेयकामुळे भारताकडून बांगलादेशला १० हजार एकरचा भूभाग मिळेल तर बांगलादेशकडून भारताला ५१० एकरचा प्रदेश मिळेल. हेतु हा आहे की यामुळे दोन्ही देशांच्या सीमा मानवनिर्मित न राहता नदी, पर्वत अशा नैसर्गिक घटकांच्या सहाय्याने बनतील असा अंदाज आहे. ज्यामुळे सीमांचे रक्षण करणे सोपे होइल.

रविंद्र पाटील : नाव ओळखीचं वाटतंय ???

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 08/05/2015 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल. रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी. गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले.

फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०.

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 08/05/2015 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
विशेष सूचना: हा लेख 'माझे बरोबर का तुझे बरोबर' ह्या वादासाठी नसून सगळ्या बाजूने विचार करून एखाद्या किंवा अनेक पर्यायांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न समजूया. नुकत्याच झालेल्या ह्या धाग्यावरच्या चर्चेत बरेच मुद्दे मांडले गेले. त्यात काही बाबतीत गोंधळ आहे असं वाटतंय म्हणून नवीन धागा काढतोय. हा सगळा खटाटोप पुन्हा करण्याचं कारण आजच्या ५-८ वयोगटातली मुलं असलेल्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून. आधीच्या धाग्यात चर्चिले गेलेले महत्त्वाचे दोन मुद्दे: १.

रतीब

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 08/05/2015 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून शांताच एक काम हलक झाल होत, ते म्हणजे चंद्रीला चरायला नेण. दिगूने मोठ्या उत्साहाने ते काम अंगावर घेतलं होत. रोज दुपारी त्याचा मित्रांबरोबर कधी विटी दाण्डुचा डाव रंगत होता तर कधी पत्त्याचा. खेळ संपले की मग कैर्या, चिंचा पाडण, त्या मीठ लावून खाण आणि मग विहिरीत डुंबत बसण असा त्याचा उद्योग सुरु असे. संध्याकाळ झाली कि तो चंद्रीला घरी घेऊन येई. तोपर्यंत शांता कधी घर सारवून घेई, तर कधी दळण नीट करून ठेवायची. कधी बायका वाळवण करायला बोलवायच्या मग त्यांना जाऊन मदत करायची. आजही असाच दिगू चंद्रीला रानाकड घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ शांता धुण घेऊन गेली होती.

पुस्तक परिचय : हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी’

लेखक पारुबाई यांनी शुक्रवार, 08/05/2015 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
पद्मजा फाटक या लेखिका म्हणून आणि एके काळी दूरदर्शनवर सुंदर माझे घर सादर करणाऱ्या म्हणून बऱ्याच जणांना आठवत असतील. त्यांना वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अचानकपणे ग्लुमेरेलो नेफ्रायटीस नावाच्या एका असाध्य रोगाला सामोरे जावे लागले. या आजारामध्ये किडन्या पूर्णपणे निकामी होतात. डायलिसीसवर किंवा किडन्या पुनर्रोपण करून आयुष्य वाढवता येते. पण ते असते सर्वसाधारणपणे २-३ वर्षाचे. अश्या अचानक उद्भवलेल्या जीवघेण्या आजाराशी त्यांनी १० वर्षे सर्व शक्तीनिशी झुंज दिली. या झुंजीची कहाणी त्यांनी ‘हसरी किडनी अर्थात अठरा अक्षौहिणी’ या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.