Skip to main content

आशय - भाग ३

लेखक किंबहुना यांनी शुक्रवार, 12/08/2016 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना आणि भाग १ आशय भाग २ रत्नगिरीमधील एक प्रसिद्ध कॉलेज नववीच्या मुलांसाठी एक उपक्रम आयोजित करत असे. त्याचे नाव होते विज्ञानमंच. मुलांना विज्ञानाची आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम आयोजित केला जात असे. त्यासाठी वेगवेगळ्या शाळांमध्ये पात्रता स्पर्धा होत असत. अर्थात एक हुशार विद्यार्थी म्हणून मी देखील या स्पर्धेत भाग घेतला आणि अर्थात पासही झालो.. त्या मुलांचे त्या कॉलेजमध्ये डिसेंबरच्या सुट्टीमध्ये शिबीर होत असे. आम्ही सगळे मित्र त्या शिबिरासाठी रत्नागिरीत आलो.

मढे घाट

लेखक Shivaandhale यांनी शुक्रवार, 12/08/2016 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
मढे घाट “ शिखर फाऊंडेशन ” ने या वर्षातला पहिल्याच पावसाळी ट्रेक चे आयोजन केले होते . या मध्ये ४७ सदस्यांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला .

“Hold the corridor”

लेखक जिप्सी यांनी शुक्रवार, 12/08/2016 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धाचा इतिहास नेहमीच जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो,त्यांच्या सेनापतींनी गाजवलेले पराक्रम,त्यांचे यशस्वी ठरलेले डावपेच यावर चर्चा होतात पण काहीवेळा पराभूत होता होता सुद्धा काही सेनानी आपल्या सैन्याचे भवितव्य लक्षात घेऊन काही महत्वाचे डावपेच आखतात आणि ते यशस्वीपणे पार पाडून दाखवतात.

मदारी...

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 12/08/2016 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
व्यावसायिकतेला धरुन उत्तमोत्तम प्रयोग करणारे, काहिना काही वेगळं देण्याच्या प्रयत्नात असणारे दिग्दर्शक भारतात कमी आहेत पण आहेत. नावच घ्यायची झाली तर शूजित सरकार आहे, प्रवल रमण,निरज पांडे आहे ई...... त्यात एक नाव अजुन येतं....निशिकांत कामत. डोंबिवली फास्टपासुन त्याचा सुरु झालेला प्रवास ४०४ असेल, लय भरी असेल असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत पुढे जातोय. याच प्रवासातला त्याचा नविन चित्रपट म्हणजे मदारी... मदारी...देश सो रहा है.... नावावरुन एक गोष्ट लक्षात येते चित्रपट बहुदा राजकिय वा शासकिय व्यवस्थेवर भाष्य करणारा असवा..मुळात तसच आहे.

सुखासन

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 12/08/2016 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
आले कोण गेले कोण कवतुक आता वाटत नाही , कुणी थांबले हसून बोलले मनात किणकिण वाजत नाही , पानाफुलापक्ष्यांसाठीही दार सुखाचे उघडत नाही . . . इतके माणूस छिलून निघते एकांताच्या सुखासनावर! -शिवकन्या

रात्र.....!

लेखक शंतनु _०३१ यांनी गुरुवार, 11/08/2016 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र एक रात्र ...... एक रात्र शांत बसलेली, उजव्या कुशीवर वळून शांतपणे निजलेली. मनात दिवसभराचा हिशोब मांडते आहे, एक रात्र कपाळाला आठ्या घालून दिवसाबद्दल नाक मुरडते आहे. एक रात्र दिवसाचा श्रम परिहार करते आहे. एक रात्र दिवसच्या रगाड्यातून निवांत पण शोधते आहे. कमाल आहे, निव्वळ प्रकाशाच्या खेळामुळे जागांची ओळख बदलते. एरवी गजबजणारा रस्ता रात्री मात्र निर्मनुष्य असतो, जसा आपला अगडबंब देह जसा अंथरुणावर अस्ताव्यस्त पसरून आराम घेतो. तेव्हा या रस्त्याची भव्यता, सौंदर्य अगदी उठून दिसते. दिवस आणि रात्र यांचा पाठशिवणीचा खेळ मात्र अव्याहत पणे चालू असतो.

अंधविश्वास (४) - सुखाचा शोध

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 11/08/2016 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
अंधविश्वास - (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय? अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा अंधविश्वास भाग (3) - सार्थक लढा समर्थांनी म्हंटले आहे 'जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे'. तरी हि प्रत्येक व्यक्ती सुखाचा शोधात असतो. कधी कधी सुख मिळविण्यासाठी तो शार्टकट मारण्याचा प्रयत्न करतो आणि 'अंधविश्वासाच्या' जाळ्यात अटकतो. सामान्य माणसाची सुखाची कल्पना - इच्छित वस्तू मिळाली पाहिजे, घरात लक्ष्मी आली पाहिजे इत्यादी इत्यादी. अगदी छोट्या छोट्या. सदाशिव अर्थात सदूला हि आर्ची आवडायची आणि आर्चीला परश्या.

कोणते माझे वतन होते

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 11/08/2016 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
रोज थोडे उत्खनन होते ऱोज नात्याचे पतन होते आळ हा गंभीरही नाही पण चरित्राचे हनन होते दोष वणव्याला कसा द्यावा जर इथे गाफील वन होते कोणत्या दुनियेत मी आलो कोणते माझे वतन होते कोठल्या मातीतुनी येते जिंदगी कोठे दफन होते डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस